विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.43.0-wmf.28
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९६
104
72011
209823
206671
2024-10-24T10:40:57Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209823
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग]}} {{right|[८९}}
{{rule}}</noinclude>मंडळयांच्या मार्गाने जाअून अल्पायुषी ठरली; व अमात्यमाधव हें नाटक शेवटचें असल्यामुळे त्याचे प्रयोगहि तिच्या हातून फारसे झाले नाहीत. पहिल्या तीन नाटकांपैकी चंद्रगुप्त नाटक हें कांही विशेष कारणामुळे मला स्वतःला अधिक आवडत असलें तरी, त्यांत विनोदाचा भाग बराच कमी असल्यामुळे चित्ताकर्षक नाटकमंडळी त्याचे प्रयोग थोडे कमी करी. मात्र " तोतयाचें बंड ' आणि 'कृष्णार्जुनयुद्ध' यांच्यावर त्यांचा भर असून तीं त्यांच्या हातून फार चांगली वठत.</br>
{{gap}}(७६) माझीं हीं पहिलीं चार नाटकें १९१२ ते १९९५ या तीन वर्षांत लिहून झालीं आणि चित्ताकर्षक नाटक मंडळी मोडल्यामुळें नवीन नाटकें लिहिण्याचें माझें काम कांही काळ थांबलें. पण १९९८ सालीं फिरून दोन नाटकें लिहिण्याचा प्रसंग आला. तीं 'वीरविडंबन' व 'संतभानुदास' हीं होत. नाटक न लिहिलें तरी नाटकाला अुपयोगी पडण्यासारखीं कथानकें माझ्या डोक्यांत घोळत असतात. त्यामुळे बलवंत नाटक मंडळीने नाटक लिहून मागतांच विराटपर्वांतील अुत्तर गोग्रहणाचा प्रसंग मी नाटक लिहिण्यास घेतला. तो घेण्याचें त्यांतल्या त्यांत अेक विशेष कारण नुकतेंच झालेलें (१९१४-१८) महायुद्ध हें होतें. कीचकवधानंतर लवकरच घडलेला हा प्रसंग असें कल्पून या नाटकाला सुरुवात केलेली आहे. महायुद्ध चाललेलें असतां वीरवृत्तीच्या हिंदी शिपायांना जुलमाने परदेशांत युद्धावर पाठविण्यांत आलें. वाटेल तशी रिक्रूटभरती केली. पण पुष्कळ खरे वीर अज्ञातवासांत राहिले. त्यांना पराक्रम करता आला नाही. ज्यांनी पराक्रम केले त्यांनाहि त्यांचें यश अुघडपणें मिळालें नाही. भलत्याच्या पराक्रमावर भलत्याची कीर्ति व्हावी अशाहि गोष्टी पुष्कळ घडल्या. अिकडे युद्ध चाललेलें असतां चैनबाजी व रंगेलपणा अिग्रज लोकांचा कमी झाला नव्हता. अित्यादि अनेक गोष्टींचे ध्वनि मनांत सारखे अुमटत असतां हें नाटक लिहिलें गेलें आहे. आणि त्याचे प्रयोग होत असतां, प्रथम कांहीं दिवस, महायुद्धाच्या या आठवणी सामान्य माणसाच्याहि मनांत असल्यामुळें, प्रयोग चालला असतां कांहीं खटकेदार वाक्यांवर नेमकी टाळी पडे.</br>
{{gap}}(७७) 'वीरविडंबन' नाटकांत अुत्तराचें पात्र मूळ भारतांत आहे त्याप्रमाणेंच मी रंगविलें आहे. मात्र गायनशाळेंतील प्रसंग अतिशयोक्तिपूर्ण<noinclude></noinclude>
3cjq0kcvw0yquj62t5mlog5pofpb5vp
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२
104
72012
209741
204732
2024-10-24T09:41:02Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209741
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{rh|अेक अुद्योग]||[५}}
{{rule}}</noinclude>{{gap}}(५) वर्तमानपत्राच्या द्वारें मी सार्वजनिक जीवनांत शिरलों. या जीवनांत मतप्रतिपादन हें अेक मुख्य कार्य व ध्येय ठरतें. आणि या कार्यांत लेखनकला हा अेक मुख्य आधार असतो. मराठ्यांत केसरींत लिहूं लागल्याबरोबर प्रथमपासूनच मी सार्वजनिक कार्योपयोगी संपादकीय काम चांगलें करूं शकेन असा विश्वास माझा मला वाटूं लागला, व लोकांच्या तोंडूनहि तेंच समक्ष किंवा परभारें अैकूं येअूं लागलें. मला इंग्रजी-मराठी माझ्या वर्तमानपत्री कामापुरतें तरी चांगलें लिहितां येत होतेंच. पण या कक्षेपलीकडे जाअून मी ग्रंथकारहि होअूं शकलों; आणि तोहि असा की, वर्तमानपत्राचा संपादक म्हणून मिळणाऱ्या पगाराशिवाय केवळ वाङ्मयांत मी कांही थोडा पैसा मिळवूं शकलों. अशा रीतीने तरुणपणीं साहित्य व वाङ्मय हीं माझ्या खासगी व सार्वजनिक जीवनाला आधारभूत झालीं असें मी म्हणतों.<br>
{{gap}}(६) यानंतर संपादकाच्या धंद्यांत मला स्वास्थ्य व निश्चितता मिळाल्यावर, प्रौढपणच्या दशेंत साहित्य व वाङ्मय हें मला भूषणासारखें अुपयोगीं पडलें तें असें. सार्वजनिक जीवनांत पडणारीं कित्येक माणसे बुद्धिमान, अुद्योगी, अुत्साही, प्रामाणिक व तळमळीचीं असतात, व तीं आपापल्या कक्षेत पुढारीपणाहि मिळवितात. तथापि त्यांना विद्वत्तेची जोड असावी तशी कदाचित् नसते, किंवा ती असली तरी त्यांच्या मतप्रसारक लेखां-भाषणांना अेक प्रकारचा रुक्षपणा येतो. सुदैवाने माझ्या बाबतींत तसें घडलें नाही. माझ्या कोणत्याहि राजकीय लेखांत किंवा भाषणांतहि सहजगत्या वाङ्मयसाहित्याची थोडीतरी लज्जत अुत्पन्न झाली नाही असें घडलें नाही. माझे राजकीय विचार, टीका, तत्त्वज्ञान हीं कदाचित् तितकीं खोल नव्हतीं असें कांहीच्या दृष्टीने दिसून आलें असेल. पण माझे राजकीय विचार निदान वाङमयदृष्ट्या चित्ताकर्षक पद्धतीने मांडले जातात ही गोष्ट जवळ जवळ सर्वमान्य झाली होती. म्हणून प्रौढ दशेंत वाङमय व साहित्य हें माझ्या सार्वजनिक जीवनाला अुठाव देणारें, खुलवून सजवून दाखविणारें भूषण झालें असें मी म्हणतों.<br>
{{gap}}(७) यानंतर ओघाने अशी स्थिति प्राप्त झाली की, मी यथाशक्ति करतां आलें तें सर्व करून पासष्टाव्या वर्षी अेक प्रकारें कार्यनिवृत्त झालों.<noinclude></noinclude>
f747f6dwjtrqqk554197p6pz8yimpe8
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४
104
98819
209735
204294
2024-10-24T09:37:23Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209735
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" /></noinclude></br></br>
{{xx-larger|{{center|प्रस्तावनेदाखल चार शब्द}}}}
{{gap}}सोळा वर्षांपूर्वी 'सह्याद्रि' मासिकाच्या एका संबंध अंकांत (सह्याद्रि सप्टेंबर १९४२) कै. न. चिं. केळकर यांनीं आपल्या वाङ्मयसेवेबद्दल सुमारें दीडशें पृष्ठें होईल एवढा एक विस्तृत लेख लिहिला होता. त्याला त्यांनीं " '''माझा जन्मभरचा एक उद्योग''' " असें नांव दिलें होतें. तो लेख आज या पुस्तकाचे रूपानें पुनर्मुद्रित केला आहे. शाळा कॉलेजांत लागणाऱ्या क्रमिक पुस्तकांत तात्यासाहेब केळकर यांच्या वाङ्मयांतील उतारे नित्य आढळतात. पण त्या लेखासंबंधी, लेखकासंबंधी किंवा त्याच्या वाङ्मयसेवेसंबंधी निश्चित अशी माहिती विद्यार्थ्यांना फारच थोडी असते; ती माहिती स्वतः ग्रंथकर्त्याकडूनच प्रायः लिहिलेली उपलब्ध झाली तर अधिक बरें, असाहि हें पुस्तक प्रसिद्ध करण्यांत हेतु आहे.<br>{{gap}}केवळ वाङ्मयापुरतीच नव्हे, तर तात्यासाहेबांच्या इतर सार्वजनिक आयुष्याबद्दलहि थोड्याफार माहितीची विद्यार्थ्यांना जरूर असते. याकरिता, परिशिष्टरूपानें चार विस्तृत मुलाखती या पुस्तकांत छापल्या आहेत. त्यांत त्यांच्या सर्व सार्वजनिक व खासगी आयुष्याचा मार्मिक आढावा संभाषणरूपानें आलेला आहे. "मी कां लिहितों?" हा लेख तात्विक असल्यानें पुस्तकाच्या शेवटीं आलेला आहे. तात्पर्य, कालनिर्देशाचे दृष्टीनें यांतील मुलाखती १९३२ सालच्या; "माझा जन्मभरचा एक उद्योग" हें सह्याद्रींतील लिखाण १९४२ सालचें; आणि "मी कां लिहितों?" हा लेख १९४७ सालचा. यांप्रमाणें, त्यांच्या वाङ्मयविषयक चरित्रासंबंधींचा सर्व मजकूर या पुस्तकांत ग्रथित केलेला आढळेल.</br></br>
{| {{brace table parameters}}
|{{gap}}पुणें ||{{brace|r|t}}||<code>{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''का. न. केळकर.'''
|-
|१ नोव्हेंबर १९५९.||{{brace|r|mb}}||<code>
|-
|||{{brace|r|b }}||<code><noinclude></noinclude>
9m7sv7l41zz3kylo6xt7oqp5b98vd4c
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५
104
98835
209736
204298
2024-10-24T09:37:52Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209736
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" /></noinclude></br></br></br>
{{xx-larger|{{center|अनुक्रमणिका}}}}
{{center|≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈}}
{|
|+
|-
| || {{gap}} पृष्ठ
|-
| १ माझा जन्मभरचा एक उद्योग || {{gap}}१ ते १४०
|-
| २ हार्दिक उद्गार (कविता) || {{gap}}{{gap}}१४१
|-
| ३ परिशिष्ट ( १ )<br>{{gap}}आत्मचरित्रपर मुलाखती || <br>{{gap}}{{gap}}१४३
|-
| ४ परिशिष्ट (२)<br>{{gap}}मी कां लिहितों ? || <br>{{gap}}{{gap}}१८०
|}<noinclude></noinclude>
6ko34wkqwe729bz7jf7elj8rc870za0
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६
104
98841
209737
204299
2024-10-24T09:38:14Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209737
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" /></noinclude>{{Css image crop
|Image = माझा_जन्मभराचा_एक_उद्योग.pdf
|Page = 6
|bSize = 402
|cWidth = 383
|cHeight = 797
|oTop = 3
|oLeft = 18
|Location = center
|Description =
}}<noinclude></noinclude>
owr9unb08lghdc0ur9lwj30p7cn70z6
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९
104
98868
209738
204726
2024-10-24T09:39:32Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209738
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{rh|२]||[माझ्या जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>राहिलों असतों, तर सन १९०० च्या सुमारास मला यथाक्रम मुनसफीची सरकारी नोकरी मिळाली असती. माझ्याबरोबर किंवा अेखादें वर्ष आगमागे, अेल्अेल्. बी. झालेल्या अनेक लोकांना ही नोकरी मिळाल्याचीं अुदाहरणें म्हणून नानासाहेव चापेकर, पाटसकर, रामभाअू बाळ, मेहेंदळे, वागळे, ढेकणे, बापट अित्यादि नांवें सुचतात. यांतले अेकदोन तरी शेवटीं आठशें रुपये पगारावर स्मॉलकॉजेस कोर्टाचे जज्ज झाले. तसा मीहि झालों असतों. निदान पांचसहाशें रुपये पगाराचा फर्स्ट क्लास सबजज्ज तरी झालों असतों. नोकरीला वयाची अडचण न येण्याअितक्या अल्पवयांत मी अेल्अेल्. बी. झालों होतों. कारण मी ती परीक्षा पास झालों तेव्हां माझें वय अवघें बावीस वर्षें तीन महिने अितकेंच होतें. ( २ ) मी १८९५ सालीं वकिलीची सनद घेअून आठ महिने साताऱ्यास वकिली कामें केलीं. त्यांत मला सुमारें चारशे रुपयांची प्राप्तीहि झाली. तोच धंदा करतो तर कालांतराने साताऱ्यास अेक प्रमुख वकील होअून निदान कांही थोडीं वर्षें तरी पांच-सातशें रुपयांची दरमहिना प्राप्ति होणें शक्य होतें. ( ३ ) सातारच्या मुक्कामांत, १८९२ ते १८९४ या तीन वर्षांत, अिंग्रजी निबंध लिहून, सभांपुढे वाचून, मराठींत भाषणें करून, कविता करून, वर्तमानपत्री लेख लिहून, मी लोकांच्या दृष्टीपुढे चांगलाच आलों होतों. आणि यामुळेच अेका सातारकर स्नेह्याच्या शिफारशीवरून मला टिळकांनी केसरी-मराठ्याच्या संपादकवर्गांत दाखल करून घेतलें.</br>
{{gap}}अशा तीन मार्गांनी मला संसार संभाळतां आला असता. आता धोके असलेच तर या तीनहि मार्गांत होतेच. कारण उत्साही वृत्तीमुळे अेखाद्या सभेंत भाषण केल्याने सरकारी 'ब्लॅक लिस्टां'त नांव पडून मुनसफी न मिळती. माझा स्वभाव वकिली धंद्याला न जुळता, तर वकिलीहि कदाचित् बेताबाताचीच चालली असती. पण या दोहोंपेक्षांहि वर्तमानपत्री धंद्यांतली अनिश्चितता अनुभवाला येण्याचा संभवच तेव्हा अधिक होता. कारण तो काळ सरकारी अवकृपेचा; टिळक जहाल पक्षाचे पुढारी; व केसरी हें त्याचें मुखपत्र. शिवाय 'केसरी' पत्र तेव्हा तरी स्वतःच कर्जांत असल्यामुळें आणि 'मराठा' हें कायमचें बुडित खर्चाचें काम ठरलेलें असल्यामुळें मला पगार कितीसा मिळणार ? ती नोकरी तरी कितीशी टिकणार ?<noinclude></noinclude>
dqdb3nlldqmqpx8190oyvgx2dkmhj25
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०
104
98869
209739
204727
2024-10-24T09:40:00Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209739
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग]}} {{right|[३}}
{{rule}}</noinclude>माझें काम टिळकांना कितपत पसंत पडणार ? त्यांचा माझा स्वभाव कसा जुळणार ? सर्वच अनिश्चित. असें असतांहि मुनसफी व वकिली हीं दोनहि सोडून देऊन वर्तमानपत्री लेखकाची जी पहिली जागा मला मिळाली ती मी अुडी घालून घेतली. या सर्वांवरून साहित्य व वाङ्मय ही माझी निष्ठा ठरते--म्हणजे व्यवसायात्मक बुद्धीने निर्णय करून ठरविलेला आत्मविश्वासाचा मार्ग ठरतो असें मी म्हणूं शकतों.</br>
{{gap}}( ३ ) मी पांसष्ट वर्षाचा होअून कार्यनिवृत्त झालों त्या वेळीं मला जी स्थिति लाभली होती तिचीं अनेक कारणें सांगतां येतात. उदाहरणार्थ, केसरीचें संपादकत्व, टिळकांचा आधार व आश्रय, सार्वजनिक कार्यांत दिसून आलेली माझी थोडीशी बुद्धिमत्ता व पुष्कळशी अुद्योग-प्रियता
इत्यादि. तथापि त्यापलीकडच्या मूळ कारणांचा विचार करतां दोन कारणें निश्चितपणें सांगतां येतात. (१) माझी अेल्अेल्. बी. ची पदवी आणि (२) माझी संपादक साहित्यिक होण्याची पात्रता. यांपैकीं कोणतीहि अेक गोष्ट मला प्रथम अनुकूल नसती तर पुण्यास टिळकांकडे येण्याची संधि मला लाभली नसती. टिळकांची त्या वेळची मुख्य नड लॉ-क्लास शिकविण्यासारखा सहकारी व मराठा पत्र चालविण्यासारखा उपसंपादक अेकाच व्यक्तींत मिळणें अशी सजोड होती. आणि या दोनहि नडी अेकाच वेळीं भागविण्यासारखा मी होतों. मी नुसता अेल्अेल्. बी. असतों पण मराठा पत्र चालविण्यासारखा नसतों, तर मला टिळक घेतेना. कारण लॉ-क्लास
चालवूं शकणारे नुसते अेल्अेल्. बी. पुण्यास त्यांना पुष्कळ मिळते. माझ्या आधीचे वाकनीस वकील अेल्अेल्. बी. होतेच ना ! पण ते 'टिळकां' चें मराठा पत्र चालविण्याच्या उपयोगी नव्हते. बरें, मी नुसता मराठा पत्र चालविणारा, किंबहुना समजा चांगलें अिंग्रजी लिहिणारा असतों, तरी तेवढ्यावर टिळक आपणाकडे मला घेतेना. कारण मराठ्याच्या उत्पन्नांतून भर पगारी वेगळा संपादक त्यांना तेव्हा ठेवतां येण्यासारखा नव्हता. मराठ्याच्या अर्धपगाराला लॉ-क्लासच्या पूर्ण पगाराची भर घालावी तेव्हां अेक माणसाला भरपूर देण्यासारखा पगार व्हावयाचा. आता टिळकांनी पुढे खाडिलकरांना ते नुसते बी. अे. होते तरी घेतलें, याचें कारण मी असल्याने त्यांची लॉ-क्लासच्या शिक्षकाची गरज भागली होती. पण खाडिलकर<noinclude></noinclude>
6dc23eiw6acwep181opj04xiiyu13dj
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११
104
98870
209740
204733
2024-10-24T09:40:18Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209740
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|४]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>अेल्अेल्. बी. नव्हते व अिंग्रजी लिहिण्याच्या अुमेदीचेहि नव्हते. यामुळे माझ्याअैवजी तेच प्रथम शिफारस होअून दृष्टीसमोर येते, तरी त्यांना घेऊन टिळकांची मराठा पत्राची गरज भागतीना म्हणून त्यांना टिळकांना घेतां आलें नसतें.</br>
{{gap}}( ४ ) तात्पर्य, माझी दोनहि प्रकारची पात्रता अेकाच वेळीं सिद्ध होती म्हणूनच मला घेणें टिळकांना सोयीचें झालें. पण पुढे तीन वर्षांनी लॉ-क्लास बंद झाला अर्थात् लॉ-क्लासकरिता कायद्याच्या ज्ञानाची गरज संपली होती. लॉ-क्लासचा पगारहि संपला होता. तेव्हा मी पुण्यास
वकिली करून मराठ्याकरिता साठ रुपये घेअून राहण्यास तयार झालों असतों, तर अिंग्रजी वर्तमानपत्री अुपसंपादक म्हणून टिळक मला ठेवून घेते. वर्तमानपत्राच्या संपादकालाहि कायद्याचें ज्ञान असलेलें चांगलें, असें टिळकांना वाटे. म्हणूनच पुढे त्यांनी रा. ग. वि. केतकर ( टिळकांचे नातू ) यांना बी. अे. झाल्याबरोबर केसरीकडे न घेतां अेल्अेल्. बी. कडे घातलें. तथापि वर्तमानपत्राच्या संपादकाला कायद्याचें ज्ञान नसलेंच तरी चालण्यासारखें आहे; मात्र त्याला वर्तमानपत्र चांगलें चालवितां येण्याला लागणारी साहित्यिक या नात्याची पात्रता तरी असावी, हा अनिर्वाहपक्ष टिळक मान्य करीत. आणि मी व खाडिलकर हे १८९७ पासून मराठा व केसरी यांचे अुपसंपादक म्हणून कायम झालों ते शेवटीं आम्हां दोघांच्या साहित्यविषयक पात्रतेमुळे. खाडिलकर शेवटीं अेल्अेल्. बी. झालेच नाहीत, आणि मी असून नसुन सारखाच झालों. तथापि केसरीला हवें तसें खाडिलकर मराठी लिहीत व मराठ्याला हवें तसें मी अिंग्रजी लिहीं. यामुळे आम्हां दोघांविषयी टिळकांना या बाबतींत अितकें समाधान होतें की, आमच्या जागीं अधिक चांगला लेखक म्हणून कोणी आणावा, असें टिळकांच्या मनांत पुढे कधीहि आलें नाही. माझ्यापुरतें सांगण्याचें तात्पर्य अितकेंच की, प्रारंभी जरी माझ्या अेल्अेल्. बी. पदवीने मला निःसंशय हात दिला, तरी पुढे सर्व आयुष्यभर मला माझी वर्तमानपत्री साहित्यिक पात्रताच अुपयोगींं पडली; व मीहि तोच अेक अुद्योग करून राहिलों. म्हणून तत्त्वतः साहित्य हीच
माझी निष्ठा ठरते.<br><noinclude></noinclude>
tmbfrahhdh1w701nh0fqjof3hd9vryt
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१३
104
98890
209742
204736
2024-10-24T09:41:20Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209742
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|६]}} {{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>मग केसरी-मराठ्याचें संचालकत्व सोडलें, पगारी नोकरी सोडली, ट्रस्टीचा अधिकार सोडला, कायदेकौंसिल, म्युनिसिपालिटी अित्यादि आधी सोडलीं होतींच. अितर अनेक मानाच्या अधिकाराच्या जागा सोडून मी मनाने कार्यपराङ्मुख झालों. अिच्छेप्रमाणें काम करावें वा न करावें असें झालें. द्रव्यप्राप्ति अधिक न करतां जन्मभर गरिबी-मध्यमस्थितींतला सुखवस्तु म्हणून राहण्यासारखा झालों. तेव्हा प्रथमच जिवाला रिकामपणीं कांही करमणूक म्हणून हवी अशी आवश्यकता अुत्पन्न झाली. पण शारीरिक व्यायामाची करमणूक होणें मला शक्य नव्हतें. मला पत्ते, बुद्धिबळें असल्या बैठया खेळांची आवड व मन रमण्याअितकें त्यांचें ज्ञानहि नाही. आणि
रिकामा वेळ सापडला म्हणून अुगाच कोणाच्यातरी घरीं किंवा क्लबांतहि जाअून बसून गप्पा मारून वेळ घालविण्याची सवय नाही, स्वभावहि नाही. अशा स्थितींत वाङ्मय व साहित्य यांची करमणूक मला न लाभती, तर माझा वेळ कसा गेला असता याची कल्पनाच होत नाही. १९३२ सालीं माझा ६१ व्या वाढदिवसाचा समारंभ झाला, त्या वेळीं आभारप्रदर्शनाच्या भाषणांत "आजचा हा समारंभ टाअीपरायटरच्या घंटेसारखा कानाला गोड लागणारा, पण 'मर्यादा संपत आली, सावध' असें सुचविणारा, म्हणून भीतिकारक ठरतो" अशी अेक गमतीची अुपमा मी दिली होती. पण त्यानंतर मला आणखी दहा वर्षें आयुष्य अनपेक्षित लाभलें! याचा अर्थ असा- सामान्य टाअीपरायटरची घंटा वाजली म्हणजे अेखादा शब्द लिहिण्यापुरतीच जागा अुरली असें समजावयाचें असतें. पण माझ्या आयुष्याच्या टाअीपरायटरचा सांचा बनविणाराने असा बनविला होता की, घंटा वाजल्यावरहि पुढे लिहून काढण्याला भरपूर जागा राहिली. अर्थात् दहा वर्षें ही घंटा मी कानाने अैकत राहिलों, व त्याबरोबर हाताने टाअीपरायटरचे ठोकेहि पाडीत राहिलों म्हणजे लेखनव्यवसाय करीत राहिलों. केवढी ही गोड करमणूक !</br>
{{gap}}(८) मात्र ही करमणूक करतांना मीं वाङ्मय लिहिलें तें केवळ ललित स्वरूपाचेंच लिहिलें असें नाही. अभ्यास करून लिहावें असेंहि कांही लिहिलें. १९३२ सालीं मला साठावें वर्ष लागलें तेव्हा माझी लेखणी त्यापुढे थांबेल, विश्रांति घेअील, असें अितरांप्रमाणें मलाहि वाटूं लागलें होतें.<noinclude></noinclude>
rciqef5bp9m9kbanw3wbib43rnlk2rb
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१५
104
100050
209743
204737
2024-10-24T09:41:39Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209743
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|८]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>{{gap}}(९) अजूनहि माझा हात थांबलेला नाही. पण यापुढे मी वाङमय लिहिणें म्हणजे ती अेखाद्या व्यसनाची तलफ भागविणें असें कोणी म्हटल्यास मला त्याला नांवें ठेवतां येणार नाहीत. तथापि माझीं संकल्पित अशीं कांहीं पुस्तकें लिहून पुरीं व्हावयाचीं आहेत. त्यांत चार कादंबऱ्या असून त्या अर्धवट लिहून झाल्या आहेत. त्यांचीं नांवें ( १ ) अंधारवड ( २ ) जगाची रीत (३) प्रमिला - नवमहिला व (४) दिवाण झिप्री. याशिवाय (५) जागतिक तत्त्वज्ञानावर निबंधरूप किंवा प्रश्नोत्तर संवादरूप असा सुलभ ग्रंथ लिहिण्याचें माझ्या मनांत आहे. पण या वाङ्मयव्यसनाची तलफ कशी काय भागते, पार पडते, हें आता पाहावयाचें आहे.<br>
{{gap}}(१०) अुतारवयांत मधून मधून आळस झाडण्याकरितां मनुष्याला अेखादें व्यसन अपयोगी पडतें. त्याप्रमाणें कोणी तपकीर, कोणी विडी- सिगारेट, कोणी पान-तंबाखू यांची मदत घेतात. पण पहिली चीज घाणेरडी व दुसरी अपायकारक म्हणून त्या मला नको वाटतात. चार मित्रमंडळींत बसलों असतां, ह्रीं व्यसनें असणाऱ्या अितर कोणाकडून मी तपकिरीची चिमूट घेतों, सिगारेट मागून घेऊन ओढतों. पण त्या वस्तु स्वतःच्या संग्रहीं ठेवून त्याचा नित्य अुपयोग करणें हें माझ्या मनाला मानवत नाही. म्हटलें तर हीं दोनहि व्यसनें प्रतिष्ठितच आहेत. आणि सत्तरी अुलटलेल्या मनुष्याने, वेळ जाण्याकरितां, तसलें अेखादे व्यसन मुद्दामहि स्वीकारलें, तरी त्याला कोणाला भिण्यालाजण्याचें कारण नसतें. बरें, ह्यांच्या खर्चाचीहि अडचण मला नाही. पण त्या व्यसनी पदार्थांच्या अतिरेकाची मनांतून भीति ! मात्र अेक हौस निरुपद्रवी म्हणून ती करावीशी वाटते. ती पानविड्याचें तबक ठेवून मधून मधून विडा करून कुटून खाणें ही होय. कारण अेकदा विडा करून कुटून खावयाचा म्हणजे त्या उद्योगांत सहजासहजी कांही वेळ जाअून विरंगुळा लाभतो. पण हें निरुपद्रवी व्यसनहि मला माझ्या एका विशेष स्वभावदोषामुळे अजून पार पाडवलें नाही. तो दोष म्हणजे स्वत: हाताने अेखादें काम करण्याचा कंटाळा. मग हें काम टेबल पुसण्याचें असो, स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालण्याचें असो, प्रवासाचें सामान जुळवून बांधण्याचें असो, बूट पायांत चढवून त्याच्या दोन्या बांधण्याचें असो, टाअीपरायटरवर लिहिण्याचें असो, वीणा लावण्याचें असो, किंवा हार्मोनिअम<br><noinclude></noinclude>
rbpbousz5u65b62bg0y7j9so0el7oth
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१६
104
100070
209744
204738
2024-10-24T09:41:58Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209744
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग]}} {{right|[९}}
{{rule}}</noinclude>वाजवावयाचें असो. फक्त अेकच गोष्ट मला स्वतःच्या हाताने करतां येते, व ती करण्याचा मनाने कंटाळा येत नाही. ती म्हणजे लेखणी घेअुन लिहिणें. आणि हात थकेपर्यंत तें काम मात्र मी अनेक वेळा केलें आहे. यामुळे अितर रीतीने कंटाळा आला म्हणजे मी कांही तरी पुस्तक घेऊन पान निघेल तेथें वाचूं तरी लागतों, किंवा विचार आला की लगेच लेखणी घेअून तो कागदावर अुतरतों.<br>
{{gap}}(११) याने व्यसनाची तलफ भागल्यासारखें होतें. कारण तलफ भागणें म्हणजे तरी काय ? मस्तकांत साकळून राहिलेल्या रक्ताच्या दाबाला कशाने तरी झटका देणें ! हें रक्त साकळलें म्हणजे डोक्यांत खाजल्यासारखें होतें. आणि हाताने खाजविल्याने जसें शरिराला बरें वाटतें, तसेंच तपकिरीची चिमूट ओढल्याने, विडीचा झुरका मारल्याने, किंवा विड्याचा रस गळ्याखाली गेल्याने ज्ञानतंतु अुत्तेजित होतात. म्हणून लिहिण्याशिवाय पानसुपारीचा संच जुळविण्याचा उद्योग अजूनहि मी करीन, तो कारभार मोठा अुमदा वाटतो. स्वच्छ पितळीं डब्यांत विड्यांची गहिरी पानें भरून ठेवायचीं! त्यांवर ओलें फडकें टाकून ठेवावयाचें! त्यांत सुगंधी केवडा वगैरे घालावयाचा ! तलफ आली म्हणजे प्रशस्त मांडी घालून डबा अुघडायचा ! मग अेकेक पान घेऊन तीं पिकलीं न पिकलीं पाहावयाचें ! त्यांचें डेख व टोक कुरतडून शिरा काढावयाच्या ! ( आणि पानाला धक्का न लावतां शिरा सोलणें ही एक मोठी विद्याहि आहे बरें का ! ) मग पाण्यांत बुडी मारून बसलेल्या चुन्याला बाहेर काढून घेअून, तो न्यायबुद्धीने पानाच्या सर्वांगाला सारखा फासावयाचा! मग त्यावर त्रयोदशापैकी अनुकूल असेल तो अेकेक पदार्थ यथाप्रमाण घालावयाचा ! मग तोंडांत दांत असल्यास पट्टी करून तोंडांत घालून चावावयाची, किंवा दांत पडलेले असल्यास खलबत्त्यांत कुटून चांदीच्या चमच्याने पानावर काढून घेअून त्याची गोळी करून तोंडांत घालावयाची ! आणि मग मधून मधून मुखरस गळयाखाली सोडीत असतां, तोंडावरून (विशेषतः मिशा असल्यास) अैटीने हात फिरवावयाचा ! या वेळीं कोणी बोलावयाला आल्यास त्याच्याबरोबर अर्धे ओठ मिटून, राजदरबारीं नोकर धन्यापुढे बोलतात त्याप्रमाणें - - अदबीने पण वस्तुतः तोडांतील लाल मुखरस कपड्यावर सांडेल या भीतीने-<br><noinclude></noinclude>
dmsf1y3fjotwzo6rmhz80ttknmj8cc4
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१७
104
100102
209745
204740
2024-10-24T09:42:09Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209745
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१०] }}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>बोलावयाचें ! आणि असा अेक बार भरला म्हणजे मग कांही पानें काढून घेअून, कुजट भाग कातरून, तीं फडक्यावर पुसून पुन: डब्यांत भरून त्याला झांकण लावावयाचें! या गोष्टीला पांच मिनिटें लागतात व केवढी निरुपद्रवी करमणूक होते ! ( वरील वर्णनांत हातावर तंबाखु-जरदा चोळून, त्याची चिमूट हळूच तोंडांत टाकून, हात झाडावयाचा समावेश मी केला नाहीच ! )<br>
{{gap}}(१२) असो. व्यसनाचें हें कौतुक बस्स झालें. माझ्या लिहिण्याच्या व्यसनासंबंधी हें सांगावयाचें की, तेंहि या पानविड्याच्या व्यसनासारखेंच विरंगुळा लाभविणारें व निरुपद्रवी आहेच. पण त्याचा दुसराहि अेक अुपयोग मला अलीकडे होअूं लागला आहे तो असा. कोणाहि माणसाच्या डोक्यांत कोणते ना कोणते तरी विचार अेकसारखे घोळत असतातच. पण वार्धक्यामुळे हल्ली माझें असें होअूं लागलें आहे की, त्यांतला अेखादा विचार डोक्याची पकड घेतो. वरचेवर तोच आठवावा, घर करून राहावा, दुसन्या विचाराला त्याने जागा देअूं नये - तात्पर्य, भोवरा फिरत राहिल्याने तो जसें जमिनींत भोक पाडतो तसें या विचारामुळे होतें. पण मौज ही की, तो डोक्यांतून काढून टाकण्याचा अेक अुपाय हटकून यशस्वी होतो. असा की, तो विचार कागदावर अुतरावा म्हणजे झालें ! मी असें अैकलें आहे की, कोर्टांत मुकदमा भांडून निकालांत निघेपर्यंत, म्हणजे वकिलाला बोलावयाचें तें बोलून होअीपर्यंत, वकिलाच्या डोक्यांत मुकदम्याच्या किती तरी गोष्टी --रकमा, तारखा, निशाण्यांचे नंबर, दस्तअैवजांतील महत्त्वाचीं वाक्यें - भरून राहिलेल्या असतात. जितक्या की, कागद पाहिल्याशिवाय त्या तो तोंडाने सांगू शकतो; पण काम संपवून घरीं येअून ते कागद त्याने टाकून दिले की, तो त्या सर्व विसरून जातो. त्याप्रमाणें हल्ली असा डोक्याचा ताबा घेअून राहणारा विचार मी कागदावर लिहून टाकला, म्हणजे एखाद्या हट्टी समंधाने गती घ्यावी त्याप्रमाणें तो नाहीसा होतो.<br>
{{gap}}( १३ ) अशा रीतीने व्यसनाची तलफ भागविण्यासारख्या लिहिलेल्या वाङ्मयाचे गुण केव्हा केव्हा कमी प्रतीचे भरण्याचा संभव सहजच असतो. यामुळे अेखाद वेळ असें वाटतें की न लिहिलेलें बरें. पण<noinclude></noinclude>
kytth7kikntbinrhfoa2r3xns8ybot5
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१८
104
100133
209746
204742
2024-10-24T09:42:21Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209746
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग]}}{{right|[११}}
{{rule}}</noinclude>सुदैवाने आता या वयांत लिहिलेल्या वाङ्मयाला कोणी बरें म्हटलें, वाअीट म्हंटलें, तरी मला त्याची किंमत सारखीच वाटते. साहित्यशास्त्री मम्मट याने काव्याचीं (म्हणजे साहित्याचीं) जीं प्रयोजनें सांगितलीं आहेत त्यांतील अेकहि आता माझ्या वाङमयलेखनाला लागू पडणारें नाहीं. यश, द्रव्यप्राप्ति अित्यादि जे लाभ मला वाङ्मयलेखनापासून व्हावयाचे, म्हणजे होणें योग्य किंवा अपेक्षित, तितके सगळे मला मिळून चुकले आहेत. वडिलकीच्या नात्याने साहित्याचार्य असें मला कोणी म्हणतात तें कदाचित् ठीक असेल. पण त्यानंतर 'साहित्यसम्राट् ' ही जी पल्लेदार पदवी कांहीच्या कडून मला लावण्यांत येते, ती मनाला बरी वाटत नाही, कारण तिच्या योगाने त्यांच्या गौरवबुद्धीपेक्षा माझा गर्वच अधिक दिसायचा ! बरें, माझ्या लेखनकलेच्या दोषांचा अुल्लेख टीकाकारांकडून व्हावयाचा तो पूर्वीच झाला आहे, व त्या दोषांत मी अलीकडे नवी भर घातलेली नाही. आता माझें पाहणें अितकेंच असतें की, हल्ली जें मी लिहितों तें केवळ म्हातारपणाच्या दोषांमुळे अगदी भलतेंच कांही तरी लिहीत नाहीना ! पण अजून तशी भीति फारशी वाटत नाही. कारण अद्यापि मला लिहिण्याला नवे विषय किती तरी सुचतात. माझ्या बुद्धीला, सारग्राहकतेला, सारासार विवेकाला, कोणतीहि मोठी विकृति जडलेली नाही, आणि मी जें कांही
लिहितों तें विशेष नांवाजण्यासारखें नसलें, तरी विशेष नांवें ठेवण्यासारखेंहि नसतें असा विश्वास माझा मला वाटतो. कारण मी जें लिहितों तें साधार असतें, व अुपयुक्तहि असतें. माझ्या बरोबरीच्या साहित्यिकांना त्यांत कांही विशेष नाही असें वाटलें तरी, असा अेक मोठा वाचकवर्ग
आहे की जो माझे लेख अुत्सुकतेने व आदरवुद्धीने वाचतो. आणि अशा वाचकांची मी करमणूक तरी करतों, किंवा त्यांना कांही नवीन सांगतों, असें मला समाधान वाटतें. न लिहिण्याला काय घ्याल असें मला कोणी म्हणण्याची वेळ खास आलेली नाही. शिवाय विषयवैचित्र्य हा जो माझ्या
वाङ्मयांत असलेला अेक गुण तो अजून कायम आहे. वाङमयाचा हा किंवा तो अेकेक विशिष्ट प्रकारच घेतला, तर त्यांत केव्हा केव्हा माझ्यापेक्षा अधिक चांगली निर्मिति करणारे लेखक आहेत. आणि त्यांचें तें यश मी निर्मत्सरपणें केव्हाहि कबूल करतों. पण अुलट त्यांनाहि हें कबूल करावें<noinclude></noinclude>
oved1lzq1lv5q0hogpad95fi54liywr
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१९
104
100134
209747
204753
2024-10-24T09:42:51Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209747
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१२]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>लागेल की, माझें लेखन अनेकांगी आहे, यामुळे त्याचा अुपयोग जसा सर्व प्रकारच्या वाचकांना होअूं शकतो, तसा त्यांच्या अेकांगी लेखनाने होत नाही.</br>
{{gap}}(१४) मी वाङ्मयलेखनांत कालक्रमाच्या जोरावर अेखादें विशेषस्थान मिळविलें असलें, तरी मी हें प्रांजळपणें कबूल करतों की वाङ्मयांत असें स्थान आज न मिळणारापेक्षा मी अधिक बुद्धिवान आहें असें मुळीच नाही. माझी बुद्धि कांही कांही कार्यांमध्ये कमीच पडली याचें प्रमाण हें की विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांत म्हणजे परीक्षांमध्ये मला कोणताहि विशेष मिळवितां आला नाही, बक्षीस लाभलें नाही, स्कॉलरशिप नाही, फेलोशिप नाही. यामुळे मी अुदरनिर्वाहाचा धंदा शोधूं लागलों तेव्हा कोणत्याहि विषयांत कॉलेज प्रोफेसर होअूं शकलों नाही. ती गोष्ट माझ्या आशेच्या पलीकडची वाटे. नेहमी तिसऱ्या वर्गांत पास होणाऱ्या मला प्रारंभीं तरी शाळामास्तरीपेक्षां शिक्षणक्षेत्रांत अधिक कांही लाभलें नसतें. अेल्अेल्.बी.च्या परीक्षेने चालचलाअू वकिलीला लागणाऱ्यापेक्षा अधिक ज्ञान मला कायद्यांतहि लाभलें नव्हतें. अुलट माझ्याबरोबरीच्या विद्यार्थ्यांत कित्येक असे बुद्धिमान असत की ते दुसऱ्या पहिल्या वर्गांत हटकून पास व्हावयाचे, बक्षिसें, स्कॉलरशिपा, शिष्यवृत्त्या मिळवावयाचे. त्यांच्याकडे पाहून मी मनांत खट्टू होअीं. कनिष्ठतेच्या भावनेने चेपून दडपून जाअीं. कॉलेजांतील सर्व काळ मी या ' न्यूनगंडा ' च्या दडपणांत काढला. आणि मला असेंहि वाटतें की, या माझ्या समकालीन विद्यार्थ्यांनी आपली सरस ुद्धि माझ्या प्रमाणें वाङ्मयलेखनाकडे लावली असती तर त्यांच्या माझ्यामधलें मान्यतेचें अंतर मला त्यांनी केव्हाहि तोडूं दिलें नसतें. पण अितर अशा धंद्यांत ते शिरले की त्यांना त्यांत माझ्यापेक्षा द्रव्यप्राप्ति अधिक झाली तरी लोकप्रसिद्धि माझ्यापेक्षा कमी लाभली. अुत्तम वकील किंवा अुत्तम कायदेपंडित न्यायाधीश झाला तरी त्याची प्रसिद्धि त्याच्या तालुक्याजिल्ह्यापुरती. पण संपादकाची जागा ही अशी आहे की तिजमुळे मनुष्याला प्रमाणाबाहेर बिनहिशेबी प्रसिद्धि मिळते. आणि त्यांतच माझ्या वाङ्मयलेखनाच्या सापेक्ष यशाची भर पडल्यामुळे, आणि लोकांना प्रिय वाटणा-या राजकारणी अुद्योगाचा त्याला पाठपुरावा मिळाल्यामुळे, मी माझ्या समकालीन विद्यार्थ्यांपेक्षा अधिक बुद्धिवान असा माझा खोटा लौकिक झाला ! यांत मला चांगलें<noinclude></noinclude>
pgv5il1lah8r3u2dcfj7pw2z73w0y4t
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२०
104
100483
209748
204754
2024-10-24T09:43:32Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209748
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग]}}{{right|[१३}}
{{rule}}</noinclude>किंवा वाअीट वाटण्यासारखें काय आहे ! पण आपपर तुलना करतांना मला न्यायबुद्धि सोडतां येत नाही.</br>
{{gap}}(१५) त्यांतल्यात्यांत मौज ही वाटते की ज्या अेका दिशेने मोठेपणा किंवा कीर्ति लाभण्याचा संभव विद्यार्थिदशेंत मला स्वप्नांतहि आला नाही, आणि वर सांगितल्याप्रमाणें, त्या दशेंतलें सगळें आयुष्य मी न्यूनगंडाच्या आपत्तींत घालविलें, त्या दिशेने शेवटीं शेवटीं मला तें यश अनपेक्षित रीतीने लाभलें. तें असें--वाङ्मयलेखक व ग्रंथकार असा माझा लौकिक झाल्याने मला मुंबअी नागपूर विद्यापीठांत अेम्. अे. च्या परीक्षांत परीक्षक म्हणून नेमण्यांत आलें. प्रारंभीं सहजच दुर्लभ वाटणारी प्रोफेसरी शेवटीं लाभून, विद्यापीठाने मला पीअेच्. डी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक नेमलें ! म्हणजे विद्यापीठांत मराठी या अभ्यासविषयासंबंधाने मिळण्यासारखा जो जास्तींत जास्त मान तो मला मिळाला. मी युनिव्हर्सिटी फेलोच्या निवडणुकीला अुमेदवार म्हणून उभा राहिलों असतों तर हटकून निवडून आलों असतों. विद्याखात्यांतले अितर श्रेष्ठ मानहि मला कांही मिळाले. अुदाहरणार्थ, डेक्कन अेज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळांत माझी आज आठदहा वर्षें निवडणूक होत आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचा तर मी कैक वर्षें चेअरमनच आहें. भांडारकर संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचाहि मान मला अनेक त्रैवार्षिक निवडणुकींत मिळाला. आणि ओरिअेंटल कॉन्फरन्सच्या अेका शाखेचा अध्यक्षहि अेक वेळ मी निवडला गेलों.</br>
{{gap}}(१६) पण याहिपेक्षा जो अेक अवांतर मान मला मिळाला तो सांगण्यांत मला फारच आनंद व अभिमान वाटतो. तो म्हणजे डेक्कन कॉलेज अिन्स्टिट्यूटच्या ट्रस्टीशिपचा. त्याचें कारण असें - कोणाहि विद्यार्थ्याला आपलें कॉलेज म्हटलें की त्याविषयी प्रेम तर वाटतेंच; पण भीतिगर्भ आदरबुद्धिहि मनांत अितकी वाटते की ती सांगतां पुरवत नाही. डेक्कन कॉलेजांत मजप्रमाणें अेक वेळ असणाऱ्या कोणाहि विद्यार्थ्याने त्या वेळची आपली भावना स्मरणाने मनांत आणावी. म्हणजे मग, कॉलेज हें अेक पूजनीय दैवत, व आपण केवळ त्याचे पूजक व्हावें अितकीच आपली<noinclude></noinclude>
qin86mfl1llatf10w3cyl8a6u59b86i
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२१
104
100490
209749
204174
2024-10-24T09:43:47Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209749
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१४]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>योग्यता, याहून पुढे जाअून अधिकारी या नात्याने त्याच्या पायरीला पाय लावणें हा अुपमर्द, अशी भावना असल्याचें त्याला स्मरेल. आणि मी तर स्वतःविषयीं क्षुद्र भावनेने ग्रासलेला असा विद्यार्थी! त्या वेळीं मला जर कोणी असें म्हटलें असतें की ' केळकर, तुम्ही अेक वेळ या कॉलेजचे ट्रस्टी ( म्हणजे मर्यादित मालकच ) व्हाल', तर मी त्याला काय म्हणालों असतों याची कल्पनाच करावी ! परंतु ती गोष्ट यदृच्छेने घडली खरीच. सरकाराने डेक्कन कॉलेज बंद करून अिमारती विकायला काढल्या. त्याविरुद्ध फिर्याद होअून अखेर हायकोर्टांत आपसांत समजूत झाली, व डेक्कन कॉलेजचें संशोधन-संस्थेत रूपांतर होअून अिमारतीचा ट्रस्ट करून ती पांच ट्रस्टींच्या स्वाधीन करण्यांत आली. तेव्हा ना. खेर यांनी मला त्यांपैकी अेक ट्रस्टी नेमलें. या नेमणुकीनंतर मी अेकदा मुद्दाम अेकटाच जाअून डेक्कन कॉलेजच्या अिमारतींना भेट दिली. आणि मी १८९१ चा कॉलेजचा जुना विद्यार्थी, व आज १९३९ सालपासूनचा त्या अिमारतीचा ट्रस्टी, या दोन मानसिक अवस्थांची सांगड घालून देअून विचारांत व महानंदांत दंग होअून गेलों</br>
{{gap}}(१७) तात्पर्य, माझ्या वेळच्या विद्यार्थ्यांपैकी जे अत्यंत हुषार बुद्धिमान होतकरू विद्यार्थी होते त्यांनी पुढच्या आयुष्यांत मिळविलेली कीर्ति व यश, आणि त्यांच्या वेळीं स्वतःकडून व लोकांकडून अगदी सामान्यांमध्ये गणल्या गेलेल्या, व ज्याच्याविषयी कोणताहि भावी अुज्ज्वल मनोरथ बांधतां येत नव्हता अशा मला, अुत्तर आयुष्यांत लाभलेली कीर्ति व यश, याची तुलना केली म्हणजे, दैवाच्या कर्तबगारीचें नवल वाटतें याहून अधिक कांही म्हणतां येत नाही !</br>
{{gap}}(१८) मी सांगत होतों तें हें की, माझ्या समकालीन कांही विद्यार्थ्यांमध्ये मी कमी बुद्धिवान होतों. उदाहरणार्थ, गणित किंवा विज्ञान हे विषय प्रयत्न करूनहि मला चांगले शिकतां आले नसते असें मला खचित वाटतें. आणि पहिल्या बी. अे. पर्यंत मी या विषयांत कसा पास होत गेलों याचें माझें मलाच नवल वाटतें. असें असतां भाषाविषयांत माझी गति त्या मानाने बरी झाली याचें कारण इतकेंच की, बुद्धीचा तो विशिष्ट प्रकार मला जन्मतःच अनुकूल होता. आणि असें म्हणावेंच लागतें. कारण मनुष्य-<noinclude></noinclude>
6tvsnn3z4beddqcfnqmwq3gwckpg4h6
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२२
104
100597
209750
204756
2024-10-24T09:44:16Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209750
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />अेक अुद्योग]{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}[१५</br>
{{rule}}</noinclude>बुद्धीला सर्व विषय सारखेच ग्राह्य नसतात. तसेंच कोणाला अेका विषयांत गोडी वाटते, तर कोणाला दुसऱ्याच अेखाद्या विषयांत गोडी वाटते, याचेंहि कारण सांगतां येणें कठीण आहे. हें कारण कदाचित् मानसशास्त्रापेक्षा शारीरशास्त्रच अधिक सांगूं जाणे. इतकें मात्र माझें मला स्मरतें की आम्हा तिघां भावांपैकी दोघां वडील भावांनी भौतिक विज्ञान हा विषय बी. अे.ला घेतला होता, व त्यांपैकी अेकाने तर ( माधवराव) बी. अें.त दुसऱ्या वर्गात येअून युनिव्हर्सिटींतली स्कॉलरशिप व दक्षिणा-फेलोशिप मिळविली. अुलट मी भाषाविषय अैच्छिक घेतला.</br>
{{gap}}(१९) वाङमयाची आवड ही अितर कलांच्या आवडीप्रमाणें पुष्कळशी अुपजत असते. वाङ्मयलेखनाची आवड तरी मुद्दाम लावून घेअून कोणाला लागत नाही. वर्षेचीं वर्षें किंवा जन्मभर वाङ्मयाच्या वाचनांत घालवून ती लागतेच असेंहि नाही. याचें अेक अुदाहरण प्रो. जिनसीवाले हे होत. त्यांचा स्वतःचा पुस्तकसंग्रह फार मोठा होता. आणि त्यांतलीं बहुतेक पुस्तकें त्यांनी वाचलीं होतीं, असें त्यांतील खुणांवरून मीं स्वतः पाहिलें आहे. पण जिनसीवाल्यांचा म्हणून अमुक हा अेक लेख असें कोणासहि सांगतां येणार नाही. कारण त्यांनी साऱ्या जन्मांत कांही लिहिलेंच नाही. याच्या अुलट हल्ली हायस्कुलांतील मुलेंदेखील आपलीं हस्तलिखित मासिक पुस्तकें काढून त्यांत चांगले लेख लिहितात असें आढळतें.</br>
{{gap}}(२०) अुचित समर्पक शब्दयोजना करणें ही गोष्ट लहानपणापासूनच थोडीशी माझ्या अंगीं होती असें वाटतें. त्याविषयी अेक आठवण सांगतों. अिंग्रजी शाळेंत माझ्या वर्गात बंडु अप्पा तावरे म्हणून अेक जैन विद्यार्थी होता. त्याचें गणित चांगलें असे व माझें वाअीट असे. अेक दिवस मीं त्याला विचारलें की, "मास्तरांनी गणित घातलें की, लगेच तुला त्याची रीति बरोबर कशी रे सुचते ?" त्याने अत्तर दिलें, तुला भाषांतरांत किंवा निबंध-लेखनांत मास्तरांच्या पसंतीला पडतील असे शब्द लगेच सुचतात तशी. " त्याचें हें म्हणणें खरें होतें. कारण भाषांतर किंवा निबंध यांमध्ये मला हायस्कुलांत नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरचे मार्क<noinclude></noinclude>
9lrm31afa99cxj5uyet3mpdhkle1xx9
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२३
104
100891
209751
204761
2024-10-24T09:44:44Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209751
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१६]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>मिळत. कवितेसंबंधानेहि तीच गोष्ट. आमचे गुरुजी वासुदेवशास्त्री खरे हे मुलांना स्वतः कविता करून दाखवीत व त्यांच्याकडून करवून घेत. अेक वेळ त्यांनी 'रामवनवास' या विषयावर संस्कृत श्लोक करावयास सांगितले. तेव्हा मी सात आठ श्लोक केले. त्या श्लोकांची त्यांनी प्रशंसा केली व म्हणाले, “ बी. अे.च्या वर्गांतील सामान्य विद्यार्थ्याला असे श्लोक करतां येणार नाहीत." त्यांतल्या कांही ओळी आठवतात त्या अशा --</br>
{{gap}}{{gap}}'''दुःखार्ता विजहुर्मृगादि पशवो ग्रासान् मुखस्थानपि'''</br>
{{gap}}{{gap}}'''मौनं कांचनपंजरस्थ विहगैः शोकाकुलैः स्वीकृतं'''</br>
{{gap}}{{gap}}'''वीणावादननर्तनादिसकलाः सौख्योपभोगा गताः'''</br>
{{gap}}{{gap}}'''रामे गच्छति काननं हि गहनं किं कस्य सौख्यं भवेत्'''</br>
पण वाङ्मय सोडून व्याकरण विषयाकडे वळले असतां त्यांत मला विशेष गोडी वाटत नसे. मॅट्रिक्युलेशनच्या प्रिलिमिनरीमध्ये मी संस्कृत व अिंग्लिश भाषेच्या विभागामध्ये पास होअून बराच वर आलों, पण माझ्या व्याकरणाच्या अुत्तराच्या कागदावर परीक्षकाने ' जवळ जवळ शून्य' हीं अक्षरें बोटभर लांबरुंद लिहिलेलीं आढळलीं. याच वेळेस, हायस्कुलांत असतांनाच, मराठी कविता करावयास शिकण्याकरिता मी संस्कृत सुभाषितांचीं भाषांतरें करण्याचा अुपक्रम योजला होता. त्यांतील अेक आठवतें तें असें -
{{center|'''पीअूनि निरवशेषा कुसुमरसा'''}}
{{center|'''आपुल्या कुशलतेने'''}}
{{center|'''गुंजन भृंग करी तें अितरांचें'''}}
{{center|'''कार्य सफलतेतें ने ॥'''}}
{{center|( ही गुप्तदूत-विषयक अन्योक्ति आहे ).}}
{{gap}}(२१) अभ्यासाचे विषय सोडून अवांतर वाचनाचा नाद मला कॉलेजांतच लागला. त्या नादामुळे क्वचित् परीक्षेला धोका येतो की काय असेंहि वाटे. पण सुदैवाने तसें झालें नाही. गणित सायन्स अशा नावडत्या विषयांतहि, पण अगदी जरुरीपुरते मार्क मिळवून, मी पास होत गेलों. बी. अे.च्या प्रिलिमिनरी परीक्षेनंतर अेक गोष्ट अशी घडली की, अेक ‘ चीप जॅक' बुकविक्या डेक्कन कॉलेजांत आला, व पांच रुपयांत स्कॉट्च्या<noinclude></noinclude>
9t7syxlldt6ll8tkjgem11bijooii5j
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२४
104
100898
209752
204778
2024-10-24T09:44:58Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209752
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग]}}{{right|[१७}}
{{rule}}</noinclude>सगळ्या कादंबऱ्या ( बारीक टाअीपांतल्या) तीन व्हॉल्यूम्समध्यें बांधलेल्या जुनीं बुकें म्हणून त्यानें मला विकत दिल्या. तीं वाचण्यांत माझा अितका वेळ जाअूं लागला की, शेवटीं अभ्यासाचा अेक विषय जो बेकन तो कच्चा राहिला, व त्या पेपरमध्यें माझें कसें होअील ही भीति मला अखेरपर्यंत वाटे. अितकी की, माझ्या 'नाअिटमेअर'च्या म्हणजे दुःस्वप्नांच्या विषयांत ती अेक बाब अजूनहि केव्हा केव्हा येते ! आणि जागा झाल्यावर माझें मला
हसूं येतें, व जीवाला सुख वाटतें की बेकन कच्चा राहिल्याने परीक्षा नापास होण्याची भीति आता तरी राहिली नाही !
{{gap}}(२२) बी. अे. वर्गामध्ये असतां त्या वर्षाच्या मे महिन्याच्या सुट्टींत डेक्कन कॉलेजांत मी मुद्दाम राहिलों, घरी गेलों नाही. आणि कॉलेजच्या विषयांचा अभ्यास करतांना, त्याबरोबरच आपण कांही तरी मराठी लिहावें अशी अिच्छा मला प्रथमच झाली. तेव्हा मराठी भाषा लिहितां यावी म्हणून प्रयोगादाखल, माझें अेक आवडतें अिंग्रजी पुस्तक (मूळचें फ्रेंच) 'पॉल आणि व्हर्जीनिया' यांतील कांही वनश्रीवर्णनात्मक व कांही बालचरित्र भागांचें मराठी भाषांतर मी केलें असें आठवतें. अेल्अेल्.बी. च्या अभ्यासाला सुरुवात केली त्याबरोबर गद्यलेखन व कविता करणें या दोनहि गोष्टी मी सुरू केल्या. या वर्ष दोन वर्षांत मी केलेल्या कांही कविता हरिभाअू आपट्यांच्या 'करमणूक' पत्रांत तेव्हा छापल्या होत्या. तसेंच अर्धें भाषांतर व अर्धे स्वतंत्र अशी अेक सरमिसळ कादंबरी, स्कॉट्च्या 'रोकबी' नामक काव्यावरून. मी लिहिली होती, व हरिभाअू आपटे यांना दाखविली ती त्यांना आवडली. पण " करमणुकींत चालू कादंबरी अशी अेकच घेतों, व ती मीच लिहीत असतों, म्हणून मला तुमची ही अनेक भागांची कादंबरी
घेतां येणार नाही " असें त्यांनी मला सांगितलें.
{{gap}}(२३) या अेकदोन वर्षांतच मी वर्तमानपत्रांत पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केली. त्या (१८९३) सालीं अेल्अेल्. बी.च्या टर्मसंबंधाने युनिव्हर्सिटीने कांही भानगड केली होती. त्यावर टीका करून मी अेक पत्र 'टाअिम्स ऑफ अिंडिया' मध्ये लिहिलें होतें. आणि कर्मधर्मसंयोगाने त्याच पत्राशेजारी डॉ. मॅकिकन यांचें दुसऱ्या अेका विषयावर पत्र छापण्यांत आलें</br>
{{gap}}मा. ज. अु. २<noinclude></noinclude>
54rmp06vimt9znjjyxax50w4kh6omh5
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२५
104
100899
209753
204781
2024-10-24T09:45:28Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209753
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१८]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>होतें. तें पाहून माझ्या सोबत्यांनी आश्चर्य प्रगट केलें. मला केवढा अभिमान वाटला तो सांगतां पुरवत नाही. तसेंच या सुमारास टिळक व आगरकर या दोघांचे वाद केसरी व सुधारकांतून जोराने सुरू होते. त्यांना अुद्देशून, त्या दोघांनाहि दोष देअून, टीका केलेलें अेक पत्र मी 'ज्ञानप्रकाश' कडे पाठविलें. त्या पत्राची नक्कल मी कौतुकाने अजून जपून ठेवली आहे. हें पत्र ' गतगोष्टी' या पुस्तकांत पृष्ठ १६९-७३ येथे सर्व छापलें आहे. याच दोन वर्षांच्या अवधींत ' शिवाजीचा बंदिवास व सुटका' या विषयावर मी अेक नाटकहि लिहिलें होतें. परंतु तें कै. वासुदेवशास्त्री खरे यांजकडे वाचण्यास दिलें असतां त्यांनी अैतिहासिक दृष्टीने नापसंत करून, त्यांत अितक्या चुका दाखविल्या की तें पुढे छापण्याच्या भानगडींत मी पडलों नाही. मात्र अेल्अेल्. बीच्या अभ्यासाकरिता साताऱ्यास असतां, तेथे कोणी अेका बंडोपंत दाढे नामक गृहस्थाने खासगी नाटक कंपनी काढली होती तिने तें नाटक बसविण्यास घेतलें होतें. पण प्रयोग होण्यापूर्वीच कंपनी मोडली आणि त्यांनी माझ्या नाटकाची प्रतहि हरवली! तेव्हापासून कोणाची हस्तलिखित प्रत म्हटली म्हणजे मला त्याची बेसुमार जबाबदारी वाटते; व म्हणून मी ती सहसा ठेवून घेत नाही.
{{gap}}(२४) साता-यास अेल्अेल्. बी. चा अभ्यास करीत असतांच, तेथील पुढारी काँग्रेसहून जाअून आले म्हणजे त्यांच्या अभिनंदनार्थ कविता व पदें करणें व त्यांच्याविषयी सर्भेत भाषणें करावयाचीं तीं लिहून पाठ म्हणणें, ही कामगिरी मजकडे येत असे. कै. दत्तोपंत पारसनीस यांनी अेक लहानसें मासिक पुस्तक सुरू केलें होतें, त्यांत मी लहानसहान लेख लिहीत असें. या मासिक पुस्तकाचें नांव सुप्रसिद्ध 'केरळकोकिळ' याच्या अनुकरणाने
'महाराष्ट्र-कोकिळ" असें ठेविलें होतें. तसेंच साताऱ्यास अेल्अेल्. बी. चा अभ्यास करतांना Toleration व Legal Profession या विषयांवर मी अिंग्रजी निबंध लिहून सभेपुढे वाचले. पैकी दुसऱ्या निबंधांत मी केलेल्या वकिलीच्या धंद्यावरील टीकेने वकिलमंडळींत बरेंच काहूर माजलें असें मला स्मरतें. यावेळी साताऱ्यास " बोधसुधाकर" या नांवाचें अेक जुनें वर्तमानपत्र असे. त्याचे संपादक वामनराव दीक्षित म्हणून असत. ते अिकडून-तिकडून कोणाचे तरी लेख घेऊन वर्तमानपत्र भरून काढीत. आणि हा अेक बरा<noinclude></noinclude>
onvx27ndwsw4kyajkar9hkirmsj6ngv
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२६
104
100900
209754
204782
2024-10-24T09:45:45Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209754
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग]}}{{right|[१९}}
{{rule}}</noinclude>लिहिण्याचा नादी आहे असें पाहून त्यांनी तें पत्र जवळ जवळ माझ्या स्वाधीन केलें, व त्यांत मी कांही विनोदी व कांही टीकात्मक असे लेख लिहीं.
{{gap}}(२५) मी बी. अे.च्या वर्गांतच वाङ्मय लिहिण्याला सुरुवात केली, पण कोल्हटकरांप्रमाणे स्वतंत्र निर्मिती करण्याची पात्रता माझ्या अंगीं तेव्हा मला वाटत नव्हती. तथापि श्रेष्ठ वाङ्मयाच्या गुणांची जाणीव मला होती. म्हणजे विचारसौंदर्य, अुचित समर्पक शब्दयोजना, ध्वनिमाधुर्य, वाक्यांतील तालबद्धता, अित्यादि गोष्टी मला तेव्हा स्वतः निर्माण करतां न आल्या
तरी अिंग्रजी ग्रंथकारांत त्या आढळल्या तेथे तेथे त्यांनी माझ्या मनाची फ्कड घ्यावी असें होअी. आणि अुमेदीने मनाला असा प्रयोग करावासें वाटे की, अिंग्रजींत जर या गोष्टी साधतात तर त्या मराठींतहि कां साधूं नयेत ? भाषांतर म्हणजे अुसनवारी तर खरीच. पण केवळ भाषा बदलल्याने या गोष्टी सर्वस्वी नष्ट कां व्हाव्या ? वाचनाच्या अधिक व्यासंगाने व बुद्धीच्या परिणतीमुळे, जर आपणाला स्वतंत्र निबंध किंवा वर्णनें यांचे विषय सुचूं लागले व विचारसामग्री सिद्ध होअूं लागली तर वरील सर्व गुण प्रकट होण्यासारखें लेखन मराठी भाषेंतहि आपणाला कां न करता यावें ?
निबंधांत विष्णुशास्त्री यांच्या निबंधांचें अुदाहरण डोळ्यांपुढे होतेंच. ललितवाङ्मयांत आपट्यांचें अुदाहरण होतें. त्यांची बरोबरी आपल्या हातून होणार नाहीच, व न होवो. परंतु त्या दिशेने प्रयत्न करता येण्याअितकी प्रतिभा व मराठी भाषा लिहिण्याची पात्रता आपणाजवळ कांही थोडी आहे, व अधिक मिळवितां येअील, असें मला वाटू लागलें. आणि अवांतर अुद्योग म्हणून जर कांही करावयाचा तर वाङमयव्यासंगच करावयाचा असें मी मनाच्या आवडीने ठरविलें.
{{gap}}(२६) या व्यासंगांत मराठीअितकी अिंग्रजी लेखनाचीहि हौस मी मनांत नेहमीं बाळगिली होती. आणि वर्तमानपत्राच्या क्षेत्रांत पाअूल पडण्याला, खरोखर पाहतां, मराठीपेक्षा अिंग्रजी लेखनकलाच मला अधिक सद्यःफलदायी झाली. कारण मी टिळकांकडे आलों तो प्रथम अिंग्रजी 'मराठा' पत्राचाच संपादक होण्याच्या अपेक्षेने व आश्वासनाने. अिंग्रजी वाङमयांत<noinclude></noinclude>
n6fohv6781j3htsnt2ng626ph1fu6tk
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२७
104
100901
209755
204827
2024-10-24T09:46:01Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209755
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|२०]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>माझे आवडते ग्रंथकार मेकॉले, गोल्ड्स्मिथ, ऍडिसन, गिबन, व अिमरसन हे होते. त्यानंतर अितर अनेक अिंग्रजी ग्रंथकार माझ्या वाचण्यांत आले, पण ते वरील आवडत्या ग्रंथकारांची जागा कधीहि घेअूं शकले नाहीत. मी सुमारें वीस वर्षें 'मराठ्या'चा प्रत्यक्ष संपादक होतों. यामुळे त्यांत किंवा अितर प्रसंगीं, निबंध व भाषणे यांच्या रूपानें, मी अिंग्रजी लेख किती तरी लिहिले. आणि बारा वर्षांपूर्वीं त्यांतील निवडक अेक हजार पानें छापूनहि काढलीं आहेत. तथापि अिंग्रजी ही किती केलें तरी परभाषा ! तिच्यांत आमची मजल ' सरड्याची धाव कुंपणापर्यंत' या न्यायानेच जावयाची. मी प्रयत्न केला असता तर अिंग्रजींतहि अेखादा वाङमय ग्रंथ लिहूं शकलों
असतों. तथापि प्रस्तुत समालोचनांत माझ्या वाङमयाची चिकित्सा करतांना अिंग्रजी भाषा वगळूनच मी लिहिणार आहें. कारण परकी भाषा हस्तगत होणें हें कठीण असतें. कोणाहि हिंदी लेखकाने आपण अिंग्रजी चांगलें लिहितों असें मानणें हें धाडसच होय. कारण नळराजाच्या टाचेवरील तिळमात्र जागेतून कलि नळाच्या शरीरांत शिरला, त्याप्रमाणें अुलट अेखाद्या शब्दप्रयोगांतून हिंदी लेखकाचें अिंग्रजी भाषेचें हास्यास्पद अज्ञान हटकून बाहेर पडावयाचें ! आम्ही हिंदी लोक अितकें तरी चांगलें अिंग्रजी लिहितों हीच गोष्ट मोठी समजावी. म्हणून मी स्वतःला चांगलें अिंग्रजी लिहिणारा असें समजत नाही. तथापि, वेळीं अवेळीं मला अद्देशून 'पुणेकरी' अिंग्रजी म्हणून थट्टा करणाऱ्या माझ्या मुंबअीकर निंदकांपेक्षा मी अधिक चांगलें अिंग्रजी लिहितों असें आत्मविश्वासाने म्हणतों.
{{gap}}(२७) बी. अे. ची परीक्षा पास होऊन साता-यास आल्यावर माझ्या कविता-लेखनव्यवसायालाहि सुरुवात झाली. त्यांतील दोन पद्यें याखाली देतों. १८९२ त लिहिलेली हीच माझी पहिली मराठी कविता-</br>
{{center|'''चंद्राला पाहून'''}}
{{gap}}'''रजनिवल्लभा तुला नभःपथपथिका वंदन करी'''</br>
{{gap}}'''निबिडघनावृत अंबरमार्गा आक्रमिसी झडकरी ।'''</br>
{{gap}}{{gap}}'''अुदासवाणें तुझें हिमकरा पाहत मुख हें फिकें'''</br>
{{gap}}{{gap}}'''परि मम हृदयीं अतुल होतसे सौख्यचि जाणे निकें ||'''<noinclude></noinclude>
mzvhgaldawn5kvedk1tgnx215oqgye5
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२८
104
100902
209756
204795
2024-10-24T09:46:29Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209756
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग]}}{{right|[२१}}
{{rule}}</noinclude>{{gap}}'''समचित्ताने गमे अुदारा मानव-लीला बरी'''</br>
{{gap}}'''पाहसि अपुल्या विमललोचनीं तवचि सुजनता खरी ॥'''</br>
{{gap}}{{gap}}'''अवनितलीं मातले पहा हे कलह तशा आपदा'''</br>
{{gap}}{{gap}}'''परि समतेने सकलां सुखवुनि देसि हिमकरीं मुदा ॥'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{x-larger|'''भिकारी'''}}</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''पडली सांज पहा भूतळीं'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''गगनीं नक्षत्रें अुगवलीं'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''अंधकार करि धुंद दिशा'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''जग शून्यवदनता आली ॥'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''दिनभरि फिरलो चक्रापरी'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''दया कोणिहि न मजवरि करी'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''श्रांत चरण जाहले किती तरि'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''हरहर शिणलों भारी'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''सुजनसे आपणा पाहुनी'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''आलों या द्वारीं ॥'''</br>
{{gap}}(२८) १८९३ सालीं सातारचे पुढारी दादासाहेब करंदीकर व बळवंतराव सहस्रबुद्धे, वकीलद्वय, हे राष्ट्रीय सभेहून परत आले तेव्हां त्यांच्या सत्कारसभेंत म्हणण्याकरिता मी केलेल्या कवितांपैकी आर्या--</br>
{{gap}}{{gap}}'''हिंदुस्थानवनाच्या कोनामधि राष्ट्रसदस तरु फुलला'''
{{gap}}{{gap}}'''परि करंदिकर भ्रमरें आम्हां मकरंद येथ सेवविला ॥'''
{{gap}}{{gap}}'''अितक्या सुदूर देशी राष्ट्रसभा जान्हवी प्रकट झाली'''
{{gap}}{{gap}}'''तत्शैत्त्य पावनत्वें बलवंत समीरणें अम्हां दिधली ॥'''
{{gap}}यांत त्या दोघां गृहस्थांचें विशिष्ट स्वभावगुणवर्णन अंतस्थ होतें तें लोकांना फार पटलें. सत्येंद्रनाथ टागोर साहेब, सेशन जज्ज सातारा, यांच्या मुलीला शिकविण्याकरिता मी अनेक मराठी पद्यें तयार केलीं होतीं. त्यांतलें सीतापरित्याग' हें अेक आजहि आठवतें--<noinclude></noinclude>
7ngc9ha4njmwe2zy5pt7ykmm95xu6n4
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२९
104
100924
209757
204822
2024-10-24T09:48:27Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209757
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|२२]}}{{right|[ माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>{{gap}}{{gap}}'''होसि रे अदय कसा रघुवीरा'''</br>
{{gap}}{{gap}}'''कां बनिं टाकिलि सखि सुकुमारा ॥ धृ० ॥'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''जानकि जीवन कुसुम कोवळें'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''अर्पण करितां विरहज्वाळे'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''निघेल निंदा काजळ काळें'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''केलें या न विचारा | होसि रे ॥ धृ० ॥'''</br>
{{gap}}{{gap}}'''प्रिय यश मानुनि त्यजिलें सीते'''</br>
{{gap}}{{gap}}'''अपयश याहुनि अन्य कोणतें'''</br>
{{gap}}{{gap}}'''सार असार भ्रम हा तूतें'''</br>
{{gap}}{{gap}}'''कैसा झाला सारा | होसि रे ॥ धृ० ॥'''</br>
तसेच हीहि कविता--</br>
{{gap}}{{gap}}''''झिम् झिम् झिम् पर्जन्य पडे'''</br>
{{gap}}{{gap}}'''गमत गगन जणु'''</br>
{{gap}}{{gap}}'''मिटुनि नयन अणु'''</br>
{{gap}}{{gap}}'''करुनि मलिन मुख'''</br>
{{gap}}{{gap}}'''करुण रडे ॥'''</br>
{{gap}}{{gap}}'''घन जमले बहु दाट भरारा'''</br>
{{gap}}{{gap}}'''वायु हालवी वृक्ष थरारा'''</br>
{{gap}}{{gap}}'''हरिणगण भयें अंग कापवुनि'''</br>
{{gap}}{{gap}}'''घन कुंजांतरिं शिरुनि दडे'''</br>
{{gap}}{{gap}}'''झिम् झिम् ॥'''</br>
{{gap}}{{gap}}'''दिशि दिशि सुचकित'''</br>
{{gap}}{{gap}}'''वीज चकाकत'''</br>
{{gap}}{{gap}}'''निज तेजें करि दृष्टी विफलित'''</br>
{{gap}}{{gap}}'''परि रंगित पसरोनि पिसारा'''</br>
{{gap}}{{gap}}'''मयूर किति नाचत मुरडे ॥'''</br>
{{gap}}{{gap}}'''झिम झिम्''''</br><noinclude></noinclude>
ab7vz3ah07wmyn4o1ngzy8jfich5lna
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३०
104
100925
209758
204826
2024-10-24T09:48:47Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209758
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग]}}{{right|[२३}}</noinclude>{{gap}}याच कालावधींत 'माझा आवडता फकीर' या नांवाची कविता मी केली. ती ह. ना. आपटे यांच्या करमणुकींत प्रसिद्ध झाली. आजहि माझ्या मतें तीं चांगली साधली असून, तेव्हाप्रमाणें अजूनहि ती वाचकांना फार पसंत पडते. ( गेल्या ता. ५ जुलै रोजीं, ही कविता आपल्या संग्रहांत घेतल्याबद्दल, अेका प्रकाशकाने मला दहा रु. पाठविले ! ) नित्य रात्रीं
दहाच्या सुमारास अेक फकीर, त्या कवितेंत केलेल्या वर्णनाचा, माझ्या घरावरून जाअी. सात्त्विक भिक्षावृत्तीचा तो अेक उत्कृष्ट नमुना होता.'आनंद रहो आबादीआबाद' असें कांहीसें म्हणत तो जाअी. तो कोणत्याहि घराशीं थांबत नसे. यामुळे, तशा रात्रीच्या दहा वाजण्याच्या वेळींहि, घरांतील माणसें त्याच्याकरिता ठेवलेली भिक्षा त्याला थांबवून त्याच्या झोळींत टाकण्यास टपून बसत. अगदी घड्याळ लावल्या वेळेप्रमाणें तो माझ्या घरावरून जाअी. हें पाहून स्फूर्त झालेले विचार त्या कवितेंत दिले आहेत.</br>
{{gap}}(२९) १८९४ च्या नोव्हेंबरांत अेल्अेल्. बी. ची परीक्षा मुंबअीस देऊन मी साता-यास आलों. त्यानंतर चार आठवड्यांनी परीक्षेचा निकाल लागावयाचा होता. त्या अवधीचा फायदा घेअून मी शेरिडनच्या 'रायव्हल्स' या नाटिकेचें मराठी रूपांतर केलें. शेरिडनच्या या नाटिकेपेक्षा गोल्डस्मिथच्या नाटिका मला अधिक आवडत, व त्या मी कॉलेजांत शिकलोंहि होतों. पण त्या हाताशीं नव्हत्या. म्हणून शेरिडनवर भागविलें. हाच माझा गद्यलेखनाचा पहिला प्रयत्न. तोच माझा पहिला गद्यग्रंथ. यानंतर साता-याच्या मुक्कामांतच अेका टागोर बंधूच्या (जोतिरींद्रनाथ) 'सरोजिनी' नामक बंगाली नाटकाचें मीं भाषांतर केलें. हीं दोन नाटकें मी पुण्यास आल्यावर प्रसिद्ध झालीं.
{{gap}}(३०) १८९६ च्या मार्च महिन्यांत टिळकांना येअून मिळाल्यावर सवा-दीड वर्षांत, म्हणजे टिळकांवरील पहिल्या खटल्यापर्यंत (१८९७ सप्टेंबर ) मी केसरींत कांहीच लिहिलें नाही. त्या खटल्यांत टिळकांना शिक्षा झाल्यानंतर दोन वर्षें मी केसरीचा जबाबदार संपादक झालों, तेव्हा मधून मधून केसरीत लिहूं लागलों. पण ते लेख टिळकांच्या गैरहजेरींत लिहिले गेले, आणि टिळक परत आल्यावर तरी केसरींतील अमुकच लेख माझे असें<noinclude></noinclude>
18z6h31q6qnazywsmczgwyefm88lf5a
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३१
104
100926
209759
204828
2024-10-24T09:49:02Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209759
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|२४]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>त्यांना कळून येण्याचें कारण नव्हतें. पण १९०१ च्या जानेवारीच्या पहिल्या मंगळवारचा केसरींतील माझा अग्रलेख, मी हौसेने मुद्दाम परवानगी मागून घेअून लिहिला होता. तो टिळकांनी पाहिला, त्यांना आवडला, आणि अितरांनीहि त्या लेखाची त्यांच्याजवळ स्तुति केली. हा मराठी लेख पाहून व मराठ्यांतील माझ्या अेकंदर लेखांवरून, मला सर्वसाधारण भाषाविषयाची आवड आहे हें टिळकांना कळून आलें होतें. तथापि १९१४ साली मंडालेहून
परत येअीपर्यंत माझे केसरींतील लेख त्यांच्या दृष्टीस पडण्यास मार्ग नव्हता. मात्र ते परत आल्यावर त्यांच्या मित्रांनी माझ्या लेखांची स्तुति खुद्द त्यांच्याजवळ केलेली त्यांनी अैकली होती. आणि १९१४ पासून १९२० पर्यंत तर त्यांच्या समक्ष व सहकारितेने मी केसरी लिहीत होतों. मराठी लेखनांतहि त्यांच्या अपेक्षेला मी शंभर टक्के अुतरत नसलों तरी ६०।७० टक्के तरी
खास अुतरलों असेन.
{{gap}}(३१) टिळकांना आपल्या राजकीय विषयावरच्या लेखांनीच 'केसरी' अितका लोकप्रिय करतां येत असे की, वाङमयाच्या अितर अंगांनी केसरी सजविण्याची आवश्यकता त्यांना कधीच भासली नाही. त्यांनी क्वचित् कविता वगैरेना केसरींत स्थल दिलें, तर राजकीय विषयावरील कवितांना. मग त्या कविता काव्य या दृष्टीने नीरस असल्या तरी त्यांना चालत. ते म्हणत ' देशभक्तीच्या कवितांमध्ये काव्य तें काय पाहावयाचें ? भक्ति असली म्हणजे झालें.' यामुळे हंगामी राष्ट्रीय अुत्सवांत म्हटल्या जाणान्या कवितांपैकी निवडक कविता केसरींत घालीत. याशिवाय केसरींत कविता कधी आल्या तर टिळकांच्या कांही आवडत्या मक्तेदार व्यक्तींच्या किंवा आग्रही
भक्तांच्या ! अुदाहरणार्थ, पारखीशास्त्री यांच्या वार्षिक संक्रातीसंबंधाच्या, ठराविक अुष्टे संस्कृत संकेत घातलेल्या, किंवा किचकट श्लेषांनी मढविलेल्या अशा त्या असत. पण टिळकांचा स्वभाव जितका तुटक असा आपण समजतों तितका भिडस्तहि असे. त्यांच्या या तुटकपणाची सर्व झोड प्रतिपक्षीयांना सोसावी लागली. पण त्यांचे कांही ठराविक लोचट स्नेही त्यांच्या भिडस्तपणाचा सर्व फायदा लुटीत. अशा अेका स्नेहयाच्या आग्रहामुळे टिळकांनी सर्कसवाले काशिनाथपंत छत्रे यांना जाहीर मानपत्र दिलें. अितकेंच नव्हे, तर पद्यांकित अशा त्या मानपत्रांतल्या कांही कविता केसरींत छापल्या<noinclude></noinclude>
e1d910nd714e33xrdobmobktpnu751w
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३२
104
100927
209760
204830
2024-10-24T09:49:32Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209760
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग]}}{{right|[२५}}
{{rule}}</noinclude>पण याहीपेक्षा सांगण्यासारखी विशेष नवलाची गोष्ट ही की, त्या पद्यांतलें अेक पद्य स्वतः टिळकांनी रचलें! त्यांच्या सांगण्यावरून दुसरें अेक पद्य मी रचलें यांत विशेष कांही नाही. ता. २० मे सन १९०२ च्या केसरींत, टिळकांचा श्लोक व माझा श्लोक अेकत्र घातलेलें, तें अपूर्व पद्यमय मानपत्र छापलेलें आहे! वाचकांनी तेव्हा तें मानपत्र केसरींत वाचलें, पण त्यांतलें अेक पद्य स्वतः टिळकांनी रचलें ही गुप्त गोष्ट बहुधा कुणाला माहीत नव्हती. ते दोन श्लोक मी मुद्दाम गमतीखातर याखाली देतों :--</br>
{{center|{{larger|'''टिळकांचा श्र्लोक'''}}}}
{{center|( अश्वधाटी )}}
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}लोकामध्ये फिरुनि जो का नर विलोका चमत्कृतिरसा ।</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}ज्याशी स्वबंधुगुण राशी समर्पि रवि भाशीतरश्मि जसा ॥</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}नाना कला निपुण माना समग्र अभिमानार्ह मेळवि तया ।</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}नाथा असो सुखद पंथा प्रभो विनवि माथा पदी रचुनिया ॥</br>
{{center|'''माझा श्लोक'''}}
{{center|( स्रग्धरा )}}
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}झाला जीच्या सुयोगें प्रिय अरुण जरी व्यंग तो भास्करास ।</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}केलें जीच्या प्रसादें परगृहिं नकुलें आपुल्या निन्हवास ||</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}अैशी ही अश्वविद्या प्रचुर गुणवती जी नला कार्यवाही ।</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}येथे द्वीपांतरीं हो सुखफलद तुम्हां आमुची प्रार्थना ही ॥</br>
{{gap}}बुद्धिमंत टिळक मनावर घेतील तर काय वाटेल तें करतील, हा जो लोकांचा समज व विश्वास होता तो किती यथार्थ होता, हें या श्लोकासारख्या अगदी क्षुल्लक गोष्टीवरूनहि कळून येण्यासारखें आहे. मात्र टिळकांची काव्यपठडी जुनी. ती या शब्दचित्र श्लोकांतहि दिसून आली
आहे. पण सरकस म्हटली म्हणजे त्यांत घोड्यांचा नाच असावयाचाच. म्हणून 'अश्वघाटी' हें वृत्त त्यांनी आपल्या श्लोकाला पसंत केलें, यावरून त्यांचा मार्मिकपणा दिसून आला. आणि खरोखर त्या वृत्ताची रचना अशी<noinclude></noinclude>
97mypd4m2wn2ik00jdg3y4pudexrj42
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३३
104
100928
209761
204841
2024-10-24T09:49:55Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209761
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|२६]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>आहे की, तो नीट वाचला तर घोडा ठुमकत पाअूंडावर टापा टाकीत नृत्य करतो आहे की काय, असें श्रोत्याला वाटावें. पण वृत्ताचें हें औचित्य साधून शिवाय ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांत 'काशीनाथा' हा शब्द चार ओळींत दोन तीनदा साधला आहे !
{{gap}}(३२) पण टिळकांच्या लेखांतली ओजस्विता ज्याला आपल्या लेखांत आणतां येत नव्हती अशा माझ्यासारख्या केसरीच्या संपादकाला, केसरींत ललितवाङ्मयाचीं कांही अंगें नटवावी असे वाटणें स्वाभाविक होतें. आणि त्या दिशेने मी काही प्रयत्नहि केले. मात्र हीं अंगें कितीहि नटविलीं, तरी केसरीचा सर्वसाधारण गंभीर स्वभाव मी लोपूं दिला नाही. टिळकांपेक्षा मी विनोदाचा अुपयोग केसरींत अधिक करीत होतों, तरी त्याला थिल्लरपणाचें रूप न येअील अशी खबरदारीहि घेत होतोंं. किंबहुना टिळकांनी, भिडस्त स्वभावामुळे, काव्याच्या दृष्टीने हीनगुण अशा कविता केव्हा केव्हा केसरींत घालूं दिल्या तशा मी सहसा घातल्या नाहीत. मी ललिताची लीला केसरींत दिसूं दिली असेल तेव्हा फार तर असें घडलें असेल की, " केसरी हा रागाने शेपटी हापटणारा, डरकाळ्या फोडणारा सिंह न दिसतां, त्या जागीं, अेखाद्या वेळीं, आपल्या अंगाला बिलगून खेळणाऱ्या-बागडणाऱ्या, आपल्या छाव्यांच्या अंगावरून शेपटीचा झुबका
चवरीसारखा वारणारा, नुसता गुरगुरणारा, असा सिंह दिसला असेल."
{{gap}}(३३) १९१० सालीं मी केसरीचा संपादक झालों. लगेच १९१२ सालांत मनोरंजक व बोधप्रद अशीं कांही सदरें घालण्यास मी सुरुवात केली. त्यांतील पहिलें म्हटलें म्हणजे तीस वर्षांपूर्वींच्या (१८८२ सालच्या ) केसरींतील अुतारे. केसरीला या सालीं ३१ वें वर्ष लागलें होतें. आणि अवघ्या तीस वर्षांनीहि पिढी बदलून बोधप्रद तुलना करतां येण्यासारखीं स्थित्यंतरें व मतांतरें होअूं शकतात. हें सोदाहरण दर्शविण्याचा माझा हेतु होता. या दृष्टीने लेखनपद्धति, सामाजिक मतें, राजकीय सिद्धान्त, वगैरे दर्शविणारे तीस वर्षांपूर्वीचे अुतारे वाचकांना मनोरंजक वाटले. पण या अुता-यांतूनच पुढे अेक गंडांतर निघालें. तें असे. कै. प्रो. गोपाळराव आगरकर यांच्या लेखांतील अेका अुताऱ्याचें निमित्त करून, जातिद्वेष<noinclude></noinclude>
tsc78gqk7dqcnpym7cp0j7l267srk8o
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३४
104
100936
209762
204843
2024-10-24T09:51:02Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209762
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग]}}{{right|[२७}}
{{rule}}</noinclude>अुत्पन्न करण्याचा केसरीवर आरोप ठेवून, नव्या प्रेस ॲक्टान्वयें, मुंबई सरकाराने केसरीकडून पांच हजारांचा जामीन मागितला ! यामुळे हें सदर बंद करण्यांत आलें. तेव्हा राजकीय परिस्थिति अितकी नाजूक झाली होती, आणि केसरी बुडविण्याचे सरकारचे प्रयत्न अितके कसून सुरू होते
की, कोणत्याहि दिशेला पाअूल टाकणें तें अगदी जपून टाकलें पाहिजे अशी दहशत माझ्या मनांत क्षणोक्षणीं अुभी असे. तथापि त्यांतूनच कसा तरी मार्ग काढून, पण अेकंदरीने राष्ट्रीय राजकारणाचें धोरण वाचकांच्या डोळयांपुढून हलूं नये अशी योजना मी करीत असें.
{{gap}}(३४) दुसरें नवें सदर म्हटलें म्हणजे नाटकें व नाट्य-प्रयोग अित्यादि ललित अंगांच्या समालोचनाचें. केसरींतील अेक लेखक कै.सदाशिव हरि भावे हे नाट्यविषयाचे मोठे भोक्ते असत. त्यांनी हा नवीन अुपक्रम करण्याची परवानगी मला मागितली व ती मी त्यांना दिली. त्यामुळे अुलट सुलट वादहि सुरू झाले. तथापि रंगभूमीवर अवतरणा-या वाङ्मयासंबंधी व कलेसंबंधी चौकसबुद्धि वाचकांत अुत्पन्न होअूं लागली. हें सदर कित्येक सोवळ्या अभिरुचीच्या वाचकांना आवडलें नाही. पण केसरीशीं निकट संबंध असलेले असे आम्ही दोघे जुनेनवे संपादक, म्हणजे खाडिलकर व मी, हे स्वतःच नाटककार व नाट्यप्रिय असल्यामुळे, मी आपल्या अभिरुचीचा आग्रह विशेष धरला आणि केसरींतील विषयमर्यादा अशा रीतीने वाढविली यांत आश्चर्य नाही.
{{gap}}केसरींत कविता, लघुनिबंध, लघुकथा, वक्रोक्ति लेख, तरंग-तुषार, खडे बोल, अित्यादि ललितप्रकार मी घातलेच. पण शेवटीं १९३४ सालीं मनाचा धडा करून अगदी खरीखुरी कादंबरीच, नवलपूरचा संस्थानिक ही, घालून या स्वैरपणाचा अुच्चांक गाठला. हें पाहून सनातनी वृत्तीचे परंपरेचे भोक्ते असणारे कांही वाचक नाराजहि झाले. पण या सर्व ढंगांच्या मुळांतले विषय व भावना राजकीय होत्या म्हणूनच निभावलें. या ललित अंगाचीं अुदाहरणेंच देतों म्हणजे वाचकांना कदाचित् आठवण होअील.
{{gap}}कवितेचें सदर सुरू करावयाचें, तर अुगीच केव्हा तरी अेखादी कविता घातल्याने तें अंग ठरीव होत नाही. म्हणून ओळीने अेक-दोन<noinclude></noinclude>
7hgj1u2jx7kpp0ny15u76116duh4erp
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३५
104
100937
209763
204867
2024-10-24T09:51:48Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209763
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|२८]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>अंकाआड कविता घालावयाच्याच असें मी ठरविलें. पण आयत्या वेळीं कविता केसरीच्या संग्रहीं कोठून येणार ? तो झराच आटल्यासारखा झाला होता. म्हणून केसरी अर्ध-साप्ताहिक केल्यापासून, 'अनामिक' या सहीने, स्वतः मीच कविता नव्या रचून त्या घालण्यास सुरवात केली. आणि पहिलीच, सूचक म्हणून, 'गद्य व पद्य' नांवाची व त्या दोन प्रकारांचें
वैशिष्ट्य वर्णन करणारी अशी कविता घातली. ती कविता अशी--</br>
{{center|{{larger|'''गद्य व पद्य'''}}}}
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}अेक अर्थ दोन ठायीं{{gap}}{{gap}}गद्य पद्या भेद नाही</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}गद्य शिव पद्य शक्ति{{gap}}{{gap}}दोन मार्गों अेक भक्ति</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}अेका जनक-जननीचीं{{gap}}{{gap}}गद्य-पद्य बाळें साचीं</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}परि करणी अीश्वर करी{{gap}}{{gap}}भेद स्वभावा अंतरीं</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}मंद जड गद्य दादा{{gap}}{{gap}}पद्य ताअी चंचळ सदा </br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}गद्य स्तिमित दूर बसे{{gap}}{{gap}}पद्य गळां पडुनी हसे</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}गद्य मानी मनीं कुढे{{gap}}{{gap}}पद्य निर्भीड ओरडे </br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}गद्या मनीं दुरुनी आस{{gap}}{{gap}}पद्य हातें घेअी घास</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}गद्य पल्लव विस्तृत{{gap}}{{gap}}पद्य पुष्प सुगंधित</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}गद्य मेघांचें डंबर{{gap}}{{gap}}पद्य वीज झळके वर</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}गद्य पाथरवटी घडण{{gap}}{{gap}}पद्य रंगीत रोगण</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}गद्य आखिव-रेखिव भाषा{{gap}}{{gap}}पद्य मुक्तहस्त रेषा</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}गद्य तर्कग्रस्त भाष्य{{gap}}{{gap}}पद्य स्फूर्तीचें हविष्य </br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}गद्य जेवी दगडी शिळा{{gap}}{{gap}}पद्य जलवीचि-लीला</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}गद्य अुद्योगाचा सांठा{{gap}}{{gap}}पद्य दैवाचा झपाटा </br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}गद्य विद्वत्तेचें सोंग{{gap}}{{gap}}पद्य तुकयाचा अभंग</br>
{{gap}}कांही दिवसांनी हें कवितेचें नवें सदर केसरी हेतुपुरःसर घालीत आहे असें वाचकांच्या लक्षांत आलें, व मग कांहीं कवि कविता पाठवूं लागले.
{{gap}}(३५) 'लघु' प्रकारच्या लेखांचीं कांही अुदाहरणें - ' शेवटचें लढाअू जहाज', 'दुर्जनसिंग महाराजांची नवसफेड', 'वेताळाचा घाट'
"¹.<noinclude></noinclude>
n1l1b4zboy7epdj8dttp63lzucrsgak
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३६
104
101141
209764
205125
2024-10-24T09:52:01Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209764
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[२९}}
{{rule}}</noinclude>अित्यादि. ' लोकमताच्या ठिणग्या' हें सदर अशाकरिता केलें की, विचार तेच पण शब्द-पाल्हाळ न करतां थोडक्यांत फुटाणे अुडवावे तसे चार दोन चटकदार ओळींत विचार सुटे सुटे लिहावे. संक्षेपाने लिहिण्यांत, बेटाळीं आवळून वळलेल्या 'स्प्रिंग' कमानीसारखें, विचार प्रगट करण्याला अेक प्रकारचें आंतून बळ येतें. या प्रकाराचें अेक अुदाहरण १९२९ च्या अेका केसरींतलें देतों.
{{center|{{larger|'''लोकमताच्या ठिणग्या'''}}}}
(१) पाहा ! चळवळ कशी करावी हें मुसलमानांपासूनच शिकावें.</br>
(२) शारदा-बिल अुद्या पूर्ण रद्द न झालें, तरी मुसलमानांना तें लागू करूं नये अितकें तरी खास होणार. चळवळ चळवळ !</br>
(३) मग हिंदूंनीहि काय थोडी चळवळ त्या बिलाविरुद्ध चालविली आहे ?</br>
(४) पुण्यांत 'तुळशीची आमटी' झाली. आणि पंढरपुरांत 'धुरळ्याचा भंडारा ' अुधळला तितकाचना !</br>
(५) अहो ! तुमच्या महाराष्ट्राच्या हातून तितकेंच व्हायचें. महाराष्ट्राला बालविवाह मनापासून हवा होता कधी ? जशी असेल मनांत तळमळ तशी होअील हातून चळवळ ?</br>
(६) बरे बिचारे ते पुराणमतवादी टिळक १८९१ सालीं मिळाले म्हणून संमति-वयाच्या बिलाविरुद्ध चळवळ झाली ! </br>
(७) हं: ! ! पण आज टिळक असते तरी काय अुपयोगी होते म्हणा !</br>
(८) नव्या कायदेकौन्सिलाबद्दल त्यांनी १९१९ सालीं जाहिरनामा लिहिला, त्यांत कौन्सिलाकडून समाज-सुधारणा करूं नये असें कांही त्यांनी लिहिलें नाही.</br>
(९) टिळक शहाणे होते. त्यांना पुढे काय होणार हें पूर्वीपासून दिसतच होतें. मग आपल्याच हाताने लिहून आपला अपमान भावी पिढीकडून कां करवून घेतील ते ?</br><noinclude></noinclude>
e4f4homyxrlul7p4krqlsgmbt1t3pez
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३७
104
101142
209765
205129
2024-10-24T09:52:14Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209765
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|३०]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>(१०) आणि शारदा-बिलांत फक्त चौदा वर्षें घातली तर, याच तुळशीबागेंत, "१६ वर्षांपर्यंत लग्न करूं नये” अशा कराराची सूचना टिळकांनीच सुधारकांपुढे टाकून त्यांना निरुत्तर केले होतें ! आणि तेहि ४० वर्षांपूर्वीं !</br>
(११) मिळून तत्त्वाकडूनहि टिळकांच्या नांवाचा पाठिंबा मिळण्यासारखा नव्हता म्हणतां ?</br>
(१२) पण आम्ही सनातनी लोक टिळकांवर विसंबलों नाही. आणि त्यांच्या अनुयायांवर तर नाहीच नाही ! खुद्द टिळकांवरच ग्रामण्य केलेले आम्ही !</br>
(१३) स्वावलंबनावर आमची भिस्त आहे. कायदा मोडूं, दंड देअूं मग कायदा अुरला कोठें ?</br>
(१४) तेवढ्याने नाही भागलें ! धार्मिक चळवळहि आमची सुरूच आहे. मद्रासकडे अतिरुद्र झाल्याचें अैकलें नाहीत वाटतें ?"</br>
(१५) अैकलें. पण " स्वाहाकाराने जितकीं चिलटें मारलीं तितकीं नवीं चिलटें, भोजनाची झोड अुठून घाण न निघाल्यामुळे अुत्पन्न झालीं” असें अेका थट्टेखोर मद्राश्याने लिहिलें आहे म्हणे !</br>
(१६) तसेंच अेक दिवस तरी कांही ठिकाणचा गोवध शारदा बिलाच्या निषेधार्थ वांचला ही पुण्याअीची भर पडलीच की नाही ? ती फळ दिल्याशिवाय कशी राहील ?</br>
(१७) अहो ! पण त्या पुण्याअीला शेंडी नाही, दाढी आहे म्हणतात !</br>
(१८) होय. मुसलमान खाटकांनीच केली म्हणून ती गोष्ट झाली. पण खाटकाच्या सुरीपासून जर गाय वांचते तर शारदा बिलापासून मुली वांचविणें काय कठिण ?</br>
(१९) थांवा थोडे ! माघ-फाल्गुन अुजाडूं दे, म्हणजे पाहा किती तरी बालविवाह घडून येतील ते. अुरलेली अेक सोन्याची संधि कोण घालवितो ?</br>
(२०) आणि ती घालविली तर पुढे वैशाखापासून 'सोन्याचें दान' करण्याची पाळी यायची दंडादाखल !</br><noinclude></noinclude>
ah5brnlua633csh56md8h57q39qhdv4
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३८
104
101143
209766
205397
2024-10-24T09:52:29Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209766
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[३१}}
{{rule}}</noinclude>(२१) हो, हो, सुवर्णदानहि करूं. कन्यादानाच्या वेळीं ताम्हनांत सोन्याचा तुकडा टाकावाच लागतो.</br>
(२२) तोच जरासा मोठा अितकेंच !</br>
(२३) पण अितकें करण्यापेक्षा कायदाच पाळला तर ! कदाचित् मुलीचें कल्याण - ?</br>
(२४) हो, स्वार्थ-परमार्थ अेकदम साधले !</br>
(२५) तें काही नाही. घी देखलें पण बडगा नाही देखला म्हणावें शारदा बिल पास करणारांना !</br>
(२६) वाचा म्हणावें सोलापूरच्या वे. शा. सं. लअूळकरशास्त्र्यांची नोटीस.</br>
(२७) हा सोन्याचा सोटा घाला प्रथम जयकरांच्या पाठींत. आहेत श्रीमंत. सहज सोसतील.</br>
( २८ ) पण खरा बडगा : पुढेच आहे. आणि तो मात्र थट्टेचा विषय नव्हे बरें का.</br>
(२९) निपाणीस न्यूयॉर्क आणि शिकारपुरास शिकागो होअील तेव्हा तो पाठींत बसेल !</br>
(३०) विचारा त्यांना लाला गौवाचें 'अंकल शॅम' हें पुस्तक वाचलें का म्हणून!</br>
(३१) पण परवा डॉ. शेरवुड अेडी हे पुण्यांत कोणाजवळ म्हणाले म्हणे की " गौवा म्हणतात, मी अमेरिकेला न जातांच तें पुस्तक लिहिलें !"</br>
(३२) मग यांत अमेरिकेला जायलाच कशाला हवें ? पुण्यास जोशी व चिपळूणकर यांनी नाही का अमेरिकेची माहिती सांगितली ?</br>
(३३) अगदी बरोबर. कानाने अैकतांना नाकाला पदर लावावा लागत होता.</br>
(३४) अहो ! सत्य तें सत्य. तें काय प्रत्यक्ष डोळ्यालाच तेवढें दिसतें वाटतें ? ' चक्षुर्वै सत्यं ' ही आपली अेक म्हण आहे अितकेच !<noinclude></noinclude>
840kz6z9wphtt4avlbx6drbino4p3a8
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३९
104
101158
209767
205147
2024-10-24T09:52:44Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209767
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|३२]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>(३५) हॅवेलॉक अेलिस हेंच मिस मेयोला अुत्तर. " तुझीच काठी आणि तुझ्याच पाठीं. "</br>
( ३६ ) पण अशाने बिलाविरुद्ध चळवळ करण्याची जबाबदारी चुकत नाही बरें का हिंदूंची ! ध्यानांत ठेवा. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.</br>
( ३७ ) आणि स्वत: अमेरिकेला गेल्याशिवाय शिकागोची घाण दिसणार नाही.</br>
(३८) मग पाठवाना हो जोशी यांनाच सगळे मिळून अमेरिकेला !</br>
( ३९ ) कल्पना चांगली आहे. पण फिरून सुवर्णदानाचा प्रसंग आणलातच ?</br>
(४०) करावें काय ? गोल्ड् स्टँडर्डचे दिवसच आहेत !</br>
( ४१ ) पण गोल्ड स्टँडर्ड ठरवावयाला गोल्ड करन्सीचें कारण नाही, असेंहि ठरलें आहे म्हणे !</br>
(४२) अेकूण तुम्ही कांहीअेक न करतां सर्व परस्पर साधणार म्हणतां ! फार चांगलें ! देव हितकरी असला म्हणजे असेंच परस्पर साधतें ! ' स्वस्थ आणि स्वस्त ! '</br>
( ३६ ) अशाच प्रकारचें ' रजःकण ' या मथळयाचेंहि अेक सदर घातलें होतें त्याचा अेक अुतारा देतों.</br>
{{center|{{larger|'''रजःकण'''}}}}
{{gap}}" ज्यांनी चोरी करून पचनीं पाडली ते प्रामाणिकपणाची स्तुति करतातच. पण ज्यांना पुढे चोऱ्या करावयाच्या आहेत तेहि स्तुति आगाअूच करूं लागतात. अिंग्लंड, फ्रान्स वगैरे लढाअू राष्ट्रांनी शांततादेवीची पूजा आरंभिलीच होती. पण आता अमेरिकेनेहि ती सुरू केली आहे. कारण आपणाला पुढे युद्धें करावीं लागणारं अशीं स्वप्नें तिला पडूं लागलीं आहेत. पाहा ! दुःस्वप्नांचा आगाअूच परिहार !
{{center|{{x-larger|'''* {{gap}} * {{gap}} *'''}}}}<noinclude></noinclude>
j56zrsjb935yer7c08uyx2waw7dy3t0
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४०
104
101159
209768
205396
2024-10-24T09:53:05Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209768
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[३३}}
{{rule}}</noinclude>{{gap}}अमेरिकन मंत्री केलॉग यांनी शांततावादी तह लिहिला. त्यावर युरोपियन राष्ट्रांनी अुड्या घालघालून सह्या केल्या. कांही राष्ट्रें तर असेंहि म्हणत होतीं म्हणतात कीं, " अरेरे, हा तहाचा मसुदा अितका चांगला आहे की त्यावर आम्ही अेक सोडून दोन हातांनी सह्या केल्या असत्या. पण-पण काय करावें ! दुसरा हात जरासा गुंतला आहे. " हा दुसरा हात बार भरलेल्या पिस्तुलाच्या घोड्यावर होता.
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}हल्लीचे दिवस शांततावादाचे असल्यामुळे सगळीं नांवें त्याला शोभतील अशींच ठेवलीं पाहिजेत. फ्रान्सने असें ठरविलें आहे की, आपल्या युद्धखात्याला यापुढें 'शांततासंरक्षक खातें' असें कागदोपत्रीं म्हणावें. अिंग्लंडाने ' युद्धमंत्री ' हें नांव काढून टाकून फक्त ' लष्करमंत्री ' हें सौम्य नांव चालूं केलें आहे. पण अजून त्यांत कोणीकडून तरी शांतता असा शब्द घुसडावयाचा राहिला आहे. 'तोफे' ला ' अलगुज ', ' बाँबला ' ' कंदुक ', ' तरवारी ' ला ' लोहलता ', 'विषारी धुरा ' ला 'अैंद्रजाल' , ' हल्ला ' याला ' प्रगति ', ' तोफेच्या मारगिरी ' ला ' गुलालगोटयाचा खेळ ', ' रक्ता ' ला ' लाल पाणी ' व ' मृत्यू ' ला ' परम सुख ' अशीं अितर नावें सुचविण्यांत आली आहेत !
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}पण युद्धाचीं स्मारकें म्हणून, शत्रूकडून पाडाव करून आणलेल्या व अितर तोफा, शहराशहरांच्या पदार्थसंग्रहालयांत ठेवल्या आहेत, व लहान मुलें त्या भयंकर वस्तु पाहतात त्याची वाट काय ? असा प्रश्न अिंग्लंडांतल्या का अेका मेयॉरने केला आहे. पण त्या तोफा दृष्टीआड करण्याला त्या मोडून-तोडूनच टाकावयाला कशाला हव्या ! शांतता परिषद व केलॉगचा तह हा
ज्यांत कशिद्याने विणला आहे अशा रेशमी झुली या तोफांवरून घातल्या म्हणजे झालें !
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}हिंदु लोकांत ' तेरावा' दिवस हा मृताच्या अुत्तरकार्यासंबंधाने प्रसिद्ध असल्याने तो अशुभ मानतात. अिंग्रज लोकांत ' तेरावा' हा संख्यावाचक</br>
मा. ज. अु. ३<noinclude></noinclude>
eul9ikoesl5y2h6svzvu76ux3hrfier
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४१
104
101352
209769
205370
2024-10-24T09:54:16Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209769
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|३४]}}{{right|[ माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>शब्द अशुभवाचक मानतात हें प्रसिद्धच आहे. यावरून अेक 'तुलनात्मक संस्कृतिसंशोधक' कळवितात की, हिंदु लोक व अिंग्रज लोक हे मूळ अेकाच वंशाचे होत असा सिद्धान्त अवश्य काढावा. खोट्या 'साम्या'च्या समुद्रावरून जितके तरून गेले त्यापेक्षां त्यांत बुडालेल्यांचीच संख्या अधिक भरेल !</br>
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}' वोल्शेव्हिक ' हा शब्द दिसण्यांत नवा दिसला, तरी तो संस्कृताचाच अपभ्रंश होय असेंहि या संशोधकाचें मत आहे. 'बोल्शेव्हिक ' म्हणजे ' बलसेवक ’. दुसरें-तिसरें कांही नाही. अचा ओ होणें व अची अि होणें हें फायलॉलजीच्या शास्त्राला धरूनच आहे. आणि श व स यांतील अभेद तर प्रसिद्धच आहे. अर्थात् हिंदुस्थानांत बोल्शेव्हिझम आली, तर त्याला बलसेवक या शब्दाचा जुनाच आधार आहे.</br>
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}'युवकसंघा 'चें अुदाहरण पाहून हिंदुस्थानांतील कांही वृद्धांनी अेक 'वृद्धसंघ' नांवाची संस्था काढण्याचें ठरविलें आहे म्हणतात. युवकसंघाने जसें ३५ व्या वर्षापुढचा कोणी सभासद घ्यावयाचा नाही असें ठरविलें आहे, तसेंच या वृद्धसंघांत ६० वर्षांच्या आंतला कोणीहि घ्यावयाचा नाहीं. कार्यक्रमांतहि तसाच स्पष्ट भेद ठेवला आहे. 'युवकसंघ ' जर 'काय वाटेल तें करणार' तर ' वृद्धसंघ' कांहीहि करणार नाही. ' या दोन संघांत प्रौढांना जागा नसल्याने त्यांनी आता आपलाहि अेक संघ बनविला पाहिजे नव्हे काय !
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}हिंदुस्थानांत दोनतीन आठवडे घालवितांच, त्या देशाविषयी लिहिण्याची पात्रता आली असें समजून, किती तरी अिंग्रजांनी आजवर हिंदुस्थानविषयक पुस्तकें लिहिलीं आहेत. दोन-तीन आठवडेच कां होअीनात, पण त्या अवधींत प्रवाश्याला हिंदी लोक डोळ्याला दिसतात तरी. पण अशीं पुस्तकें लिहिण्याची पात्रता विमानविद्येबरोबर वाढीस लागली आहे. कराचीवरून अेकदम रंगूनला जाणाऱ्या अेका विमानांतील प्रवाशाने ' A bird's eye-view of India' या नांवाचें पुस्तक प्रसिद्ध<noinclude></noinclude>
mh98b4if0zpjxilm8nz700dcr8d2plr
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४२
104
101353
209770
205395
2024-10-24T09:54:32Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209770
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ३५}}
{{rule}}</noinclude>करण्याची जाहिरात दिली आहे. यांत मिस् मेयोच्या पुस्तकावर ताण होणार आहे असें म्हणतात. या नव्या पुस्तकांतील ' A bird's eye-view of India' हें मात्र अगदीं खरें असणार ! बाकीचें कसें कां असेना !
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}हिंदी संस्थानांचा 'संबंध' आजवर हिंदुस्थान सरकाराशीं होता हें प्रसिद्धच आहे. पण त्यांना त्याची भीति वाटावयास लागलेली असून, त्यांना तो 'संबंध' यापुढे खुद्द राजे बादशाहांशीं जोडण्याची अिच्छा झाली आहे. पण स्वतः बादशहांना हा 'संबंध' पसंत आहे काय ! पूर्वी बादशहांनीं 'स्नेहसंबंध' जोडला तो प्रत्येक वेळीं अेकेकट्या संस्थानाशीं. पण शेकडो संस्थानांनीं अेकदम 'संबंध' जोडणें जरासें चमत्कारिच नव्हे काय ! कोणत्याहि गोत्रांतील अेका मुलीशीं विवाह करणें वेगळें. पण हें तर अेका 'गोत्रां' तील सर्व मुलींशीं अेकदम विवाह करण्यासारखे होत आहे !
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}ग्लासगो येथील रेक्टरच्या निवडणुकींत मुख्य प्रधान मि. बाल्ड्विन हे निवडून आले. या निवडणुकीने स्कॉच लोकांचा वंश नामशेष होत आहे अशी हाकाटी करण्यांत आली आहे. स्कॉटलंडमध्यें आयरिश लोकांचा भरणा होअूं लागला आहे. ब्रिटिश लोक युनिव्हर्सिटीच्या निवडणुकी जिकूं लागले ! पार्लमेंटांत स्कॉटलंडच्या हितसंबंधाची हेळसांड होते अित्यादि कारणांनी आतां स्कॉच जातीचें संरक्षण करण्याकरितां जातवार संघ बनविण्यांत येत आहेत ! हिंदी लोकांत जातिभेद आहे म्हणून त्यांना हसा म्हणावें !
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}हिंदुस्थानांत जातीच्या बाहेर लग्ने होत नाहींत, तेव्हा त्यांच्या जात्यभिमानाला कारण तरी आहे. विलायतेंत, ' बाप महमदखान आअी साळुबाअी' अशी लग्नें सर्रास होतात. अर्थात् यामुळे जातिद्वेष हटावा. पण केवळ पितृरक्ताच्या, म्हणजे आठ आणे शुद्धीच्या अभिमानाने विलायतेंत हा अिंग्रज, हा स्कॉच, हा आयरिश, हा वेल्श, असा भेद कडकडीत रीतीनें
पाळतात. परस्परांत हेवादेवा मत्सर बेसुमार असतो. मुं. टाअिम्स पत्रांत स्कॉच लोकांच्या कृपणपणाची व दारूबाजीची थट्टा केली नाही असा अेकहि दिवस जात नाहीं. व थट्टा अितकी वाअीटहि असते की अेखादा स्कॉच<noinclude></noinclude>
2ng2owpnpixxomd3ezk9bqymes8fmpw
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४३
104
101354
209771
205376
2024-10-24T09:54:49Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209771
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|३६]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>मनुष्य चाबुक घेअून संपादकावर धावत कसा नाही याचें आश्चर्य वाटतें. विलायतेंतला जातिभेद सर्वस्वीं निष्कारण म्हणूनच तर या जातिद्वेषाच्या प्रदर्शनाची मौज वाटते.
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}जातवार संघाच्या मागणीला दिवसेंदिवस तरतरी येअूं लागली आहे. आजवर फक्त ब्राह्मणेतर संघ होता. त्यानंतर आता 'मराठेतर ब्राह्मणेतर ' संघ स्थापन झाला आहे, अुद्या 'शाण्णव कुळेतर - मराठेतर - ब्राह्मणेतर ' संघ निर्माण होणार. व परवां ' अकरमासेतर - शाण्णव कुळेतर - मराठेतर -ब्राह्मणेतर' संघ निर्माण होअील !
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}सायमन कमिशनचा खरा उद्देश असा आहे की, राजकीय सुधारणांच्या प्रगतीच्या नांवाने 'कमींत कमी' किती हक्क हिंदी जनतेला देतां येतील. पण हेंच काम विलायतेंतल्या 'शिंपी संघा' कडे सोपविलें असतें तरी चाललें असतें. कारण, स्त्रियांचा लहंगा ' कमीत कमी ' किती कापड खर्चून तयार करतां येअील याविषयी या शिंपी संघाने हल्ली चौकशी सुरू केली आहे !
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}विलायती स्त्रियांनीहि अलीकडे दैवी संपत्तीचा शोध चालविला आहे. अीश्वराच्या बागेंत (अीडन) पतीसह नांदणाऱ्या आदिम स्त्री अीव्हने, लज्जारक्षणार्थ वस्त्र म्हणून, अंजिराचें अेक पान लावून घेवून काम भागविलें होतें. व त्यानें काम तेव्हा भागतहि होतें. विसाव्या शतकांतल्या सुधारलेल्या स्त्रीचा निश्चय ही मितव्ययी सात्त्विक दैवी संपत् आपलीशी करण्याचा आहे असें म्हणतात."</br>
{{gap}}(३७) प्रसंगविशेषीं विषय सोपा व्हावा, चांगला समजावा, म्हणून मी प्रश्नोत्तररूप चर्चेचा अवलंब करीत असें. अुदाहरणार्थ, हुंडणावळ. ती चर्चा केसरीच्या अनेक अंकांत आली होती. आणि हुंडणावळीचा विषय या प्रश्नोत्तरांमुळे बरा समजला अशीं पत्रेंहि मला आलीं. असला अगदी पहिला संवाद ' म्हणा स्वराज्य मतदार की जय' या मथळयाखाली १९२० सालीं
मी टिळकांच्या हयातींत केसरींत लिहिला. टिळकांनी नव्या कौ. निवडणुकी-<noinclude></noinclude>
r8lvi13yarsf5574hka5t0a9jnq2rve
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४४
104
101371
209772
205398
2024-10-24T09:55:10Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209772
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[३७}}
{{rule}}</noinclude>करिता आपल्या पक्षाचे अुमेदवार अुभे केले व डेमोक्रॅटिक स्वराज्य पक्षाचा जाहीरनामा लिहिला. तेव्हा निवडणुकीकरिता मतप्रचारार्थ तो संवाद विनोदी पद्धतीने मी लिहिला. त्यांत मतदारांचें महत्त्व वर्णन करतांना समाजांतील कनिष्ठ व अुपेक्षित वर्गाला महत्त्व दिलें होतें तें सर्वांना आवडलें.
{{gap}}{{gap}}(३८) सन १८९७ - ९९ नंतर सन १९१० पर्यंत माझा संबंध केसरीशीं जबाबदार संपादक म्हणून पुन्हा आला नव्हता. पण तेथपासून १९१४ सालीं टिळक तुरुंगांतून परत येअीपर्यंत, मला आपल्या संपादकीय कल्पना अगदी हव्या तशा अमलांत आणतां आल्या. मी या अवधींत निबंधलेखनाची हौस भरपूर पुरवून घेतली. पुढे १९१४ ते १९२० या सालांत टिळक जाग्यावर होते तरी माझ्या अंतर्व्यवस्थेंत ते लक्ष घालीत नसत. त्यांना हवें तेव्हा ते स्वतः लिहीत, व संपादक वर्गाला सांगून हवें असेल तें लिहवीत. पण अितर अंगांकडे ते लक्ष देत नसत. १९२० नंतर तर मी पूर्ण मुखत्यार असा संपादक व संचालक असल्यामुळे, मला माझ्या कल्पना हव्या तशा अमलांत आणतां आल्या. तसें करतांना वर दर्शविल्याप्रमाणें, मला काय ललित प्रकार
लिहावयाचे ते मी लिहीत असेंच. परंतु अितर संपादक मंडळींच्या अंगीं ललितकलेची आवड असल्यास ती त्यांच्या पद्धतीने त्यांना पुरी करतां यावी, म्हणून त्यांच्याकरिता केसरीचें अेखादे पान राखून ठेवून सर्वस्वी त्यांच्या स्वाधीन करीत असें. हेतु हा की त्यांनी वाटेल त्या पद्धतीने आपला राखीव विषय स्वतः लेख लिहून, किंवा अुतारेहि देअून, सजवावा व मनोरंजक करावा. संपादकीय लेखांत ताठर गंभीरपणा असावा लागतो तो पूर्णपणें न पाळतां, थोडें मोकळ्या मनाने हसतखेळत विनोद करीत, विषयांत विविधता आणून, चित्ताकर्षक रीतीने मांडणी करतां यावी, म्हणून दरआठवड्याला असें राखीव सदर ( फीचर) योजून तें अेकेका अुपसंपादकाकडे दिलें जाअी.हेतु हा की आपला विषय ' फीचर'च्या रूपाने सजवावयाला त्याला अेक महिनाहि मिळावा. आणि अुपसंपादक असतांहि आपणाला कर्तृत्व प्रगट करण्याचें स्वतंत्र स्थान मिळालें त्याचा आपण अुपयोग कसा केला हें संपादकाला दाखवितां यावें. अशा रीतीने केसरीला ललित प्रकारचीं अनेक अंगें चिटकविण्याचा प्रयत्न मी केला तथापि दुर्दैवाने तो फार दिवस टिकला नाही. पण याचीं कारणें सांगून जागा अडविण्याची माझी अिच्छा नाही !<noinclude></noinclude>
ksrc8c5b8gp1a8g604oijjzxz6qzmzb
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४५
104
101372
209773
205401
2024-10-24T09:55:29Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209773
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|३८]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>मी इतकेंच म्हणतों की गंभीर व ललित यांची सांगड घालण्याची माझी कल्पना, माझ्यापुरती तरी, मीं भरपूर अमलांत आणली व तो प्रयोग लोकांना आवडतो याचा अनुभव घेतला. केसरी आठवड्यांत दोनदा निघूं लागला, पानें वाढलीं, या गोष्टीने मला या कामीं फार सहाय्य झालें, व त्याचा मी माझ्यापुरता पुरेपूर फायदा घेतला. पूर्वी केसरी आठवड्यांतून अेकदाच निघणारा व पानें आठ असें असेपर्यंत, केसरीला ललित अंगें जोडण्याचें मनांत येतें तरी तें फारसें शक्य नव्हतें. मात्र राजकीय चळवळी जोरांत होत्या. तथापि, आठ पानांचा केसरी असतांच १९१०-११ सालीं मी नाट्य ग्रंथ, नाट्य प्रयोग, अित्यादिकांच्या परीक्षणास जागा देण्याला सुरुवात केली होती. असला अवांतर मजकूर थोडाच घालावयाचा; पण ललित प्रकार म्हणून तो वर्ज्य अशी विपरीत समजूत होअूं द्यावयाची नाही, किंवा तशी निषेधाची प्रथा पाडावयाची नाही, हा निश्चय.</br>
{{gap}}( ३९ ) केसरींत टिळक व मी दोघेहि बरींच वर्षें अेकत्र लिहीत होतों. तथापि टिळकांची ओजस्वी, मतप्रचाराला सर्वस्वी योग्य व समर्थ, अशी भाषा मला लिहितां आली नाही. माझ्या भाषेंतलीं वैगुण्यें त्यांतील कांही गुणांबरोबर अखेरपर्यंत कायम राहिलीं. या दोन भाषापद्धतींची सविस्तर तुलनात्मक चिकित्सा १९३२ सालीं, पूर्वी केसरीचे व हल्ली मराठ्याचे
संपादक रा. ग.वि. केतकर यांनीं 'लोकसत्ता' मासिक पुस्तकाच्या अेका विशेष अंकांत केली आहे. म्हणून त्यांच्या त्या लेखांतील कांही अुतारे देतों.</br>
{{gap}}" दोघांचेहि विशिष्ट गुण आहेत. या गुणांची अगर वैशिष्ट्यांची अशा प्रसंगीं सहजच तुलना मनांत अुभी राहते. पण दोघेहि अेकेका परीने श्रेष्ठ लेखक असल्याने अशा तुलनेनें कोणा अेकाच्या चाहत्यास वैषम्य वाटण्याचें मुळीच कारण नाही.</br>
{{gap}}" प्रथमच स्वतःवर येणारा आक्षेप घेअून बचावाच्या धोरणाने लिहिणें हा केळकरांच्या वर्तमानपत्रांतील लिखाणाचा विशेष आहे. तो टिळकांच्या लेखांत दिसून येत नाही. पण अुदाहरणार्थ घेतलेल्या लेखांत अेक अुपमांनी युक्त असें वाक्य आहे, व तें अितकें केळकरी नमुन्याचें आहे की तेवढ्या अेका वाक्यावरून हा लेख केळकरांचा हें कोणीहि मार्मिक मनुष्य सांगू<noinclude></noinclude>
m6ujvex3dns0j2yvzj1ied4w711zefv
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४६
104
101373
209774
205403
2024-10-24T09:55:47Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209774
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ३९}}
{{rule}}</noinclude>शकेल. हें तें वाक्य वाचा : " कायदे कौन्सिलपुढे आणलेलें बिल म्हणजे तो कांही ' रामाचा बाण' नव्हे किंवा ' वासवी' शक्ति नव्हे, की अेकदा हातांतून सुटली म्हणजे मग परत यावयाचीच नाही. हीं बिलें म्हणजे मांजराच्या नखासारखीं वाटेल तेव्हा पुढे काढतां येतात व वाटेल तेव्हा मागे घेतां येतात.</br>
{{gap}}" टिळकांच्या आक्रमणशक्ति लिखाणांत त्यांचा रोख प्रतिपक्षावर असतो व स्वपक्षांतील भेदाच्या खांचाखोंचा दर्शविण्याच्या भानगडींत ते पडत नाहीत. अुलट स्वपक्षासंबंधीहि केळकरांचें लिहिणें धारवाडी कांट्यांत तोलून नेमकें व यथास्वरूप केलेलें असतें.</br>
{{gap}}" टिळकांच्या लेखसंग्रहाच्या दुसन्या भागांत अेक केळकरांचा अत्यंत अुत्कृष्ट लेख टिळकांच्या नांवावर छापला आहे. तो लेख म्हणजे " वेडरबर्न साहेबांचा ताजा निरोप" हा होय. (पृ. ५५२) या लेखांत कावळ्या चिमणीची लहान मुलांची गोष्ट अितक्या सुंदर रीतीने सांगितलेली आहे की, टिळकांच्या हातून ती अशी कधीच आली नसती. ती केळकरांचीच होय हें कोणीहि सांगूं शकेल. ही गोष्ट केळकरांच्या भाषेचा अुत्कृष्ट नमुना म्हणून पाहण्यासारखी आहे. ती अशी-" चिमणीचें मोती कावळ्यानें उपटलें. तेव्हा चिमणाबाअीने कावळयास अुडवून देण्यास झाडास विनंति केली. झाड कबूल होअीना तेव्हा तें तोडण्यास सुतारास सांगितलें. सुतार नाकबूल
झाला म्हणून अशा अनुपकारी मनुष्यास शासन करण्यास तिने राजास विनंति केली. राजास चिमणीचें सुखदुःख काय कळणार ? तेव्हा त्याने नाहीं म्हटल्यावर, त्याची गुरुकिल्ली हातीं असणाऱ्या राणीस ' राजावर रुसून' हा महत्त्वाचा व्यवहारनिर्णय करण्यास तिने सांगितलें. परंतु
स्त्रियांसहि स्त्रियांची सहानुभूति नेहमीच वाटते असें नाही. तेव्हा सरळ अुपाय थकल्याने चिमणीने अुंदरास राणीचीं भरजरी वस्त्रें फाडण्यास सांगितलें. आणि मग तेथून तिने आपला अर्ज अनुक्रमें मांजर व कुत्रा येथपर्यंत नेअून, कुत्राहि अैकेना तेव्हा अेक लठ्ठसा सोटा गांठून त्यास कुत्र्याचे पाठींत बसण्याची तिने विनंति केली. तेव्हा सोटा कबूल झाला व तो कुत्र्याचे
पाठींत बसतांच कुत्र्याने मांजरास, मांजराने अुंदरास, असें दहशत घालण्याचें<noinclude></noinclude>
tds5nmsw8i2v4mdiv3b8n4qb67bxn07
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४७
104
101374
209775
205404
2024-10-24T09:56:03Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209775
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|४०]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>काम सुरू होअून, शेवटीं पेंड पोचत पोचत झाडापर्यंत आला; व झाडानें जेव्हा कावळ्यास हुसकून लावण्याचें कबूल केलें तेव्हा कावळयाचा निरुपाय होअून अर्जदार चिमणीस न्याय मिळून तिचा मोती तिला परत मिळाला ! याच गोष्टीच्या दुसऱ्या अेका आवृत्तींत, सोट्यानेहि नाकबूल केल्यामुळे, चिमणीस तो जाळून टाकण्यास अग्नीकडे, अग्नि विझविण्यास समुद्राकडे,
समुद्र पिअून टाकण्यास हत्तीकडे, व हत्तीच्या कानांत शिरण्यास मुंगीकडे, जाअून दाद मागावी लागली. परंतु मुंगीहि नाकबूल झाली, तेव्हा चिमणीनें आपलें छोटेखानी विश्वरूप दाखवून " तुला खाअून टाकतें " म्हणून आपली चोंच उघडली ! तेव्हा मुंगी कबूल होअून अुलट पेंड पोंचत पोंचत, शेवटीं चिमणीस न्याय मिळाला. या व अशा प्रकारच्या मुलांच्या गोष्टींत नेहमीं बरेंच शहाणपण सांठविलेलें असतें; व विनोदशील पण मार्मिक अशा मनुष्यास अशा गोष्टींचा अुपयोग मोठमोठे राजकीय प्रश्न सोडविण्यासहि होण्यासारखा आहे.</br>
{{gap}}"अेकंदर गोष्टीची चटकदार वर्णनशैली व शेवटी " विनोदशील व मार्मिक” मनुष्याचा अुल्लेख यांवरून हा लेख तात्यासाहेबांचा आहे यांत शंका अुरत नाहीं.</br>
{{gap}}"मार्मिकपणा, गमतीच्या अुपमा व खुसखुशीत भाषा या कामांत केळकरांची सर टिळकांना यावयाची नाही. नेहमी जरुरीपुरतें व तोडून मर्यादित करून केळकर हें विधान करतात. म्हणून वादांत दुसऱ्या बाजूला त्यांना धरणें कठिण जातें. कारण आक्षेप आल्यास प्रत्येक विधानाला त्यांनी अपवादात्मक पळवाट ठेवलेली असते.</br>
{{gap}}"चढाअीचा हल्ला व प्रेरक विधानें या बाबतींत टिळकांचे लेख ठणठणीत असतात. मात्र त्यांत भाषेची कुसर कमी. केळकरांच्या लेखांत वस्तुस्थितीचें मर्मभेदक विश्लेषण व सूचनेच्या स्वरूपांत प्रेरणा असते. केळकर हे टिळकांचे चेले म्हणून मानले गेले असले, तरी त्यांचें भाषा-
वैशिष्ट्य स्वयंभू आहे. आणि त्या भाषेचें सौष्ठव, खुसखुशीतपणा, अखंड आकर्षण, अित्यादि बाबतींत केळकरांनी अितकी प्रगति केली की, त्यांच्या भाषेपुढे टिळकांची भाषा जुनाट व बोजड वाटते. सूक्ष्म विचार बोलून<noinclude></noinclude>
4mgmzb80ih4ev8kx073j5pi4gp99i1s
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४८
104
101413
209776
205453
2024-10-24T09:56:51Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209776
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[४१}}
{{rule}}</noinclude>व्यक्त करण्यास मराठी भाषा केळकरांनी समर्थ केली. त्यांनी किती तरी नवे शब्दपर्याय व रचनाविशेष प्रसृत केले. या रचनाविशेषांवर "केळकरी वळण" म्हणून शिक्का देतां येअील. या विशेषांचा अभ्यास करणारास आतापर्यंत केलेलें तुलनात्मक व संशोधनात्मक विवेचन अुपयोगी पडेल अशी आशा आहे."</br>
{{gap}}(४०) केतकरांनी ही तुलना करण्यापूर्वी बारा वर्षें टिळक निर्वतले होते. यामुळे टिळकांचें लिहिणें १९२० पर्यंतचें, व तुलना करितांना केतकरांच्या डोळ्यापुढे असलेलें माझें लिहिणें १९३२ पर्यंतचें होतें हें लक्षांत घेतलें पाहिजे. या मधल्या बारा वर्षांत माझ्या लेखांना थोडें निराळें वळण लागलें होतें. कारण १९२०-२१ पासून, टिळकांच्या अभावीं, आमच्या टिळक पक्षातर्फे करण्याच्या अवश्य त्या सर्व गोष्टींचा भार मजवर पडला होता. त्यामध्यें प्रतिपक्षाशीं झगडा, भांडण, स्वपक्षसमर्थन, पक्षोपन्यास, व गांधीविरोधी मतांच्या पाठीमागे असणारें तत्त्वज्ञान अित्यादि गोष्टी येत. यामुळे १९२० पूर्वीच्या माझ्या लेखांत जो शांतपणा, थंडपणा, संयम, विवेक
दिसून येतो तो त्यानंतरच्या लेखांत सुटत चालला होता. मी पूर्वी टिळकपक्षाचा अखबारनवीस किंवा रिपोर्टर होतों. तो आता त्या पक्षाच्या आघाडीचा शिपाअी झालों. १९२० नंतरच्या माझ्या वर्तमानपत्री भाषेंत साधेपणा, सोपेपणा व ठसठशीतपणा अधिक येअूं लागला. १८९८ - १९०१ मधल्या केसरींतील माझ्या लेखांची भाषा, १९१० ते १९२० मधल्या केसरींतील माझ्या लेखांची भाषा, व १९२० नंतरची भाषा यांत पुष्कळच फरक पडला आहे. पूर्वी पंडितानें पंडिताकरिता लिहावें असें मी लिहीं; तर त्यानंतर बाजारांतल्या गर्दींतला अेक म्हणून बाजारी गर्दीकरिता लिहावें, असें स्वरूप येअूं लागलें. म्हणूनहि १९२० नंतरच मी केसरींत ललित वाङ्मयाकडे अधिक वळलों. यापूर्वी माझी सगळीं नाटकें लिहून झालीं होतीं; पण ललित वाङमय व वर्तमानपत्री वाङमय यांचा मेळ मी १९२० नंतरच घालूं लागलों. पुढे पुढे तर, कित्येकांच्या मतें, ललित वाङमयानें किंबहुना ललित 'पद्धतीने केसरी' 'बाटविण्या'चें पाप करूं लागलों !</br>
{{gap}}(४१) १९२० नंतरच्या माझ्या या अशा वर्तमानपत्री लेखनाविषयी 'केसरीप्रबोध' ग्रंथांतील प्रो. माटे यांचा अेक अुतारा देतों तो असा --<noinclude></noinclude>
sfna0wk9qk1us6p9ht9i0004kqlwwm0
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४९
104
101442
209777
205538
2024-10-24T09:57:10Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209777
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|४२]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>“ पण केळकर यांचा खरा गौरव १९२१ सालापासून जीं ५/६ वर्षें मोठ्या धामधुमीचीं गेलीं त्यांतील मजकुराने होतो. आतापर्यंत स्वतंत्र पुढारीपण असें त्यांनी केलें नव्हतें. टिळक असतांना टिळकच तें करीत, व ते तुरुंगांत असतांना तें करतां येणें कोणासहि अशक्यच होतें. टिळक यांच्यानंतर महात्मा गांधी पुढारी झाले; व आपल्या मतस्वातंत्र्याचा जो हक्क केळकर हे खुद्द टिळकांच्या संगतींत गाजवीत असत, तोच त्यांनी गांधींच्या संगतींत गाजविला. फरक अितकाच की, त्यांच्या म्हणण्याचा टिळक यांनी आपल्या म्हणण्यांत समावेश करून घेअून व त्यांना आपलें म्हणणें पटवून देअून त्यांचा संग्रहच केला. पण महात्मा गांधींच्या बाबतींत हा प्रकार विपरीत झाला. पण त्याने अेक गोष्ट पुनः अेकदा सिद्ध झाली. ती ही की, केसरीचे संपादक स्वतंत्र विचार करतात अितकेंच नव्हे, चांगल्या चांगल्या बुद्धिमंतांशी बौद्धिक झुंज करून त्यांना रेटीत रेटीत नेअून 'मला आपलें असें वाटतें' ह्या स्वयंभू प्रमाणाशिवाय दुसरें कोणतेंहि प्रमाण शिल्लक अुरूं देत नाहीत. १९०९ ते १९१४ ह्या काळांत ज्याप्रमाणें त्यांची ज्ञानलालसा, वाङमयभक्ति आणि विचारांतील आवरशक्ति हीं स्पष्ट झालीं, त्याप्रमाणेंच १९२१ ते २६-२७ पर्यंतच्या काळांत त्यांची मतस्वतंत्रता,
सामान्य विधानांत गुप्त रूपाने वावरत असलेले हेत्वाभास अुघडकीस आणण्याची कुशलता, माणसाच्या मनाची सूक्ष्म ओळख, व मनस्वी पुढा-याच्या योग्यतेचा मान करूनहि त्याचें विचारवैकल्य त्यास दाखवून देण्यास लागणारा आत्मविश्वास हे गुण अत्यंत ठळकपणाने नजरेस आले. बुद्धिदृष्टया म. गांधींचें धोरण चूक आहे असें दिसूं लागतांच त्यांच्या लोकप्रियतेचा मुलाहिजा न बाळगतां आपलें मत ठासून सांगण्याच्या कामीं जी निर्भयता त्यांनी दाखविली ती केसरीच्या कुलव्रताला साजेशीच होती; आणि सतत पांचसहा वर्षें बौद्धिक झुंज करून लोकमान्यांचें प्रतिसहकाराचें तत्त्व पुनरपि प्रस्थापित करण्याच्या बाबतींत त्यांनी दाखविलेली अीर्षा व चिकाटी हीं तर संपादकीय अितिहासांत अितर क्वचितच पाहावयास सापडतील. वाद करतांनासुद्धा अुगाच धुरोळा अुठविण्याची गोरजपद्धतिहि त्यांनी कधी अवलंबिली नाही. हें वैभव त्यांनी केसरीस दिलें. सामान्य विधानांत खोल शिरून त्याचे तपशील न्याहाळावयास बुद्धीला शीण पडतो,<noinclude></noinclude>
spmopu3db1ktwegwszph87siw8mihn6
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५०
104
101443
209778
205539
2024-10-24T09:57:26Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209778
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[४३}}
{{rule}}</noinclude>व म्हणून पुष्कळ लोक ही दगदग न करतां सामान्य वचनांची पेरणी करून वाचकांत भोळेपणा अुत्पन्न करतात. केळकर यांनी या कालांत जर कांही केलें असेल तर तें हें की, हा वैचारिक भोळसरपणा अगदी घालवून त्याच्या जागीं हिशेबीपणा आणला. ज्याप्रमाणें माणसाच्या जीवितांत, त्याप्रमाणें वर्तमानपत्राच्या जीवितांतहि मतप्रवाहास अनुसरून चढअुतार हे अवश्यच आहेत; आणि म्हणून ते तसे झाले. तरी आपली विचारनिष्ठा लोपू देअून पत्राची भरभराट मात्र जिवंत ठेवण्याची आशा धरणें हें त्यांनी गौणच मानलें. पुढारीपणा आणि संपादकत्व हीं दोनहि टिळकांच्या अंगीं अेकवटलीं होतीं. पण आपण मुख्यतः संपादक आहोंत, पुढारीपण प्रसंगप्राप्त म्हणून आलें तर करावयाचें, ही जाणीव मात्र केळकर ह्यांच्या धोरणांत पहिल्यापासून शेवटपर्यंत दिसते. म्हणून अुत्पन्न झालेल्या प्रसंगांत वर्तमानपत्राचीं म्हणून जीं कर्तव्ये ती करण्यांत आपलें सर्व सामर्थ्य ते वेंचीत; त्यामुळे प्रायः अडचणीचा असा कोणताहि प्रसंग प्राप्त झाला, तर आपलें संपादकाचें कर्तव्य, केसरीच्या धोरणास अनुसरून पुरेपूर करण्याच्या कामीं ते सदैव तत्पर असत."</br>
{{gap}}(४२) माझ्या वाङ्मय - सेवेसंबंधाने मुख्य गोष्ट ही की, मी ही सेवा करण्याकरिता कोणापासून फारसें कांही घेतलें नाहीं, व तसेंच कोणाला फारसें कांही दिलेंहि नाही. पण हें मी भाषापद्धतीपुरतेंच म्हणतों. विचारांसंबंधाने म्हणत नाही. लेखकाचें व्यक्तित्व त्याच्या भाषापद्धतीवरून जसें कळून येतें, तसें त्याच्या विचारसरणीवरून कळून येत नाही. चेहऱ्याची ठेवण, बोलण्याचालण्याची ढब, आवाज यांवरून अेक मनुष्य दुसऱ्यापासून जितका वेगळा होअून ओळखला जातो, तितका कदाचित् त्याच्या स्वभावगुणावरून किंवा चारित्र्यावरूनहि ओळखला जात नाही. कारण पहिल्या प्रकारचीं लक्षणें कधींहि बदलूं शकत नाहीत. जन्मभर तीं तशींच राहतात. पण स्वभावगुण व त्यामुळे चारित्र्य हीं वेळोवेळीं बदलूं शकतात. तिरळ्या डोळ्याचा मनुष्य जन्मभर तिरळाच राहील. आणि घोगन्या आवाजाचा मनुष्य शस्त्रक्रियेनेहि गोड गळ्याचा होअील असें वाटत नाही. पण स्वभावगुणांत चांगल्याचा वाअीट किंवा वाअिटाचा चांगला होअूं शकतो. चारित्र्य ही गोष्ट देखील क्वचित् परिवर्तनशील आहे. ऑस्कर<noinclude></noinclude>
423kvie38gvqu6rcgf0kk4b3bap7720
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५१
104
101444
209779
205541
2024-10-24T09:57:44Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209779
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|४४]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>वाअिल्डचें येक वाक्य मला फार आवडतें व मी नेहमी त्याचा उपयोग करीत असतों. तें म्हणजे " Saints have a past and sinners have a future.” याचें पद्यात्मक भाषांतर करावयाचें तर तें असें होअूं शकेल-</br>
{{gap}}{{gap}}'''साधू होतसे दुश्चित्त । स्मरुनि आपुलें पूर्ववृत्त'''</br>
{{gap}}{{gap}}'''पापी आस धरुनी मनीं । म्हणे साधू होअिन अजुनी'''</br>
{{gap}}(४३) वाङमयसेवेसंबंधानेहि हाच फरक आहे. म्हणजे मनुष्य आज जो विवेचक पद्धतीने लेख लिहितो तो अुद्या भावनाप्रधान पद्धतीने लिहूं शकेल, लिहिण्याचे विषय बदलील, गद्याअैवजीं पद्य लिहूं लागेल, निबंधाची त्याची गोडी जाअून त्याला ललित वाङमय लिहिण्याची गोडी लागेल. तथापि त्याची भाषापद्धति म्हणून जी आहे तींत सहसा फार, म्हणजे ओळख बुजण्याअितका, फरक व्हावयाचा नाही. प्रयत्न करून भाषापद्धति बदलणारे लेखक माझ्या पाहण्यांत फारसे आले नाहीत. हट्टाला पेटून, किंवा मौजेचा प्रकार म्हणून, किंवा विनोदबुद्धीने, किंवा केवळ चातुर्यप्रदर्शन म्हणून, अेखादा लेखक अितर कोणत्याहि लेखकाचें हुबेहूब अनुकरण करून, किंवा विडंबन म्हणून, अेखादा लेख लिहील. पण तितकाच. स्वतःकरिता म्हणून लिहावयास बसला म्हणजे तो आपल्याच घटीव वळणावर जावयाचा. तळहातावरच्या रेघा बदलण्याअितकीच जवळ जवळ कठिण गोष्ट हातांतील लेखणीने लिहिल्या जाणाऱ्या रेघांतील वैशिष्ट्याची आहे. त्याप्रमाणें माझ्या लेखनपद्धतींत - भाषापद्धतींत - आज चाळीस वर्षांत फारसा फरक पडला नाही असें मला वाटतें. १८९२ सालीं टिळक-आगरकर यांच्यांतील वादासंबंधाने ' ज्ञानप्रकाशा 'ला मी लिहिलेलें पत्र, व टिळकचरित्रांत १९२८ सालीं तत्सदृश विषयावर मी केलेली चर्चा, यांची पद्धति जवळ जवळ अेकच म्हणून ओळखण्यासारखी आहे.</br>
{{gap}}(४४) ' केसरी'मध्ये मी अनेक वर्षें सतत लिहीत गेल्याने अनेक वाचकांना माझें लिहिणें अितकें परिचयाचें होऊन बसलें की, अेखाद्या लेखावर माझें नांव नसलें तरी लिहिण्याच्या ढबीवरून, म्हणजे गुणांप्रमाणें दोषावरून, ते तो लेख माझा म्हणून बिनचूक ओळखूं शकतात. अितर पुष्कळांविषयींहि असेंच होत असेल असें. मला वाटतें. या गोष्टीचें अेक<noinclude></noinclude>
l9stmz0j09llajhv0xoit6s9xs2ky5b
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५२
104
101585
209780
205713
2024-10-24T09:58:01Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209780
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ४५}}
{{rule}}</noinclude>प्रत्यंतर मला नुकतेंच परवा आलें. प्रो. कर्वे यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या वेळीं ' केसरी'त मीहि अेखादा लेख लिहीन असें आगाअू प्रसिद्ध झालें होतें. त्याप्रमाणें अेक आठवणवजा लेख मी माझ्या नांवावर दिला. पण संपादकांनी मला अग्रलेख लिहिण्याबद्दल सांगितलें म्हणून तोहि मी लिहिला. अेकाच अंकांत माझा अेक लेख अेका नांवाने व दुसरा लेख बिननांवाने येअील अशी कोणाची अपेक्षा सहजच असूं शकणार नाही. परंतु कांहीनी तो अग्रलेख माझा म्हणून ओळखला व मला म्हणूं लागले, तुम्ही नांव छपविलें तरी आम्ही हेरलें. वास्तविक मला छपवाछपवी करण्यासारखें त्यांत कांही नव्हतें. पण मुंबअीचे अेक स्नेही रा. काशिनाथपंत धारप, अॅडव्होकेट व लॉ कॉलेजचे प्रोफेसर यांनी मला खालीलप्रमाणें पत्र लिहिलें ---
{{gap}}" प्रश्न आजच्या ' केसरी'तील अग्रलेखाबद्दल आहे. तो आपण स्वतः लिहिला असला पाहिजे असें वाटतें. पुरावा लेखांतर्गतच आहे. तो म्हणजे लेखनशैली व विचारपद्धति. समर्पक दृष्टान्त देअून अगदी सोप्या शब्दांत अुच्च तत्त्वांचें सूक्ष्म व मार्मिक विवेचन करण्याची आपली लेखनशैली अितर कोणा मराठी लेखकास फारशी साधली नाही. या आपल्या गुणाने आपलें म्हणणें वाचकांच्या बुद्धीला सहज पटतें. शिवाय सर्व लेखनावर जो अेक विनोदाचा अुजळा हळुवार हाताने दिलेला असतो त्याने मनाला आल्हाद होतो. मन व बुद्धि या दोघांचें रंजन अेकसमयावच्छेदाने होत असतांना सद्भावनांनाहि स्फूर्ति मिळत जाते. आपल्या लेखनांत जे अनेक गुण आहेत त्यांत मी वर लिहिलेला गुण फार अुत्कटत्वाने दिसतो. ' केसरी'च्या आजच्या अग्रलेखांत मला हा गुण फार दिसला; शिवाय भाषेची विशिष्ट धाटणी तर आहेच. तर मग माझें अनुमान खरें आहे काय ? जर असेल, तर मला आपलें हार्दिक अभिनंदन करावयाचें आहे. पण तें आपला हा लेख चांगला म्हणून नव्हे हो ! कारण आपले पुष्कळच लेख तसे असतात. मग म्हणाल, अभिनंदन कशाबद्दल ? तर
आपल्या प्रतिज्ञाभंगाबद्दल ! प्रतिज्ञाभंगाचा आरोप केला म्हणून रागवाल व अनौचित्याबद्दल हसालहि. पण तसें करण्याचें कारणच नाही. प्रतिज्ञाभंगाचा आरोप खरा आहे, व कित्येक वेळा प्रतिज्ञाभंगाबद्दल अभिनंदन करणें अुचित व आवश्यक ठरतें. स्वतःचें नाव घातल्याशिवाय ' केसरीं 'त'<noinclude></noinclude>
1rekr5t8k8cuwug8hs1awyixq9zrvck
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५३
104
101588
209781
205781
2024-10-24T09:58:25Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209781
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|४६]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>यापुढे लेख लिहिणार नाही अशी प्रतिज्ञा पूर्वीं आपण अेक वेळ केली होतीना आणि येथे तर जो लेख नांवावर लिहिलात तो मामुली आहे, आणि नांव न देतां जो अग्रलेख ' केसरी'त लिहिलात त्याचीच मजा विशेष आहे. भीति अेकच वाटते की, माझें अनुमान चुकलें तर मग कसें ? मी हास्यास्पद ठरेन. माझा हा अुपद्व्याप ठरेल. तरी पत्राचें अुत्तर पाठवावें. लेख आपला ठरला तर मात्र मी अभिनंदन कोणाचें करावें याचा प्रश्न पडेल. आपल्या दुर्दम लेखनस्फूर्तीचें ? की तीच स्फूर्ति अुत्पन्न करणाऱ्या महर्षि कर्वे यांच्या ध्येयनिष्ठ कर्मयोगी जीवनाचें? असो. माझें अभिनंदन कोणासहि पोंचलें तरी तें सारखेंच. कारण दोघांचें अेक अेक कार्य तसेंच अुच्च प्रकारचें झालें आहे. "</br>
{{gap}}(४५) सुमारें तीस वर्षेंपर्यंत शिवरामपंत परांजपे, श्री. कृ. कोल्हटकर
व स्वतः मी असे तिघे समकालीन साहित्यिक आपापल्या वाङ्मय -कार्याने लोकांच्या दृष्टीपुढे वावरत होतों. यामुळे आम्हा ओकमेकांची तुलना मार्मिक प्रेक्षकाला सहजच सुचे. म्हणून ती कोणी कशी केली याचे नमुने याखाली
देतों. प्रथम परांजपे व मी यांची तुलना पाहा-</br>
{{gap}}श्री. ग. त्र्यं. बापट, वी. अे., भावे स्कूल पुणें, हे लिहितात-</br>
{{gap}}" तात्या राजकीय प्रबंधांच्या पंख्यालाहि कोरीव आणि कातीव कलाकुसर करून वाङ्मयाची झालर लावतात, तर पंत आपल्या 'दगडी कोळशा 'सारख्या रुक्ष विषयाला किंवा शकुंतलेवरच्या ललितलेखालासुद्धा राजकारणाच्या पोलादी चौकटींत बसवतात. ललित वाङ्मयांत, नाटकांत, आणि कादंबन्यांत - ज्यांनी राज्यपत्राचा आचार संभाळावयाचा तें केळकर लघुकथेंतील तंत्राचा विचार करण्यांत दंग पाहून टिळकांच्या राजकीय परंपरेच्या कित्येक अभिमान्यांना विषाद वाटतो! पंतांनी साधेल त्या प्रसंगाने लोकांना स्वातंत्र्याचे घुटके दिले. केवळ लालित्याकरिता म्हणून पंतांनी फारसें लेखन केलें नाही.</br>
{{gap}}" राजकारणानंतर या दोन ग्रंथकारांच्या लेखनशैलीवर शोधकिरणांचा प्रकाश पाडून पाहूं. अेका निबंधनिष्णाताने वाङ्मयाचे ' स्फूर्तिलेखन ' आणि
'ज्ञानलेखन' असे दोन भाग कल्पिले आहेत. शिवरामपंतांच्या दुथडी<noinclude></noinclude>
qvlruykw4wqrrn9zzqdcic9qy81o6nj
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५४
104
101629
209782
205782
2024-10-24T10:05:18Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209782
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ४७}}
{{rule}}</noinclude>वाहणा-या लेखनगंगेंत वाचक वाहत जातो; केळकरांचें चौरस लिखाण जीवनाभोवती गुरफटलेले ज्ञानाचे कण प्रत्यही टिपून घेत असतें, पंतांचें लिखाण ठरीव पद्धतीचें पण खोलींत जास्त; तात्यांचें व्यापक पण खोलींत कमी. दोघांच्याहि लेखांचें घनपरिमाण (व्हॉल्यूम) मात्र प्राय: सारखेंच ! पंत वेळेलाच लिहीत; तात्या अवेळींसुद्धा हुकमी व चांगलें लिहितात. पंतांच्या लिखाणांत स्पष्टोक्तीचा अभाव, तर तात्यांचें लिखाण प्रासादिक. पंतांची भाषा बुरखा घेतलेल्या काश्मिरी युवतीप्रमाणें ! शरिराला त्वचा त्याप्रमाणें लेखणीला भाषा ! तात्या अर्थ व्यक्त करण्याकरिता लेखन करतात; पंत कांही वेळीं अर्थ गुप्त ठेवण्याकरिता लेखणी सरसावीत. तात्यांची भाषा देवदर्शनाला निघालेल्या प्रौढ गंभीर महाराष्ट्रीय स्त्रीप्रमाणें आहे.</br>
{{gap}}" तात्या आधी लेखक आणि नंतर वक्ते; पंत आधी वक्ते आणि नंतर लेखक. तात्यांच्या वक्तृत्वांत ग्रंथकाराचा संयम, तर पंतांच्या ग्रंथांत वक्तृत्वाचा ओघ. पंतांचीं शैली प्रदीर्घ आणि पल्लेदार; तर तात्यांची आटोपशीर आणि सुटसुटीत; पंतांच्या गद्यांतहि काव्याचा विलास तर तात्यांच्या काव्योपाहारांतहि प्रसंगी गद्याचा साधपणा व तार्किकपणा ! मुक्तेश्वराप्रमाणें पंतांची भाषा जोमदार आणि मर्मभेदक आहे; अर्थांच्या स्वरूपाप्रमाणें ती आकार धारण करते. तात्यांची भाषा श्रीधराच्या भाषेृप्रमाणें बहुजनसमाजाला सहज कळेल अशी आहे.
{{gap}}" केळकरांचें शनवारवाड्याचा जीर्णोद्धार करणारें भरदार वाक्य पाहा -</br>
{{gap}}" अठराव्या शतकाच्या विशींत बांधलेल्या, अेकोणिसाव्या शतकाच्या विशींत नाश पावलेल्या व विसाव्या शतकाच्या विशींत पाये अुकरून काढलेल्या या वाड्याला अेकविसाव्या शतकाच्या विशींत काय दिसणार आहे, तें परमेश्वराला माहीत !"</br>
{{gap}}" हीच कल्पना पंत कशी नटवतील बरें ? प्रतिभेच्या पंखांवर अुड्डाण
करून त्यांची तंद्री लागेल. नंतर विकट हास्य करून छझी स्वराने, वक्रोक्ति<noinclude></noinclude>
ix6mmhzzd7czlfq40elf5nyd12jx0j7
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५५
104
101630
209783
205783
2024-10-24T10:05:35Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209783
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|४८ ]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>आणि व्याजोक्ति अशा टोंकांनी त्यांची लेखणी कुरकुरूं लागेल. ती कालकन्या त्या शनिवारवाड्याला म्हणेल-</br>
{{gap}}'हे शनिवारवाड्या, तूं शनीप्रमाणे मराठ्यांच्या राशीला लागलास वास्तविक श्रीवर्धनाच्या धैर्यमेरूंना अंकावर खेळविण्याचें भाग्य तुला लाभलें होतें. ...' भावनेची शाअी सुटून लेखणी पल्लवित झाल्यावर, पंत शनिवारवाड्याला डिवचून म्हणतील- 'जुनाट पुरुषा, फुकट तुझा जन्म ! भेद आपापसांत पाडूं नये, परकीयांत पाडावा, हें राजनीतीचें साधें तत्त्वदेखील तुला समजत नाही, तेव्हा तुला काय म्हणावें ! डोळे मिटल्यावर तूं मला दिसूं लागतोस. आणि तुझ्यावर शिबंदीचे लोक गर्दीगर्दीने चालले आहेत, चौघडे झडत आहेत, भगवीं आणि जरिपटक्याची निशाणें जिकडे तिकडे फडकत आहेत, कालभगिनी महांकाळीच्या सरबत्त्या होत आहेत, भालदार चोपदार ललकारत आहेत, मंत्री आणि प्रधान मनसुबे करीत आहेत, सैन्यें लढत आहेत, आणि राजे विजयश्री मिळवीत आहेत, असे अपूर्व समारंभ जिकडे-तिकडे दृग्गोचर होअूं लागतात!'</br>
{{gap}}" पंतांचा भाषाविलास संस्कृताभिमुख, तर तात्यांची भाषा महाराष्ट्रीय वळणाची. दोघांचें अिंग्रजी सारखेंच असलें, तरी अिंग्रजीच्या प्रकृतीचा परिणाम त्यांच्या शैलीवर झाला आहे. तात्यांच्या शब्दांची नाणीं परिचयाचीं, पण अुपयोगामुळे किंचित् घासलेलीं. पंतांचीं नाणी पिवळींधमक आणि कलदार. पंतांचा खजिना नेहमी भरलेला. कोणत्याहि राष्ट्रीय दामाजीवर संकट आलें की, पंतांच्या कल्पनेचा विठोबा सैरावरा धावूं लागतो. तात्यांची लेखणी तोल संभाळून विचार करूं लागते. दामाजी दरवडेखोर आहे काय ? बादशहांची परवानगी न घेतां कोठारें मोकळीं केलीं हा त्याचा लहान कां होअीना पण अपराधच नव्हे काय ? असे विचार तिच्यापुढे अुद्भवतात.</br>
{{gap}}" दोघांनाहि शब्दचित्रें रेखाटतां येतात. तात्यांचें शाहिराचें चित्रण पाहा - 'बुदलीने ओतल्या जाणाऱ्या तेलाने पेटणारे हिलाल पाजळत आहेत; रंगीबेरंगी कपडे घातलेले अर्धअुघडे लोक गोळा झाले आहेत; पायांत तोडा, डोक्यावर कंगणीदार पगडी व त्यांत तुरा खोवलेली अशी अर्धगोंधळी अर्ध-<noinclude></noinclude>
spg8icj0lf6115hhm61xbqx82rxzlh4
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५६
104
101713
209784
205871
2024-10-24T10:05:51Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209784
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ४९}}
{{rule}}</noinclude>तमासगीर मंडळी तुणतुणें खेंचून तिसऱ्या सप्तकांत सूर खेंचून गात व साथ करीत आहेत; कडकडीत डफावर डाव्या हाताची टिचकी व अुजव्या हाताची थाप मारून त्यांचा पुढारी अेकाहून अेक सरस असे पोवाडे आठआठवून म्हणत आहे; आणि सर्व श्रोतेमंडळी तल्लीन होअून तटस्थ झाली आहे.</br>
{{gap}}" या चित्रणांत डफावर थाप पडते; पण डफ कडाडत नाहीं. ठराविक मर्यादेवर तात्यांची लेखणी थांबते; पंत त्या मर्यादेच्या पलीकडे भरारी मारतात. पंतांची शैली श्रद्धा अुत्पन्न करते. त्यामुळे आपणास प्रस्थानत्रयीची अेकवाक्यता पटून, जुनी पुराणांतरीची गोष्ट नवीन रूपांत सापडते. मदनाचें दहन झाल्यावर पुनर्जन्म पूर्वजन्म यांबद्दल जिज्ञासा अुत्पन्न होअून, आपलें लक्ष नव्या सृष्टींतील शब्दांच्या वाढीचा अितिहास आणि त्यामधील कारस्थानें यांकडे जातें.</br>
{{gap}}" तात्यांचे लेखन अफाट ! सर्व विषयांत लेखणी चालविण्याचा त्यांना हव्यास. त्यांच्या ग्रंथांतील अुतारे काढून अेक वाचनीय ग्रंथ होअील. विषय आत्मसात् करण्याकरिता तात्या ग्रंथ लिहितात. तो विषय त्यांना कळतो; पण खोल दृष्टीच्या वाचकांच्या मनांत भरत नाही त्यामुळे त्यांचें कांही लिखाण कांहीं वाचकांना खर्ड्यासारखें भासतें. पण पंतांचें बहुतेक लिखाण कित्येकांना कित्त्यासारखें भासतें. दोघांच्या भाषेत खळखळ नाही. दोघेहि शब्दांच्या कह्यांत जात नाहीत. तात्यांची भाषा अर्थवती, तर पंतांची अर्थवती असूनहि नादवती. पाठ करण्यासारखे अुतारे पंतवाङमयांत जास्त. तात्यांची शैली वर्तमानपत्री आहे. पंतांची ओघवती लेखनशैली वर्तमानकाळाचे दरवाजे खुले करून, वाचकाला भव्य भविष्याकडे नेते. तात्यांच्या लेखणीचें टोंक अेकसारख्या लेखनाने झिजल्यामुळे गुळगुळीत झालें आहे. पंतांची लेखणी अुसंत मिळतांच स्फूर्तीच्या वालुकापत्रावर घासून अणकुचीदार बनते !</br>
{{gap}}" अॅडिसन आणि स्विफ्ट यांच्या रचनेची धाटणी अनुक्रमे तात्या व पंत यांच्या लिखाणांत दिसून येते. पंतांजवळ स्विफ्टजवळ नसलेली काव्याची देणगी होती. अॅडिसन तात्यांप्रमाणें राजकारणी नव्हता. केळकर अॅडिसन -
मा. ज. अु. ४<noinclude></noinclude>
saf8b7kdnao6jajesn8wfdbfazx4kqu
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५७
104
101714
209785
205872
2024-10-24T10:06:06Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209785
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|[५० ]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>प्रमाणें विषयाचें निरीक्षण करतील; तर पंत स्विफ्टप्रमाणें चिकित्सेच्या चाकूने त्याचे वाभाडे काढून सत्त्वपरीक्षण करतील. केळकरांच्या सर्वसंग्राहक न्यायालयांत गेलेला अपराधी हसतमुखाने परत जातो. पंतांच्या विरोधाच्या आणि अुपहासाच्या कात्रींत सांपडलेल्या वंदिजनाची अेका डोळ्यांत आसू आणि दुसऱ्या डोळ्यांत हसूं अशी अवस्था होते. तात्या कल्पनेचे धागे जमवून त्याचा गोफ विणतात. पंत कल्पनेचें सूत सापडल्यावर सुताने स्वर्गाला जातात. तात्यांचे विचार समतोल, तर पंतांचे विनतोल. पंतांच्या गुलगुलीत लेखनशैलींत मांजरीचीं नखें लपलेली असतात, तर तात्यांनी, प्रो. पोतदारांच्या म्हणण्याप्रमाणें, केसरीच्या खडतर नखाग्रांना कलेचीं कांकणें चढविलेलीं दिसतात. "</br>
{{gap}}त्याचप्रमाणें मी व श्री. कृ. कोल्हटकर यांची तुलना अ. ब. कोल्हटकर व माडखोलकर यांनी केली आहे. तिचे कांही अुतारे याखाली देतों-</br>
{{gap}}" श्री. कृ. कोल्हटकर हे झाले अेक तात्यासाहेब. आता दुसरे तात्यासाहेब म्हणज श्री. नरसिंह चिन्तामण अूर्फ तात्यासाहेब केळकर. ह्यांची गोष्ट ह्याच्या अगदी अुलट आहे. ते आधुनिकांतले आधुनिक आहेत. त्यांच्यात जुनेंपानें असें कांहीच नाही. व्यासंगाच्या अभावामुळे श्री. गंगाधरराव देशपांडे जितके मागे पडले, किंवा व्यासंगाच्या अेकदेशीयत्वामुळे श्री. शिवरामपन्त परांजपे जितके मागे पडले, तितकेहि रा. रा. केळकर मागे पडलेले नाहीत! ते अगदी आधुनिकांतले आधुनिक आहेत " मॉडर्ना "तले " मॉडर्न " आहेत !</br>
{{gap}}"ह्याचें अेक कारण त्यांची चौकसबुद्धि व दुसरें कारण त्यांचा वर्त-मानपत्राचा व्यवसाय ! चौकसवृद्धि नसली, तर वर्तमानपत्राचा व्यवसाय असूनहि खाडिलकरांसारखीं माणसें जुनीपुराणीं होअूं शकतात, आणि वर्तमानपत्रासारखा व्यवसाय किंवा राजकारणाची रोजची अुठाठेव नसली, तर चिंतामणराव वैद्यांसारख्या चौकस माणसावरदेखील जुनेपणाची हिरवी छाया पडावयाला लागते! पण तात्यासाहेब केळकरांना दोनहि आहेत ! त्यांच्याजवळ राजकारणाचा रोजचा प्रपंचहि आहे व चौकस बुद्धीहि आहे-<noinclude></noinclude>
stdcghshfacs8u5t3tdez315h5wr1l3
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५८
104
101715
209786
205876
2024-10-24T10:06:59Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209786
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[५१}}
{{rule}}</noinclude>आणि अेखाद्या घासलेल्या तरवारीप्रमाणें त्यांची मेंदूची तरतरी चकचक चकाकणारी आहे !
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}" आणि म्हणूनच साहित्यसंमेलनांतील दोन तात्यासाहेबांचा संयोग म्हणजे प्राचीन युग आणि अर्वाचीन युग ह्यांचा संयोग आहे ! ' कृत'युग जर 'कलि'युगाला भेटावयाला आलें, किंवा अश्वत्थामा जर ब्रिटिश पलटणींत अुभा राहिला, तर ज्या प्रकारचा संयोग दिसेल तशा प्रकारचा संयोग ह्या दोन तात्यासाहेबांच्या योगाने यंदाच्या साहित्यसंमेलनांत दिसणार आहे ! कारण श्रीपाद कृष्ण म्हणजे प्राचीन जग आणि नरसोपंत केळकर म्हणजे वर्तमानपत्राचा ताजा अंक ! 'मौज' पत्राच्या पहिल्या पानावर वेद छापावेत किंवा वेदाच्या अेखाद्या अध्यायांत बालगन्धर्वाचें "लेटेस्ट " पद आढळावें त्यांतीलच हा संयोग होय ! यंदाच्या संमेलनाला निदान ह्या अेका गोष्टीने जरी अपूर्वता आली तरी त्यांत आश्चर्य नाही.
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}" दोघां तात्यासाहेबांत हा जसा अेक मोठा फरक आहे तसा आणखीहि अेक फरक आहे. दोघेहि तात्यासाहेब रसिक आहेत, प्रेमळ आहेत, रंगदार आहेत, रंगेल आहेत - तथापि अेकाच्या स्वभावांत भयंकर लाजाळूपणा आहे आणि दुसऱ्याच्या स्वभावांत तितकाच ढकलबाजपणा (Pushingness) आहे ! अेकाच्या पुढे पक्वान्नांचे ताट वाढलेलें असलें तरी दुसरे काय म्हणतील ह्या भीतीने ते जपून खातील. दुसरे खुलेपणाने पक्वान्नावर हात मारतील आणि पुनः वर असें म्हणतील की " काय हो, जिलब्याच जिलब्या झाल्यामुळे तोंडाला कशीं मिठी वसलेली आहे ! ह्यावेळीं जर चार खुसखुशीत भजी असती तर काय बहार झाली असती !
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}" किंबहुना तात्यासाहेब केळकर यांच्या लोकप्रियतेचें हेंच बीज आहे!
ते कोठेहि गेले, तरी मनमोकळेपणाने घरच्यासारखे वागतील आणि लहानापासून थोरापर्यंत आवडणाऱ्या प्रत्येक विषयांत लक्ष घालतील. तात्यासाहेब कोल्हटकर यांचें तसें नाही ! त्यांच्याभोवती नेमकी ३|४ माणसेंच आहेत<noinclude></noinclude>
43y43bt0z3yd7sfkq4sknt1l2bndxh9
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५९
104
101747
209787
205911
2024-10-24T10:07:13Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209787
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|५२]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>तोंपर्यंत ते खुलेपणाने बोलतील. पण जास्त माणसें जमावयाला लागलीं की, तात्यासाहेबांच्या तोंडाला कुलूप बसलेंच. तात्यासाहेबांच्या ह्या संकोचीपणाचें अनेक वेळ सभाभीरुत्वांत रूपान्तर झालेलें आहे ! ते जेव्हा सभेंत बोलतात तेव्हा फारच चांगली भाषणें करतात; पण ते सभेंत बोलावयाला येतातच कशाला ? येतच नाहीत! त्यांना संकोच वाटतो! ते " अपसेट" होतात !</br>
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}"साहित्यसभा ही अेक शकुन्तला आहे अशी जर कल्पना केली, तर तात्यासाहेब केळकर व तात्यासाहेब कोल्हटकर हे शकुन्तलेच्या बरोबर दुष्यन्त राजाच्या राजवाड्यांत गलेले दोन ऋषिकुमार आहेत असें म्हणावयाला कांही हरकत नाही ! ह्यांपकी अेकाला सभा आणि थाट आणि गर्दी म्हणजे अगदी कंटाळा - दुसन्याला त्याची अतिशय हौस ! त्याला अुलट हाच आनन्द की, शकुन्तलेला पोंचविण्याच्या डेप्युटेशनवर आपण आलों हें सर्व लोकांना समजावें; आणि दुष्यन्त राजाशीं शेकहॅण्ड करावयाला आपल्याला मिळालें ह्याच्या तारा चोहोकडे जाव्यात !
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}" श्री. नरसिंह चिंतामण केळकर हे श्रीपाद कृष्ण यांचीच व्यावहारिक आवृत्ति होत ! श्रीपाद कृष्ण यांनी संसार विसरूनहि आपला सर्व जन्म वाङ्मयास वाहिल्यामुळे वाङ्मयांतील अत्युच्च प्रदेशांना ते केव्हाना केव्हा तरी स्पर्श करूं शकले ! केळकर यांना तसें करावयाला सवड सापडली नाही ! कल्पनेच्या प्रांतांत ते Wit पर्यंत - फुलपांखरी कोट्यांपर्यंत - अुड्डान करूं शकले. पण सृष्टीच्या निगुढ प्रान्तांमधून 'ह्युमर'च्या थंडगार वाऱ्यांत राजहंसीय अुड्डानें करावयाला राजकारण व वर्तमानपत्रें ह्यांच्या जंजाळा-मुळे त्यांना वेळच सापडला नाही !
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}" आणि म्हणूनच श्री. केळकर ह्यांच्याजवळ Logic ( तर्कशक्ति ) आहे, पण Initiative ( चैतन्यशक्ति ) नाही, असा अनुभव येतो. खरोखर तात्यासाहेब कोल्हटकर यांना जर Heart ( सहसंवेदन) असतें - केळकर
यांना जर Initiative (चैतन्य) असतें - सुवर्णाला जर सुगन्धीत्व असतें -<noinclude></noinclude>
c2yparjlybj0gxiqlwgdp0iuq1qpraf
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६०
104
101749
209788
205913
2024-10-24T10:07:26Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209788
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ५३}}
{{rule}}</noinclude>मयुराला जर गायन असतें - सौन्दर्याला जर स्वारस्य असतें - द्रव्याला जर अयाचित्व असतें - वैभवाला जर विवेचकत्व असतें - मनुष्याला जर अमरत्व असतें - अमरांना जर मानव्य असतें - शौर्याला जर शहाणपण असतें - शहाणपणाला जर यश असतें - सत्याला जर सामर्थ्य असतें - आणि सामर्थ्याला जर विश्वप्रेम असतें, तर ह्या जगांत कोणत्याहि तत्त्वनिष्ठेचे पूर्णावतारच आपणास दिसले असते ! पण तें नाही, म्हणूनच भावनाशीलांच्या ठायीं बुद्धीमत्तेचा अभाव आणि बुद्धीमन्तांच्या ठायीं भावनाशीलतेचा अभाव राहून, कल्पनाजन्य कोटि किंवा विनोद ह्यांना निरालम्ब चिदाकाशांत निष्प्रयोजन लोम्बकळत बसल्याचे देखावे नजरेस येतात.</br>
{{gap}}" श्रीपाद कृष्ण आणि नरसोपंत ह्या दोघांचे असेंच झालेलें आहे !त्यांच्या कोट्या किंवा त्यांचा विनोद ह्यांना भावनाशीलत्वाची आर्द्र भूमिका न मिळाल्यामुळे मसालेवाल्याच्या दुकानाप्रमाणें कल्पनांच्या स्वतंत्र बरण्या भरून ठेवलेल्या त्यांच्याजवळ दिसून येतात. पण असे वाटतें की, हा चमचमीत मसाला जर भावनांच्या चमचमीत पक्वान्नांत पडला असता, तर केवढा चमत्कार झाला असता-केवढा लाभ झाला असता ! पण भावनेच्या अभावामुळे आज त्या पक्वान्नांच्याअैवजी " पोहे " मात्र मिळालेले आहेत !</br>
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}"तात्यासाहेब केळकरांच्या बुद्धिमत्तेसम्बन्धाने ' चाबुकस्वार 'मध्यच अनेक वेळा लिहिण्याचा सम्बन्ध आलेला असल्यामुळे त्याविषयी पुनरावृत्ति करण्याची जरुरी नाही. बुद्धीची कुशाग्रता, व्यापकता, सुपूर्तता व चपलता ह्या चारहि गुणांनी त्यांची तुलना कै. महादेव गोविंद रानडे ह्यांच्याशींच करावी लागते. रानडे यांच्या वेळेपासून अितका बुद्धिमान् पुरुष महाराष्ट्रांत झालाच नाही म्हटलें तरी चालेल ! अनेक प्रसंगी कै. लो. टिळकांपेक्षा केळकरांनी सरस बुद्धिमत्ता दाखविलेली आहे ! व्यासंगांत तर ते कोणापेक्षाहि खात्रीने सरस आहेत. [वरील सर्व परिच्छेद ' संदेशी अतिशयोक्तीचा अेक मासलेवाअीक नमुना' असें म्हणतां येअील ! ]</br>
{{gap}}" ह्याच्या अुलट श्री. तात्यासाहेब कोल्हटकर यांच्याकडे पाहिले म्हणजे सेण्ट हेलेना बेटांतील तुरुंगवासांत अेखाद्या खडकावर शन्यदष्टीने बसलेल्या<noinclude></noinclude>
qx64vslikpnpz0rp47fjx097x0bpzqe
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६१
104
101750
209789
205915
2024-10-24T10:07:37Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209789
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|५४]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>नेपोलियन बोनापार्टाच्या चित्राची आठवण होते ! त्याचें राज्य गेलेलें आहे, त्याचें वैभव गेलेलें आहे, पंचवीस वर्षांपूर्वी असलेला त्याचा दरारा गेलेला आहे-आणि आता मूकभाषेंत समुद्राच्या लाटांना आपले मनोगत सांगत तो अेकान्तवासांत बसलेला आहे !</br>
{{center|{{x-larger|'''*{{gap}}*{{gap}}*'''}}}}
{{gap}}“ केळकर यांचें आयुष्य यशस्वी दिसतें-श्रीपाद कृष्ण ह्यांच्या आयुष्या- वर Failure (निष्फळ) असा अेक मोठा फकार किंवा मोठा नकार दिसूं लागतो ! आणि ह्याचें कारण काय तर श्रीपाद कृष्ण यांनी चालू जगावर आपली Hold (पकड ) ठेवली नाही ! नरसोपन्त यांनी ह्याच्या अुलट वर्तन ठेवलें ! ते चालू जगांत राहिले-चालू जगांत पोहले - चालू जगाशीं लढले व चालू जगांत मिसळले ! त्यांच्या ढकलबाज स्वभावामुळे प्रत्येक परिस्थितींतून ते सहीसलामत बाहेर पडले ! त्यांना सातव्या मजल्यावर कोंडलें तरी ते पहिल्या मजल्यावरून बाहेर पडले, व पहिल्या मजल्यावर कोंडले तरी तळघरांतून निसटले ! चालू जगाशीं संबंध आल्यामुळे त्यांची बुद्धि अत्यंत कुशाग्र राहिली ! बुद्धिमत्तेंत त्यांचा " नंबर " पहिला लागला !</br>
{{gap}}रा. माडखोलकर हीच तुलना खालील शब्दांत करतात--</br>
{{gap}}"कोल्हटकर यांच्याअितकाच तात्यासाहेबांच्याहि सहवासाचा परिणाम माझ्या वाङ्मय-जीवनावर झाला आहे; व त्या दृष्टीने तेसुद्धा मला गुरुस्थानींच आहेत म्हटलें तरी चालेल. त्यांच्याजवळ मी पांच महिने होतों. या अवधींत जन्मभर पुरेल अितकें लेखनकलेचें शिक्षण त्यांनी मला कळत न कळत दिलें आहे. किंबहुना त्यांचा सहवास हेंच मुळीं अेक प्रकारचें शिक्षण असतें. बकुळीच्या वृक्षाखाली बसणाऱ्या मनुष्याला जसा छायेबरोबर परिमळाचाहि लाभ घडतो तसा त्यांच्या सहवासांत राहणान्या मनुष्याला ज्ञानाबरोबर वाङ्मयाच्याहि अुपभोगाचा आनंद लाभतो. त्यांच्या बुद्धीला अविषय नाही, सहानुभूतीला मर्यादा नाहीत, आणि अुद्योगाला खंड नाही. त्यांच्या अेका मित्राने त्यांना अेकदा असें गमतीने म्हटलें होतें की, "दिवसाच्या प्रत्येक बदलत्या तासागणिक आपण निरनिराळ्या व्यक्तींशीं<noinclude></noinclude>
2dae5zipu2ix23zsm4kr30pkwey50gc
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६२
104
101768
209790
205939
2024-10-24T10:07:50Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209790
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[५५}}
{{rule}}</noinclude>निरनिराळ्या विषयांवर बोलत असतां. जणु कांही विषय, व्यक्ति आणि तास यांचा, आपला वेळ केव्हा कोणी किती घ्यावयाचा ह्याबद्दल, आगाअू संकेत ठरूनच, सारे व्यवहार चाललेले असतात !" दुपारची वामकुक्षी आणि रात्रीची झोप यांना वांटून दिलेला मोजका वेळ सोडला, तर बाकीच्या त्यांच्या वेळाचा प्रत्येक क्षण बोलण्यांत, लिहिण्यांत, वाचण्यांत किंवा मनन करण्यांत जात असतो. कोल्हटकर हे आयुष्याकडे अुपभोगाच्या दृष्टीने पाहतात, तर केळकर हे आयुष्याकडे अुपयोगाच्या दृष्टीने पाहतात. आणि या दोघां साहित्याचार्यांच्या या विशिष्ट दृष्टिकोणाचा परिणाम त्यांच्या वाङ्मयावर झालेला स्पष्ट बघावयाला मिळतो. कोल्हटकर यांचें वाङ्मय मुख्यतः रंजनप्रधान, तर केळकरांचें वाङ्मय मुख्यतः ज्ञानप्रधान आहे; व कोल्हटकर यांच्याकडे गेलें असतां मनुष्य जसा आनंदित होअून परत येतो, तसा केळकर यांच्याकडे गेलें असतां तो उद्बोधित होअून परत येतो. कोल्हटकर यांच्या साध्याहि बोलण्यांत जशी कल्पकता व्यक्त झालेली असते, तसा केळकर यांच्या साध्याहि बोलण्यांत त्यांचा बहुश्रुतपणा प्रतिबिंबित झालेला असतो; व त्यामुळे त्यांचे अगदी स्वैर कथालापसुद्धा अुपदेश होअून बसतात.</br>
{{gap}}पण या दोघा मित्रांच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टींत जरी फरक असला, तरी त्यांच्या स्वभावांत मात्र पुष्कळच साम्य आढळतें. "</br>
{{gap}}( वसुंधरा - दिवाळी अंकांत (१९३१) ग. त्र्यं. माडखोलकर).</br>
{{gap}}रा. ग. वि. केतकर, केसरीचे पूर्वी अेक वेळचे व मराठा पत्राचे
विद्यमान संपादक लिहितात ---</br>
{{gap}}" सभाचालकांच्या मनांत हा विश्वास तात्यासाहेब यांनी आपल्या कृतीने अुत्पन्न करून ठेवला आहे. व्याख्यानें अैकून भागलेला व कांटेकोर दृष्टीचा किंवा अेक प्रकारें दुर्ललित बनलेला पुण्याचा सुशिक्षित श्रोतृवृंद हा तात्यासाहेब यांचें अध्यक्षीय भाषण अैकण्यासाठी, अितर कंटाळवाणी भाषणें
अैकण्याची अगर समारंभिक क्रिया पाहण्याची शिक्षा भोगीत बसलेला असतो; व तात्यासाहेब अुभे राहिले, म्हणजे ते कांही नवे मार्मिक विचार अुद्बोधक व चटकदार रीतीने मांडतील अशी त्याची खात्री असते.<noinclude></noinclude>
6qdravlzalo1wfwtxmli3543js6gqsy
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६३
104
101769
209791
205941
2024-10-24T10:08:06Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209791
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|५६]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>{{gap}}"याला कारण तात्यासाहेब यांची औचित्याकडे असणारी मार्मिक दृष्टि, विषयाचें मर्म, व त्यांतील नेमका महत्त्वाचा भाग विश्लेषण करून काढण्याची भेदक बुद्धि, त्यांना स्वाभाविक सुचणाऱ्या मार्मिक विनोदी अुपमा, अेकान्तिक अगर अेकांडेपणाचा अभाव व व्यापक सहानुतीची मनोभूमिका त्यांचें नित्य नवें चालू असलेलें वाचन, त्यायोगें त्यांना प्राप्त झालेला अष्टपैलूपणा, अित्यादि गुणांचा समुच्चय हेंच होय. तात्यासाहेब हे अुपजत वक्ते नसतांना, किंबहुना वक्तृत्वाला हानिकारक अशा कित्येक स्वाभाविक अडचणी असतांनाहि, त्यांच्या वरील गुणांची सरशी होते.</br>
{{gap}}" जे गुण अध्यक्षाला अुपयोगी पडतात, तेच वाङ्मयांत प्रस्तावना लेखकाला असावे लागतात. '''तात्यासाहेब यांनी प्रस्तावना लिहिली, म्हणजे अेक प्रकारें वाङमयक्षेत्रांत त्या ग्रंथाला " राजमान्यता" प्राप्त होते. या दृष्टीने त्यांना मराठी वाङमयाच्या राजाची अुपमा शोभेल.''' आणि राजाच्या शिक्कामोर्तबाला जी किंमत आहे, तीच त्यांच्या अभिप्रायाला अगर प्रस्तावनेला मराठी वाङ्मयांत प्राप्त झाली आहे. ( 'वैनतेय' पत्रांत ग. वि. केतकर. )</br>
{{gap}}टिळक-केळकर यांची भाषासरणीहि अशीच मनोवेधक आहे. समर्पक दृष्टान्तांनी विषयप्रतिपादन सुलभ करणारे केळकर हे अेकटेच मराठी लेखक होत. मार्मिक कोट्या, सूक्ष्म विनोद, बहारदार वर्णनें, सूचक सुभाषितें व म्हणी, ठसकेबाज व नेमके शब्दप्रयोग, तर्कशुद्ध व पटणारें विषयप्रतिपादन, आणि पुनः समतोलपणाच्या तारेवरील कसरत, ह्रीं सर्व अेका वेळी व अेका ठिकाणीं पाहावयाचीं असल्यास केळकर यांचा अेखादा सुंदरसा अग्रलेख वाचावा म्हणजे झालें ! टीकेचाहि तोच प्रकार. चिपळूणकर काय, टिळक काय, आगरकर काय, किंवा परांजपे काय, या सर्वांचाच प्रतिपक्षावर 'ब्रह्मास्त्र' सोडण्याचा प्रघात, पण केळकर यांचा नेहमीचा प्रघात म्हणजे शत्रूवर टीकेचें 'मोहनास्त्र' सोडण्याचा ! यामुळे होतें काय की, प्रतिपक्षाला परांजपे यांची 'व्याजोक्ति', किंवा टिळक-आगरकरांची 'अेक घाव की दोन तुकडे' करण्याची पद्धति पुरवते; पण केळकर यांचे हे ' रेशमी चिमटे' आणि
'शालजोडींतले' कांही सोसवत नाहीत ! याचींहि अुदाहरणें 'केळकरकृत लेखसंग्रहां'त पुष्कळ सापडतील.<noinclude></noinclude>
7n3k0jk8uk0ne5izz27wivkoddcp29o
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६४
104
101780
209792
205965
2024-10-24T10:08:19Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209792
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[५७}}
{{rule}}</noinclude>{{gap}}“केळकर यांचा आणखी महत्त्वाचा विशेष म्हणजे हा की, जरनॅलिझम् ही अेक कला आहे, विद्या आहे, ही गोष्ट त्यांना जितकी पटली, व ती साध्य करून घेण्यांत त्यांना जितकें यश मिळालें, तितकें त्यांच्यापूर्वी कोणालाहि मिळालें नाही. चिपळूणकर यांची जरनॅलिझमची कल्पना ग्रंथरचनेहून फारशी भिन्न नव्हती. टिळक-आगरकर यांनी जरनॅलिझमकडे कलेच्या दृष्टीने पाहिलें नाही. आणि परांजपे यांना जरी जरनॅलिझम् ही अेक कला आहे हें कळलें असलें, तरी त्यांना ती केव्हाही साध्य झाली नाही. मतप्रसार सर्वांनीच केला. पण चिपळूणकर यांचें विशेष लक्ष ग्रंथरचनेवर व भाषाभिवृद्धीवर असे, आणि टिळक-आगरकर यांचें विशेष लक्ष मतप्रसारावर असे. मतप्रसार करीत असतां, स्वतःला न कळत त्यांच्याकडून कौशल्य दाखविलें गेलें, व अशा रीतीने त्यांनी महाराष्ट्राचा जरनॅलिझम् निर्माण केला हें खरें. पण या धंद्यांत पडण्याच्या वेळीं आपण अुत्तम वृत्तपत्रकार होणार या महत्त्वाकांक्षेने ते प्रवृत्त झाले असें म्हणतां
येत नाही. आगरकरांची अशी अिच्छा होती असें वाटतें; पण टिळक तर हिंदुस्थानाच्या सुदैवामुळेच या धंद्यांत गोवले गेले. अेरवी त्यांची महत्त्वाकांक्षा शिक्षणशास्त्रज्ञ व संशोधक होण्याची होती. साधारण सर्व प्रसिद्ध ' सौ. वत्सलावहिनींनी आपल्या अेका 'पत्रां'त म्हटल्याप्रमाणें केळकर यांनी केसरीची परंपरा कायम राखली, अितकेंच नव्हे, तर तिच्यांत सुंदर व अलंकारिक भाषासरणीची भरहि घातली. ' सौ. वत्सलावहिनी ' केळकरांना असें सर्टिफिकेट देतात, यापेक्षा केळकर यांच्या संपादकीय कौशल्याचा आणखी कोणता पुरावा पाहिजे ? विषय कसाहि असो, केळकर यांचें प्रतिपादन नेहमी गोडच असावयाचें !" ('वैनतेय' पत्रांत येरवडेकर, अेम्. अेम्. अेल्अेल्. बी. )</br>
{{gap}}(४६) वाङमयोपासनेच्या पंचेचाळीस वर्षांच्या अवधींत अनेक ग्रंथकारांचे ग्रंथ वाचल्याने, माझ्या भाषापद्धतीवर त्यांचा कळत न कळत थोडाबहुत परिणाम झाला असला तरी, मी पूर्वीच्या जुन्या कोणाहि लेखकाला सोळा आणे आदर्शभूत मानला नाही, किंवा त्याला गुरु करून त्याचा शिष्य म्हणवून घेतलें नाहीं. केसरीसंबंधाने टिळकांची लेखनपद्धति माझ्या डोळ्यांसमोर पंचवीस-तीस वर्षे असतां, त्यांच्या माझ्या<noinclude></noinclude>
9rkdc5cyy4zapzzyww8uf7z4dxghpbu
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६५
104
101832
209793
206024
2024-10-24T10:11:48Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209793
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|५८]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>भाषापद्धतींत किती फरक राहिला हें रा. गजानन विश्वनाथ केतकर यांच्या शब्दांनी वर दिलेंच आहे. अुलट, मी जसें या बाबतींत कोणाला गुरु केलें नाही त्याप्रमाणें मी कोणाचा गुरुहि होअूं शकलों नाही. कारण माझा 'सांप्रदाय' बनण्यासारखें 'वैशिष्ट्य' मजमध्ये नाही. रा. श्री. कृ. कोल्हटकर
यांनी आपला असा अेक ' सांप्रदाय' प्रस्थापित केला आणि गडकरी, खांडेकर हे त्यांचे शिष्य होत, हें जसें यथार्थपणें म्हणतां येतें, तसें माझ्यासंबंधाने कोणाविषयी म्हणतां येणार नाही असें वाटतें. कोल्हटकरांप्रमाणें केवळ विनोद आळविण्याकरिता अेकहि लेख मी लिहिलेला नाही. रा. कोल्हटकर हे विनोदी लेखक, आणि माझ्याहि लेखांत मधून मधून विनोद असतो, यावरून कांही तरुण लेखकांनी मला कोल्हटकर यांच्या सांप्रदायांत गोवून त्यांचा शिष्यहि बनविलें आहे ! पण तें त्यांच्या अज्ञानामुळे होय. वस्तुस्थिति मुळीच तशी नाही, म्हणून त्याचा मुद्दाम उल्लेख केला आहे.</br>
{{gap}}(४७) आणि माझ्या वाङ्मयांतील विनोदाचें वर्णन रा. वि. स. खांडेकर यांनी केलें आहे तेंच येथें देतों. कारण ते विनोदाचार्य कोल्हटकर यांचे शिष्य असून, स्वतः विनोदी वाङमय लिहिणारे आहेत, म्हणून या अभिप्रायाला महत्त्व येतें--</br>
{{gap}}“ केळकरांच्या प्रतिभेच्या म्यानांत काव्य व विनोद या दोन्ही तलवारी
राहूं शकतात हें खरें. पण म्यानांत दोन तरवारी असल्या तरी त्यांतली अेक सैनिकाची अधिक आवडती व्हावी यांत अस्वाभाविक असें काय आहे ?
त्या दृष्टीने पाहिलें तर केळकरांच्या बुद्धीचा स्वाभाविक कल काव्यापेक्षा विनोदाकडेच दिसतो. त्यांच्या व्याख्यानाला जाणारा वर्तमानपत्राचा प्रतिनिधि, को-या कागदावर मधून मधून हंशा हे शब्द, घरूनच लिहून गेला तरी चालण्यासारखें असतें. 'संस्कृत विद्येच्या पुनरुज्जीवना' सारखा गंभीर विषय ! पण त्यांतहि त्यांची सूक्ष्म विनोदबुद्धि, रणभेरी वाजूं लागल्या असतांनाहि सतार छेडणाऱ्या सव्यसाची सेनापतीप्रमाणें, सलील विहार करूं शकते.</br>
{{gap}}"काव्य काय अगर विनोद काय, दोन्हीचीहि बुद्धि मनुष्याला अुपजतच असावी लागते. आंधळयाला कितीहि जाड कांचांचा चष्मा दिला,<noinclude></noinclude>
7diukqs0h62x7vax73vbf7yts7xbehw
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६६
104
101833
209794
206025
2024-10-24T10:12:01Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209794
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[५९}}
{{rule}}</noinclude>तरी त्याचा जसा अुपयोग नाही, त्याप्रमाणें बहिःसृष्टि व अंतःसृष्टि यांतील सौंदर्याचें संवर्धन करणारी सुसंबद्धता, अगर विनोदविलासाला पोषक असा विसंगतपणा, सूक्ष्मतेने जाणण्याची शक्ति नैसर्गिकच म्हटली पाहिजे. तसें नसतें तर कालिदासाच्या काव्यरसांत बुडून कोरडे राहणारे, अगर बोलण्याखाण्याखेरीज ओठांना विभक्त होअूं न देणारे, हरीचे लाल जगांत दिसलेच नसते !</br>
{{gap}}“ झाडावर कलम करावें त्याप्रमाणें नैसर्गिक काव्यविनोदशक्तीवर वाचन, निरीक्षण, परिस्थिति व लेखकाचे स्वभावगुण यांचा संमिश्र परिणाम होतो. केळकर यांच्या विनोदाचा या दृष्टीने विचार करूं लागलें की, प्रख्यात विनोदलेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याशीं कॉलेजमध्ये असतांनाच झालेला त्यांचा स्नेह, वर्तमानपत्राच्या धंद्यांत पडल्यामुळे त्यांच्या वाचनाला आणि अनुभवांना आलेली विलक्षण विविधता, वर्तमानपत्री लेखकाला आपलें लिखाण अळणी वाटूं नये म्हणून त्यांत मीठमसाला घालण्याची नेहमी वाटणारी आवश्यकता, अित्यादि गोष्टी सहज सुचतात.</br>
{{gap}}“ सूक्ष्म टीकाबुद्धीच्या पायावर विनोदाचें मंदिर बहुशः अुभारलें जातें. यामुळे टीकाकारांच्या स्वभावभेदांप्रमाणे त्यांच्या विनोदाचेंहि स्वरूप भिन्न होत असतें. टीकाकाराला 'नावडतीचें मीठ अळणी' लागत असलें की, विनोदांत त्याने अतिशयोक्तीचा आश्रय केलाच म्हणून समजावें. राजकीय व सामाजिक प्रश्न केवळ भावनांवर अवलंबून ठेवणारा टीकाकार विनोदी पद्धतीने लिहूं लागला की, अुपरोध, अुपहास, वक्रोक्ति व व्याजोक्ति ह्या अस्त्रांचा तो पदोपदीं अुपयोग करूं लागतो. टीकाकाराच्या स्वभावाचा अुच्छृंखलपणा त्याच्या विनोदांत प्रतिबिंबित झाल्याचीं अुदाहरणेंहि विपुल सापडतील. केळकर यांचा विनोद बहुधा नेमस्त असतो. याचें कारण त्यांचीं टीकाबुद्धि जितकी मार्मिक तितकीच सात्त्विक आहे हें होय. चिकित्सा आणि सहानुभूति या सवतीसवती त्यांच्या लिखाणांत बहिणीबहिणीप्रमाणें वागत असल्याचें आढळून येतें.</br>
{{gap}}निबंध-चरित्र-इतिहासादि वाङ्मय, ललितलेखणीने लिहिलें तरी, अेकंदरीत विचारप्रधानच. कोटाला लावलेल्या अस्तराप्रमाणें अशा प्रकारच्या<noinclude></noinclude>
c7ai3ldpevyb15nbvnmtss6o6jzohxx
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६७
104
102064
209795
206297
2024-10-24T10:12:14Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209795
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|६०]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>वाङ्मयालाहि केळकर विनोदाची जोड देअूं शकतात. पण अस्तराचें कापड कितीहि तलम ( जाड ? ) असलें तरी त्याचें अस्तित्व कोट वरवर पहाणारांना जसें कळत नाही, त्याप्रमाणें 'टिळक-चरित्र' अगर 'मराठे व अिंग्रज' हीं पुस्तकें वाचणारांना केळकर यांच्या नाजुक विनोदाची कल्पना येणें शक्य नाही.</br>
{{gap}}"केळकर यांचें बहुतेक निबंधलेखन केसरीसाठीच झालें. राष्ट्रीय जागृतीच्या ध्रुवताऱ्यावर नजर ठेवून, दर आठवडयाला अुपस्थित होणाऱ्या नव्या नव्या विषयांच्या किनाऱ्याने त्यांनी वर्षांनुवर्षें आपली निबंधनौका चालविली. हें नौकानयन, प्रशांत सरोवरांतील स्वच्छंद नौकाविहारापेक्षा तत्त्वतःच भिन्न असल्यामळे, त्यांच्या निबंधांत आत्मभावना, कल्पनास्वातंत्र्य, व विनोदविलास यांना पूर्ण अवसर मिळाला नाही यांत नवल कसलें ? सभेंतील भाषण कितीहि सहजसुंदर असलें तरी खेळीमेळीच्या संवादाचें स्वरूप त्याला कुठून येणार ? निरीक्षणसूक्ष्मता, विनोदप्रवणता, व भाषाप्रभुत्व या केळकर यांच्या वाङमयगुणांच्या संगमांतून गार्डिनर, लिंड, चेस्टरटन, मिल्ने या लेखकांच्या लिखाणासारखे लघुनिबंध निर्माण होणें अशक्य होतें असें नाही. पण सहजसुंदर भावनिबंध लिहावयाला लागणारें विषय कल्पना व वेळ यांचें स्वातंत्र्य वर्तमानपत्राच्या लेखकाला सहसा मिळत नाही. चित्रकार सैनिक झाला की त्याच्या हाताला रणांगणावरील भव्य देखाव्याचें चित्र रेखाटण्याअैवजी तलवारीचे घाव घालण्यांतच दंग व्हावें लागतें.</br>
{{gap}}" भावनिबंधासारखें कलात्मक लेखन केळकर यांच्या हातून झालें नसलें, तरी त्यांच्या निबंधांनी मराठी वृत्तपत्रांना अेक निराळें वळण लावलें असें म्हणण्यास हरकत नाही. वृत्तपत्राच्या संपादकाला मतप्रसार केला पाहिजे हें तर खरेंच. पण मतप्रसाराचें कडू चाटण विनोदाच्या मधांत मिसळून दिलें तर रोगी तें हसतमुखाने घेतो, हें तत्त्व पुरेपूर ओळखून तें अमलांत आणण्याची पराकाष्ठा करणारे संपादक तीनच-'काळ'कर्ते परांजपे, 'केसरी' कार केळकर, व 'संदेश' स्थापक कोल्हटकर. आगरकर यांच्या लेखनांत प्रासंगिक विनोद असला तरी टिळकांप्रमाणें त्यांच्या लेखनाचाहि ओज हाच आत्मा आहे. परांजपे-केळकर-कोल्हटकर या त्रयींत परांजपे अपरोधाचे<noinclude></noinclude>
rrnhbjrbrjlee0j7dtvgxmkv4zamjdq
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६८
104
102065
209796
206298
2024-10-24T10:12:42Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209796
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[६१}}
{{rule}}</noinclude>भोक्ते, केळकर कोटीचें भक्त व अच्युतराव कोल्हटकर सुलभ विनोदाचे पुरस्कर्ते असें ढोबळ वर्गीकरण केलें असतां फारशी चूक होणार नाही. परांजपे यांचें लिहिणें अुन्हासारखे ! सावलींतल्या वाचकाला त्याच्याकडे पाहून आनंद होअील; पण तें प्रत्यक्ष अंगावर घेण्याची वेळ आली तर तो छत्री हुडकायला लागल्याशिवाय रहाणार नाही. केळकर यांचें लिहिणें म्हणजे स्वच्छ चांदणें ! चोराच्या मनाशिवाय त्याचा चटका सहसा कुणाला बसायचा नाही. अच्युतरावांच्या लिखाणांत बहुधा संध्यारंगांचें संमेलनच आढळतें. विनोदी पद्धतीचा अवलंब करून वाचकांचीं मनें अंकित करणाऱ्या या तीन वाङ्मयसेनानींचीं निशाणें अेखाद्या व्यंग्यचित्रकाराच्या हातांत पडलीं, तर तो त्यांच्यावर फार सुंदर चित्रें काढील.</br>
{{gap}}"शब्द, कल्पना, परिस्थिति, प्रसंग व स्वभाव हे विनोदाचे पंचप्राण होत. यांतील येक प्राण भाषेच्या शरिरांत असला तरी विनोदाचें अस्तित्व वाचकाला पटतें. प्रासंगिक, स्वभावजन्य, व परिस्थितिमूलक विनोदाला कथा व नाटकें यांच्याअितकें निबंधांचें क्षेत्र अनुकूल नाही. तथापि 'कृष्णार्जुनयुद्ध' व 'वीरविडंबन' यांतील वातावरण, 'तोतयाच्या बंडा'तील चवथ्या अंकाचा चवथा प्रवेश, आणि 'माझी आगगाडी कशी चुकली ? ' ही गोष्ट केळकर यांच्या या प्रकारच्या विनोदाची अुत्कृष्ट अुदाहरणें होत. परिस्थितिमूलक विनोद 'विलायतेच्या बातमीपत्रा'प्रमाणे त्यांच्या निबंधलेखनांतहि क्वचित् दृग्गोचर होतो. ओहेन्री अगर पी. जे. वुडहाअूस यांचें 'विनोदाकरिता विनोद' हें तत्त्व केळकर यांनी ललित लेखनांतसुद्धा कधीहि अंगीकारिलेलें दिसत नाही. त्याचा स्वाभाविक परिणाम त्यांच्या निबंधांतील विनोद मुख्यतः कल्पनाप्रधान होण्यांत झाला. विनोद म्हणजे गारगोटीवर गारगोटी घासून अुत्पन्न होणारा अग्नि होय. तो उत्पन्न होतांना मौज वाटली, वाऱ्याच्या लहरीवर त्याचें आयुष्य अवलंबून नसलें, तरी त्याचें दर्शन होअीपर्यंत केवढी तपश्चर्या करावी लागते ! अुलट कोटी म्हणजे आगपेटींतील काडी ! ओढली काडी अन् शिलगाविली विडी ! अग्निदेवता क्षणार्धांत प्रसन्न ! पण वाऱ्याने ती मध्येच विझली तर पुनः ओढायची मात्र सोय नाही. अर्थात् वर्तमानपत्रांत गंभीर विषयाच्या विवेचनांत विनोद फुलवित बसण्याला सवड मिळत नसल्यामुळे, केळकर<noinclude></noinclude>
ef89tw7qnoby1esk6vulfq2q9y36vkx
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६९
104
102066
209797
206299
2024-10-24T10:12:59Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209797
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|६२]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>यांच्या विनोदबुद्धीने कोटीचाच आश्रय केला यांत अस्वाभाविक असें काय आहे!</br>
{{gap}}"शाब्दिक सहानुभूतीप्रमाणें शाब्दिक कोटीचेंहि महत्त्व फारसें नसलें तरी तिचें अस्तित्व सर्वत्र आढळतें व प्रसंगीं ती अुपकारकहि होते. केळकर यांना शाब्दिक कोट्यांची हौस नाहीं असें नाही. पण विपुलता, समर्पकता, व सरसता या दृष्टींनी त्यांच्या शाब्दिक कोटया कोल्हटकर-गडकऱ्यांच्या मानाने फिक्क्या वाटतात. पण केळकर यांच्या शाब्दिक कोट्यांपैकी कांही अितक्या सफाअीदार व सुंदर असतात की, त्या पाहून डोळयाचें पातें लवतें न लवतें तोंच खेळाडूचा त्रिफळा अुडवून टाकणाऱ्या कुशल गोलंदाजीचीच आठवण व्हावी.</br>
{{gap}}"केळकर यांनी विनोदासाठी विनोद लिहिला नसला, नवी विनोदृसृष्टि निर्माण केली नसली, तरी मराठी वाङ्मयाला विनोददृष्टि देणान्या आधुनिक लेखकांत त्यांचें स्थान अत्यंत अुच्च आहे. समतोल बुद्धीमुळे अतिशयोक्तीची अतिशयोक्ति करून हास्यरस निर्माण करायला त्यांची विनोदबुद्धि सहसा तयार होत नाही. प्रतिपाद्य विषय सुबोध व मनोरंजक करण्याकरिताच ते बहुधा आपल्या विनोदशक्तीचा अुपयोग करतात. अशा लिखाणांत कोटीसाठी कोटी तरी कोण करीत बसेल ?</br>
{{gap}}“ प्रत्येक वाङ्मयांत काव्याप्रमाणें विनोदाचे विषयहि बहुधा ठराविक ठशाचे होअून बसतात. तसें झालें की, त्या वाङ्मयाची स्थिति सांठलेल्या पाण्याप्रमाणें होते. त्यांत क्वचित् कमळें फुललीं तरी स्नानाचें सुख कोणालाहि मिळत नाही. वाङ्मयाचा प्रवाह वाहता राहिला तरच त्याचा विस्तार होण्याची शक्यता. मराठींतील विनोदाचा असा विस्तार करण्याचें श्रेय भाषेचे भावी अितिहासकार ज्या निवडक लेखकांना देतील, त्यांत केळकर यांची प्रमुखत्वाने गणना होअील. 'टवाळा आवडे विनोद' ही बहुजनसमाजाची विनोदाची कल्पना बदलण्याला केळकर यांचें लिखाण कांही कमी कारणीभूत झालें नाही. अस्पृश्य मानल्या गेलेल्या विनोदाला त्यांनी राजकारणादि देवमंदिरांचीं द्वारें अुघडीं करून दिलीं. त्यांच्या विनाेदगर्भ वाङ्मयाच्या अभ्यासकांतूनच भावी पिढींतील लघुनिबंधकार निर्माण<noinclude></noinclude>
01lmqg6dia8oag79lzcx0gmhy8qaay9
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७०
104
102075
209798
206312
2024-10-24T10:13:11Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209798
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ६३}}
{{rule}}</noinclude>व्हावयाचे आहेत. पहाटे पूर्वेकडे दिसणाऱ्या शुक्राचें स्वयंभू तेज मोहक असतें हें तर खरेंच; पण रम्य अुषःकालाचा दूत या दृष्टीनेहि त्याच्याकडे आपण कौतुकाने पाहत नाही काय ?"</br>
{{gap}}(४८) माझ्या या वरील सर्व हकीकतींत, किंवा माझ्या अुदाहरणाने तरुण पिढीच्या लेखकांना नक्की काय बोध घेतां येण्यासारखा आहे हें मला सांगतां येणार नाही. पण कदाचित् बोध घ्यावयाचा तर अितकाच की, 'लिहिण्याची हौस बाळगून मनुष्य अुद्योगशीलपणाने लिहीत राहिला, तर कोणाहि माणसाच्या हातून वाडमय या सदराखाली घालण्यासारखे लेखन होअूं शकेल.' ही हौस कांही अंशीं अुपजत असते हें मी प्रारंभींच सांगितलें आहे. परंतु त्या हौसेचा विकास दोन कारणांनी होअूं शकताे. अेक कारण म्हणजे 'वाङमय ही अेक कलानिर्मित वस्तु आहे' अशी भावना मनुष्याची असली पाहिजे. म्हणजे सुंदर चित्र, सुंदर अिमारत, सुंदर अभिनय, सुंदर कलाकुसरीचें काम, अित्यादिकांकडे पाहण्याची मनुष्याची जी दृष्टि तीच वाङ्मय - म्हणजे गद्य, पद्य, काव्य-यांच्या संबंधानेहि त्याची असली पाहिजे. पण कलेविषयी अभिरुचि ही अुपजत असेल तरच तिचा विकास अभ्यासाने होअूं शकेल. अुलट चित्र, गायन, अभिनय अित्यादि गोष्टींत ज्यांचें मन रमत नाही, व ज्यांना त्याविषयी अभिरुचि नाही, असे पुष्कळ लोक जसे आपण पाहातों त्याचप्रमाणें वाङ्मयांतील सौंदर्यप्रतीति होण्याचें अिन्द्रियच ज्यांना नाही असेहि लोक अनेक आढळतात. अशा कोटींतील मनुष्य फारसें चांगले वाङमय लिहूं शकणार नाही. शब्दलालित्य, हृदयंगम सुश्लिष्ट अर्थ, व भाषेंतील नृत्य, हीं पाहिल्याबरोवर त्यांत कांही विशेष आहे असें ज्याला वाटेल, त्यालाच वाङमय लिहिण्यांत आनंद वाटेल. चितारी जसा आपण काढलेलें चित्र पुनः पुनः आनंदाने पाहून त्यांत रमतो, तशाच प्रकारची सहृदयता वाङमय-लेखकाला पाहिजे. आणि तशी असेल तर आपण लिहिलेलीं पुस्तकेंहि फिरून चाळून वाचण्याची त्याला अिच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याहि लहान सुंदर मुलाचें दर्शन हें आनंददायकच. पण तें मूल स्वतःचें असलें तर त्यांत आनंदाची भरच पडेल नव्हे काय ? स्वतःचें वाङ्मय मधून मधून वाचून पाहण्यांत, स्वतःच्या मुलाला अपत्यप्रेमाने मधून मधून कुरवाळण्यापेक्षा अधिक अहंकारबुद्धि आहे, असें<noinclude></noinclude>
f18slshx2pp7lcga6b3wbu0hj8x7k9j
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७१
104
102108
209799
206347
2024-10-24T10:13:23Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209799
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|६४]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>मानण्याचें कारण नाही. वाङमय हें जितकें लोकांच्या आनंदाकरिता आपण लिहितों, त्यापेक्षाहि स्वतःच्या आनंदाकरिता तें अधिक लिहितों असें म्हटलें तरी त्यांत चूक नाही.</br>
{{gap}}(४९) पण सौंदर्यसुखास्वाद घेण्याप्रमाणें मतप्रतिपादन हाहि अेक वाङमयलेखनाचा हेतु असतो. प्रत्येक मनुष्याला प्रत्येक विषयावर स्वतःचें म्हणून अेक मत असतें. पण तें आपण लोकांना पटवूं अशी अिच्छा किंवा अुमेद सर्वांना सारखी नसते. आता वर्तमानपत्रासारखें साधन हातीं असलें तर मतप्रतिपादनाचें कार्य अेरवीपेक्षा अधिक प्रमाणावर आणि अधिक यशस्वीपणाने होअूं शकेल हें अुघड आहे. पण जे वर्तमानपत्रकर्ते नाहीत किंवा नव्हते असे ग्रंथकार किती तरी होऊन गेलेले दाखवितां येतील. उदाहरणार्थ, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी वर्तमानपत्रांत अेक ओळहि आजवर लिहिलेली नाही. तथापि त्यांचे टीकात्मक लेख किंवा नाटकें पाहिलीं, तर त्यांत कलाविलासाप्रमाणें मतप्रतिपादनाची आवडहि तितक्याच जोराने दिसून येते. त्यांच्या प्रत्येक नाटकाचा हेतु त्यांच्या नाट्यलेखनपद्धतीने हटकून सिद्ध किंवा सफल झाला असें जरी म्हणतां येत नाही, तरी त्यांच्या कथानकांतील व तें रंगविण्याच्या संवादांतील बीजभूत कल्पना पुष्कळशा विशिष्ट सामाजिक मतांशीं निकटपणें निगडित आहेत असेंच दिसून येअील.</br>
{{gap}}(५०) स्वतः मी काव्य नाटक यांचा हेतु किंवा मुख्य कार्य केवळ सामाजिक किंवा नैतिक बोध आहेच असें मानणारा नाही. त्यांतल्या त्यांत बोधापेक्षाहि काव्यविलासजन्य आनंद हाच वाङ्मय निर्मात्याचा मौलिक हेतु असतो व तेंच त्याचें मुख्य कार्यहि अंसतें असें मानणारा आहे. तथापि मी लिहिलेल्या वाङ्मयांत ( नाटके व कविता सोडून ) माझा मुख्य भर मतप्रतिपादनावरच असतो. मी क्वचित् विनोदी लेखहि लिहितों, पण तो विनोद केवळ विनोदाकरिता नसतो. त्याच्या द्वारें मला कांही तरी मतप्रतिपादन करावयाचें असतें. याविषयी माझ्या वाचकांना काय वाटत असेल हें मला सांगतां येत नाही. तथापि या मतप्रतिपादनाच्या मुद्दयालाच धरून मी असें म्हणतों की, मतप्रतिपादनाची तळमळ मनांत असेल तर, साधारणपणें बन्या प्रतीची<noinclude></noinclude>
efz3rcolla26fkhtp3gjbg4bloky2ag
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७२
104
102109
209800
206349
2024-10-24T10:13:40Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209800
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[६५}}
{{rule}}</noinclude>लेखनकला कोणालाहि हस्तगत करतां येअील. कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजांतील आमचे प्रोफेसर शिवराम बापूजी परांजपे यांचें अेक वाक्य मला आठवतें. तें असें की, " बेट्या, Have something to say and it is easily said.” आणि त्याचबरोबर अमेरिकन तत्त्ववेत्ता अिमर्सन यांचें अेक वाक्य मला आठवतें. तें असें की, " A river always makes its own bed. " हीं दोनहि वाक्यें अेकत्र घेतली तर त्यांचा अर्थ असा की, मनांत मतप्रतिपादनाची हौस असली म्हणजे ती शमविण्याकरिता कल्पना सुचूं लागतात, त्या पुष्कळशा मनांत सांठल्या म्हणजे शब्दांच्या द्वारें त्या आपला मार्ग काढतात, व आपल्या प्रवाहाला अनुकूल किंवा पुरेसें पात्र आपल्या सामर्थ्याने निर्माण करतात. नाही म्हणावयाला अुलट बाजूचींहि कांही अुदाहरणें मला माहीत आहेत. म्हणजे मतप्रतिपादन व वादविवाद हें जणू काय त्यांना व्यसनच जडून राहिलेलें असतें. त्या कामीं ते बोलबोलून भांडभांडून आपला जीव घाबरा करतील आणि दुसन्याला कंटाळा आणून त्याचाहि जीव नकोसा करतील. पण
लिहिण्याची गोष्ट निघाली की त्यांची गति खुंटली ! अेका पोस्टकार्डाअितकाहि मजकूर त्यांच्या हातून लिहून व्हावयाचा नाही. पण हीं उदाहरणें मी अपवादासारखी मानतों. मला संमत असा नियम म्हटला म्हणजे वरील दोन अिंग्रजी वाक्यांत ग्रथित झालेला.</br>
{{gap}}(५१) दुर्दैवाने पुष्कळ लोकांच्या समजुतींत ही गोष्ट येत नाही की, वंशवृद्धीशिवाय ज्याप्रमाणें समाज वाढणार नाही, त्याप्रमाणे मतप्रसाराशिवाय समाजाची प्रगति किंवा अुन्नति होणार नाही. कांही लोकांना असें वाटतें की " आमची मतें तीं काय, त्यांना किंमत कसली ?" दुसऱ्या कांहीना असें वाटतें की " आम्हांला काय लिहितां येणार ?" पण पहिल्या प्रकारचें मत चुकीचें व दुसरें मत भ्रमात्मक आहे. लोकोपयोगी अशा विषयावरील प्रत्येक व्यक्तीचें मत निश्चित ठरणें, व तें त्याने प्रकट करणें, याविषयी समाजाचा व्यक्तीवर हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीच्या संग्रहीं असलेला पैसा मिळूनच जशी राष्ट्रीय संपत्ति गणतात, त्याचप्रमाणें समाजांतील व्यक्तींचीं मतें अेकत्र धरूनच राष्ट्राची विचारसंपत्ति गणली</br>
मा. ज. अु. ५<noinclude></noinclude>
aakq3m8hyl7zsoytvo5p8ppxv8eyr5s
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७३
104
102110
209801
206351
2024-10-24T10:13:58Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209801
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|६६ ]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>जाते. 'मला काय लिहितां येणार आहे ( ! )' ही भावना निवळ भ्रमात्मक असते. अेका अिंग्रज ग्रंथकाराने असें म्हटलें आहे की “If every man only Makes the effort he can, before his death, produce a book worth reading by the public." म्हणून माझी पुढल्या पिढीच्या तरुण मुलांना अशी स्पष्ट सूचना आहे की, त्यांनी प्रत्येक विषयावर आपापली मतें निश्चित करावीं. वाचनाने व विचाराने तीं सुधारावीं, परिणत करावीं. साधनांच्या अनुकूलतेप्रमाणें अधिकांत अधिक लोकांना तीं पटवून देण्याची महत्त्वाकांक्षा धरावी. आणि असें झालें तर देशांत वाङमयवृद्धि होअील व ती वाङ्मयवृद्धि समाजाच्या प्रगतीला हटकून अुपयोगी पडेल.</br>
{{gap}}(५२) बहुश्रुतपणा या गुणाचें चीज व्हावें तितकें होत नाही असें मला वाटतें. पण बहुश्रुतपणा हाच विद्वत्तेचा मूळ पाया आहे; व तरुण पिढीला वाचनाचें व अभ्यासाचें व्यसन जडलें तर त्यासारखा तिला स्वतःला व समाजाला दुसरा लाभ नाही. वाचनाची आवड, वाङमयविलासाचा आनंद, आणि मतप्रतिपादनाची हौस, या तीन गोष्टी अनुकूल असतील तर समाजांत अनेक निरनिराळ्या प्रकारचें वाङ्मय आपोआप अुत्पन्न होअूं लागेल. आणि हें वैचित्र्य सहज सिद्ध होण्याचें कारण असें की, मनुष्य हा त्रिगुणात्मकच नव्हे तर अनेक गुणात्मक असतो. सत्त्व रज तम या गुणांतहि अनेक पोटभेद व बारीक प्रकार असतातच. प्रत्येक मनुष्याची आवड-निवड जशी विविध, किंवा प्रत्येक मनुष्याची चालण्याबोलण्याची, बसण्याअुठण्याची, पोषाख पेहेरावाची ढब जशी निरनिराळी असते, त्याप्रमाणें मतप्रतिपादनांत व लेखनकलेंतहि प्रत्येकाचा गुण अभिरुचि हीं वेगवेगळी असणारच. म्हणून तेंच मत सांगावयाचें असतां, तेंच कथानक कथावयाचें असतां, किंवा तीच कल्पना रंगवावयाची असतां, कोणी निबंध लिहील, कोणी नाटक लिहील, कोणी कविता करील, कोणी विनोदी लेख लिहील. आणि हे सर्व वाङमयाचे अभिजात प्रकारच होत. ज्ञानविचार किंवा मत हा आत्मा होय आणि भाषा हें त्याचें शरीर होय. शरीर सुरूप किंवा कुरूप लाभणें हें आपल्या हातचें नाही. त्याप्रमाणें आपण लिहूं तें वाङमय चित्ताकर्षक होअील ही गोष्ट आपल्या हौसेची असली तरी हातची<noinclude></noinclude>
tstht4p95ir4nxe52md5gxk7jkbdbpa
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७४
104
102123
209802
206368
2024-10-24T10:14:13Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209802
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ६७}}
{{rule}}</noinclude>नसते. तथापि सॉक्रेटिसाच्या शिष्यांचा त्याच्याविषयीचा आदर त्याच्या नकटेपणामुळे नष्ट झाला नाही, त्याप्रमाणें चित्ताकर्षक नसणाऱ्या वाङ्मयालाहि, तें सुविचारपूर्ण ज्ञानप्रद असल्यास, उपासक मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र हौस व अुद्योग पाहिजे.</br>
{{gap}}(५३) वाङमयलेखनाच्या आवडीने मी अनेक ग्रंथ लिहिले असले तरी माझी लेखनव्यासंगाची खरी हौस केसरी वर्तमानपत्रानेच भागविली. हौस व ती भागविण्याचें साधन यांचा संयोग दुर्मिळ असतो. पण सुदैवाने माझ्या बाबतींत तो संयोग आयताच साधला. तो असा की, केसरीसारख्या मोठ्या व प्रतिष्ठित अशा वर्तमानपत्रांत 'हवें तें, हवें तितकें, व हवें तेव्हा' लिहिण्याला भरपूर वाव असल्याने, मला विचार-प्रगटीकरणाचे जे जे मार्ग सुचले त्या सगळ्यांचा प्रयोग मला करून पाहतां आला. परंतु वर्तमानपत्रांत लिहिणें हाच मुख्य व्यवसाय होअून राहिल्याने मी वाङ्मयाचे अितर कोणतेहि कितीहि प्रकार लिहिले तरी, माझ्या लेखनाचा मुख्य प्रकार निबंध हाच ठरतो. आणि ही निबंधी पद्धति अितर प्रकारांतहि सांपडेल तेथे आपलें डोकें वर काढते. माझें निबंधलेखन हेंच माझ्या वाङमयांतील मुख्य अंग ठरतें असें प्रा. ना. सी. फडके यांना वाटतें. म्हणून त्या दृष्टीने त्यांनी याविषयी जें मत प्रकट केलें आहे त्यांतील अुतारे
याखाली देतों-</br>
{{gap}}" या वैभवाच्या स्थितींत केसरी असतांना व लोकजागृतीच्या व भाषावृद्धीच्या अशा दोन्ही दृष्टींनी मराठी निबंधलेखनास भरती येत असतांना, १८९६ सालीं अशा अेका व्यक्तीचा केसरीशीं व केसरीच्या द्वारें मराठी भाषेशीं ऋणानुबंध जडला की, तिनं पुढील तीन तपांत आपल्या अव्याहत विविध लेखनानं निबंधलेखनाच्या वाङमयप्रकारास अत्यंत हृदयंगम स्वरूप आणलं, आणि मराठी भाषेचं गुप्त सौंदर्य लोकांच्या पूर्ण निदर्शनास आणून दिलं. या व्यक्तीचं नांव नरसिंह चिंतामण केळकर !</br>
{{gap}}"व्यासंग, तर्क आणि विवेक या गुणांचा त्यांच्या ठिकाणीं अत्यंत अुत्कर्ष झालेला असून आपल्या मनांतील विचार अत्यंत सुसंगत पद्धतीनं, अतिशय नीटनेटक्या थाटांत, व कमालीच्या डौलदार भाषेंत, व्यक्त<noinclude></noinclude>
p67op3m387pkukylyi30shd0cvsmdwf
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७५
104
102124
209803
206369
2024-10-24T10:14:44Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209803
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|६८]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>करण्याचं त्यांचं सामर्थ्य केवळ असामान्य आहे. म्हणजे आपण असं म्हणूं की, कादंबरी - नाटकांसारख्या ललित कृतींना आवश्यक असलेला निर्मितिक्षम कल्पकतेचा गुण केळकरांच्या अंगीं नाही; पण प्रसादयुक्त भाषेच्या लालित्याचा गुण त्यांच्या लेखणींत पूर्णांशानं आहे. हा गुण त्यांच्या निबंधलेखनांत ओसंडून वाहत आहे, म्हणूनच त्यांच्या निबंधलेखनास अमरत्व प्राप्त झालं आहे. आणि खरे केळकर तुम्हांला पाह्यचे असतील तर, आणि त्यांच्यापासून तुम्हांला कांही शिकायचं असेल तर, तुम्ही त्यांच्या निबंध - लेखनाचाच होअील तितका अभ्यास केला पाहिजे.</br>
{{gap}}" वाचकांच्या भावना हालवून सोडण्यासारखं त्यांच्या निबंधांचं स्वरूप कधीच नसतं. अुलट युक्तिवादानं वाचकांच्या गळीं आपलं म्हणणं अुतरविण्याच्या हेतूनं त्यांच्या निबंधाचा प्रवाह संथपणानं पण आत्मविश्वासानं पुढेपुढे वाहत असतो. प्रत्येक विषयाच्या अुलटसुलट दोन्ही बाजू केळकरांना स्वच्छ दिसतात. आणि अुलट बाजूचं म्हणणं वाचकांपासून लपविण्याचा नजरबंदीचा खेळ खेळण्याअैवजी, त्याला उलट बाजू नीट दाखवून मग तिचं खंडन कसं करतां येअील तें दाखविण्याची त्यांची खटपट असते. श्री. वामन मल्हार जोशी हे मराठी साहित्यांतले प्रसिद्ध 'संशयात्मा' आहेत. प्रत्येक वादांतील अुभयपक्षांतील सत्य समजून घेण्याची शक्ति व इच्छा या बाबतींत श्री. जोशी व श्री. केळकर यांच्यांत साम्य आहे खरं; पण तें साम्य येवढ्यावरच संपतं, कारण " असंहि म्हणतां येअील अन् तसंहि म्हणतां येअील " अेवढंच सांगून वामनराव जोशी स्वस्थ बसतात; पण केळकर मात्र निष्क्रिय संशयांत स्वतः राहत नाहीत व वाचकांनाहि ठवीत नाहींत. अुभयपक्षांतील सत्यांश दाखवूनच ते थांबत नाहीत; तर अेक पाऊल पुढे जाअून ते त्या दोन सत्यांशांचा समन्वय करतात व प्रत्यक्ष
कार्याची दिशा दाखवितात.</br>
{{gap}}"केळकरांचा 'Sense of humour' असामान्य आहे याचा अर्थ असाच होईल की, त्यांना लेखनांत त्याचं सुंदर प्रमाण कसं राखावं हें विशेष कळतं.</br>
{{gap}}"केळकरांनी आपली विनोदशक्ति ज्या संयमानं आणि कौशल्यानं
आपल्या निबंधांत वापरली आहे तें विशेष ध्यानांत घेण्याजोगें आहे.<noinclude></noinclude>
50rhar77kwecmpgoq23ss75ryxt9lzn
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७६
104
102125
209804
206371
2024-10-24T10:15:00Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209804
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ६९}}
{{rule}}</noinclude>केळकरांच्या स्वभावांत विनोदाची आवड प्रामुख्यानं आहे. विनोद करण्याचं त्यांचं सामर्थ्यहि मोठं आहे.</br>
{{gap}}" शक्य तितके साधे शब्द, शक्य तेवढी आटपशीर व स्वतःचा तोल अैटीनं संभाळणारीं वाक्यं, अेकामागोमाग अेक लिहिलेल्या वाक्यांची बनत गेलेली ज्योत, अेकदम प्रदीप्त करणारी प्रश्नार्थक अगर अुद्गारात्मक वाक्यं, अित्यादि गोष्टींना केळकरांच्या भाषाशैलीचे खास गुणविशेष म्हणतां येअील. परंतु या गुणांचा परिणाम वाचकांवर घडतो, याचं कारण केळकरांची युक्तिवादात्मक विचारसरणी व त्यांच्या लेखनाची नमुनेदार टापटिपीची रचना, यांना त्याच गुणविशेषांचे अलंकार अगदी बरोबर शोभतात हें होय. काळकर्ते परांजपे व केळकर यांची तुलना मला अिथं करावीशी वाटते. परांजपे अतिशय श्रेष्ठ प्रतीचे वक्ते होते; पण त्यांचं भाषण अैकतांना त्यांचं जणूं लेखनच चाललं आहे असं वाटे. उलट, केळकरांचा कोणताहि निबंध वाचतांना ते लिहीत नसून आपल्याशीं बोलत आहेत असा वाचकाला भास होतो ! केळकरांची भाषा प्रतिष्ठित असूनहि अतिशय खेळकर आहे, अेवढं सांगितलं की त्यांच्या भाषेचे सारे गुणविशेष त्यांत आले. अितकी सहज प्रवाही, धावती, व आपल्या बारीक- सारीक हालचालींत सौंदर्य दर्शविणारी भाषा केळकरांनीच प्रथम लिहून
दाखवली. आणि अशा या कमाविलेल्या भाषेच्या साहाय्यानं त्यांनी असंख्य नव्यानव्या विषयांचे प्रांत काबीज करून मराठी भाषेचं साम्राज्य कल्पनेबाहेर वाढविलं. चिपळूणकर व आगरकर यांना जर आधुनिक मराठी साहित्याचे शककर्ते म्हटलं, तर त्या न्यायानं मराठी साम्राज्याचा विस्तार करून दिल्लीचं तख्त फोडणाऱ्या सदाशिवरावभाअूंचीच अुपमा नरसिंह चिंतामण केळकर यांना द्यावी लागेल ! "</br>
{{gap}}(५४) आता गद्याप्रमाणें मी पद्य ( कविता काव्य ) वाङमयहि थोडें
लिहिलें आहे. म्हणून त्याबद्दल दोन शब्द लिहितों- जगांत आजवर असा अेकहि लेखक साहित्यिक झाला नसेल की त्याने कवितेच्या कांही ओळी तरी लिहिल्या नाहीत. पण लेखक नसणारांनाहि कविता करण्याचा मोह होतो. गळ्याने गातां न येतांहि मनुष्य तोंडाने शीळ घालतो. त्याप्रमाणें<noinclude></noinclude>
jt3p2tkg03u0ds8deja094e6lzqf4tf
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७७
104
102148
209805
206401
2024-10-24T10:15:16Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209805
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|७० ]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>चांगलें लिहितां येत नसलें तरी माणसाला अेखादी कवितेची ओळ. जुळवावीशी वाटतेच. आपणाला तें गम्य नाही, ती कला साध्य नाही, हें तो विसरतो.</br>
{{gap}}{{gap}}None dares be pilot</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}who never steered a craft</br>
{{gap}}{{gap}}No untrained nurse</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}administers a draught</br>
{{gap}}{{gap}}None but skilled workmen</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}handle workmen's tools</br>
{{gap}}{{gap}}But verses all men scribble,</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}wise or fools.</br>
{{right|-Horace}}</br>
{{gap}}{{gap}}But those who cannot write</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}and those who can</br>
{{gap}}{{gap}}All rhyme and scrawl</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}and scribble to a man.</br>
{{right|-- Pope}}</br>
कवि टेनिसनच्या दोन ओळी अशा आहेत --</br>
{{gap}}{{gap}}In the spring a young man's fancy</br>
{{gap}}{{gap}}Lightly turns to thought of love.</br>
हें खरें आहे. पण love या शब्दाच्या जोडीला verse हाहि शब्द घालतां येअील असें मला वाटतें. अेखाद्या साहित्यिकांत कवि होण्याची पात्रता असते. कारण त्याची प्रतिभा अुज्ज्वल असल्याचें स्पष्ट दिसतें. पण अुत्कृष्ट काव्य त्याच्या हातून निर्माण होत नाही. 'A great poet who has not written a great poem' असें वर्णन अेका जर्मन साहित्यिका- बद्दल माझ्या वाचण्यांत आलें आहे. ' We presume capabilities; we do not find accomplishments'. विज्ञानशास्त्रांत निष्णात असलेले कित्येक लोक प्रतिभासंपन्न असतात. पण त्यांच्या भाषेला काव्याचें वळण<noinclude></noinclude>
jy5vyckxnqx0zonura52pdsfgqiry7i
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७८
104
102149
209806
206445
2024-10-24T10:15:36Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209806
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[७१}}
{{rule}}</noinclude>येत नाही. अेखाद्या खाणींतल्या मातींत सुवर्णकण भरपूर असतात. ती हातांत नुसती घेअून पाहिली तर ती आपल्या अंगच्या सोनेरी झाकेने चकाकते. पण अशा मातीचा अलंकार बनवितां येत नाही. ज्ञान हें सोन्याच्या खाणीसारखें आहे. पण प्रतिभा ही भट्टीसारखी आहे. सुवर्णकणपूर्ण अशी ज्ञानमृत्तिका नसेल तर प्रतिभेची भट्टी तरी काय करील ? म्हणून दोन्ही परस्पर पूरक समजावीं. अेकाने म्हटलें आहे की ' समजा, अेखादी तरुणी रुग्णशय्येवर पडली आहे. तिच्या अेका बाजूला तिचा प्रियकर बसला आहे. अशा वेळीं दोघांच्याहि तोंडून शब्द निघत असतील. पण दोघांच्या तोंडून शब्द निघतील ते सारखेच असतील काय? दोघांचा आवाज, दोघांच्या डोळ्यांतलें तेज सारखेंच असेल काय ? नाही. कारण अेक ज्ञानी आणि दुसरा प्रेमळ. '</br>
{{gap}}(५५) स्वतः मी या पद्यरचनेच्या भानगडींत पडतांना करमणुकीहून अधिक अुच्च हेतूची हाव कधीच मनांत धरली नव्हती. माझ्या ' पद्यगुच्छ 'या पुस्तकांतील पुष्कळशा कविता केवळ वेळ घालविण्याचें अेक साधन म्हणूनच मी लिहिल्या आहेत. केव्हा ठरीव कार्यक्रम संपून गेल्यामुळे अुरल्या वेळेचें काय करावें हें समजत नाहीसें झालें आहे. केव्हा आजारांतून अुठून बरा होतांना घरच्या घरीं बसून राहावें लागलें आहे. केव्हा विलायतेसारख्या लांबच्या प्रवासांत, अितरांच्या ख्यालीखुशालींत समरस होतां येत नाही; पण समुद्राकडे अेकसारखें पाहात बसण्याचाहि कंटाळा आला आहे. अशासारख्या स्थितींत रचलेल्या पद्यांत करमणूक होअून पुनः मनःप्रसन्नता लाभावी याहून दुसरा हेतु कोणता असणार ? मात्र कोणीहि मनुष्य, पाण्याच्या चुळा सहज थुंकीत बसला असतां, त्याच्या तोंडून अुडणा-या पाण्याने देखील जर यदृच्छेने कमीअधिक रम्य आकार भूमीवर निर्माण होतात, तर निवांत वेळीं मन गंभीर असतां निघालेल्या अुद्गारांतून कांही बोधप्रद आणि प्रसन्नतेच्या अुपासनेंतून कांही विनोदकारक, असे विचार निघून त्यांनी न कळत कला-विलासाचें रूप घेतल्यास त्यांत अस्वाभाविक असें काय आहे ? पद्यरचनेला सकृद्दर्शनीं गद्यापेक्षा कांही अधिक बंधनें असलेलीं दिसतात. म्हणून कोणाला वाटेल की, गद्यापेक्षा पद्य लिहिणें हें करमणुकीच्या खेळाला अुपकारक न होतां अपायकारकच होअील. पण दुसऱ्या अनेक<noinclude></noinclude>
7skvtpluobiso5xv2n0rmgttdhdemif
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७९
104
102185
209807
206448
2024-10-24T10:16:08Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209807
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|७२]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>दृष्टीने पाहतां गद्यलेखनापेक्षा पद्यलेखनानेच मनाचें रंजन अधिक होण्यासारखें असतें. आणि खेळाकडे कोणी अुपयुक्ततेच्या दृष्टीने पाहात नसला तरी गद्यापेक्षा पद्याची कांही अेक विशेष अुपयुक्तता असते हा विचारहि जमेस धरावा लागतो.</br>
{{gap}}(५६) मी कवि नसतांहि कविता करण्याच्या नादांत, अगदी क्वचितच का होअीना, पण पडलों याचें प्रांजल समर्थन करितां येतें. १९३१ च्या डिसेंबरांत अुज्जयिनी येथे कविसंमेलनाचा अध्यक्ष होण्याचा बिकट प्रसंग मजवर येअून पडला. त्या वेळच्या माझ्या भाषणांत मी असें म्हटलें होतें- " माझी विनयबुद्धि मला असें सांगते की, मी स्वतःला कवि म्हणवितों असा लोकांचा गैरसमज न होअूं देण्याची खबरदारी मला घेतली पाहिजे. अवंती येथील कविसंमेलनाचा अध्यक्ष म्हणजे काव्यसिंहासनावर क्षणभर कां होअीना पण मान्यतापूर्वक बसविला जाणारा राजा ! म्हणून त्या पदाला स्पर्श करतांना, विक्रमाच्या खांद्यावर बसणारा वेताळ किंवा भोजाच्या सिंहासनाला जोडलेल्या पुतळया यांनी जसा त्या राजांना त्यांच्या पात्रतेविषयी प्रश्न विचारून कुंठित केलें तसेंच, मला कोणी दुसऱ्यानें न म्हणतां मी होअूनच अुत्तर देत आहें कीं, कोणताच कविगुण मजमध्ये नाही. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा जुलूमच मजवर झाला आहे. "</br>
{{gap}}(५७) मी मनःप्रकृतीने विचारी. चिकित्सक, आणि विनोदप्रिय असा आहें. हे तीनहि धर्म काव्यनिर्मितीला वावडे असतात. जातिवंत काव्य निर्माण होण्याला लागणारें भावनाप्राधान्य मजमध्ये नाही. मी फार तर विकार व विचार यांचा चांगला मेळ घालूं शकतों. तथापि, " दगडालाहि पाझर फुटूं शकतो" या म्हणीप्रमाणें ज्यांत भावना खुलली किंवा फुलली अशा माझ्या कवितांचीं अुदाहरणें म्हणून माझ्या पद्य-गच्छ ग्रंथांत छापलेल्या कवितांचे मथळे आकडेवार देतों--</br>
{{gap}}चरख्याचें गाणें (९) महानुभावप्रशस्ति (१२) रायगडावरील हिरकणी बुरुजाचा पवाडा (१५) मराठा स्त्रीचें गाणें (१६) देशमातेला शेवटची विज्ञप्ति (१८) दुर्योधनाचे शेवटचे अुद्गार (१९) कांटेरी गुलाब (२९) फुलराणीला ओवाळणी (३०) अपूर्व देणगी (३४) प्रेमाचे प्रश्न<noinclude></noinclude>
dtrianws6j9fn3ljxj2xcldsevl20jg
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८०
104
102186
209808
206476
2024-10-24T10:16:20Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209808
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[७३}}
{{rule}}</noinclude>(३५) गणेशचतुर्थीचें चंद्रदर्शन ( ३६ ) विरहिणीची प्रणयपत्रिका-विशिष्टा-द्वैत (३७) चिमणीचें घरटें (४५) पाळणा (५४) सुगृहिणीचा वेदान्त (५५)-म्हणजे साठ कवितांपैकी पंधरा तरी कविता भावनाप्रधान आहेत ! तथापि ही गोष्ट खरी की कवितेंतहि माझा बहुतेक भर अलंकृतीपेक्षा चिकित्सा, व चिकित्सेपेक्षाहि विनोदी थट्टा, यांवर पडला आहे. मात्र अितक्या थोड्या कवितांत जितकें वैचित्र्य दिसून येतें तितकें अितर कोणा कवीच्या कवितासंग्रहांत क्वचितच आढळेल, असें मी अभिमानानें म्हणू शकेन.</br>
{{gap}}(५८) ग्रंथरूप वाङमयांत माझा प्रवेश अेका भाषांतरित विनोदी प्रहसनाने झाला. आणि पुढे अेखाद्या गंभीर विचारांच्या लेखांतहि मी विनोदबुद्धीचा हात अजीबात झिडकारला नाही; अुलट योग्य त्या रीतीनें तिचें सहायच घेतलें. तरी वर्तमानपत्रांनाच मी प्रथमपासून वाहिला गेलों, यामुळे माझ्या लेखनाला विवेचक धोपटमार्गी स्वरूप प्राप्त झालें. माझ्या गद्याने माझें काव्य मारलें, तसें माझ्या निबंधांनी माझें विनोदी लेखन मारले. मी वर्तमानपत्राचा संपादक झालों नसतों तर फार मोठा कवि झालों असतों किंवा फार मोठा विनोदी लेखक झालों असतों असें मी म्हणत नाही. कारण कवि होण्याला माझ्या मूळच्या स्वभावांतच अव्यवहार्यता, बेछूटपणा, अतिशयोक्त भावना, यांचा जोर कमी. तसेंच विनोदाच्या नादीं लागून वाहवत जाण्याचीहि मला आवड नाही. संयमाचा जोर जास्त. परंतु हेंहि खरें की वर्तमानपत्री भाषेचें वळण अेकदा लेखणीला लागलें म्हणजे मग त्याचा छाप ललितलेखनावरहि पडतो. मी १९२० च्या पुढे लेखकाच्या जन्माला आलों असतों, किंवा प्रथमपासून संपादक' झालों नसतों, तर माझ्या लेखनाचा प्रारंभ निबंधापासून न होतां लघुकथांपासूनच झाला असता. पण अुशिरा कां होअीना, मी निबंधांच्या अितिहासांच्या जोडीला नाटकें कादंबन्या लघुकथाहि लिहिल्या. हरिभाऊ आपटे लघुकथा लिहीत; पण त्यांचे स्वरूप संक्षिप्त गोष्टीचें असे. ललिताची लज्जत त्यांत बरीच कमीः मी त्यांच्यानंतर दहा वर्षांनी लिहू लागलेला. यामुळे माझ्या लघुलेखांना वैचित्र्याचें व ललितविनोदाचें रूप त्यांच्याहून थोडें अधिक आलें. माझा लघुलेख लिहिण्याला प्रारंभ झाला तो १९१३ । १९१४ सालच्या<noinclude></noinclude>
o118clftm1vnaepydi9cgd276qyf43n
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८१
104
102206
209809
206482
2024-10-24T10:16:32Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209809
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|७४]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>सुमारास; म्हणजे हरिभाअू आपटे यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस . या प्रारंभाला 'केसरी' हें वर्तमानपत्र तेव्हा अुपयोगी पडण्यासारखें नव्हतें.</br>
{{gap}}(५९) पण या सुमाराला चित्रशाळेने 'चित्रमय जगत्' हें मासिक सुरू केलें, व त्याकरिता कांहीं तरी लिहावें असें सांगण्यांत आल्यावरून, मी त्यांत ओळीने तीन विनोदी लेख लिहिले. ते म्हणजे 'गीताराव ' सामाजिक चालीरीतींचा फरक' आणि 'माझी आगगाडी कशी चुकली' हे लेख मी 'आत्मानंद' या टोपणनावाने लिहिले. कारण असल्या प्रकारचे लेख नवे, आणि विशेषतः केसरीच्या संपादकाने लिहिलेले, म्हणून लोकांना ते कदाचित् आवडणार नाहीत अशी भीति वाटत होती. आणि श्री. कृ. कोल्हटकरांनी आपले सुदाम्याच्या पोह्यांचे विनोदी लेख 'विविधज्ञान विस्तारां'त लिहिले. त्यांत पावित्र्यविडंबन बेसुमार झाल्यामुळे, विनोदी लेखांविरुद्ध लोकमत बनत चाललें होतें. वास्तविक माझ्या वरील तीन लेखांत कोणाला लागण्यासारखें कांहीच नव्हतें. ते सर्वस्वी निरपवाद आहेत. ' माझी आगगाडी कशी चुकली' या विनोदी लेखाविषयीं तर रा. खांडेकर यांनीं असें लिहिले आहे की ' या लेखाचा अंतर्भाव केल्याशिवाय कोणत्याहि विनोदी लेखसंग्रहाला पूर्णता येणार नाही.' पण 'केळकर, तुम्ही असले लेख आमच्या मासिकांत लिहू नका ! दुसरें कांही वाटलें तर लिहा' असें त्या मासिकाचे मालक वासुकाका जोशी यांनी मला स्पष्ट शब्दांनी सांगितलें असें पक्कें आठवतें. पण यानंतरच माझीं
नाटकें लिहून झाल्यामुळे, ललित लेखनाची हौस त्या द्वारानें थोडीशी भागली. आणि १९१९ मध्ये निवडणुकीना अुद्देशून 'म्हणा स्वराज्य मतदार की जय' हा विनोदी पण मतप्रसारक लघुलेख खुद्द टिळकांसमक्ष केसरींतच लिहून, त्या गंभीर वर्तमानपत्री मैदानांत माझें ललितकलेचें निशाण मी प्रथमच अुभारलें.</br>
{{gap}}(६०) वास्तविक 'चित्रमयजगतां'तील हे तीन लेख 'लघुकथा' नव्हेत. तसेंच लघुनिबंधहि त्यांना म्हणतां येणार नाही. तर वक्रोक्ति-लेख किंवा विनोदी चुटके (Skits) असें म्हणतां येअील. आणि याच जातीचे यापुढचे लेख म्हणजे 'श्रृंगाल -संमेलन', 'दुर्जनसिंग महाराजांची नवसफेड',<noinclude></noinclude>
layur59146kytpr4kk7mgd3vehn3fjm
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८२
104
102207
209810
206521
2024-10-24T10:22:37Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209810
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ७५}}
{{rule}}</noinclude>' शेवटचें लढाअू जहाज', 'वेताळाचा घाट', ‘ न्यायकोर्टांतील अेक दृश्य', अित्यादि होत. खरी लघुकथा अशी मी सिमल्याच्या अेका मुक्कामांत 'मौज' वर्तमानपत्राच्या अेका दिवाळी-अंकाकरितां लिहिली. आणि मला सांगावेंसें वाटतें कीं माझे पहिलें नाटक ' तोतयाचें बंड' हें जसें चांगलें वठलें, तशीच माझी पहिली लघुकथा 'दुधाची धार' ही देखील चांगली वठली. कारण ती वाचतांना अजूनहि माझ्या तरी डोळयांना पाणी येतें. मग अितर कोणाच्या येवो वा न येवो.</br>
{{gap}}(६१) नंतर आता माझ्या नाट्य लेखन-व्यवसायासंबंधाने सविस्तर लिहितों. नाटय विषयाची हौस मला लहानपणापासूनच होती. शाळेंत व हायस्कुलांत असतांना बक्षिसमारंभाच्या वेळीं, माझ्याकडे संभाषणांतील महत्त्वाचा पार्ट असावयाचा. अेका जरीच्या टोपीच्या मुगुटावर आण रुपेरी मठीच्या छडीच्या राजदंड वैभवावर मी राजा कॅन्यूट होऊन तोंडपुज्या दरबारी लोकांची फजिती केली ! दुसऱ्या प्रसंगीं असाच अेक राजा होअून शिकारीला गेलों, व अरण्यांत भुकेने व्याकुळ झालों असतां ज्या प्रामाणिक शेतकऱ्याने मला भाकरी खाअूं घातली त्याला मी जागच्या जागीं छोटेखानी सरदार बनविलें ! राजा अलेक्झांडर होअून, माझ्यासमोर धरून आणलेल्या अेका दरवडेखोराकडून मलाच "मोठ्यांतला मोठा दरवडेखोर " म्हणवून घेतलें, तरी अुदार मनाने त्याला बंधमुक्त केलें ! आणि पुण्यांतला अेक विद्यार्थी होअून, चतुरशिंगीच्या यात्रेला जाअून चैन करण्याकरितां घरीं आअीच्या पेटीतले पैसे चोरून घेण्यास मला सांगणा-या मित्राचा निषेध केला ! नाटक पहावयास जाणें ही माझी मोठ्यांतली मोठी करमणूक असे. आणि रा. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांसारख्या नाट्यप्रेमी गृहस्थाचा स्नेह असल्यामुळे, मुंबअीस अेल्अेल्.बी.चा अभ्यास करतांना आम्ही महिन्यांतून कमींतकमीं दोन नाटकें तरी पाहावयास जात असूं. त्या वेळीं मराठी संगीत नाटकें अेकटी किर्लोस्कर मंडळीच तेवढी करीत असे. गद्य नाटकें करणारी प्रमुख नाटक कंपनी 'शाहू नगरवासी नाटक मंडळी' हिची सुरवात असेल नसेल. यामुळे मुंबअीस पार्शी व गुजराती नाटक कंपन्यांचे खेळ पाहूनच आम्हांला आपली हौस भागवून घ्यावी लागे. या कंपन्यांचा<noinclude></noinclude>
ontg2blj4k4y5bzyzey6gjx0e2nfsed
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८३
104
102245
209811
206542
2024-10-24T10:22:56Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209811
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|७६]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>अुपयोग कोल्हटकरांना पदांच्या दृष्टीने होअी. मी तेव्हा पदें करीत नसें, व मला गातांहि येत नव्हतें, यामुळे मला तो अुपयोग नव्हता. पण विनोदाच्या दृष्टीने मला हीं पारशी गुजराती नाटकें मोठ्या करमणुकीचीं वाटत. विनोद म्हणजे चांगल्या प्रकारचा सरस व शुद्ध विनोद नव्हे. पण या नाटककंपन्या विनोदाच्या नांवाने जो गोंधळ घालीत त्याने पुष्कळ हसूं येअी. आणि विनोदी पात्रांकडूनच काय, पण आपणाकडून गंभीरपणाचीं कामें करणा-या पात्रांकडूनहि, वेष, भाषा हाव-भाव या सर्वांत जे असंबद्धतेचे प्रकार घडत ते पाहून हसून हसून आमचें पोट दुखे. पारशी गुजराती नाटक मंडळ्यांना पोषाख, सीन-सीनरी झगझगीत करतां येअी. पण त्यांचें शिक्षण थोडें व अभिरुचि हीन दर्जाची. यामुळे हास्यास्पद प्रकारांची त्यांच्या नाटकांतून खूप चंगळ असे. अशा अेका कंपनीने “ हास्यरसपरिपूर्ण हरिश्चंद्र " नाटकाची जाहिरात दिली होती ! पण तशी जाहिरात दिली नसती तरीहि भागलें असतें. शोक करणें तो देखील कांही पात्रें असा करीत की त्यांनी डोळ्याला पदर लावून रडावे व आम्हीं पाहणारांनी तोंडाला पदर लावून हसावें ! गाणें मात्र केव्हा वाअीट तर केव्हा खरोखर चांगलें असे. पण चांगलें तेंहि कवाली ! चालींमध्यें नवीनपणा असे व त्या तालबाज असत. यामुळे तत्कालीन किर्लोस्कर कंपनीच्या नाटकांतील हरिदासी चालीपेक्षा त्या ब-या लागत. रा. कोल्हटकर हे स्वतः चांगले गाणारे होते. पण केवळ गाण्याच्या माधुर्याच्या व तलम तानबाजपणामुळे. त्यांना गळा अितका अनुकूल असतां त्यांनी शास्त्रीय पद्धतीने गाण्याचा कधीहि सराव केला नव्हता. पण त्या पद्धतीच्या गाण्याची त्यांना मनापासूनच गोडी नव्हती याचें मात्र आश्चर्य वाटे. त्यांना ठुंब-या, पदें, गज्जल हीं अधिक आवडत, व त्यांचा संग्रह कंठगत करणें हा, तीं तसलीं नाटकें पाहण्यास जाण्यांत, त्यांचा अेक हेतु असे. आणि त्यांचें पहिलें संगीत 'वीरतनय' नाटकच काय, पण अगदीं पुढच्या पुढच्या नाटकांतूनहि, या मुंबअीच्या पारशी-गुजराती नाटकांच्या पदांच्या चालींची छाया भरपूर दिसते. गद्याच्या बाबतींत मात्र ही छाया तितकीशी पडली नाही. तथापि प्रवेशरचनेंत म्हणजे आलटून पालटून गंभीर व विनोदी पात्रांचे प्रवेश घालण्याच्या पद्धतींत पडली. पण या बाबतींत कोल्हटकरांनाहि मागे टाकणारा अेक नाटककार भेटला तो गडकरी.<noinclude></noinclude>
qnbi4u96gksn1wcjmk5s03ix38xn6w8
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८४
104
102256
209812
206544
2024-10-24T10:23:15Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209812
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ७७}}
{{rule}}</noinclude>गडकरी यांचीं नाटकें रंगभूमीवर पाहत असतां मी मुंबअीच्या या जुन्या नाटकगृहांत बसलों आहें की काय असा मला पुष्कळ वेळां भ्रम होअी !</br>
{{gap}}(६२) माझ्या या नाट्याच्या आवडीचा परिणाम ग्रंथलेखनांत मात्र लवकर दिसून आला नाही. १८९४ मध्ये मी शेरिडनच्या 'रायव्हलस् 'चें भाषांतर केलें ; पण तें केवळ वेळ जाण्याकरिता, करमणुकीकरता. पुढील साली बंगाली भाषा शिकण्याकरिता म्हणूनच बंगाली नाटककार ज्योतिरींद्रनाथ टागोर ( रवींद्रनाथ यांचे वडील बंधु) यांच्या 'सरोजिनी' नाटकाचें भाषांतर केलें. यानंतर १९०८ सालीं 'बलिदान' नांवाचें नाटक लिहिण्यास हातीं घेतलें; पण त्याची मजल अेक अंकापलीकडे गेली नाही. हें नाटक लिहिण्यांत, मवाळ व जहाल या पक्षांच्या गुणदोषांची तुलना व वर्णन नाट्यरूपाच्या पर्यायाने करण्याचा माझा विचार होता. म्हणून बौद्ध ( मवाळ ) व शाक्त ( जहाल ) या धर्मांच्या लोकांसंबंधाचें अेक कथानक मी योजिलें होतें; पण तें अर्धवटच राहिलें. मौज ही वाटते की, यानंतर नक्की सहा नाटकें समग्र स्वतंत्र लिहिलीं असतां हें त्रुटित नाटक मात्र पुरें करण्याला मला वेळ मिळाला नाही ! पण पुष्कळ वेळा असेंच कांही होतें. शेवटी १९३६ सालीं या कथानकावर कादंबरी ( बलिदान नांवाची) लिहून मी ती सह्याद्रि मासिकांत प्रसिद्ध केली !</br>
{{gap}}(६३) आपण नाटक लिहावें व तें रंगभूमीवर यावें अशी माझी स्वाभाविक अिच्छा व मनांतून हौस असतांहि, माझ्या हातून नाटक पुरें लिहून न होण्याचें अेक कारण असें की, प्रयोग करण्याकरिता नाटक स्वीकारणें न स्वीकारणें हें नाटक कंपनीच्या मालकांच्या लहरीवर असतें. आणि तें स्वीकारण्याची लहर यावयाची तर त्या नाटकाने आपणाला खूप पैसे द्यावे अशी त्यांची खात्री पटावी लागते. आता त्यांच्या दृष्टीने यांत वावगें असें कांही नाही. कारण नाटकाचा धंदा जसा अुत्पन्नाचा तसा फार खर्चाचाहि असतो. पण माझें माझ्यापुरतें पाहणें असें की, आपण अिच्छा प्रकट करावी व कंपनीने नाटक नाकारावें, ही गोष्ट अपमानास्पद म्हणून त्या भानगडींत पडूंच नये असें वाटे. अितकेंच नव्हे तर कंपनीने नाटक बसवावें, पण लोकांच्या नव्या अभिरुचीला तें पटूं नये, हेंहि वाअीट वाटण्याचें अेक<noinclude></noinclude>
oysuw9xpjcstu4ywkyd16xwjirbu4e1
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८५
104
102257
209813
206545
2024-10-24T10:25:11Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209813
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|७८ ]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>कारणच झालें असतें. जुन्या काळासारखी अितर ग्रंथांप्रमाणें नाटकें ही नुसत्या वाङ्मयलेखनाची अेक गोष्ट असती तर वेगळें. पण नाटक लिहिलें आणि त्याचा प्रयोग न झाला तर ते फुकट श्रम झाले असें वाटू लागलें होतें. नाटकांत चित्रें घालावयाचीं तर तीं नटांच्या प्रवेशांचीं. पण प्रयोग बसल्याशिवाय अशीं चित्रें कशीं मिळणार ? चित्रांची सवय लोकांना लागल्याने बिनचित्रांची नाटकें छापलीं तर कशीं खपणार? अशा रीतीने या विषयांत पायांत पाय अडकून राहिले होते. रंगभूमीवर यशस्वी न झालेलीं अशींहि कांही नाटकें नाटक कंपन्यांनी स्वीकारल्याचें दिसत होतें. पण तो जुलमाचा रामराम व भिडेची भीक होती. शिवाय ज्यांचीं नाटकें स्वीकारलीं गेलीं त्यांतल्या कांहीचे कर्ते स्वाभिमान सोडून नाटक कंपनींत कशा लाचारीने लाळघोटेपणा करीत, किंवा निदान तद्रूप होअून जात, याची बाहेर पुष्कळांना माहिती नसते. नाही म्हणावयाला देवल-खाडिलकर व कोल्हटकर हेच प्रतिष्ठा ठेवून खरोखर 'मास्तर' या शब्दाला अुचित अशा मानाने आपली वागणूक नाटक कंपन्यांत ठेवीत. रा. गडकरी यांच्या नाटकावर पुढे पुढे पुष्कळ अुड्या पडत हें खरें, तथापि त्यांचा अुल्लेख या बाबतींत देवल-खाडिलकर यांच्या बरोबरीने करता येत नाही. गडकऱ्यांना आपलें नांव अडचणींतून कसें तरी वर काढावयाचें होतें. त्यांना निर्वाहाचें अितर
साधन नव्हतें. या गोष्टीमुळे त्यांना प्रथम प्रथम नाटक कंपन्यांतून मुलांचे मास्तर पण मालकांचे पगारी नोकर अशा नात्याने राहावें लागे. कोल्हटकर यांचा संबंध नाटक कंपन्यांशीं देवल खाडिलकर यांच्यापेक्षाहि कमी येअी. पण ते जरी मानी होते तरी कंपनींतील लोकांशी आढ्यतेने वागत नसत. समरस होऊन जात.</br>
{{gap}}(६४) नाटक कंपन्यांचा मीहि अेक ऋणानुबंधी होतों. पण माझा त्यांच्याशीं संबंध अर्थातच या सर्वांपेक्षाहि कमी येअी. किर्लोस्कर कंपनीने आपले अेक पुरस्कर्ते म्हणून, पूर्वीच्या प्रो. आगरकरांच्या जागीं आपल्या हँडबिलावर, डॉ. गर्दे यांच्याबरोबर माझें नांव घालण्याचा मान दिला होता (सन १८९८ पासून). तथापि कंपनींत माझें प्रत्यक्ष जाणें-येणें अगदीच जुजबी व कारणपरत्वें असे. तसेंच " 'तुम्ही लिहून द्याल तसलें नाटक आम्ही करूं. तुम्हांला त्याची कां पंचाअीत ?" असें किर्लोस्कर<noinclude></noinclude>
pyh3uxzmc168li1pt3qnlc8rqrie42z
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८६
104
102258
209814
206548
2024-10-24T10:25:27Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209814
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ७९}}
{{rule}}</noinclude>कंपनीचे चालक मला म्हणत. पण या म्हणण्याच्या परीक्षेची वेळ न आलेलीच बरी असें मला वाटे ! महाराष्ट्र नाटक मंडळीचेंहि असेंच म्हणणें असे. पण कंपनीने रा. खाडिलकर यांचा व रा. खाडिलकर यांनी कंपनीचा असा दुतर्फी जवळ जवळ मक्ताच ठरल्यासारखा झाला असल्याने, त्यांत दुसन्याला खरोखरच वाव नाहीं हें अुघड दिसण्यासारखें होतें. कसेंहि असो. आपण होअून कोणाला नाटक देणें व करा म्हणणें हा प्रसंगच सहसा मीं येअूं दिला नाही किंवा आला नाही ही गोष्ट खरी.</br>
{{gap}}(६५) पण १९१२ सालीं महाराष्ट्र नाटक मंडळींत फूट झाल्याने, खाडिलकरांच्या मक्तेदारीचे दिवस संपले. महाराष्ट्र नाटक मंडळींतून कांही लोक बाहेर पडून त्यांनी भारत नाटक मंडळी या नांवाची अेक नवी मंडळी काढली व मजजवळ नाटक लिहून मागण्यासंबंधी जवळ जवळ धरणेंच धरलें. कर्मधर्मसंयोगाने याच सुमारास, कै. रावबहादुर दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी त्यांना मिळालेले तोतयासंबंधाचे कागदपत्र मला वाचण्यास दिले होते, व ते वाचून हा विषय अेखाद्या नाटकाला फार चांगला होअील असें माझ्या मनांत सहज येअून गेलें होतें. म्हणून अेक दिवस अेखादा प्रवेश लिहावा म्हणून बसलों. आणि पार्वतीबाअी पूजा करीत बसली असतां तिजपाशीं बगंभट हा नाना फडणिसाची निंदा करतो तो ' तोतयाच्या बंडा' तील प्रवेश लिहिला. तो माझा मला चांगला वाटला. आणि लिहिण्याची अेकदा जी घडी बसली ती अशी कांही बसली की, अवघ्या दहा दिवसांत माझे सुमारें चार सवाचार अंक ओळीने लिहून झाले. अेक प्रकारें तो नादच लागला, केसरी ऑफिसांत जाअून सकाळी अकरा साडेअकरा वाजेपर्यंत वर्तमानपत्राचा मजकूर लिहावा, आणि दोन प्रहरापासून रात्रीपर्यंत घरी नाटक लिहीत बसावें, असा प्रकार सुरू झाला तो दहा दिवस अबाधित टिकला. तीन साडेतीन अंक होतांच नाटकाच्या कथानकाची चढण संपून अुतार लागला. आणि पुढचा भाग हस्तगत होणें हें अगदी सोपे आहे असें दिसून येतांच अेक संपूर्ण नाटक आपल्या हातून लिहून होणार याचा किती आनंद वाटला तो सांगतां येत नाही.</br>
{{gap}} (६६) भारत नाटक मंडळीचे चालक हे पाळतीवर होतेच. त्यांना<noinclude></noinclude>
bb24pfjzmttqvmo05s6tdmx5bfy4e5x
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८७
104
102259
209815
206594
2024-10-24T10:25:40Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209815
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|८० ]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>तोंपर्यंत तयार झालेला भाग सर्व वाचून दाखविला, तेव्हा अगदी अुडी घातल्यासारखें करून ते म्हणाले, “बस्स, नाटक आमचें झालें. आम्ही तें अुद्यापासून बसविणार. अुरलेला भाग आता वाटेल तेव्हा लिहा. " त्याप्रमाणें त्यांनी तें बसविण्यास सुरुवातहि केली. नंतर शेवटच्या प्रवेशापर्यंत अुरलेला भाग लवकरच त्यांना लिहून दिला. शेवटचा प्रवेश तर खरोखरच पहिल्या रंगीत तालमीच्या दिवशींच दिला ! भारत नाटक मंडळीला माझें हें नाटक मिळालें हें पाहून महाराष्ट्र नाटक मंडळीला सहजच फार वैषम्य वाटलें व तें नाटक आम्हाला द्या असें तेहि म्हणूं लागले. पण भारत मंडळीला देण्याचें कवूल करून त्यांनी तें बसविण्यासहि घेतलें, तेव्हा महाराष्ट्र मंडळीची विनंति मान्य करणें सहजच अशक्य झालें. मात्र माझें नाटक भारत ना. मंडळीला दिलें तें महाराष्ट्र मंडळीचे प्रतिस्पर्धी म्हणून विशेष अुत्तेजन देण्याकरितां किंवा विशेष मदत करण्याकरितां दिलें नव्हतें. कारण वास्तविक माझें व महाराष्ट्र मंडळीचें चांगलेंच सख्य होतें. पण योग तसा आला व देखावाहि विनाकारण तसा दिसला खरा ! यामुळे महाराष्ट्र मंडळीनी मजवर अेक प्रकारचा बहिष्कार, अर्थात् नाटकापुरता, घालण्याचें धोरण स्वीकारले. त्यानंतर तें करण्याचा हक्क ज्या चित्ताकर्षक नाटक मंडळीला दिला तीहि लवकरच नामशेष झाली. आणि मुंबअी, नागपूर विद्यापीठांतून हें नाटक बी. अे., अेम्. अे. च्या परीक्षांना ठेवलें जातें, व बहुतेक लोक त्याला माझ्या नाटकांत अग्रस्थान देतात, असें असतां महाराष्ट्र मंडळीनी तें करण्याची अिच्छा पुढे केव्हाही दर्शविली नाही.
माझा योगच असा दिसतो की, माझीं नाटकें अप्रसिद्ध कंपन्यांच्या हातीं तरी पडावीं, किंवा ज्या चांगल्या कंपन्यांच्या हातीं तीं पडलीं त्या लवकरच बुडाव्या. कसेंहि असलें तरी, कांही नाटकें चांगलीं असतांहि तीं राहावीं तशीं रंगभूमीवर राहिलीं नाहीत अितकें मात्र खरें.</br>
{{gap}}(६७) भारत नाटक मंडळीचा स्वभाव प्रथम मला माहीत नव्हता. नाटक मागून घेतांना तर त्यांनी लीनता, आदर, आज्ञाधारकत्व, हौस हीं अितकीं कांही दाखविलीं की बोलून सोय नाही. पण त्यांच्या खऱ्या स्वभावाची परीक्षा नंतर लवकरच झाली. हातीं नवें किंवा चांगलें नाटक नाही. पुण्यास कंपनीचा मुक्काम पडलेला. तेव्हा कसें तरी नवें नाटक पुढे आणून<noinclude></noinclude>
l0wqcwi7vf06pbijc3vdun0tlr595uv
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८८
104
102260
209816
206605
2024-10-24T10:26:04Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209816
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ८९}}
{{rule}}</noinclude>चार पैसे मिळवून पुण्यांतून जावें अशी घाअी त्यांना होणें साहजिक होतें. परंतु माझें पाहणें तसें कसें असणार ? मी केवळ पैसे मिळण्याच्या अुद्देशाने नाटक लिहिलें नाही किंवा प्रयोगाला दिलें नाही. तेव्हा माझी हौस अितकीच की नाटक चांगलें बसल्यावर मगच तें लोकांसमोर यावें. मी त्या वेळीं पुण्यांत केसरीचा संपादक, व माझें हें पहिलेंच नाटक रंगभूमीवर येणार. तेव्हा तें कसें काय येतें याविषयी मी चिंतातुर असावें, हें स्वाभाविक नव्हतें काय ? पण कंपनीची दृष्टि ती नाही. तें नवें नाटक व केळकरांचें नाटक. म्हणून कसेंहि वठलें तरी चारदोन प्रयोगांना पैसे देणारच. आणि आपण पुण्यांतून बाहेर पडून अितर गांवीं त्याचे जसजसे प्रयोग करूं तसतसें तें अधिक चांगलें बसेल. तेव्हा तें घाअीने पुण्यास काढलें तरी काय हरकत ? अशा विचाराने कंपनीने घाअी चालविली. तसेंच मी नाटककार गांवांत होतों म्हणून त्यांनी, कच्च्या बिनरंगी तालमी होत असतां, अभिनय-भाषणें वगैरे कशी काय होतात, कोठे चूक निघते, कोठे दुरुस्ती करण्यास पाहिजे, कोठे पात्रांना भाषणांतील मर्माची समजूत करून द्यावयास पाहिजे, हें पाहण्याकरिता मला तालमीला निमंत्रण करावयास पाहिजे होतें. तेंहि कधी केलें नाही. परंतु घाअीघाअीने कशा तरी नकला, धड पाठ न करतांहि, ओरबाडून घेअून, रंगीत तालमीची तारीख ठरविली; व प्रयोगाच्या परवानगीकरिता त्याचें हस्तलिखित डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाकडे पाठविलें.</br>
{{gap}}(६८) मी रंगीत तालीम पाहिली तेव्हा नकलाहि धड पाठ नाहीत असें दिसून आलें. तेव्हा नाटक आणखी थोडें बसल्याशिवाय करूं नका, दोन आठवडे तरी थांबा, व तोंपर्यंत मी प्रयोगाला परवानगी देत नाही असें समजा, असें त्यांना सांगून मी निघून आलों. पण कंपनीचे मालक अत्यंत अहंमन्य. त्यांना आपल्या नाट्यकौशल्याचा अभिमान होता, व त्यांतूनहि ते स्वतःच यापूर्वी नाटक-ग्रंथकार बनले होते. तेव्हा त्यांच्यापुढे मी माझें शहाणपण चालवावें हा त्यांना माझा मोठा गुन्हाच वाटला ! त्यांनी मी गेल्यावर मागे अकांडतांडव केलें, व आम्हां 'पदवीधर' नाटक-ग्रंथकारांवर खूप तोंडसुख घेतलें ! पण मी परवानगी देत नाही म्हटल्यावर घोडें थोडेंसें अडलेंच. म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशीं कांही मंडळी मध्यस्थीला
मा. ज. अु. ६<noinclude></noinclude>
nn7b51yp6ju8o66c1kojf8wkm54vjvq
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८९
104
102261
209817
206606
2024-10-24T10:26:26Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209817
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|८२]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>पाठवून आपल्या सांपत्तिक दुर्दशेचें वर्णन केलें, व कसेहि करून परवानगी द्या अशी भीड घातली. तेव्हा मलाहि ती द्यावीशी वाटली व मी ती नाअिलाजाने दिली. पहिला जाहीर प्रयोग किर्लोस्कर नाटकगृहांत झाला. प्रयोग साधारण बरा झाला. पण नाटक नीट न बसल्याने रंग भरावा तसा भरला नाही. लगेच तीन दिवसांनी दुसरा प्रयोग झाला. पण तीन दिवसांत सुधारणा ती काय होणार ! अशा रीतीने मला नाखूष करून भारत नाटक मंडळी पुण्याहून सोलापुराला गेली. बरें, नाटक घाअीघाअीने बसविलें तरी त्याची खरी योग्यता त्यांना माहिती नव्हती असें नाही. आणि त्यांना जर नाटकाची परवानगी पाहिजे होती, तर त्याच्या मोबदल्यासंबंधी कांही करार वगैरे करण्याबद्दल त्यांनी आपण होअून मला विचारावयास पाहिजे होतें. पण पुण्याहून जातांना तेंहि केलें नाही. तेव्हा मलाहि थोडा राग आला. आणि मी त्यांना पत्र लिहून कळविलें की, कराराचें बोलणें करण्यास या. तेव्हा त्यांना यावें लागलें. परंतु आल्यावर बोलणें काढलें त्यांत ' मोनॉपली 'च्या हक्काकरिता फक्त २०० रुपये देअूं असें सांगितलें !
मला ते मेहेरबानीखातर नाटक फुकट मागते, व माझ्या हौसेप्रमाणें तें बसवून त्याचे प्रयोग करते, तर मी कदाचित् कांही न घेतांहि त्यांच्यापुरता तरी प्रयोगाचा हक्क दिला असता. परंतु त्यांची अेकंदर वागण्याची पद्धतीच अशी चढेलपणाची दिसली की, मी कांहीच न बोलतां त्यांना निरोप दिला.</br>
{{gap}}(६९) कर्मधर्मसंयोगाने त्याच वेळी पुण्यास 'चित्ताकर्षक' नांवाची नाटक मंडळी आली होती. तिचे प्रयोग दुसऱ्या अेका थिअटरांत सुरू होते. तिच्यांतील मंडळींनी भारत नाटक मंडळीचा प्रयोग पाहिला, तेव्हा नाटकाबद्दल त्यांचें मत फार चांगलें झालें. आणि माझा व भारत नाटक मंडळीचा बेबनाव झाला असें समजतांच, त्यांनी येअून आपल्यास परवानगी मिळण्याविषयी फारच गळ घातली. नंतर या मंडळीचा मी अेक दुसऱ्या नाटकाचा प्रयोग मुद्दाम जाअून पाहिला. त्यावरून त्यांच्या नाट्यनैपुण्याविषयीं माझा ग्रह चांगला झाला, व त्यांची हौस व लीनता पाहून त्यांना हें नाटक देण्याचें मी ठरविलें. आणि दोन दिवसांनी सोलापुरास भारत नाटक मंडळी प्रयोग करणार तोंच त्यांना मी तारेने मनाअी केली व " तुम्हाला हक्क<noinclude></noinclude>
7pzoip9ptzottgpnbwsfg2zc0vjevo9
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९०
104
102262
209818
206607
2024-10-24T10:26:41Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209818
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ८३}}
{{rule}}</noinclude>दिलेला नाही, माझ्या नाटकाचे प्रयोग तुम्ही यापुढे करूं नये" असें नोटिसवजा लिहिलें. तेव्हा कंपनीचे मालक ताबडतोब आले. पण त्यांच्या अेकंदर वर्तनाचा मला अितका राग आला होता की, मी त्यांना विशेष कांही न बोलूं देतां तारेंतलाच मजकूर तोंडाने सांगून परत लावून दिलें.</br>
{{gap}}(७०) पुढे 'चित्ताकर्षक' मंडळीने हें नाटक फार चांगलें बसविलें, व त्यांतील नानबा गोखले यांचें नाना फडणिसाचें काम तर अितकें अुत्तम ठरलें कीं तें काम करणारा त्यांच्या जोडीचा दुसरा मनुष्य मिळणें अशक्य आहे असे तज्ज्ञ लोकहि म्हणूं लागले. अशा रीतीने तोतयाचें बंड या नाटकाला मला नाटक मंडळी बरी मिळाली. मंडळींनाहि नाटक चांगले मिळालें व तिचें या नाटकामुळे नांव झालें. तेव्हा मजकडून आणखी कांही नाटकें लिहून घ्यावी अशी अिच्छा या कंपनीला झाली. आणि अेक नाटक पुरें लिहून होअून तें रंगभूमीवर आलें व लोकांना आवडलें, यामुळे दुसरें अेखादें नाटक लिहावे अशी मलाहि हौस अुत्पन्न झाली. त्याप्रमाणें दुसरें नाटक चंद्रगुप्त हें लिहिलें. तें लिहिण्याला कारण वास्तविक चंद्रगुप्तासंबंधाने आवड असें नसून पूर्वीपासून चाणक्यासंबंधाने मनावर गंभीर विचारांची पडलेली छाप. पूर्वी हायस्कुलांत मी मुद्राराक्षस नाटक वाचलें होतें, व त्यावरून आर्य चाणक्याच्या कर्तृत्वाविषयीं अेक प्रकारचा ठसा मनावर अुमटून राहिला होता. पण त्याच्या तामसी स्वभावाबद्दल थोडासा रागहि मनांत होता. तेव्हा त्याला मिथ्याप्रतिज्ञ करून त्याची किंचित् फजिती करावी अशी अेक कल्पना सुचून मी चंद्रगुप्ताचें कथानक हातीं घेतलें. तोतयाच्या बंडाला अैतिहासिक कथानकाचाच मुख्य आधार होता. पण माझ्या चंद्रगुप्त नाटकाला अितिहासाचा खरा आधार नसून, कथानक अगदी कपोलकल्पित असें रचलेलें आहे. मात्र वॉल्टर स्कॉटच्या वुडस्टॉक नामक कादंबरींत राजपुत्र चार्लस् याच्या चरित्राचें वर्णन फार वर्षांपूर्वी वाचलें होतें, त्याचा या ठिकाणीं किचित् अुपयोग केला. " दैवहत राजपुत्र स्त्रीवेषाने अेका राजनिष्ठ कुटुंबाच्या संरक्षणांत राहून त्याने शत्रूपासून आपला बचाव करून घेतला " ही चंद्रगुप्त नाटकांतील मूळ कल्पना होय. पण याच्याच अनुषंगाने, ' यच्चयावत् सर्व नन्दवंशीन्यांचा मी संहार करीन' अशी प्रतिज्ञा चाणक्याकडून करवून तीच पुढे<noinclude></noinclude>
r2pb5n95pl9yj4488qtwdd5hjyuvufn
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९१
104
102263
209819
206608
2024-10-24T10:27:01Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209819
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|८४]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>त्याच्या हातून मी मोडविली आहे. आणि ती मोडविण्याचा प्रकार असा की, जो आपला शिष्य चंद्रगुप्त नन्दांना मारल्यावर त्यांच्या राज्यावर चाणक्याने बसविला, तो मूळ अरण्यांत सोडून दिलेला व नापत्ता झालेला नंदाचाच मुलगा होता ! नंदववाची शब्दशः प्रतिज्ञा खरी व्हावयाची तर चंद्रगुप्ताचाहि वध चाणक्याला करणें प्राप्त; व तो तर त्याच्या हातून होणें शक्य नाही. कारण त्याला विद्या शिकवून चाणक्यानेच मोठा केला, व त्याच्याच हातून नंदांचा वध व राज्यक्रान्ति करून त्या गादीवर चंद्रगुप्ताला चाणक्यानेच बसविलें. यामुळें आपली प्रतिज्ञा फुकट गेली असें चाणक्याला आपल्या तोंडाने कबूल करावें लागलें. मानी मनुष्याने अशी गोष्ट आपल्या तोंडाने कबूल करणें हीच अीश्वराची अहंकारी मनुष्याला शिक्षा होय या तत्त्वाची मौज या नाटकांत दिसून येते.</br>
{{gap}}(७१) 'तोतयाचें बंड' शोकपर्यवसायी होण्याशिवाय गत्यंतरच नव्हतें,
व तें पर्यवसान चांगले साधलें आहे असें मला वाटतें. त्या नाटकांत मी विनोद पुष्कळ ठेवला आहे. परंतु तोतया पुण्यास धरून आणल्याची हकीकत जेथे खरी सुरू होते तेथून पुढे विनोदाचा एक शब्दहि मी ठेवला नाही. आणि नाना फडणवीस व अमला यांच्या प्रवेशापासून तर दुःखभावनेचें जें आभाळ भरून येण्याला सुरुवात होते तें कडेपर्यंत तसेंच टिकतें, व अखेर तें अगदी गडद होऊन अश्रुपाताचा पर्जन्य पडतो. चंद्रगुप्त नाटकाची कल्पना मुळापासून संकटग्रस्त पण शेवटीं आनंदपर्यवसायी आहे. तोतयाच्या बंडापेक्षा यांत विनोद असा कमी आहे, व करुणास्पद प्रसंग अेकामागून अेक वाढत जातात. तरी त्या सर्वांचा अंत कांही तरी आनंदाच्या प्रसंगांत होणार अशी आंतून मनाला अेक प्रकारची जाणीव असते.</br>
{{gap}}( ७२ ) तोतयाच्या बंडावर, त्या वेळीं, वर्तमानपत्रांतून किंवा मासिकांतून परीक्षणात्मक टीका आल्या नाहीत. पुढे पुष्कळ दिवसांनी रा. कोल्हटकर यांनी टीका लिहिण्याला सुरुवात केली. पण लवकरच या नाटकाचा विषय बाजूला राहून त्यांनी नाट्यतत्त्वांच्या चर्चेला जो प्रारंभ केला तिचाच अेक स्वतंत्र ग्रंथ झाला. चंद्रगुप्तावर परीक्षणात्मक अभिप्राय अेकदोन आले. ते दोनहि फार अनुकूल असे होते. पैकी अेक पुण्याचे प्रो.<noinclude></noinclude>
j508qlhmcelq68g40k5izxx1ejjr065
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९२
104
102264
209820
206609
2024-10-24T10:27:15Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209820
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[८५}}
{{rule}}</noinclude>खाड्ये यांनी लिहिला होता, व दुसरा नागपूरचे प्रो. बेहेरे यांनी लिहिला होता असें वाटतें. आणि नाटक रंगभूमीवर आणण्यापूर्वी, महाराष्ट्र मंडळींतील नट रा. कारखानीस यांना सगळ्या नाटकाची तालीम अेका बैठकीस दाखविली. तेव्हा त्यांनी असे अुद्गार काढले कीं, हें नाटक तोतयाच्या बंडापेक्षाहि अधिक चांगलें वठलें आहे. कथानक स्वतंत्र व चांगलें रंगलेलें या दृष्टीने माझ्या सर्व नाटकांत व्यक्तिश: मला तरी हेंच नाटक सर्वांत अधिक आवडतें.</br>
{{gap}}(७३) यानंतर तिसरें नाटक लिहिलें तें कृष्णार्जुनयुद्ध. यांतील कथानक मुळीच स्वतंत्र नाही. ते सर्वच्या सर्व अेका हरिदासी आख्यानावरून घेतलेलें आहे. फक्त प्रवेशरचना व संभाषणांतील खटके, अुत्तरें, प्रत्युत्तरें हीं कपोलकल्पित आहेत. या नाटकांत करुणास्पद असा भाग म्हणजे चित्ररथ गंधर्वाचा होअूं घातलेला वध. पण कांही अंशीं चित्ररथ हा प्रथम दारूच्या धुंदींत असतो तेव्हा त्याचा अुन्मत्तपणा हा हास्यरसपोषक होतो. तसाच दारूची धुंदी अुतरल्यावर तो जो भित्रेपणा दाखवितो व शोक करतो त्याचा हि परिणाम हास्यास्पदच होतो. नाही म्हणावयाला बिचाऱ्या त्याच्या स्त्रीचें दुःख मात्र खरें वाटतें. गंगाकांठच्या स्मशानांतील प्रवेश अेरवी करुणास्पद व भयानक वाटावयाचे; परंतु आधीपासून नारदाच्या लावालावीचा प्रकार सुसंगत चालू राहिला असल्याकारणाने, समोर स्मशानांत चिता पेटलेली दिसली तरी, ही नारदाच्या कारस्थानाची परिणति व अेखाद्या नव्या विनोदी प्रसंगाची प्रस्तावना असेंच प्रेक्षकाला वाटूं लागतें. या सर्व नाटकांत खरा गंभीर प्रवेश म्हटला म्हणजे अगदी शेवटचा - कृष्ण व अर्जुन यांची प्रत्यक्ष रणांगणावर गाठ पडते तेव्हाचा. त्यांतील अुत्तरें व प्रत्युत्तरें कोटिक्रमाच्या दृष्टीने चटकदार व समर्पक असल्यामुळें, बिनतोड प्रत्युत्तराने अुत्पन्न होणारा विनोद या गंभीर प्रवेशांतहि प्रगट होतो. तात्पर्य, या नाटकांतील असा अेकहि प्रवेश नाही की ज्यांत विनोद रंगत नाही व प्रेक्षकाला हसू येत नाहीं. या नाटकाचा प्रयोग पंढरपुरास प्रथम झाला तेव्हा " हास्ययुक्त अशा १३४ टाळ्या पडल्या" असें वर्णन कंपनींतील
एका निकाम्या नटाने आठवण ठेवून पत्राने मला कळविल्याचें स्मरतें. पण
या संख्येत विशेष असें कांही नाही. कारण नाटक-गृहांत अेकदा प्रारंभींच<noinclude></noinclude>
bp9vgnb8yto7bk9chhi1qwohg0et0e5
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९३
104
102285
209828
206668
2024-10-24T10:42:33Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209828
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|८६]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>प्रेक्षक हसूं लागले व टाळ्या वाजवूं लागले, म्हणजे एक प्रकारें तोच छंद त्यांना सर्वं नाटकभर लागून राहातो असा माझा अनुभव आहे. कदाचित् असेंहि असेल कीं, पंढरपुराचें वातावरण भजनी असल्यामुळे, तेथील प्रेक्षकांना इतर गावच्या प्रेक्षकांपेक्षा टाळी वाजविण्याची अधिक संवय असेल. पण कसेंहि म्हटलें तरी प्रथम प्रयोगापासून त्या नाटकाची लोकप्रियता सिद्ध झाली, ती पुढेहि सतत कायम राहिली, व नाटक पडलें असें कधी कोठेंच झालें नाही. पण त्यांतहि अेक असा धोका आहे की हें नाटक म्हणजे अेकखांबी बंगल्यासारखें आहे. कारण खरोखरच नारदाचें पात्र यांतून काढून टाकलें म्हणजे नाटकांत कांहीच शिल्लक राहात नाही ! आणि नारदाचें काम करणारा मनुष्य जर ढिला मिळाला, किंवा चतुर नसला, तर मात्र नाटक पडल्याशिवाय राहाणार नाही. पण सुदैवाने 'चित्ताकर्षक' मंडळीच्या हातीं हैं नाटक असता, त्यांतील मुख्य नट नानबा गोखले हा हें काम नाना फडणिसाच्या कामाअितकेंच अुत्तम करी. वास्तविक या नुसत्या नाटकाचें पुस्तक हातांत घेअून सामान्य वाचकाने वाचलें असतां, नारदाच्या भाषणाच्या 'शब्दांत' विलक्षण असें कांहीच त्याला दिसत नाही. शब्द अगदीच साधे आहेत. कोठेहि नारदाला आवाज चढा करून बोलण्याचाहि प्रसंग आला नाही. पण खालच्या अर्धसप्तकांतल्या अर्धसप्तकांतच जरूर तेवढा व योग्य ठिकाणीं आवाज बदलला, योग्य शब्दावर किंचित् अधिक जोर दिला, व किंचित् ढोंगीपणा स्वरांत आणला, म्हणजे तेवढ्याने नारदाचें पात्र यशस्वी होऊं शकतें. सर्व नाटकभर भरपूर काम असतां नारदाचें काम करणाराला आपण दमलों असें मुळीच वाटण्याचें कारण नाही. आणि आरड्याओरड्याचीं भाषणें न करतां, स्वतः न रडतां न हसतां, केवळ साधीं भाषणें करणाऱ्या पात्राने नाटक रंगतें अशीं या नाटकासारखीं अुदाहरणें फार थोडीं सापडतील असें वाटतें. पण त्याचें श्रेय, नाटकांत कथानकाच्या गुणामुळे सहज अुत्पन्न होणान्या गमतीच्या प्रसंगांना द्यावें लागतें. या अवघ्या नाटकांत अेकहि शब्द असा नाही की जो ग्राम्य किंवा थिल्लर किंवा फाजील थट्टेबाज असा म्हणतां येअील. असें असतां विनोद मात्र सर्व नाटकभर खेळत राहातो. पात्रें देव-गंधर्वादिकांचीं असल्यामुळे नाटक प्रहसनाच्या सदराखाली कोणी ढकलील असें वाटत नाही. तर त्याला 'हायक्लास कॉमेडी' असेंच नांव:<noinclude></noinclude>
o7m3va89awx1nuwqpfeioz45y3rzeuf
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९४
104
102286
209821
206669
2024-10-24T10:39:47Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209821
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[८७}}
{{rule}}</noinclude>मिळेल. रा. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी हें नाटक पाहिल्यावर व वाचल्यावर " The Most successful comedy in The Marathi Dramatical Literature ” असें या नाटकाचें वर्णन मला लिहून पाठविलें. त्यांत मित्रपक्षपाताच्या अतिशयोक्तीचा भाग कांही असला तरी अेकंदरीने त्यांचें वर्णन फारसें चूक नाही असें मला वाटतें. 'फाल्गुनराव किंवा तसबिरीचा घोटाळा' हे नाटक देखील हास्यरसाच्या दृष्टीने फारच चांगलें साधलें आहे; पण त्याला प्रहसनाचें थोडेंसें थिल्लर स्वरूप येतें. पण तें कृष्णार्जुन-युद्धांत येत नाही. हें नाटक माझ्या अितर कोणत्याहि नाटकांपेक्षा मराठी नाटक कंपन्यांना अधिक आवडलें असें दिसतें. कारण संगीत करून द्या अशा मागण्या या नाटकासंबंधानेच अधिक आल्या. 'ललितकलादर्श' नाटक मंडळीला तें देण्यापूर्वी गंधर्व मंडळीने तें मागितलें होतें. तें त्यांना देण्याचें ठरलेंहि होतें. नाटक वाचून घेऊन पात्रांच्या रचनेपर्यंत मजल आली होती. पण मुंबअीची सावकारी व मक्तेदारी या दोन्ही आड आल्याने कंपनीला वचनभंग करावा लागला, व मला स्वतःची निराशा करून घ्यावी लागली. नाट्यकलेच्या दृष्टीने अेक मोठी हानी झाली ती अशी की, रा. राजहंस म्हणजे बालगंधर्व यांनी या नाटकांत नारदाचें काम करावें असें ठरलें होतें; पण अेकजात स्त्रियांच्या भूमिका घेण्याची परंपरा मोडून, पुरुष पार्टीची भूमिकाहि आपण चांगली वठवूं शकतों हैं प्रेक्षकजगाला दाखविण्याची बालगंधर्व यांची संधि हुकली.</br>
{{gap}}(७४) माझें चवथें नाटक ' अमात्य माधव' हें लॉर्ड लिटन याच्या 'Richlieu' या नाटकावरून सुचलें. आणि मुख्य कथानक व कित्येक प्रवेशांची ठेवणहि त्या नाटकावरून घेतली आहे. पण कार्डिनल रिचलियो या पात्राच्या बरोबर तोडीचें पात्र माधवाचार्याचें घेतल्यामुळे त्या नाटकाचें निवळ रूपांतराचें स्वरूप जाअून असलीचें त्याला स्वरूप आलें आहे. प्रो. चिंतामणराव भानू यांनी या नाटकाचें परीक्षण 'विविधज्ञानविस्तारां'त करून त्याची फारच स्तुती केली आहे. विद्वत् मुगुटमणी ब्रह्मचारी तपस्वी असतां, त्याबरोबरच राज्यस्थापन व राज्यसंरक्षण असल्या जबाबदारीचीं राजकीय कामे करणारा शुद्धचारित्र्याचा माधवाचार्य हा कार्डिनल रिच लियोपेक्षा पुष्कळच श्रेष्ठ ठरतो. कारण रिचलियो हा फक्त नांवाचा ब्रह्मचारी होता. त्याच्या अंगांतला तांबडा झगा, धर्माध्यक्षाची टोपी, व<noinclude></noinclude>
lh875xpk7uiimjcmfc7pk4ug2muvtrr
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९५
104
102287
209822
206670
2024-10-24T10:40:18Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209822
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|८८]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>हातांतली माळ यांशिवाय धार्मिकतेचें भांडवल त्याच्याजवळ कांही नव्हतें हें इतिहास-वाचकांना माहीत आहे. आणि नाटक लिहितांना मी अितक्या खोल पाण्यांत शिरलों की, शेवटीं माधवाचार्याच्या खऱ्या वैराग्याचाच गंभीर ठसा वाचकां-प्रेक्षकांच्या मनावर राहतो.</br>
{{gap}}(७५) चित्ताकर्षक नाटक मंडळीला चवथ्या अेका नाटकाची गरज होती. कारण या चार नाटकांच्या संचावर बाहेर कोणत्याहि गांवीं तिला आपला मुक्काम निभावून नेतां येणार होता. मींहि त्या सुमारास लॉर्ड लिटन याचें हें नाटक वाचीत होतों. तेव्हां रूपांतराकरिता माधवाचार्याची भूमिका सुचली व त्यापुरतें, (मात्र त्या भूमिकेपुरतेंच) तें नाटक यशस्वी झालें. परंतु अैतिहासिक नाटक या दृष्टीनें त्याची योग्यता कांहीच नांही. तोतयाच्या बंडांत मात्र ही दृष्टि फार चांगली साधली आहे. त्याचा अुत्तम निर्विवाद पुरावा म्हणजे कै. वासुदेवशास्त्री यांचा या नाटकाबद्दलचा अभिप्राय असा होता की, " निवळ काल्पनिक पात्रे व प्रसंग सोडून दिल्यास खरोखर अैतिहासिक पात्रांच्या स्वरूपांत व वर्णनांत काडीचीहि चूक झालेली नाहीं. " याचें अेक कारण, पूर्वी सांगितल्याप्रमाणें, मी हें नाटक लिहितांना तोतयासंबंधी मिळेल तितकी सर्व माहिती अितिहासाच्या पुस्तकांवरूनच नव्हे तर अस्सल अैतिहासिक कागदपत्रांवरूनहि मिळविली होती. आणि त्यानंतर अलीकडेहि जे कागदपत्र नवे सापडले आहेत, त्यांनी देखील माझ्या नाटकांतील कल्पनेने बसविलेल्या प्रसंगांचें व भाषणांचें समर्थन होत आहे. पण विजयनगरचा अितिहासच मुळांत पुष्कळसा दंतकथेच्या स्वरूपाचा आहे. यामुळे कोणाच्या अितिहासविषयक अभिरुचीचा अुपमर्द माझ्या अमात्यमाधव नाटकाने होण्याचा फारसा संभव नाही अेवढीच त्यांतल्यात्यांत बरी गोष्ट. कसेंहि असलें तरीं अमात्यमाधव हें माझें सर्वांत नावडतें नाटक आहे. माधवाचार्याच्या कांहीं कांहीं भाषणांशिवाय, व दुसऱ्या अेका पात्राने केलेल्या त्याच्या वर्णनाशिवाय, त्या नाटकांत माझ्या मनाला बरें वाटण्यासारखें फारसें कांही नाही. प्रत्यक्ष प्रयोगांत दोन तीन प्रवेश खटकेदार वठतात; परंतु त्याचें श्रेय मला मुळीच नाही. ते लॉर्ड लिटन याच्या पुस्तकावरून बहुधा जसेच्या तसे घेतलेले आहेत. शिवाय हें नाटक रंगभूमीवर फार दिवस राहिलेंहि नाही. चित्ताकर्षक नाटक मंडळी अितर चार नाटक
7<noinclude></noinclude>
net8vb7560ko1tnvvcjhee5cnf2y2pi
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९७
104
102288
209824
206672
2024-10-24T10:41:10Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209824
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|९०]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>घातले असल्यामुळे, हास्यास्पदतेंत माझ्या 'अुत्तरा'ने भारतांतील अुत्तरावर ताण केली आहे. परंतु पुढे युद्धावरून परत आल्यावर त्यानें आपला सत्कार-समारंभ चालला असतां जो आत्मनिषेध केला, तो भाग मूळ भारतांत नाही; व या प्रसंगाच्या भाषणावरून अुत्तराच्या पूर्वीच्या थिल्लरपणाचें परिमार्जन होअून, त्याच्या मनांत येणाऱ्या पश्चात्तापात्मक सद्विचारांनी त्याच्या स्वभावरचनेंत पुढे थोडासा अुठावदारपणा आलेला आहे. रंगशाळेंत बृहन्नडा वेषांत असलेल्या अर्जुनाकडून अुत्तर हा नृत्यगायनाचे पाठ घेत असल्याची कल्पना, व असें थिल्लरपणाचें आचरण तो करीत असतां त्याच्या तोंडून मोठमोठ्या वीरांची तुच्छतागर्भ निन्दा, मी करविली आहे. तो भाग लिहितांनाहि मला मोठी मौज वाटली. पण लाकूड हातभर आणि ढलपी सवाहात असा प्रकार पुष्कळदा नाटकाचा प्रयोग करतांना होत असतो. तसाच या नाटकासंबंधाने थोडासा झाला. कारण नृत्यगायनाचे पाठ घेतांना अुत्तराने घेतलेला अर्धवट स्त्रीवेष व त्याचें अभिनयशिक्षण, यांच्यामुळे कथानकगुणाने त्या प्रवेशाला आधीच हलकेपणा येणारा असून, अुत्तराचें काम करणारा मुलगा फाजील हुशार असल्यामुळे एखादे वेळीं त्याच्या हातून त्या प्रवेशाच्या एका भागाला फारच ग्राम्य स्वरूप येई. म्हणून मला नाटकमंडळीला वरचेवर बजावून सांगावें लागे कीं ' कृपा करा व हा प्रवेश अशा रीतीनें अितका रंगवू नका.' कारण तो अितका विकृत करावा असें माझ्या मनांत मुळांत नव्हतें व तें दिसण्यांतहि चांगले दिसत नाही. नाट्यांत कांहीं प्रकार सद्भिरुचीला सोडून होअी. नाटकाच्या अुत्तरभागांत द्रौपदीकडून विराटनगरींचें रक्षण, हातांत हत्यार घेऊन व स्त्रियांना सैनिक बनवून, केल्याचें मी दाखविलें आहे तें अर्थात् सर्वच काल्पनिक आहे. शकुनीमामाची फजिती झालेली मी नाटकांत दाखविली आहे ती केवळ कथानकाचा जम बसविण्याकरिता. त्याला मुळांत कांही आधार नाही. तसेंच पांडवांच्या शोधाकरिता शकुनीने पाठविलेले गुप्तहेर त्याजकडे परत येअून आपल्या फसलेल्या कामगिरीचें वर्णन करतात असा अेक प्रवेश घातला आहे. त्यांत सरकारी गुप्त पोलिसखात्याचे लोक भत्ते कसे अुपटतात, हवा तितका खर्च कसा करतात, व त्यांतले कांही स्वार्थसाधु तर कांही अगदी मूर्ख कसे असतात, याची जी ओक कल्पना करतां येण्यासारखी आहे ती या प्रवेशांत<noinclude></noinclude>
hwfeukne1w95s2erpkz4war9omzheiv
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९८
104
102289
209825
206673
2024-10-24T10:41:25Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209825
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[९१}}
{{rule}}</noinclude>मी रंगविली आहे. हें नाटक सर्वस्वी हास्यरसोत्पादक आहे. पण कृष्णार्जुनयुद्ध नाटक व हें नाटक यांतील विनोदांत अेक मोठा फरक आहे. तो असा की, कृष्णार्जुनयुद्ध नाटकांतील विनोद सर्वस्वी माझ्या मनासारखा, माझ्या अभिरुचीसारखा, म्हणजे केवळ परिस्थितींतून आपोआप निर्माण होणारा आहे. त्यांत अतिशयोक्ति नाही व कृत्रिमपणाहि नाही. पण वीरविडंबन नाटकांतील विनोद बराचसा कृत्रिम आहे. म्हणजे तो साधण्याकरिता अतिशयोक्ति व कृत्रिमपणा यांचा बराच अुपयोग करावा लागला आहे.</br>
{{gap}}(७८) १९१८ सालीं विलायतेस जाण्याकरिता टिळकांबरोबर कोलंबो येथे गेलों. पण आयत्या वेळीं पासपोर्ट रद्द झाल्याने परत आलों. अुलट अिकडे मी विलायतेस जाणार म्हणून खाडिलकर यांचें नांव केसरीवर घालण्यांत आलें होतें. यामुळे मला केसरींत लिहिण्याच्या बाबतींत थोडी विश्रांति सहजच मिळाली होती. त्या अवधींत म्हणजे फिरून १९१९ सालीं विलायतेला जाण्यास निघण्यापूर्वीं मीं वीरविडंबन नाटक लिहिलें. पण तें प्रत्यक्ष लिहिण्याला मला फार वेळ लागला नाही; व तें किती सहजासहजी हातून लिहून झालें हें त्या नाटकाची मूळची हस्तलिखित प्रत मजजवळ आहे त्यावरून पाहिलें म्हणजे लक्षांत येतें. पदें देखील कांही कांही तालीम चालू असतां, व पदांच्या चाली कानाने अैकत असतां, जागच्याजागीं करून दिलीं आहेत. याचें कारण नाटक ताबडतोब रंगभूमीवर आणण्याची नाटक मंडळीची जरूरी. नाटकाचा प्रयोग एकंदरीने चांगला होअी. परंतु केव्हा अर्जुनाचें पात्र व केव्हां द्रौपदीचें पात्र हीं कल्पनेप्रमाणें असावीं तशीं शरिराने भरदार नसल्यामुळे रंग चढत नसे. तथापि या नाटकावर बलवंत संगीत मंडळीला एकंदरीने पैसा चांगला मिळाला, व मलाहि त्यांनी मोबदला चांगला दिला.</br>
{{gap}}(७९) माझे शेवटचें नाटक 'संत भानुदास ' वऱ्हाडांत नवीन स्थापन झालेल्या कोणत्याशा अेका ( आता नांवहि आठवत नाही) नाटक मंडळी- करिता मी हे नाटक लिहिलें. राजापूर नाटक मंडळीचें यश पाहून याहि नाटकमंडळीला साधुसंतांचीं नाटकें करावीशीं वाटलीं; व त्यांनी मला अेखादे संतचरित्राचेंच कथानक घेण्यास सांगितल्यावरून मी भानुदास-चरित्र घेतलें. ही<noinclude></noinclude>
0xydz5bnauo2fnua0espgye49hje97d
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९९
104
102324
209826
206745
2024-10-24T10:41:41Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209826
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|९२]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>नाटक मंडळी पांच-सहा महिन्यांतच नामशेष झाली. पण राजापूरकर नाटक मंडळीने या नाटकाचा प्रयोग वन्हाडांतच पाहिलेला होता, यामुळे ती दुसरी नाटक मंडळी मोडतांच राजापूरकर मंडळीनें हें नाटक मजकडे मागितलें व मीं तें त्यांना दिलें. साधुसंतांचीं नाटकें या नाटक मंडळीने लोकप्रिय करून दाखविलीं आहेत यांत शंका नाही. परंतु त्या लोकप्रियतेचें खरें मर्मं प्रत्यक्ष संतचरित्र चांगलें रंगविण्यावर नसून, थट पीटमधल्या ग्राम्य लोकांना आतड्याला पीळ पडून हसू येण्यासारखं जे अितर प्रसंग, व अत्यंत विकृत स्वरूपाचे जे अभिनय अितर पात्रें करीत त्यांतच तें मर्म होतें. राजापूरकर मंडळींना संतचरित्राचें माझें नाटक मिळालें, पण त्यांच्या पदरीं ग्रंथकार भलताच पडला. कारण मी हें नाटक आपल्याकडून शक्य तितकें ग्राम्य, व अगदी खालच्या दर्जाच्या अशिक्षित लोकांनाहि पटावें व आवडावें असें करून लिहिलें तरी, चार-दोन वाक्यांशिवाय त्यांत खरा ग्राम्यपणा असा कोठेच अुतरला नाही! यामुळे, म्हणजे केवळ संभावितीच्या दोषास्तव, हें नाटक राजापूरकर मंडळीच्या हाती पडून त्यांच्या दृष्टीने फिकें ठरलें.</br>
{{gap}}(८०) प्रयोगाची ही दृष्टि सोडून दिली असतां माझ्या मतें या नाटकांत अेका महत्त्वाच्या प्रश्नाचा खल, अत्यंत साध्या भाषेंत, साध्या पात्रांच्या तोंडून चांगला करण्यांत आला आहे. विषय बोलून-चालून गावगुंडीच्या रीतीने रंगविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांत अनागुंदीचा राजा व स्वतः भानुदास यांच्याशिवाय अेकहि भलें असें प्रमुख पात्र ठेविलें नाहीं. पण देवस्थानें कशीं निर्माण होतात, मुळांत नसलेलें वैभव त्यांना केवळ यदृच्छेने आणि वाढत्या अंधपरंपरेने कसें प्राप्त होतें, देवस्थानाशी प्रत्यक्ष संबंध असणारे लोक धार्मिकतेपासून किती दूर असतात, व देवस्थान हा पोटभरू लोकांच्या लोभवुद्धीचा विषय कसा होअून बसतो, हीच मध्यवर्ति कल्पना सर्व नाटकभर रंगविण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि माझ्या मतें हा प्रयत्न अत्यंत स्पष्टोक्तिपूर्ण किंबहुना निष्ठुरपणाचाहि झाला आहे. वरील गोष्टी विनोदाला सहजच पोषक होतात, तेव्हा त्यांचा त्या कामींहि मी भरपूर अुपयोग करून घेतला आहे.</br>
{{gap}}(८१) दुर्दैवाने संतचरित्राचेंच कथानक घेतल्यामुळे दैवी चमत्कारा-<noinclude></noinclude>
2s3xbyso925icauqz5ggmkzvmyrqitk
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१००
104
102356
209827
206746
2024-10-24T10:42:09Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209827
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[९३}}
{{rule}}</noinclude>सारख्या कांही गोष्टी मनाविरुद्ध व स्वभावाला सोडून मला या नाटकांत घालाव्या लागल्या. परंतु संतचरित्र म्हटलें म्हणजे त्यांत अशा गोष्टी यावयाच्याच. आणि नाटकमंडळीचा दर्जा लक्षांत घेतां, त्यांचा खेळ नीट वठण्याला असल्या अद्भुत गोष्टी चांगल्याच अुपयोगीं पडतात. या दोन्ही दृष्टींनी मला हे दैवी चमत्कार घालावे लागले. पण कथानकाची परिणति किंवा अुलगडा कसा कुशलतेने करावा याकडे या नाटकांत माझी कलादृष्टि नसून, संतचरित्र वर्णनाच्या पांघरुणाखाली देवस्थानच्या कर्दमांत लोळणाऱ्या मनुष्यरूपी कृमींच्या स्वभावाचें बोधप्रद वर्णनच मला मुख्यतः करावयाचें होतें. आणि या विशेष दृष्टीपुरतें हें नाटक चांगलें साधलें आहे असें माझें मला वाटतें. मग अितरांना काय वाटतें हें माहीत नाही. असें म्हणण्याचे कारण की, नाटक राजापूरकर मंडळी करितात म्हटलें म्हणजे तें पाहाण्याला सुशिक्षित वर्ग सहसा जात नाही. म्हणून ज्या वर्गाचें मत कळावें अशी माझी खरी अिच्छा, त्याचें तें मत कळूं शकत नाही. आणि जो प्रेक्षकवर्ग या मंडळीचीं नाटके पाहावयास नेहमीं जातो त्याच्या दृष्टीने नीरस ठरण्याअितकें तें (गावगुंडीचें असतांहि ) संभावित आहे. त्यांना गुदगुल्या होण्यासारखीं त्यांत भाषणें नाहीत, व पात्रांनी आपणाकडून फाजीलपणा करण्याचें मनांत आणलें तरी तो साधण्यासारखे प्रसंग नाहीत. मिळून दोन्हीकडून कुचंबणाच !</br>
{{gap}}(८२) छापून प्रसिद्ध झालेल्या माझ्या नाटकांची ही अशी हकीकत आहे. याशिवाय संपूर्ण न झालेलीं, पण कथानकासंबंधाने निश्चित योजना होअून थोडेफार लिहून झालेलीं, अशीं कांहीं माझीं नाटकें परवापर्यंत पडून होती तीं सर्व मी फाडून टाकलीं. नाट्यलेखनाची हौस असणान्या लेखकांनी यापुढे पूर्वीप्रमाणें आपल्या नाटकांना प्रयोगशरण न मानतां, तीं केवळ वाङ्मयाच्या दृष्टीने लिहावीं. चित्रें वगैरे न घालतां अितर पुस्तकांप्रमाणें तीं प्रसिद्ध करावीं. मग तीं वाचून कोणी नाटक मंडळ्यांनी प्रयोगाची परवानगी मागून रंगभूमीवर आणलीं तरी वाहवा न आणलीं तरी वाहवा असें समजून चालण्याची वेळ आली आहे. नाटकावर चार पैसे मिळवावे अशी आता मला अपेक्षा नाही, व अितर नाटककारांनीहि ती आता धरू नये. चित्रें घालण्याची वहिवाट विलायती किंवा युरोपियन नाटकांच्या<noinclude></noinclude>
mtxmxoop9bqe4ehsy8p1mg06t5p8mys
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०१
104
102357
209829
206747
2024-10-24T10:43:01Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209829
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|९४]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>पुस्तकांत नाही ती सोयीचीच आहे. केवळ वाङ्मय म्हणून लोक नाटकें वाचावयाला शिकले तर तें हवें आहे. शिवाय नाटक व कादंबरी यांतलें अंतर होअील तितकें काढून टाकावें, अशी अेक माझी कल्पना आहे. तिचाहि त्यांतल्या त्यांत प्रयोग होअूं शकेल.</br>
({{gap}}८३) त्याचा प्रकार असा. कादंबऱ्यांच्या जुन्या पद्धतींत आता फरक करण्याची वेळ आली आहे. तो फरक हा की, वर्णनें किंवा ग्रंथकर्त्याचें पाल्हाळिक विवेचन यांना रजा द्यावी, आणि बहुतेक सर्व कादंबरी संभाषणात्मक असावी. रा. हरिभाऊ आपट्यांच्या कादंबऱ्या पहिल्या प्रकारच्या असून या प्रकारामुळेच मधून मधून त्या कंटाळवाण्या होतात. अुलट अलेक्झांडर ड्यूमा या फ्रेंच कादंबरीकाराचीं पुस्तकें घेतलीं तर, शेंकडा पंचाण्णव अितका त्यांतला भाग संभाषणात्मक असतो म्हणून तीं चटकदार वाटतात. ड्यूमाच्या कादंबन्याहि कंटाळवाण्या होतात. पण त्याचीं कारणें वेगळीं होत. तीं अशीं की, त्या फार मोठ्या, कथासूत्र चांगलेंसें संभाळले जात नाही, प्रवेश अुडते व असंबद्ध फार, आणि कांही कांही प्रसंग ठरीव कायम ठशांचे. पण ड्यूमाची संभाषणात्मक पद्धति अनुसरून सुमारें अडीचशें पानांची कादंबरी, मधून मधून अगदी अवश्य तितकींच लहान वर्णनें किंवा विचार घालून लिहिलीं असतां, ती या दिवसांत वाचकांना आवडेल. आणि त्यांतच हेंहि साधेल की, निरनिराळी प्रकरणें हेच जसे कांही नाटकांतील प्रवेश होतील, व मधलीं वर्णनें व विचार काढून टाकून दिले, किंवा तेच कोणा पात्रांच्या तोंडीं बसविले की, थोड्या सांधजोडीच्या प्रयत्नाने कादंबरींतून नाटक तयार होअील. कादंबरींतील वर्णनें व आत्मविश्लेषणादि चर्चा हीं नाटकांतील आत्मगत भाषणाप्रमाणे कंटाळवाणीं होतात. म्हणून तीं दोनहि निघून गेल्यास कादंबरी व नाटक हीं पुष्कळांशीं अेकरूप होअून, किंचित् प्रयत्नाने त्यांचें अेकमेकांत रूपांतर होअूं शकेल अशी माझी कल्पना आहे. आणि तसे झाल्याने नाटकांच्या प्रकारांत वाङ्मयाला जें पारतंत्र्य आज आलेलें आहे तें जाअून, कादंबन्यांच्या प्रकारांतलें स्वातंत्र्य येअील. असली कादंबरी छापली तरी ती म्हणजे हटकून विकली जाअून खपेल असें नाही. कारण हें निवळ तंत्र झालें. पण नाटकापेक्षा अधिक पुढे येअून
वाचकांच्या हातीं जाण्याला तिला अधिक वाव मिळेल.<noinclude></noinclude>
9typw3vsci88nmujfry73q3tnmnmibc
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०२
104
102381
209830
206749
2024-10-24T10:43:26Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209830
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[९५}}
{{rule}}</noinclude>{{gap}}(८४) नाट्यवाङ्मयाच्या दृष्टीने पाहतां त्यांत मला निबंध-वाङमयाअितकें यश आलें नाही. याचें मुख्य कारण असें की, नाटकांत भावनेला प्राधान्य असून अतिशयोक्ति हा जवळ जवळ तिचा आत्मा होअून राहिला आहे. पण या दोहोंचीहि माझ्यामध्ये बरीच कमतरता आहे. माझ्याहि नाटकांत भावनात्मक प्रवेश नाहीत असे नाही. अुदाहरणार्थ, तोतयाच्या बंडांतील पार्वतीबाअीसंबंधाचे बहुतेक प्रवेश करुणरसाच्या दृष्टीने चांगले साधले आहेत. त्याचप्रमाणें चंद्रगुप्त नाटकांतले अेकदोन प्रवेश प्रेक्षकांना हटकून रडवितात असें मी पाहिलें आहे. परंतु अेकंदरीने भावना कमीच, व असली तरी ती युक्तिवादावर अधिष्ठित झालेली असते. तोतयाच्या बंडांतील नाना फडणवीस व पार्वतीबाअी यांच्या प्रवेशांत प्रेक्षकाला हटकून रडूं येतें हें खरें असले, तरी तो ' बौद्धिक' भावनेचाच प्रकार होय. अथपासून अितिपर्यंत तो सर्व प्रवेश म्हणजे मला प्रिय असलेल्या युक्तिवादात्मक भावनेचा, माझ्या हातून वठलेल्यांत सर्वांत अुत्तम, नमुना आहे. सर्व भाषण युक्लिडच्या अेखाद्या सिद्धान्ताप्रमाणें साखळीने बांधलेले
असून बुद्धिवान् मनुष्यालाहि तें दुतर्फी बिनतोड वाटतें. आणि जेव्हा परस्परांना अडविणारी नाना फडणवीस व पार्वतीबाअी दोघेंहि रडूं लागतात, तेव्हा लौकिक न्यायकोर्टांत कधीहि पाहावयास न मिळणारा, म्हणजे अुभयपक्षांचेहि वकील किंवा बॅरिस्टर, आपली तक्रार सांगतां व अेकतांहि, डोळयाला हातरुमाल लावून रडत आहेत, असा अेक प्रकारचा देखावा त्या प्रवेशांत पाहावयास सापडतो! माझ्या नाटकांत कड्यावरून कोसळणा-या जलप्रवाहाप्रमाणें भावनेचा ओघ किंवा वेग नसून, जमिनीच्या आधाराने म्हणूनच कमजास्त प्रमाणाने केवळ स्थानपरत्वें वेगवान, अशा जलप्रवाहाप्रमाणें असतो. माझी विनोदबुद्धि तीक्ष्ण असल्यामुळे सद्भावनेचीहि अतिशयोक्ति मला खपत नाही !! त्याचप्रमाणें 'मेलो-ड्रॅमॅटिक'असें ज्याला अिंग्रजींत म्हणतात तसलेंहि कांही माझ्या नाटकांत असत नाही. याच्या अुलट निबंधात्मक गद्याची
भूमिकाच मुळांत युक्तिवादावर रचलेली असल्यामुळे, मलां साधणारी मर्यादित नेमस्त भावना त्यांत मधून मधून शोभून जाते, व गद्याला जरूर तितका अुठावदारपणा आणते.
,<noinclude></noinclude>
6f0jvpf2oi04kwa5xphqhbxztb95kgx
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०३
104
102382
209831
206752
2024-10-24T10:43:41Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209831
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|९६]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>{{gap}}(८५) भावनेच्या खोलपणांत कोल्हटकरहि कमीच पडतात. त्यांच्या कल्पनेची व कोटिवाजपणाची भरारी माझ्याहून फार अुंच असल्यामुळे प्रेक्षकांना -पण फक्त त्यांतल्या त्यांत कांही वर्गांना अधिक खुलवूं शकतात. पण करुणरसाच्या दृष्टीने माझे कांही प्रवेश त्यांच्या अशा कोणत्याहि प्रवेशापेक्षा अधिक चांगले वठतात. खाडिलकर व गडकरी या दोघांनाहि आम्हां दोघांपेक्षा रसोत्कर्ष अधिक साधतो. मात्र कोल्हटकर हे जरी विनोदी व कोटिबाज आहेत तरी ग्राम्यपणाच्या बाबतींत त्यांना खाडिलकर व गडकरी यांच्यापुढे हारच खावी लागते ! कोल्हटकरांची भाषा कृत्रिम, बोजड, व कल्पना सुंदर पण समजण्याला थोड्या कठिण असतात. यामुळे त्यांचीं नाटकें खाडिलकर व गडकरी यांच्या नाटकांजितकीं प्रेक्षकांच्या अंतरंगांत शिरत नाहीत.</br>
{{gap}}अशा कांही नाट्यगुणांत माझीं नाटकें या तीनहि नाटककारांच्या नाटकांपेक्षा नीरस आहेत. पण अभिरुचीच्या दृष्टीने तीं त्या सर्वांपेक्षा अधिक बरीं आहेत असें मला वाटतें. आणि याचें अेक प्रत्यंतर असें की, अभिरुचीच्या दृष्टीने या तिघांच्याहि नाटकांतील कांही कांही प्रवेशांवर जशी कडक टीका झाली आहे तशी माझ्या नाटकांतील अेकाहि प्रवेशावर कधी झाली नाही. हे तिघेहि चांगल्याप्रमाणें वाअिटांतहि परमावधीस जातात. माझ्या नाट्यरसाचा घोडा कोणालाहि केव्हाहि ठाणबंद किंवा मैदानांत अुभा असाच दिसेल. पण या तिघांच्याहि नाट्यरसाचा घोडा, खरखरीत जमीन दिसली असतां पाठ खाजवून कंडू शमविण्याकरिता, पाठीवर पडून व चारहि पाय वर करून, मनसोक्त लोळण घेणा-या घोड्यासारखा केव्हा केव्हा तरी प्रेक्षकाला अप्रियदर्शन वाटल्यावाचून राहणार नाही. हें तरी वस्तुगत गुणावगुणांचेंच विवेचन झालें. कारण आजकाल मराठी नाटकांची योग्यता त्यांच्या लोकप्रियतेवरून ठरते, व लोकप्रियतेचें माप म्हणजे पैशाची पिशवी हें तर अुघडच आहे. पण लोकाश्रय हा कित्येक नाटकांसंबंधाने त्यांतील काम करणाऱ्या पात्रांवर म्हणजे 'पार्टी'वर अवलंबून असतो. नाटकें खाडिलकरांचींच पण त्यांतल्या कित्येकांचें यश केवळ बालगंधर्वावरच अवलंबून आहे. अितर कोणा नटाने तींच नाटकें<noinclude></noinclude>
ee4fj3sq68hb6l3k2c9hiz3jsthj02h
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०४
104
102386
209832
206846
2024-10-24T10:44:06Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209832
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[९७}}
{{rule}}</noinclude>केल्यास त्यांचें अुत्पन्न व त्या दृष्टीने त्यांची लोकप्रियता किती खाली अुतरेल याची कल्पना सहजच करतां येते.</br>
{{gap}}(८६) अशा रीतीने नाटकांना आलेली प्रयोगशरणता काढून टाकल्यास नाट्यवाङ्मयाला पुष्कळच वाव आहे, आणि वाङ्मय या दृष्टीने नाटकाचें चीज होण्यास हरकत नाही. या बाबतींत मी तरी सहीसलामत सुटून गेलों असें आठवून बरें वाटतें. बिचान्या कोल्हटकरांचें मात्र तसें झालें नाही. माझा नाटक लिहिण्याचा व्यवसाय थांबल्याने तें कोणी कंपनी करील अशी आशा करण्याचें कारण नाही, व न केल्याने निराशेचा संभव राहिला नाही. पण गंधर्व मंडळीने कोल्हटकरांचें 'सहचारिणी' नाटक टाकून दिल्यानंतरहि त्यांनी तीन-चार नाटकें लिहिलीं व तीं कोणीहि प्रयोगाकरिता न घेतल्यामुळे त्यांची बरीच निराशा झाली. शेवटीं शेवटीं नाटक लिहिण्याचे श्रम करून, तें कसें तरी अेखाद्या मासिक पुस्तकांतून कां होअीना छापून प्रसिद्ध झालें म्हणजे मिळविलें, असें त्यांना होअून गेलें. अशा लोकोत्तर नाटककाराचा असा -हास झालेला पाहून कोणालाहि वाअीटच वाटेल. पण त्याला अक-दोन कारणेंहि आहेत. कोल्हटकरांनी स्वतःच मूळ नाटककारांना व नाटक मंडळयांना हास्यरस-प्रधान नाटकांचें अुदाहरण घालून देअून जें वळण लावून दिलें, तें पुढे अितकें आस्थेने गिरविण्यांत आलें की 'शिष्यांनी गुरुजींचा पराभव' केला व त्यांना मागे टाकलें. दुसरेंहि अेक कारण असें दिसतें की, कोल्हटकरांच्या पहिल्या पहिल्या नाटकांतील प्रतिभा लोपून त्यांचीं कथानकें दिवसेंदिवस अधिकाधिक क्लिष्ट, किचकट व गुंतागुंतीचीं होअूं लागली. मूकनायक हेंच त्यांचें अेक नाटक अजून रंगभूमीवर टिकून राहिलें असून, अजूनहि रसिक प्रेक्षकांना पहिल्या दिवसासारखा आनंद देतें. त्यांचीं 'मतिविकार' व 'वधूपरीक्षा' ह्रीं जुनीं नाटकें चांगलीं करण्यासारखी म्हणजे लोकांना आवडण्यासारखीं आहेत. पण अलीकडे, ' नवें नाटक' ही ओक 'वेडाची भाषा' होअून बसल्यामुळे, नाटक कंपन्या जुन्या चांगल्या नाटकांचेंहि पुनरुज्जीवन करण्यास धजत नाहीत. परवा परवापर्यंत दोन-तीन चांगल्या गद्य नाटकमंडळया असतां, माझ्या तोतयाचें बंड या नाटकालाहि कोणी प्रयोगा-
मा. ज. अ. ७<noinclude></noinclude>
lsg5e04sqwok398upqvpir5si824zl5
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०५
104
102401
209833
206848
2024-10-24T10:44:18Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209833
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|९८]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>करिता हातीं धरीत नव्हत्या, यावरून या वेडाच्या भाषेची मजल कोठवर गेली आहे हें कळून येअील. माझ्या अितर नाटकांबद्दल मी कांही म्हणत नाही. पण 'तोतयाचें बंड' व 'कृष्णार्जुनयुद्ध' हीं नाटकें रंगभूमीवर नेहमीं राहण्यासारखीं आहेत असें मी म्हटलें तर तें शोभणार नाही असें कोणी म्हणूं शकणार नाही !</br>
{{gap}}(८७) गडकऱ्यांची देखील कांही नाटकें ( अु. प्रेमसंन्यास ) पुढे पुढे मागे पडलीं. अेकच प्याला, पुण्यप्रभाव, व भावबंधन हीं टिकून होतीं. पण अेकच प्याल्याला आधार केवळ गंधर्व मंडळीचा मिळाल्यामुळे ! पुण्यप्रभाव हेंच नाटक खरोखर रंगभूमीवर नेहमी टिकण्यासारखें आहे. भावबंधन हें लोकांना अितकें कसें आवडतें याचें मला गूढच आहे. कोल्हटकरांप्रमाणें खाडिलकरांचेहि नाट्यदोष दिवसेंदिवस वाढत जाअून त्यांचे खरे गुण कमी कमी होअूं लागले होते. त्यांतूनहि त्यांना गंधर्व मंडळीचा आश्रय मिळाल्यापासून, केवळ अेका मुख्य स्त्री-पार्टापुरतें पाहून, त्याच्यावरच भर ठेवून, नाटक अेरवीं वाटेल तसें लिहिण्याचा प्रघात त्यांनी घातल्यापासून, खाडिलकरांचें यश व बालगंधर्वांची स्त्रीपार्ट करण्याची पात्रता हीं दोन्ही समांत ठरणार अशी भीति वाटली व ती खरी ठरली. खाडिलकरांनी अहमदाबादेच्या तुरुंगांत सावित्री नाटक गंधर्व नाटक मंडळीकरिता लिहिलें; पण मंडळी तें बसविण्याला तयार नव्हती, अशी कुजबुज नुकतीच मी अैकली व ती खरी असण्याचा संभव आहे. तात्पर्य, नाटक मंडळ्यांपासून स्वतंत्र स्वावलंबी व प्रयोगाला अशरण असें राहण्याची हिंमत नाटककार धरतील तरच महाराष्ट्रांतील नाट्यवाङ्मय आपलें अुच्च स्थान संभाळून राहील असें वाटतें.</br>
{{gap}}(८८) असो. वर परिच्छेद (८३) यांत सांगितलेल्या दृष्टीचा प्रयोग मीं केसरींत लिहिलेल्या कादंबरींत करून पाहिला. विश्रांतीकरिता अर्धपगारी रजा घेतली होती. संस्थानी राजकारण डोळ्यापुढे होतें. तेव्हा तो विषय कादंबरीकरिता घेतला. हीच माझी पहिली कादंबरी. हींत अुगाच वर्णनाकरिता म्हणून वर्णनें नाहीत. बहुतेक भाग संभाषणात्मक आहे. शेवटींनायिकेने नायक संस्थानिकाला सुचविलेला स्वराज्याचा नमुना कित्येक<noinclude></noinclude>
1300qxx9y8y7m0r4qr1n6sarfgemgx7
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०६
104
102402
209834
206863
2024-10-24T10:44:31Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209834
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[९९}}
{{rule}}</noinclude>वाचकांना 'अपुरा, निराशाजनक व असमाधानकारक' वाटतो. पण राजांच्या लोभीपणाबरोबर सामान्य प्रजेची स्वराज्य चालविण्याची अपात्रताहि माझ्या मनांत डोकावत असते. कलेच्या दृष्टीने या कादंबरींतीलल दोनहि स्त्री पात्रें मला स्वतःला रम्य वाटतात. अेका पात्राच्या रूपाने तरुण सुशिक्षित कुमारीचें चित्र आदर्शभूत असें रंगलें आहे; व दुसऱ्या-स्त्री- पात्राच्या द्वारें सावत्रपणाची भावना न मानणारी, अुदात्त स्वभावाची, व वृद्ध पतीशीं लग्न झालें असतां आपलें शील शुद्ध ठेवणारी, अशी. आदरणीय स्त्री रंगविली आहे. प्रभाकराची भूमिका आजच्या पाणीदार बंडखोर पण भोळया निःस्वार्थी सात्विक 'गुंडा'ची आहे.</br>
{{gap}}दुसरी कादंबरी 'बलिदान' ही माझ्या चारहि कादंबऱ्यांत मला अधिक आवडते. तींत भावना भरपूर खेळविली गेली आहे, व मलाल आवडणाऱ्या लहान मुलाविषयीच्या वात्सल्यभावनेवर सर्व कथानक आधारलेलें आहे. या कादंबरीतील कांही भाग अन्योक्तीच्या स्वरूपाचे आहेत. समस्त वैदिकांची आंवळयांची मोट बौद्धांना विरोध करण्याकरिता कशी बांधावयाची, हा भाग वक्रोक्तिगर्भ असून त्याचा बोध पक्षोपपक्षांच्या बळावर आधारलेल्या कोणत्याहि आधुनिक चळवळींना लागू पडण्यासारखा आहे. नीला या पात्राचें अुच्छिन्न जीवन, तिला वाटणारे अेका परक्या लहान बाळाविषयीचें प्रेम, आणि त्याचे प्राण वांचविण्याचे तिचे प्रयत्न, हा भाग जितका अुदात्त तितकाच अंतःकरणाला भिनणारा आहे. या कादंबरींत अेक तरुण जोडपें मीं आणलें आहे. त्याची ठेवण प्रेमावर अधिष्ठित असतांहि त्याची प्रणयभावना सात्त्विक ठेवलेली असून, मला आवडणारा संयम त्यांच्या संबंधांत रेखाटण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला या कादंबरींत सर्वांत आवडणारी गोष्ट ही की, कथानकाचा काळ फार प्राचीन असा घेतला असतां, तींतील सर्व वातावरण तत्कालीन असेंच ठेवण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला आहे. आधुनिक स्वरूपाच्या कोणत्याहि कल्पनेने त्या
वातावरणाचा भंग मी बहुधा होअूं दिलेला नाही. </br>
{{gap}}' कावळा व ढापी' ही माझी तिसरी कादंबरी आधुनिक स्वरूपाचीआणि बलिदान कादंबरीच्या अगदी उलट स्वभावाची आहे. तिला गुप्त<noinclude></noinclude>
sbyl8ey6nzbtpoo4jkxapk42t388229
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०७
104
102422
209835
206864
2024-10-24T10:44:53Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209835
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१००]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>पोलिसाच्या चातुर्यविषयक कादंबरीचें रूप शेवटीं आलें असलें, तरी मुख्य अुद्देश केवळ तत्त्वचिकित्सक कसा आहे, हेंं मीं त्या कादंबरीच्या शेवटीं सविस्तर विवेचन करून सांगितलें असल्याने येथे सांगत नाही. ही कादंबरी देखील माझ्या आवडीप्रमाणें वहुतेक सर्व संभाषणात्मक आहे. यांतील कोणतेंहि पात्र म्हणण्यासारखें चांगलें रंगलेलें नाही. पण सगळ्यांचा संच एकत्र घेतला असतां, तो कादंबरीच्या मुख्य हेतूला पोषक असा झाला आहे. या कादंबरींत दोनच प्रणयप्रसंग आहेत. पैकी एक संभाविती विलायती थाटाचा, व दुसरा आपल्या देशी आधुनिक अभिरुचीचा असा आहे. माझ्या सर्व नाटक-कादंबऱ्यांत दोनच प्रवेश-प्रसंग अुत्तान किंवा फाजील प्रणयाचे आहेत. पैकीं अेक तोतयाच्या बंडांतील वगंभट व विठाई यांचा, आणि दुसरा 'कावळा व ढापी' यांतील जंबू व बिंबा यांचा. ही कादंबरी खरी वास्तववादी म्हणतां येईल. कारण तीव्र बुद्धीचे सुशिक्षित लोकहि प्रसंगविशेषीं बुद्धिप्रामाण्य विसरून अतर्कित बाह्यशक्तिदर्शनाने भांबावून गेल्याची अुदाहरणें हल्लीच्याहि काळांत माझ्याप्रमाणें अितर अनेकांनी पाहिलीं असतील !</br>ं
{{gap}}माझी चवथी कादंबरी 'कोंकणचा पोर' ही कादंबरी वॉल्टर स्कॉट्च्या 'विंवटिन डरवार्ड' या कादंबरीच्या स्वरूपाची आहे. तिचा हेतु सर्वस्वीं अितिहास-दर्शनाचा असून पार्श्वभूमि सर्वस्वीं प्रादेशिक कोंकणी आहे. माझे फारच थोडे दिवस कोंकणांत गेले आहेत, तथापि कोंकणांतील जीवन मला फार प्रिय वाटतें. म्हणून तें प्रादेशिक जीवन शक्य तितकें यथार्थ रंगविण्याचा प्रयत्न मी केला आहे. ' मराठे व अिंग्रज' या माझ्या अतिहास-ग्रंथाची पुरवणी ' कोंकणचा पोर' ही कादंबरी ठरते, व तशीच ती योजलेली आहे. या कादंबरींत कोणतेंच पात्र हातीं घेअून त्याचा स्वभाव मला पद्धतशीर रंगवितां आलेला नाही. अेकच अेक स्त्रीपात्र घातलें आहे. तें अगदीं नांवाला म्हटलें तरी चालेल. यामुळे अितिहासाची आठवण किंवा त्याचें प्रेम नसलेला मनुष्य ही कादंबरी वाचील, तर तो तिजवर अगदी नाराज होल यांत शंका नाही. अलीकडच्या जॉर्जेट पातळवजा कादंबऱ्या वाचणाराला माझी ही कादंबरी म्हणजे जुन्या काळचा बुरणूस वाटेल ! पण कादंबरीची माझी कल्पना हल्लीच्या प्रथित यश कादंबरीकारांच्यापेक्षा वेगळी आणि अधिक विस्तृत आहे अितकेंच मी म्हणतों.<noinclude></noinclude>
qo9tkwt8lymt1aqetig4ggz4skfgnsv
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०८
104
102423
209836
206865
2024-10-24T10:45:11Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209836
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१०१}}
{{rule}}</noinclude>{{gap}}माझ्या कादंब-या व नाटकें या दोहोंसंबंधाने दोन सर्वसामान्य विधानें. करतां येतील. अेक असें की, मला अस्सल दुष्ट मनुष्य म्हणजे काव्यनाटकांतला खलनायक (व्हिलन ) मुळीच रंगवितां आला नाही. याचा अर्थ, अितर कोणा ग्रंथकारांनी ते चांगले रंगविले म्हणून ते माझ्याहून अधिक दुष्ट बुद्धीचे आहेत असा नाही. तर माझ्या कल्पनाशक्तीचा पल्लेदारपणा कमी अितकाच त्याचा अर्थ. दुसरें असें की, माझ्या कादंबऱ्या-नाटकें यांतील पुरुषपात्रांपेक्षा स्त्री-पात्रें अधिक चांगलीं रंगविलीं गेलीं आहेत. अुदाहरणार्थ, पार्वतीबाअी, अमला, तारिणी, विमल, नीला अशीं पात्रें निर्माण करतां आल्याचा मला अभिमान वाटतो.</br>
{{gap}}(८९) आता मराठीशिवाय मला समजतात अशा कांही अितर भाषांविषयी थोडें सांगतों. भाषाविषय व वाङ्मय यांच्या स्वाभाविक गोडीमुळे मी अिंग्रजी वाङमय पुष्कळच वाचलें. परंतु त्या मानाने संस्कृत फारच थोडें वाचलें. संस्कृताशिवाय अितर कोणतीहि भाषा शिकलों नाही याचें मला वाअीट वाटतें. ज्याला सामान्यतः भाषाविषयाची गोडी असते आणि ज्याला वाङ्मयात्मक लेखनाची हातोटी साधलेली असते, त्याल परभाषा शिकणें फारसे अवघड जात नाही असें म्हणतात. या दृष्टीने पाहतां मी परभाषांपैकी निदान फ्रेंच, व देशी भाषांपैकी कानडी, गुजराती, हिंदी, बंगाली अितक्या भाषा थोड्याशा प्रयत्नाने शिकूं शकलों असतों. पण तें माझ्या हातून घडलें नाही. देश-भाषांपैकी बंगाली मी अेकवेळ शिकलों होतों. पूर्ववयांत मी अेका बंगाली पुस्तकाचें भाषांतर छापून प्रसिद्ध केलें. दुसऱ्या अेकाचें निमेंशिमें करून ठेवलें पण छापलें नाही. मला हिंदी चांगलें कळतें. हिंदी भाषेंतील लेख व्याख्यान अैकलें असतां त्यांतील शेंकडा नव्वदपंचाण्णव अितका भाग मला समजतो. परंतु हिंदी व्याकरणाचा अभ्यास केलेला नाही, व अस्सल हिंदी शब्दभांडारहि अगदीच बेताबाताचें. यामुळे मला हिंदी चांगलें लिहिण्याअितकें येत नाही. पण कोणीहि माझ्या बरोबरीचा हिंदी गृहस्थ जितकें मराठी लिहील त्यापेक्षा मी हिंदी अधिक चांगलें लिहूं शकेन असा मला विश्वास वाटतो. आणि याचा अेकदा सहज अनुभवहि आला.<noinclude></noinclude>
bow9sk5feea1u5m4j5spshdv5d70gxk
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०९
104
102595
209837
207029
2024-10-24T10:45:27Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209837
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१०२]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>{{gap}}(९०) १९२९ साली मी जबलपूर येथे भरलेल्या 'हिंदु महासभे'च्या अधिवेशनाचा अध्यक्ष होतों. त्या वेळीं अध्यक्ष या नात्याने मी लिहिलेल्या अिंग्रजी भाषणाचा हिंदी तर्जुमा सभेच्या चालकांनी हिंदींत करवून छापून घेतला होता. त्यावरून मी आपलें सर्व भाषण हिंदींतूनच वाचून दाखविलें. तें मी बिनचूक अितकेंच नव्हे, तर शब्दांवर यथायोग्य जोर देअून व योग्य अुच्चार करून वाचून दाखविलें असें म्हणून, तेथील प्रमुख लोकांनी मला शाबासकी दिली. पण या छापील भाषणाशिवाय अगदी आयत्या वेळी अेक पानभर मजकूर मी स्वतः वेगळा हिंदींत लिहून काढला. कारण जबलपुरास पोचल्यावर तेथील लोकांनी माझी मिरवणूक काढून जें मोठ्या थाटाने स्वागत केलें, त्याबद्दल मला लोकांचे आभार मानावयाचे होते. अर्थात् हा आयत्या वेळचा मजकूर छापील भाषणांत घालणें शक्य नव्हतें. पण तो अवश्यहि होता. म्हणून मीच तो लिहून काढला व पंडित मदन मोहन मालवीय यांना दाखविला. त्याचें त्यांना विशेष आश्चर्य वाटलें. त्यांनी अेकदोनच ठिकाणीं किंचित् दुरुस्ती केली, व बाकीचा सर्व प्रबंध बरोबर आहे असें सांगितलें. तसेंच पूर्वी मुझफरनगर येथे असाच अेका सभेचा मी अध्यक्ष असतां तेथेहि, मला हिंदी अितकें चांगलें कसें समजतें व बरोबर वाचतां येतें, याविषयी तेथील लोकांनीहि आश्चर्य प्रकट केलें
होतें. तीच गोष्ट पुण्यांतील हिंदी साहित्य-संमेलनप्रसंगीहि घडली.</br>
{{gap}}(९१) पण हिंदी व मराठी लोकांच्या भाषाज्ञानासंबंधाने परस्पर असा फरक नेहमीच पडतो. याचें अेक कारण असें की मराठी भाषा, म्हणजे तिचें व्याकरण, हें हिंदी व्याकरणापेक्षा अधिक अवघड आहे. दुसरें असें की, हिंदी प्रांतांतील लोकांच्या कानांवर वर्षानुवर्षांत मराठी भाषा जितकी पडते त्यापेक्षा आम्हां महाराष्ट्रांतील लोकांच्या कानांवर हिंदी भाषा नेहमीं पुष्कळ अधिक पडते. तिकडल्या प्रांतांत निव्वळ महाराष्ट्रीय लोकांची वस्ती फार थोडी. पण अिकडे मुसलमान व परदेशी हिंदु वसाहतवाले व्यापारी तसेच भय्ये हे घरीं व बाहेर हिंदी व हिंदुस्थानी बोलतात. किंबहुना अिकडील कोणत्याहि मोठ्या गांवच्या बाजारांत निम्माशिम्मा व्यवहार हिंदी भाषेतूनच चालतो. आमच्या अिकडील ब्राह्मणांच्या बायकांपेक्षा अितर जातींच्या वायकांना हिंदी अधिक समजतें, नागपूर प्रांतांतले माधवराव सप्रे, कानपूरचे पराडकर,<noinclude></noinclude>
5ylxa5txpxrp7ekd0spkwmfnez59xel
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११०
104
102596
209838
207027
2024-10-24T10:45:38Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209838
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१०३}}
{{rule}}</noinclude>वगैरे महाराष्ट्रीय लोक हिंदी भाषा लिहिण्यांत अितके निष्णात आहेत की त्यांचा हात हिंदी लेखकहि धरणार नाहींत. पण हिंदी मातृभाषा असणारे पण चांगले मराठी लेखक किती झाले ? माझें गुजरातीचें ज्ञान हिंदीपेक्षाहि पुष्कळच कमी आहे. ती भाषाच महाराष्ट्रांत हिंदीपेक्षा कमी प्रसृत आहे. यामुळे महाराष्ट्रियांना हिंदीपेक्षा गुजराती कमी येतें. बडोदें प्रांत गुजरात वगैरेमध्ये राहाणाऱ्या महाराष्ट्रियांची गोष्ट मात्र वेगळी. तेथे काका कालेलकरांसारख्या गृहस्थांनी गुजराती लेखक म्हणून जसें नांव केलें तसें कोणत्याहि गुजराती मनुष्याने मराठी लेखक म्हणून नांव केलेलें नाही. कानडी मात्र मला दहापांच वाक्यांअितकेहि येत नाही. याचें कारण कानडी कानावरून जात नाही असें नाही; तर ती भाषाच अवघड व संस्कृतापासून अगदी सुटून आहे. अुलट अुच्च प्रतीचें हिंदी, गुजराती, बंगाली घेतलें तर त्यांतले साठ पाअुणशें टक्के शब्द जवळ जवळ सारखे म्हणजे संस्कृताशीं संबंध असलेले, असेच आढळतील.</br>
{{gap}}(९२) मला संस्कृत भाषेची व वाङमयाची फार आवड आहे. 'संस्कृत विद्येचें पुनरुज्जीवन' या माझ्या निबंधांत ती चांगलीच दिसून येते. हायस्कुलांत असतां मी अमरकोश ( कांड १) पाठ केला होता. त्याचप्रमाणें रूपावली व समासचक्र घोकलें होतें. रघुवंशाचे दोनतीन सर्ग वाचले होते. डॉ. भांडारकर यांच्या संस्कृत शालोपयोगी पुस्तकांपलीकडे व्याकरणांत माझी मजल गेली नव्हती. पण आपटे यांच्या ग्रंथांतील अुतारे सुभाषित-संग्रह अित्यादिकांचें वाचन माझें मधून मधून होत असे. तथापि संस्कृत भाषेचा पद्धतशीर अभ्यास असा नाहीच म्हटलें तरी चालेल. कॉलेज सोडल्यानंतर मी संस्कृताचा ग्रंथ क्वचितच वाचला असेल. नाही म्हणावयाला, केवळ विनोदस्थळें हुडकून तीं 'सुभाषित व विनोद' या विषयावरील पूर्वींच्या ग्रंथांत अुदाहरणादाखल घालण्याकरिता, मी अनेक संस्कृत काव्य-नाटकें चाळलीं. पण तेव्हाहि त्याचा अभ्यास असा केला नाही. मग स्वतः संस्कृत लेख मी कोठून लिहिणार? आणि त्यांना संधि तरी कोठें होती ? तथापि संधि येतांच माझी संस्कृताची आवड जागृत होअी. त्याप्रमाणें प्रथम १९०६ सालीं, किर्लोस्कर नाटक गृहावर अखादें अुचित वचन पाहिजे होतें म्हणून मी खालील श्लोक मुद्दाम तयार करून दिला -<noinclude></noinclude>
7wvg3tpgjwi4p567gg5snjmw1v7z1qi
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१११
104
102597
209839
207031
2024-10-24T10:45:58Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209839
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१०४]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>{{gap}}{{gap}}'''प्रज्ञा विघृष्ट प्रतिभा- मणिदीपप्रकाशितं'''</br>
{{gap}}{{gap}}'''संसारालेख्यभांडारं पश्येदं रंगमंदिरम्''''</br>
{{gap}}नाटकगृहाच्या या वर्णनांत थोडक्यांत सर्व कांही त्याविषयीचें मर्म आलें आहे.</br>
{{gap}}(९३) यानंतर ता. २० जुलै १९२० रोजीं वासुदेवशास्त्री खरे यांच्या अध्यक्षतेखाली ' अितिहास व अितिहाससंशोधन' या विषयावर भा. अि. सं. मं. च्या विद्यमानें माझें व्याख्यान व्हावयाचें रलें. तेव्हा त्या प्रसंगाकरिता मी, सुभाषितपद्धति डोळयांपुढे ठेवून, अितिहाससंशोधक-वर्णनपर असे खालील संस्कृत श्लोक केले--</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''"अद्ध्वस्तवर्णरुचिचित्रकलापहर्म्य :'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''विच्छिन्नलेखनपुराणशिलासनस्थ:।'''</br>
{{gap}}{{gap}}'''दुष्कीटभुक्तशतपत्र पटोत्तरीयः'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''निर्मूल्यनाणकगणैः परिपूर्णकोशः ॥ १ ॥'''</br>
{{gap}}{{gap}}'''नष्टाधिकारपरिहासितगर्वमुद्रः'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''संदेहवृत्तिवशवृंहणयंत्रदृष्टि:'''</br>
{{gap}}{{gap}}'''श्रद्धावितर्कपरिचारकवेष्टितांग:'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''संशोधकः खलु प्रशास्ति विशून्यराज्यम् " ॥ २ ॥'''</br>
{{gap}}मला वाटतें, हे श्लोक अितके मार्मिक अर्थपूर्ण असे साधले आहेत की त्या कृतीचा मला खरोखर अभिमान वाटतो. आणि ' असे श्लोक या विषयावर तुम्ही करा पाहूं ' असें आव्हान मी थट्टेने, माझ्या बरोबरीच्या संस्कृतज्ञांना, (म्हणजे माझ्याइतकाच संस्कृताशीं अल्प परिचय असणा-या अज्ञांना ! ) देअूं शकेन. खरेशास्त्री यांना हे श्लोक फारच आवडल्याचें त्यांनी मला सांगितलें. कारण त्यांत जुन्या सुभाषितांची खोटी अैट चांगली साधली आहे! !</br>
{{gap}}(९४) यानंतर मी सिमल्यास कायदेमंडळाच्या कामावर असतां, कृष्णशास्त्री कवडे यांनी आपलें 'क्लोमनिर्णय' नांवाचें लहानसें स्वकृत संस्कृत<noinclude></noinclude>
a6puhxnn56luk2yuq7ljjorplrxlafp
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११२
104
102598
209840
207033
2024-10-24T10:46:34Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209840
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१०५}}
{{rule}}</noinclude>पुस्तक मजकडे पाठविलें. तेव्हा संस्कृत लिहिण्याची हुक्की पुनः येअून, मी खालील अभिप्राय संस्कृतांतच लिहून त्यांजकडे पाठविला :--</br>
{{gap}}"परमसुहृद्भ्यो वैद्यपंचाननकृष्णशास्त्रिभ्योऽहं नृसिंहशर्मा स्नेह-प्रमाणपूर्वकं निवेदयामि ।</br>
46
{{gap}}'यत् अद्यतिथितावत् अत्र सर्वमपि कुशलं श्रीधन्वंतरिकृपया । हिमालयकुक्षिस्य-हिंद-विधि-महामंडलस्य कार्यं यथाकथं निर्वाह्य अहं झटित्येवात्रागतः पंचदिनात्पूर्वम् । तदुपरि मित्रकार्ये कालक्षेपमसहमानेन मया भवद्भिरुपायनीकृतं ' क्लोमनिर्णय ' पुस्तकं परिशीलनार्थमुद्धृतम् । वाचनक्रमे च तत्र मया पूर्वापेक्षितमेवानुभवितं । यत् आदौ तावत् वैद्यक-विषयः स्वतः अेव गहनः सन् परिभाषाकाठिण्येन गहनतरः संजातः । परं च प्रस्तुत निबंधकारस्वीकृतविद्वत्परिपाठ्यनुसारिण्याऽभिरुच्या गहनविषय-गंडस्योपरि पीटिका संवृत्ता । अेवंहि मया निबंधकलितविवादविषये प्रवेशार्थं यथामति प्रयत्नः कृतः । संतोषो भवति च निवेदनाय यत् कठिनं सदपिकार्यंं भवद्भिः सुतरामेव सम्यक्तया निर्वाहितं ।</br>
{{gap}}" शारीरपरिभावानिश्चयाद्विना शारीराङ्गोपाङ्गानां वर्णनं क्लेशकलितं भवेत् " अित्येत्तद्यद्भवद्भिरुक्तं तदस्माकं संमतार्थमेव । प्राचीनाचार्यैः शारीरशिक्षणविषये यथार्थचित्रदर्शनं सर्वथोपेक्षितम् । अत अेवार्थनिश्चये काठिन्यं समुत्पन्नम् । अधुना तु आयुर्वेदशिक्षकस्तत्वविवेचक-निबंधकारैरपि अेतदावश्यकशिक्षणसाधनं नोपेक्षितं भवति अित्येतदत्यंतमभिनंदनास्प मन्ये ।</br>
{{gap}}"भवन्तु नाम देवाः परोक्षप्रियाः । मानुषैस्तु अेतद्देवचरितं नानुकरणीयम् । लौकिकविषये अपरोक्षानुभूतिरेव जिज्ञासूनां शरणं भवति ।अित्यलं । "</br>
{{gap}}(९५) यानंतर पुण्यांतील वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या अेका वार्षिक सभेचें अध्यक्षस्थान मला देण्यांत आलें. तेव्हा तर संस्कृत गद्यलेखनाला अेक प्रकारें मित्रकृत आव्हान असेंच वाटलें. म्हणून मोठी मेहनत घेअून माझें सर्व अध्यक्षीय भाषण मी संस्कृतांत लिहून काढलें. तें वाचण्यास अर्धा-पाऊण तास लागण्याअितकें विस्तृत तर आहेच; पण भाषा आणि<noinclude></noinclude>
e67zh2tcc0a5b94i0u6qxyoyhoi6fxc
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११३
104
102599
209841
207098
2024-10-24T10:47:03Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209841
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१०६]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>विवेचनपद्धति दोनहि दृष्टींनी तें फार चांगलें वठलें आहे असें कांही संस्कृतज्ञ मित्रांनी ( अुदाहरणार्थ वामनशास्त्री किंजवडेकरादि ) मला खऱ्या भावाने सांगितलें. या भाषणांत, संस्कृत वाङ्मय हें, व्याकरण व संधिनिर्बंध यांच्यामुळे, निष्कारण कठिण व गूढ कां वाटतें, आणि तें सोपें सुलभ कसें करतां येअील, याची चर्चा मीं केली आहे. या कारणाने, मराठींतील नष्कारण अनुस्वारांविरुद्ध झालेल्या चळवळीचा जसा मीं आधुनिक जनक ठरतों, तसाच संस्कृतांतील निष्कारण संधीविरुद्ध चळवळीचाहि ठरलों आहें. आणि या दोनहि चळवळींना थोडेबहुत यश आलें आहे व पुढे आणखीहि येअील.</br>
{{gap}}(९६) १९३५ साली मीं 'सह्याद्रि' मासिक सुरू केलें. त्याच्या माथ्यावर सह्याद्रिविषयक अेखादा अवतरणरूप संस्कृत श्लोक घालण्याची आवश्यकता भासली. तेव्हा तो श्लोक मीच खालीलप्रमाणे तयार केला --</br>
{{gap}}'''श्रीरामदासशिवगणचरणांजितधूलिधूसरितमौलिः ।'''</br>
{{gap}}'''निश्चलवृतिररिसागरभङगश्रीर्जयति जगति सह्याद्रिः ॥'''</br>
{{gap}}हा श्लोक पूर्णपणें श्लेषात्मक आहे हें वाचकांच्या लक्षांत येअीलच.</br>
{{gap}}(९७) यानंतर बेळगांव व पुणें येथील संस्कृत साहित्य-संमेलनांत संस्कृत लेख लिहून वाचले. मला संस्कृत बोलतां येत नाही, प्रयत्नाने लिहितां येतें. तथापि संस्कृत भाषेंतील या माझ्या अुपद्वयापावरून अेखाद्या अपरिचित मनुष्याची कल्पना माझ्या संस्कृत-ज्ञानाविषयी होअील ती मात्र खरी ठरणार नाही. माझें हें ज्ञान अगदीच तुटपुंजें आहे. आणि थोड्या भांडवलावर मोठ्या व्यापाराचा देखावा अुत्पन्न करणारा असें माझें मीच जें वर्णन थट्टेनें केव्हा केव्हा करतों तें या संस्कृत ज्ञानासंबंधाने खरेंच आहे.</br>
{{gap}}(९८) यापूर्वी असाच आणखी अेक प्रसंग अगदी अनपेक्षित रीतीने आला. तो असा-सौ. क्षमाबाओ राव ( डॉ. राव यांच्या पत्नी व कै. शंकर पांडुरंग पंडित यांच्या कन्या) या सुविद्य असून, त्यांना अिंग्रजी, फ्रेंच अित्यादि भाषा येतात. पण संस्कृत भाषेवरील त्यांचें प्रभुत्व व तिची<noinclude></noinclude>
fhh9fui5rm4yvpjkb739rc0x3oa3eg3
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११४
104
102649
209842
207100
2024-10-24T10:47:24Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209842
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१०७}}
{{rule}}</noinclude>आवड या गोष्टी विशेष वाखाणण्यासारख्या आहेत. त्यांनी आपल्या वडिलांचें चरित्र संस्कृत पद्यांत लिहिलें आहे. त्यांना माझ्या संस्कृत भाषेच्या आवडीची बातमी कोणी सांगितली. असो, किंवा माझ्या अेरवीच्या प्रसिद्धीवरून मला संस्कृत येतें असें त्यांनी अनुमान केलें असो. परंतु या पद्यमय संस्कृत ग्रंथाला मी प्रस्तावना लिहावी, अशी विनंति त्यांनी मला केली. हाच त्यांचा माझा प्रथम परिचय होता. तथापि मी ती विनंति मान्य केली. व ती प्रस्तावना संस्कृत पद्यात्मक अशीच लिहून दिली. आणि हीं पद्यें त्यांना अपेक्षेपलीकडे चांगली वाटली असें पत्रच त्यांनी मला लिहिलें आहे. म्हणून त्यांचेच शब्द देतों--</br>
{{gap}}" तुम्ही माझ्या वडिलांच्या (शंकर पाण्डुरंग पंडित ) संस्कृत चरित्रग्रंथालाजी श्लोकबद्ध संस्कृत प्रस्तावना लिहून पाठविली तिचें मला खरोखर किती कौतुक व आश्चर्य वाटलें हें कसें सांगू ! तुमच्या प्रस्तावनेविषयी माझी कांही आधीची अपेक्षा होतीच. तथापि तिच्याहि पलीकडे जाअून तुम्ही अुत्कृष्ट प्रस्तावना लिहिलीत. तुमची स्वभावसुंदर संस्कृतभाषापद्धति वाचली म्हणजे संस्कृत भाषेला मृतभाषा म्हणणारांचा मूर्खपणा सहज कळून येतो. ही प्रस्तावना कोणत्याहि संस्कृत साहित्यिकाला शोभेल अशीच झाली आहे. आणि ती पाहून मला वाटतें की, 'प्रस्तावना लिहिण्याची मजवर
कृपा करा' अशी विनंति जेव्हा मी तुम्हांला केली, तेव्हा माझ्या मेंदूंतून अेक अकल्पित स्फूर्तीची लाट निघाली असली पाहिजे ! आणि त्याबद्दल मी स्वतःचेंच अभिनंदन करतें. तुम्ही अितकी चांगली संस्कृत भाषा लिहिलेली पाहून तुम्ही अितकें चांगलें मराठी लिहू शकतां याचें कुणालाहि आश्चर्य वाटणार नाही."</br>
{{gap}}(९९) जगांत वाङ्मय-व्यवहारांतील यश व अपयश हीं मोजण्याचें माप, सुख व दुःख हीं मोजण्याच्या माताअितकेंच अनिश्चित आहे. यांत लोकांचें व तुमचें स्वतःचें माप जुळणे कठीण. कार्यनिवृत्त होणान्या माणसा-संबंधाने त्याचे टीकाकार व प्रतिपक्षी म्हणतील 'अमका तो ना ? त्याचें जीवन अयशस्वीच झालें. कारण त्याने केलें त्याहून तो अधिक करील किंवा त्याने अधिक करावें अशी आमची तरी अपेक्षा होती. 'अुलट त्याचे<noinclude></noinclude>
07m0zdsv33xayljtlj1j8xshibx8pd8
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११५
104
102650
209843
207103
2024-10-24T10:47:40Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209843
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१०८]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>मित्र म्हणतील ' त्याचें जीवन यशस्वी झालें. कारण त्याने आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक केलें.' पण या दोनहि प्रकारांत अेक काढून घ्यायला अेक द्यावें लागतें. टीकाकार अमित्र तुमचें यश काढून घेतात; पण गुण कबूल करतात ! अुलट मित्र अपयशाचा आक्षेप खोडून काढतात; पण मुळांत तुमचे गुण कमी होते असें त्यांच्या समर्थनांतूनच निघूं पाहतें !अेतावता मनुष्य हा स्वतःविषयीं जें म्हणेल तेंच शेवटीं ग्राह्य धरावें लागतें. लोकांना तुमची योग्यता ठरविण्याचा अधिकार जितका आहे तितका तुम्हांलाहि कां नसावा ? मात्र तुमच्यामध्ये न्यायबुद्धि आणि आत्मविश्वास पाहिजे. म्हणजे मग लोकांच्या मतावर तुम्ही आपली योग्यता किंवा सुखदुःखाची कल्पना सर्वस्वी अवलंबून ठेवणार नाही. तुम्ही अल्पसंतुष्ट असाल तर त्या संतोषाचा आनंद तुम्हांलाच. तुम्ही हावरे असाल तर त्या असंतोषाचें दुःखहि तुम्हांलाच. तुमच्याविषयींच्या मताने लोक सुखी होत नाहीत किंवा दुःखीहि होत नाहीत. केवळ ते आपल्या मतप्रदर्शनाची हौस फेडून घेतात !</br>
{{gap}}(१००) वाङमयसेवेत मीं स्वतःची हौस फेडून घेतलीच; पण त्याबरोबर हेंहि केलें की, शक्य तितका अितर लोकांच्या अुपयोगी पडलों. कोणी मजकडे येअून ' हा माझा लेख, हें माझें पुस्तक, वाचून पाहून अभिप्राय द्या' असें म्हणाला, आणि मीं त्याचा अव्हेर केला असें बहुधा घडलेंच नाही. त्यामुळे माझें प्रस्तावनात्मक परीक्षणात्मक वाङमय पुष्कळच झालें आहे. आता अभिप्राय कमीअधिक मोठा लिहिणें हें अनेक अवांतर गोष्टींवर अवलंबून राही हें सांगावयासच नको. तसेंच अभिप्रायार्थ आलेल्या कांहीं पुस्तकांचा राग येअी म्हणून मी फार तर बरेच दिवस मौन धरीत असें. हेतु हा की अुपेक्षेवरून परस्पर ज्याचें त्याने अुमजावें. तथापि कांही ग्रंथकार पिच्छाच पुरवीत, तेव्हा असा अभिप्राय लिहून देअीं की, तो त्यांना प्रसिद्ध करण्याची अिच्छा राहूं नये. अर्थातच तो ते छापीत नसत. पण कांही लोकांना अभिप्रायांत आपली नाजुक निंदा किंवा थट्टा आहे, हें न अुमजल्याने ते तोहि अभिप्राय छापीत ! याचें अेक अुदाहरण सांगतों. अका कवीने 'सौंदर्यलहरी ' नांवाचें काव्य लिहिलें. मला तें नीरस वाटलें. पण ग्रंथकाराचा आग्रह असा की, मी अभिप्राय तर लिहून द्यावाच; पण तोहि समवृत्त समश्लोकी असावा. 'सौंदर्यलहरी' हें काव्य<noinclude></noinclude>
anwu73kp49rg3qxmxsd7bata6v4fazk
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११६
104
102652
209844
207108
2024-10-24T10:47:53Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209844
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१०९}}
{{rule}}</noinclude>पाहावें तों तें सुमारच होतें. अशा काव्याला कवितावद्ध प्रस्तावना ती काय लिहावी ? तेव्हा मी मनांत रागावून हे खालील तीन श्लोक लिहून पाठविले, व आग्रह धरला की, प्रस्तावनेच्या रूपाने हे श्लोक, फेरबदल न करतां, जसेच्या तसे घालणार असाल तरच त्यांचा अुपयोग करावा व माझी सही घालावी. पण तुमच्या श्लोकांत माझे श्लोक घुसडून देअूं नयेत. बिचाऱ्याने मर्म न अुमजतां तींहि पद्ये छापलीं !</br>
{{gap}}मीं प्रस्तावनेदाखल श्लोक रचून पाठविले ते असे :-</br>
{{gap}}{{gap}}नटे वर्षाकालीं सजलधन संभार गगनीं</br>
{{gap}}{{gap}}स्फुरे विद्युत्जिव्हा चमचम करोनि झणिझणीं</br>
{{gap}}{{gap}}शिखी मोदें नाचे थयथय पिसाराहि पसरी</br>
{{gap}}{{gap}}बघोनी घ्या तेव्हा अनुपमचि सौंदर्यलहरी ॥ १ ॥</br>
{{gap}}{{gap}}परी लांडोरीने करुनि अनुकारा अुभविलें</br>
{{gap}}{{gap}}स्वपार्श्वी पुच्छातें तरि न गमतें नर्तन भलें</br>
{{gap}}{{gap}}कळोनी येअी कां तुज सहज धीमंत चतुरा</br>
{{gap}}{{gap}}दिला दुर्दैवाने तिज नच पिसारा नच तुरा ॥ २ ॥</br>
{{gap}}{{gap}}स्थळ सौंदर्याच्या कविस जगतीं वाण न मुळीं</br>
{{gap}}{{gap}}स्वतंत्र स्फूर्तीने पडतिल सदा येअुनि गळीं</br>
{{gap}}{{gap}}हठाने हव्यासें पदसमिति काव्यब्रुव करी</br>
{{gap}}{{gap}}कशा निर्मी सांगा मग अकवि ' सौंदर्य-लहरी' ? ॥ ३ ॥</br>
{{gap}}(१०१) अभिप्राय देण्याच्या कामांत माझा भिडस्त स्वभाव मला फार नडला. कारण तेंच अेक काम नेहमीं फार पडे. अलीकडे दरदिवशीं अेखादें नवें पुस्तक-पत्रक अभिप्रायार्थ टेबलावर येअून पडूं लागल्यापासून तर, अभिप्राय देतां देतां मी हैराण झालों. कोणत्याहि राजकीय सम्राटाला त्याच्या खजिन्यांत येअून पडणाऱ्या ' करभारा'चा कंटाळा येणें शक्य नाहीं. पण या बिचाऱ्या 'साहित्यसम्राटा 'ला तो करभार नको नको असें होून गेलें. अभिप्राय मागणाराला थोडा तरी अुपयोग व्हावा, असा अभिप्राय दिला पाहिजे ही स्वभाव-दाक्षिण्याची बळजोरी. अुलट<noinclude></noinclude>
oyzfhttmc30kwbuxnu3py2pzgmj1bp6
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११७
104
102654
209845
207230
2024-10-24T10:48:09Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209845
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|११०]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>मनाला न पटणारा असा खोटा अभिप्राय देअूं नये असा निश्चय. आणि भलताच अभिप्राय दिला तर, स्वतः ग्रंथकाराला बाजूला ठेवून त्याच्याअैवजी मार्मिक टीकाकार माझ्यावरच कोरडे ओढणार ही भीति ! तात्पर्य, या तिहेरी कात्रीला संभाळून रोज अेक अभिप्राय लिहावयाचा अुपद्रव किती होत असेल याची कल्पना कोणालाहि सहज करतां येअील. अभिप्राय मागणारे लेखक, तो ग्रंथविक्रीला जाहिरातीसारखा अुपयोगी पडावा याकरिताच बहुतेक मागतात. प्रामाणिक यथार्थ गुणदोषदर्शनाकरिता मागणारे थोडे. आणि अुपचाराला बळी न पडतां गुणदोषविवेचक असा स्पष्ट व प्रामाणिक अभिप्राय देणारेहि थोडे.</br>
{{gap}}(१०२) पण अेका प्रकारचा अभिप्राय देण्याचा मात्र मी कधीहि कंटाळा केला नाही. तो म्हणजे लहान मुलांनी मला कांही भाषाविषयक वाङ्मयविषयक प्रश्न विचारल्यास त्यावर. कारण अशा प्रश्नांची चिकित्सा तीं अितक्या अल्पवयांत करतात याचेंच कौतुक वाटे. आणि नातवंडांनी आजोबाकडे जाअून आपली अडचण मांडावी त्याप्रमाणें अशीं मुलें, जवळचे सर्व साहित्यिक व गुरु सोडून जणुं कांही मी हें त्यांचे हायकोर्ट अशा आदरबुद्धीने, माझा अभिप्राय विचारतात याचा मला मनापासून आनंद वाटतो. आणि मीहि खऱ्या मनाने आठवण ठेवून आवर्जून त्यांना पत्रद्वारें अभिप्राय कळवितों. अशा प्रकारचें अेक पत्र कोल्हापुराहून गेल्या ता. ३ ऑगस्टचें मला आलें त्यांतला मजकूर --</br>
{{gap}}"पत्रास सुरुवात करण्यापूर्वी आपणांस अेक विनंति करावयाची आहे. आणि ती म्हणजे अशा तऱ्हेने आपणासारख्या थोर माणसांना निष्कारण पोरकटपणाचीं पत्रें पाठवून आपल्यासारख्यांचा अमूल्य वेळ घेणें चुकीचें आहे. आपल्यासारख्यांना अशा तऱ्हेचीं पत्रे पुष्कळ येत असतात व त्यांना अुत्तरें पाठविणेंहि शक्य नसतें ही गोष्ट खरी आहे. पण आपण या पत्राची तशीच गत करणार नाही अशी नम्र विनंति करून मुख्य मजकुराकडे वळतों.</br>
{{gap}}" मी माझ्या अेका मित्राला अलीबाग मुक्कामाहून अेक पत्र टाकलें. त्यांत असें अेक वाक्य होतें की, 'मी अुद्या न येतां गरुवारी सकाळच्या<noinclude></noinclude>
4i0gjy4lybs69w8pndemm8pcxl554yb
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११८
104
102748
209846
207232
2024-10-24T10:48:26Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209846
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१११}}
{{rule}}</noinclude>बोटीने मुंबअीस येणार आहें व लागलीच पुण्यास जाणार आहें, तरी ठरल्याप्रमाणें गुरुवारीं रात्रीं माझी गांठ घ्यालच. अशा तऱ्हेने 'लागलीच' हा शब्द मी अुपयोगांत आणला. पण त्यामुळे माझ्यामध्ये व माझ्या मित्रामध्ये तात्त्विक वाद निर्माण होअून वाद अेकेरीवर आला. माझें म्हणणें असें की ' लागलीच ' हा शब्द मराठी भाषेंत आहे व तो लिहितांना अुपयोगांत आणतात व तेंच बरोबर आहे. मित्राचें म्हणणें असें आहे की, त्या ठिकाणीं लागलीच पुण्यास जाणार आहें असें न म्हणतां ' लागलाच' पुण्यास जाणार आहें असें म्हटलें पाहिजे, 'लागलीच' म्हणणें मूर्खपणाचें आहे. मित्राचें म्हणणें असें आहे की, त्या ठिकाणीं जर अेखादी स्त्री असेल तर तिने ' लागलीच ' जाणार आहें असें म्हटलें पाहिजे, पुरुषांनी 'लागलाच' असें म्हटलें पाहिजे. मी पुष्कळांना हा प्रश्न विचारला, पण कोणी म्हणतात लागलीच हा शब्द अशा तऱ्हेने अुपयोगांत आणला जातो व तो बरोबर आहे. कोणी तिसरेंच सांगतात. त्यामुळे समाधान होअीना. शेवटी आपल्याकडे हा वाद सोपवावयाचा व आपण जो निकाल द्याल तो मान्य करावयाचा असें त्याच्यांत व माझ्यांत ठरलें. तरी 'लागलीच' हा शब्द आहे का ? व तो अशा तऱ्हेने अुपयोगांत आणणें चूक आहे की बरोबर आहे, तें आपण सांगितल्यास आभारी होअीन. तरी कृपा करून आमचें समाधान कराल अशी विनंति आहे. "</br>
{{gap}}या पत्राला मीं तत्परतेने पानभर सविस्तर अुत्तर पाठविलें. मी संभाळून ठेवलीं असतीं तर अशीं पत्रे किती तरी मजजवळ जमलीं असतीं. याचप्रमाणें संपादक या नात्याने मजकडे आलेल्या शेंकडों गमतीदार पत्रांची आठवण होते. पण तो विषय वेगळा आहे.</br>
{{gap}}* (१०३) असो. मौज ही की, सर्वांत कमी अभिप्राय लिहिले गेले किंवा प्रसिद्ध झाले असतील तर ते माझ्याच पुस्तकांवर. कारण, अगदी प्रारंभी काय झालें असेल लक्षांत नाही, पण पुढे पुढे मी स्वतः होअून माझीं पुस्तकें अभिप्राययाचनेने कोणाकडे पाठवीतच नव्हतों. अभिप्रायार्थ पुस्तक धाडावयाचें तें प्रसिद्धीच्या आशेने प्रथम वर्तमानपत्रांकडे. पण वर्तमानपत्री अभिप्रायाची किंमत मला स्वतःला माहीत असल्यामुळे मी त्यादिशेला फारसा गेलों नाही. खासगी स्नेह्यांनाहि मीं पुस्तकें दिलीं तरी तीं<noinclude></noinclude>
5xsnrhhs6jd4nmi5b6jzpskotr9bzjv
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११९
104
102755
209847
207241
2024-10-24T10:48:41Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209847
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|११२]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>'भेट' म्हणून देअीं, सहसा 'अभिप्रायाकरिता ' म्हणून नाही. मला फक्त त्याच अभिप्रायाचें महत्त्व वाटे की, जो सहज खासगी भाषणाच्या किंवा सार्वजनिक चर्चेच्या ओघांत अवचित प्रगट झाला असेल. मग तो बरा असो, वाअीट असो. आपल्या बरोबरीचा तज्ज्ञ मनुष्य, तो पुस्तक खुणा करून वाचणार, अभिप्राय लिहिणार, आवर्जून आपणाकडे पाठविणार, आणि भीडमुर्वत न ठेवतां खऱ्या मनाने गुणदोषदर्शन करणार असा योग येण्याची आशाच फारशी करूं नये. पुस्तक किती खपलें यावरून लोकांना तें कितपत आवडलें याचा अंदाज कांही करतां येतो. पण त्यांत फक्त सामान्य वाचकांचा अभिप्राय कळतो. खऱ्या तत्त्वज्ञाचा कळत नाही. तात्पर्य, याहि बाबतींत, म्हणजे आपण निर्माण केलेल्या ग्रंथावर स्वतः आपण जो अभिप्राय मनाने देअूं तोच शेवटीं खरा. कारण आपला ग्रंथ झाला म्हणून त्यांतील गुणदोष आपणाला कळत नाहीत असें होत नाही.</br>
{{gap}}(१०४) दुसरीहि ओक अनुभवाची, मर्माची म्हणून गोष्ट सांगतों. ती ही की, रीतसर अभिप्रायाकरिता जशीं मी माझीं पुस्तकें सहसा लोकांकडे पाठविलीं नाहीत, त्याचप्रमाणें कोणालाहि " माझें तें अमुक अमुक पुस्तक तुम्ही वाचलें का ? " असेंहि विचारीत नाहीं. तें वाचल्याचा अुल्लेख त्याने होअून आपल्या भाषणाच्या ओघांत केला तर मात्र, अुन्हाळयांत अंगावर आलेल्या थंड वाऱ्याच्या झुळुकेसारखा, तो अुद्गार सुखद वाटतो. आपण होअून लोकांना 'माझें पुस्तक तुम्ही वाचलें का?' असें विचारून त्याने खरें किंवा खोटें ' होय' म्हटल्याचें समाधान मानणें हें, आपल्याच हाताने पंखा सुरू करून वारा अुठवून अंगावर घेण्यासारखें मला हीन प्रतीचें वाटतें. त्याला आभाळांतून आलेल्या वाऱ्याच्या झुळकेची किंमत नाही. शिवाय माझ्या परिचयांतीलच कांहीं व्यक्ति अशा भावनेच्या आहेत की "कांहो माझें अमुक अेक तें पुस्तक किंवा लेख तुम्ही वाचला आहे का " असें मीं कारणपरत्वें म्हणावें, विचारावें, आणि “ छे: मी तें मुळीच वाचलें नाही (कदाचित् वाचलेलें असूनहि ! ) असें तुच्छतादर्शक अुत्तर देअून माझा अपमान करतां यावा याच्या संधीची जणूं काय वाट पाहतच बसलेले असतात. मग मी त्यांना ती संधि कां द्यावी ? कारण अेखाद्याने आपणाला अुत्तर दिलें की ' तुमचें पुस्तक मीं वाचलें नाही' तर अुगीचच वाअीट<noinclude></noinclude>
d4xm5i2bx5c791ig4gepx64u4fx8gsr
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२०
104
102794
209848
207398
2024-10-24T10:49:16Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209848
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[११३}}
{{rule}}</noinclude>वाटण्याचा मनुष्यस्वभाव असतो की नाही ? वास्तविक कोणाहि सुज्ञ ग्रंथकाराला तसें वाअीट वाटण्याचें कारण नाही. कारण तुम्ही अगदी मोठे लोकप्रिय ग्रंथकार झालां, तरी तुमचीं सर्व पुस्तकें सर्व मराठी वाचक वाचतील, वाचूं शकतील, अशी अपेक्षा तुम्ही कां करावी ? पुस्तकें विकलीं जातात, किंवा देणगीरूपाने दिली जातात, त्या प्रत्येकागणिक सुमारे दहा-वीस वाचक त्यांना लाभलें तरी पुष्कळ झाले ! स्वतः तुम्ही ग्रंथकार असलां तर आपल्या ठिकाणीं विचार करून पाहा की तुम्ही तरी लोकांचीं पुस्तकें कितीशीं वाचतां ?</br>
{{gap}}(१०५) मला माझ्या म्हातारपणांत वाङ्मयलेखन हें व्यसनासारखें जडलें आहे असें कोणी म्हटलें ( आणि मी स्वतःहि तें थोडेंसें कबूल केलेंच आहे ) तर त्याचें मला वाअीट वाटणार नाही. पण अिच्छा दोनच. या व्यसनाच्या भरांत माझ्या हातून कदाचित् कांही नीरसहि वाङमय लिहून होवो; पण आजकाल ललिताचा आत्मा होअून बसलेलें अश्लील अभद्र असें वाङ्मय - समाजाला अितरहि रीतीने अपायकारक असें वाङ्मय - लिहिलें न जावें. असलें वाङमय मीं यापूर्वी सहसा कधी जाणून लिहिलें असें स्मरत नाही. आता मनुष्य हा चुकीला पात्र असल्यामुळे, नियमाला अपवाद किंवा गोऱ्या अंगावर तीळ, या न्यायाने अेखाददुसरें अुदाहरण कोणी कोठे कोठे दाखवूं शकेल. परंतु माझ्या चवदा-पंधरा हजार पृष्ठांच्या वाङ्मयांतील अभद्र अश्लील लिखाण काढून दाखवावयाचें झालें तर त्याकरिता अेखादें संशोधक कमिशनच बसवावें लागेल ! दुसरी अिच्छा ही की, पूर्वी कांही वृद्ध साहित्यिकांवर प्रसंग आल्याप्रमाणें, आपलीं पुस्तकें खाकेंत मारून लोकांच्या घरोघर जाअून तीं विक्रीचीं म्हणून त्यांच्या पदरांत बांधण्याची वेळ न यावी. माझी बुद्धि निरोगी राहील तोंपर्यंत माझी पहिली अिच्छा बहुधा सफळ होत राहील. मृत्यूपर्यंत बुद्धि निर्विकार राहणें हें अीश्वराचें देणे. आणि वार्धक्याच्या आपत्तीबरोबर बुद्धीच्या वैकल्याची आपत्ति ओढवणें यापेक्षा मरण बरें. पण या गोष्टी कोणाच्या हातच्या नसतात ! त्याविषयी आपली अिच्छा प्रकट करणें अितकेंच माणसाच्या स्वाधीन असतें, म्हणून तितकेंच मी या ठिकाणीं करीत आहें.</br>
मा. ज. अु. ८<noinclude></noinclude>
qme3rpupt5o3c4gcgq7eensbh8ffncw
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२१
104
102795
209849
207399
2024-10-24T10:50:05Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209849
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|११४]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>{{gap}}(१०६) यानंतर दुसन्या प्रकारची अिच्छा मात्र हटकून सफळ होअील. तद्विषयक आपत्ति मजवर येणार नाही याविषयी मला अगदी निर्धास्त वाटतें. कारण अलीकडे मी असा क्रम ठेवलेला आहे कीं, अेखादें पुस्तक लिहून झालें तरी तें स्वतः खर्च करून छापावयाचें नाही. जो कोणी प्रकाशक त्याच्या खर्चाची व विक्रीची जबाबदारी पत्करणारा आपण होअून पुढे येअील त्याला तें देऊन टाकावयाचें. त्यांत स्वामित्वाबद्दल लेखनमूल्य म्हणून त्याने कांही दिलें तर ठीक. नाही तर त्याचीहि अपेक्षा ठेवावयाची नाही. कारण स्वतःच्या पुस्तकांची विक्री स्वतः करीत बसण्यासारखे कंटाळवाणें जिकीरीचें काम दुसरें कोणतेंहि मला वाटत नाही. वास्तविक अितर ग्रंथकारांच्या मानाने प्रकाशनाच्या विक्रीच्या सवलती सुदैवाने किती तरी मला अधिक आहेत ! केसरी पत्राच्या ऋणानुबंधाने जाहिरातीची हुकमी सोय व सवलत ! केवढी मोठी गोष्ट ! तसेच विक्रीचें कामकाज करण्याला केसरी कचेरीचें हुकमी साहाय्य. असें असतांहि स्वतः पुस्तकविक्रीचा व्यवहार करणें, विशेषतः त्याचा हिशेब ठेवणें, या गोष्टींचा कंटाळा येतो. वरील सोयी-सवलतींचा फायदा घेअून मी स्वतःच्या अंगावर तें काम घेतलें तर कांही अधिक पैसे मिळतील. तथापि त्या मोहामुळेहि मी पुस्तकविक्रेता होण्यास धजत नाही.</br>
{{gap}}( १०७) पण मी यापुढे निरपवाद असेंच वाङमय लिहीत गेलों, आणि स्वतःचीं विक्रीचीं पुस्तकें दुसऱ्याच्या गळ्यांत बांधण्याचा अप्रयोजकपणा केला नाही, तरी असें कांही लोक आहेत की ते माझ्या वाङ्मयलेखनाच्या हौसेचें कौतुक न करतां कदाचित थट्टा करतील. कारण मजकडे पाहण्याची त्यांची दृष्टि अेकंदरीने कुत्सितच राहिली. याला जोडीचें अुदाहरण माझ्या अध्यक्षपद-स्वीकाराचें. वास्तविक मी आता अध्यक्षपदें स्वीकारतों तीं अपेक्षित मानसन्मानाची अुणीव भरून काढण्याकरिता नाही. तर जे मला बोलावतात त्यांना माझा कांही अुपयोग, त्यांच्या कार्याला होईल असें त्यांना वाटतें म्हणून. आणि तसा अपयोग झाला तर तो कां न करावा असें मलाहि वाटतें म्हणून. ही सरळ गोष्ट कोणीहि सरळ मनाचा मनुष्य कबूल करील. पूर्वी ज्ञानप्रकाशांत कै. रा. आंबेकर यांनी माझ्या अध्यक्षपदग्रहणाची थट्टा केली तशी आजहि करणारे कोणी तत्समानधर्मी भेटणार नाहीतच असें<noinclude></noinclude>
co84susxhyorgpfoc57slavdfktztdj
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२२
104
102796
209850
207400
2024-10-24T10:50:35Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209850
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[११५}}
{{rule}}</noinclude>नाही. पण माझाहि निश्चय आहे कीं अशा बाष्कळ थट्टेला भीक घालावयाची नाही. आणि स्वतःला योग्य वाटल्यास खुशाल सभांना जावयाचें, भाषणें करावयाचीं, अध्यक्षपदेंहि स्वीकारावयाचीं. याला मर्यादा पडेल ती स्वतः माझ्या आळसाने, कंटाळयाने, अभिरुचीने, मतभेदाने. त्याचप्रमाणें माझें वाङमयलेखनहि मी प्रतिपक्षियांच्या कुत्सितपणाला न जुमानतां चालू ठेवणार आहें. माझ्या निरुद्योगीपणांतली विश्रांतींतली आवडती व लोकोपयोगी करमणूक मी कां गमवावी ?मी अशीच अिच्छा करतों की--</br>
{{gap}}Oh that I were an orange tree</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}That busy plant</br>
{{gap}}Then should I ever laden be</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}And never want</br>
{{gap}}Some fruit for him that asked me.</br>
{{gap}}(१०८) मला अिंग्रजी, मराठी, संस्कृत ञित्यादि अनेक भाषांतील वाङ्मय-साहित्याची आवड असली तरी या भाषांचा शास्त्रीय अभ्यास मी मुळीच केलेला नाही. या भाषांचें साधें व्याकरणहि मला चांगलेंसें येत नाही. मग या भाषांची रचना, त्यांच्या वाढीचा क्रम व अितिहास, त्यांचा परस्पर तुलनात्मक संबंध, सर्वसाधारण भाषाशास्त्र, अित्यादि विषयांत माझी मुळीच प्रगति नाही हें सांगावयास नकोच. 'विद्वान्' असा माझा कोठे अुल्लेख झाला असतां, तें विशेषण मला लागू पडलें तरी किती संकुचित अर्थानें लागू पडतें, हें जाणून मी मनांत हसतो. कारण खरी 'विद्वत्ता' ही माझ्या मतें खोल शास्त्राध्ययनावर अवलंबून असते. पण भाषाविषयच काय, अितर कोणताहि विषय (विनोद हा सोडून) शास्त्राच्या दृष्टीने मीं अभ्यसिलेला नाही. मला जें करतां आलें तें अितकेंच की, शास्त्रीय विषयांतलें जें मी समजून घेअीं, व जें मला लोकांना सांगावेंसें वाटे, तें मी चांगल्या, म्हणजे समर्पक, सुबोध व चित्ताकर्षक रीतीने, मांडूं सांगू शकलों. मला अेकच कला थोडीशी येते ती अर्थप्रगटीकरणाची कला. या अुपयुक्त कलेला महत्त्व नाही असें मी मान्य करीत नाही. तथापि शास्त्रीय विषयाच्या अभ्यासाच्या मानाने मी तिला गौण स्थान देन. आता मी शास्त्राच्या दृष्टीने प्रयत्न केला असता तर<noinclude></noinclude>
d8x7zkxgvl9lz4djr75134bkz54yfhl
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२३
104
102797
209851
207401
2024-10-24T10:50:49Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209851
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|११६]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>तो, कांही विषयांत तरी, मला साधलाच नसता हें मात्र मी मान्य करीत नाही. तसेंच सामान्य लोकांपेक्षा थोडें अधिक खोलात जाअून विषयाभ्यास केल्याबरोबर जे घमंडानंदन स्वतः मोठे तज्ज्ञ ( Expert ) म्हणून मिरवूं पाहतात त्यांचें मला हसूं येतें. ' हास्यविनोदमीमांसा' हा जो ग्रंथ मी लिहिला तो माझ्या संशोधक चिकित्सक अभ्यासू शास्त्रीय बुद्धीचा अेक पुरावा व चांगला नमुना आहे असें मला वाटतें. विनोद या विषयाची चिकित्सा मराठी भाषेतून अितर कोणीहि माझ्याअितकी समर्पक केलेली नाही. त्या विषयावर मी स्वतःचें स्वतंत्र असेंहि कांही सांगितलें आहे. आणि त्या विषयज्ञानांत चांगली भर घातली आहे असें वाटतें. तथापि मला स्वतःला त्यांतहि expert म्हणवून घेणें बरें वाटत नाहीं.</br>
{{gap}}( १०९) विद्या संपादन करण्याच्या दोन रीति असतात. अेकीला अेकांगी व दुसरीला अनेकांगी असें नांव देतां येअील. पैकी मी अनेकांगीं रीतीचा अनुयायी, कांही आवडीने पण कांही गरजेने व परिस्थितीने हि ठरलों. आवड ही की जो जो म्हणून ज्ञानाचा विषय तो, अगदी वरवर कां होअीना, पण थोडासा तरी समजून घ्यावा. पण तो केवळ पांडित्यप्रदर्शनाकरिता असें मात्र नव्हे. ही भ्रमरी वृत्ति म्हणावी ! भ्रमर हा स्वतः मध बाहेरून गोळा करून आणीत नाही. तर ज्या ज्या फुलांत त्याला तो मध मिळूं शकेल त्यावर थोडा वेळ बसून त्या मधाचें सेवन करतो. दुसऱ्या टोकाचें अुदाहरण मधमाशांचें. त्यांचा अुद्योग असा की, मिळेल तेथून मध गोळा करून अेखादें पोळे बनवून त्यांत त्याचा संग्रह करावयाचा. स्वतः मधमाशा तो मध खातात किंवा नाही हें मला माहीत नाही. देव जाणे. जन्मभर ज्यांनी अभ्यास करून स्वत:चें मन समृद्ध केलें, पण दुसऱ्यांना त्या ज्ञानाचा लाभ होण्यासारखी अेक ओळहि सान्या जन्मांत लिहिली नाही, असेहि 'विद्यार्थी ' हमाल मी कांही पाहिले आहेत. अुलट ज्यांनी पुष्कळ लिहिलें पण त्यांत मिळविलेलें ज्ञान संपून गेलें, त्यांच्या स्वतःजवळ कांही शिल्लक राहिलें नाही, असे दुसरेहि कांही लोक मी पाहिले आहेत. त्यांना विद्यार्थी हें नांवहि मी देअूं अिच्छीत नाही. सदासर्वदा वर्तमानपत्री लिहिणारे हे या दुसऱ्या वर्गांत पडतात. अखाद्या मजूर कुटुंबाप्रमाणें त्यांचा क्रम म्हटला म्हणजे रोज त्या दिवसापुरता शिधा विकत आणावयाचा, त्याचा स्वयंपाक<noinclude></noinclude>
iw0pe0xggvgz7opsfw5hs5xocy0pywd
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२४
104
102798
209852
207402
2024-10-24T10:51:42Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209852
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ११७}}
{{rule}}</noinclude>करून खावयाचा वाढावयाचा, आणि भांडीं धुअून हात झाडून मोकळें व्हावयाचें. या दोनहि प्रकारचे लोक मला मान्य नाहीत. मला विद्वानाचा तो प्रकार आवडतो की जो स्वतः सुविद्य व बहुश्रुत असतो, व त्या ज्ञानाचा अितरांनाहि लेखनप्रवचनद्वारा अुपयोग करून देतो. मी स्वतः या प्रकाराचीच आवड धरली. मी वर्तमानपत्रकार झालों नसतों तरी ग्रंथकार झालों असतों. पण मी वर्तमानपत्रकार झाल्याने मला भ्रमरवृत्ति व मधुमक्षिकावृत्ति दोन्हीचा उपयोग करतां आला.</br>
{{gap}}( ११० ) केसरी व मराठा या दोन्ही वर्तमानपत्रांत प्रचलित राजकीय विषयांवर तर मला नित्य लेख लिहावे लागतच. पण मी मनाने वैचित्र्य व विविधता यांचा भोक्ता असल्याकारणाने, आणि माझ्या विस्तृत वाचनांत अनेक विषय सहजच सुचत असल्याकारणाने, मी प्रचलित नाहीत अशाहि विषयांना, लहानशाहि निमित्ताने, प्रचलितपणाचें स्वरूप देअून निबंधवजा अिंग्रजी मराठी लेख लिहीत असें. राजकारणाचा व्याप १९०५ पर्यंत या देशांत सर्वत्रच बेताचा होता. १९०५ ते १९०९ या सालांत त्यांना पुष्कळच 'भर आला. पुढे १९१४ सालीं महायुद्ध सुरू झालें. लो. टिळक मंडालेहून परत आले, तेव्हापासून राजकारण हाच प्रधान विषय वर्तमानपत्रांना लिहिण्याला झाला. आणि तो यापुढे केव्हाहि गौण होणार नाहीं. मुख्यच राहील. पण मला सांगावयाचें तें हें की १९१० ते १९१५ पर्यंत मी खुद्द केसरींत निबंधलेखनाची हौस अितकी पुरवून घेतली की, चित्रशाळेला त्यांतील निवडक निबंधांचा मिळून सुमारे सहाशें पानांचा ग्रंथच काढता आला. मी निश्चितपणें म्हणूं शकतों कीं, ठरीव चाकोरीबाहेर जाऊन अवांतर विषयांवर मी जितके लेख केसरींत लिहिले तितके दुसऱ्या कोणाहि संपादकाने लिहिले नाहीत.</br>
{{gap}}(१११) हें तर झालेंच. पण वर्तमानपत्रांतून जी भूक भागण्यासारखी नव्हती ती मी आणखी अनेक स्वतंत्र ग्रंथ लिहून भागविली आहे. आणि माझ्या ग्रंथांतहि विषयांचें वैचित्र्य व विविधता हीं अुघड दिसून येतात. आयर्लंडचा अतिहास, तिरंगी नवमतवाद, संस्कृत विद्येचें पुनरुज्जीवन हे ग्रंथविषय अेकवेळ केसरींत लेखमालेच्या रूपाने लिहिले गेले होते !<noinclude></noinclude>
3co9fc0z119fysg955h46zqr67tzhs0
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२५
104
102842
209853
207496
2024-10-24T11:00:53Z
Shurpalimedha
5041
/* मुद्रितशोधन */
209853
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|११८]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>टिळकचरित्राचे तीन खंड हे कर्तव्यबुद्धीने लिहिले गेले. मराठे व अिंग्रज हा ग्रंथ पेशवाअीचें शतसांवत्सरिक श्राद्ध व प्रसंगोपात्त म्हणून अितिहासविषयाच्या प्रेमाने लिहिला. मी अितिहाससंशोधक नाही. पण अतिहास हा माझा अेक अत्यंत आवडीचा विषय आहे व अितिहासाच्या तत्त्वज्ञानांत मला थोडी गती आहे. हास्यविनोद-मीमांसा हा केवळ आवडीचा विषय म्हणून लिहिला. नाटकें कांही नाट्यप्रियतेमुळे व कांही द्रव्यप्राप्तीकरिता लिहिलीं. कादंबऱ्या व लघुलेख ( लघुकथा, लघुनिबंध, वक्रोक्ति लेख, विनोदी चुटके) हे सर्व कलाविलासाच्या हौसेमुळे लिहिले, आणि भारतीय तत्त्वज्ञान हा ग्रंथ केवळ स्वतः विषयाभ्यास करावा म्हणून, आणि त्याचबरोबर निवळ मराठी वाचकांना अुपयोगी पडावा म्हणून लिहिला. तात्पर्य, 'केवळ संशोधनात्मक ' हा प्रकार दिला असतां, बहुश्रुत माणसाच्या दृष्टींत येणारा असा कोणताहि प्रकार मी सोडला नाही. मात्र यांत माझ्या बुद्धिमत्तेपेक्षा आवड व अभिरुचि यांच्या दुर्दमतेला अधिक श्रेय मी देतों. माझ्या समकालीन पिढींत माझ्यापेक्षा अधिक बुद्धिवान असे जितके लोक आहेत की, त्यांच्यापुढे मी ठेंगणाच होअीन. पण दुर्दैवाने त्यांना ग्रंथ कर्तृत्वाची आवडच नाही त्याला कोण काय करणार ?</br>
{{gap}}(११२) अशा रीतीने मी हें आत्मपर विवेचन किंवा समालोचन संपवितों. आणि शेवटी अेका अिग्रज कवीच्या शब्दांनी असें म्हणतों-</br>
{{gap}}{{gap}}Farewell dear flowers</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}Sweetly your time you spent</br>
{{gap}}{{gap}}Fit while you lived</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}For smell or ornament</br>
{{gap}}{{gap}}And after death for cures</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}I follow straight</br>
{{gap}}{{gap}}Without complaints or grief</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}Since if my scent be good</br>
{{gap}}{{gap}}I care not if</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}It be as short as yours.</br><noinclude></noinclude>
esbyngejv717gpj46t4rk9svck7q2az