मराठवाडा

From Wikipedia

विभाग : मराठवाडा
राज्य : महाराष्ट्र
क्षेत्रफळ :६४,८११ चौ.कि.मी.
विभाग मुख्यालय : औरंगाबाद
जिल्ह्यांची संख्या :८
जिल्ह्यांची नाव
1
:औरंगाबाद, जालना,बीड, उस्मानाबाद, लातुर, नांदेड,परभणी, हिंगोली
जन संख्या : १५,५८९,२२३ (ई.स.२००१)
साक्षरता : ६८.९५%

मराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी खोर्यात वसलेला एक भाग असून आठ जिल्ह्याचा त्यात समावेश होत्तो.औरंगाबाद शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे.पैठण चे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकिय उत्कर्षाचा काळ होता.पैठण।पैठणचे धार्मिक महत्त्व पण मोठे होते.अजिंठा-वेरूळची लेणी मराठवाड्याचा मानबिंदू आहे.

अजिंठातल्या लेण्यांमधले एक चित्र
Enlarge
अजिंठातल्या लेण्यांमधले एक चित्र

शिरडी, साईबाबांचे जन्मगाव, वसमत समर्थ रामदासांचे जन्मगाव जांब, संत एकनाथांचे पैठण, शक्तीपिठ माहूर, ज्योतीर्लिंग परळी वैजनाथ, औंढा-नागनाथ, घृष्णेश्वर मंदिर, शीख।शीखांचा नांदेड येथील गुरुद्वारा इत्यादी धार्मिक स्थाने या विभागात येतात.


आज तारखेस मराठवाड्यातील श्री.यु.म.पठाणयांनी हे मराठी संतसाहित्याचे अग्रणी अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे.कै. नरहर कुरुंदकर मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते.डॉ. लक्ष्मण देशपांडेयांनी नाट्य तर नाथराव नेरळकर यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. लक्ष्मीकांत तांबोळी, फ.मु.शिंदे यांनी काव्य लेखन केले.

स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ निजाम।निजामाच्या हैदराबाद राज्य चा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.श्री.स्वामी रामानंदतीर्थ,श्री.गोवींदभाई श्रॉफ हे हैदराबाद मुक्तीसंग्राम चे अर्ध्वयू होते.१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्य स जोडण्यात आला.१ मे १९६० पासून नविन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला. दैनिक मराठवाडाचे संपादक कै.श्री.भालेराव व दैनिक प्रजावाणी, नांदेडसंपादक श्री.सुधाकर डोइफोडे यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रीय कार्य केले.

स्वातंत्र्योत्तर काळात कै.श्री.शंकरराव चव्हाण हे इंदिरा कॉंग्रेसचे नेते यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागात राजकीय प्रभुत्व होते.शंकरराव चव्हाणहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांनी भारतीय संघराज्याचे गृहमंत्री, अर्थमंत्री इत्यादी केंद्रीय मंत्रिपदेही सांभाळली . शंकरराव चव्हाण यांचे राजकीय विरोधक पण त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे कौतुक करत.

जायकवाडी धरण, पैठण
Enlarge
जायकवाडी धरण, पैठण

त्यांचा महराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा गाढा अभ्यास होता.पैठण चा जायकवाडी जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील मोलाचे योगदान होते.

बुद्धवासी श्री.बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठवाडा विभागाबद्द्ल विशेष ममत्व होते त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा केला.

अनुक्रमणिका

[संपादन] जिल्हे

[संपादन] महत्वाची ठिकाणे

  • औरंगाबाद शहर
  • जालना शहर
  • परभणी शहर
  • नांदेड शहर
  • लातूर शहर
  • बीड शहर
  • उस्मानाबाद शहर
  • हिंगोली शहर
  • परळी वैजनाथधार्मीक पर्यटन केंद्र
  • माहुरधार्मीक पर्यटन केंद्र
  • औंढा-नागनाथधार्मीक पर्यटन केंद्र
  • लोणार - उल्कापाता मुळे तयार झालेले तळे - औरंगाबाद पासुन १५० कि.मी.अंतरावर आहे.

[संपादन] वृत्तपत्र

[संपादन] प्रसिध्द व्यक्ति

[संपादन] राजकारण

  • स्वामी रामानंदतीर्थ
  • गोवींदभाई श्रॉफ,
  • शिवाजीराव निलंगेकर
  • शिवराज पाटिल चाकुरकर
  • विलासराव देशमुख
  • प्रमोद महाजन
  • गोपीनाथ मुंडे

[संपादन] व्यवसाय

  • नंदकुमार धुत
  • जवाहरलाल दर्डा
  • मच्छिन्द्र चाटे
  • रंजीत देशमुख

[संपादन] साहित्य

  • डॉ. रफिक झकेरिया
  • फ.मु.शिंदे
  • लक्ष्मीकांत तांबोळी
  • यु.म.पठाण


[संपादन] कला

  • डॉ. लक्ष्मण देशपांडे
  • मयुरी कांगो

[संपादन] क्रिडा

[संपादन] अर्थकारण

मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद हे अंतरांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मध्य्वर्ती शहर आहे. औरंगाबाद जवळील औद्यौगिक क्षेत्र विकसित झाले आहे.मुख्यत्वे कापुस हे मराठवाडा विभागातील प्रमुख पिक असुन .शेतकरींच्या आर्थीक सुरक्षे करीता महाराष्ट्र शासन एकाधिकार कापुस खरेदी योजना राबवत होते.

[संपादन] हे सुद्धा पहा

[संपादन] बाह्यदुवे

मराठवाडा प्रोफाईल

प्लानिंग कमिशना रिपोर्ट

[1]