अशी ही बनवाबनवी, चित्रपट

From Wikipedia

अशी ही बनवाबनवी
निर्मिती वर्ष {{{निर्मिती वर्ष}}}
दिग्दर्शक सचिन पिळगांवकर
कथा लेखक
पटकथाकार
संवाद लेखक
संकलन {{{संकलन}}}
छायांकन
गीतकार {{{गीतकार}}}
संगीत
ध्वनी दिग्दर्शक
पार्श्वगायन
वेशभूषा
रंगभूषा
प्रमुख अभिनेते -


    अशी ही बनवाबनवी हा सचिन पिळगांवकरने दिग्दर्शित केलेला एक चित्रपट आहे.

    अनुक्रमणिका

    [संपादन] कलाकार

    [संपादन] पार्श्वभूमी

    अनेक उपद्व्यापानंतर शेवटी घरमालकाने घरातून हाकलून दिल्यावर नवीन जागा भाड्याने मिळवण्यासाठी चार मित्रांना काय काय प्रताप करावे लागले याची मजेदार गोष्ट म्हणजे "अशी ही बनवाबनवी"

    [संपादन] कथानक


    सावधान: खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.


    धनंजय, शंतनू, परश्या आणि सुधीर हे चौघे एकाच गावात राहणारे परममित्र. नोकरीसाठी धनंजय गाव सोडून पुण्याला येतो. त्याचा धाकटा भाऊ शंतनू हा वैद्यकीय शिक्षण घेत असतो. त्याला अभ्यासाची सुटी लागल्यामुळे तो आपल्या भावाकडे पुण्याला येतो.

    धनंजयचे घरमालक विश्वास सरपोतदार हे टिपीकल पुणेरी व्यक्तिमत्व असते. धनंजयचा भाऊ त्याच्याकडे (म्हणजे आपल्या मालकीच्या खोलीत) राहणार हे त्यांना पटत नाही. जास्त भाडे आकारुन ते शंतनूला तिथे राहण्याची परवानगी देतात. मात्र हे जास्तीचे भाडे ते आपल्या पत्नीपासून लपवून ठेवतात.

    नंतर थोड्याच दिवसांनी आपल्या काकाबरोबर भांडण झाल्यामुळे सुधीर आणि आपल्या प्रेमप्रकरणाचा मुलीच्या बापाला पत्ता लागल्यामुळे नोकरी गमावलेला परश्या आपले नशीब आजमावण्यासाठी एकामागे एक पुण्याला येतात. पुण्यात त्यांच्या ओळखीचे दुसरे कोणी नसल्यामुळे त्यांना अर्थातच धनंजयकडे रहावे लागते.

    खडूस घरमालक घरात राहण्याची परवानगी देणार नाहीत हे जाणून धनंजय त्या दोघांनाही चोरून घरात राहण्याची सोय करतो.

    दरम्यान सुधीरला एका संगीत विद्यालयात नोकरी मिळते. त्या आनंदात सुधीर, धनंजय, परश्या दारु पिऊन घरी येतात आणि घरमालकाच्या घरी गोंधळ घालतात. येथे सुधीर आणि परश्या हे दोघे चोरुन घरात राहत असल्याचे बिंग फुटते आणि घरमालक धनंजयला एका आठवड्याच्या आत घर खाली करण्यास सांगतात.

    मात्र या अविवाहित तरुणांना पुण्यात घर मिळणे अतिशय अवघड जाते. शेवटी त्यांना हवी तशी जागा सापडते पण घराच्या मालकीणबाई लीलाबाई काळभोर यांची अट असते की त्या भाडेकरु म्हणून केवळ लग्न झालेल्या दांपत्याचाच विचार करतील. लीलाबाईंचा पुतण्या बळी त्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून असतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने लीलाबाईंसाठी हा मुद्दा अतिशय महत्वाचा असतो. येथे धनंजय अशी युक्ती सुचवतो की परश्या आणि सुधीर यांनी अनुक्रमे धनंजय आणि शंतनूची बायको व्हायचे ज्यामुळे काळभोरांच्या बंगल्यात राहण्यासाठी आवश्यक असलेली "दांपत्याची अट" ते पाळू शकतील. दरम्यान चौघांनीही दुसरे घर शोधण्यासाठी चालू असलेला खटाटोप सुरुच ठेवायचा. सुरुवातीला परश्या आणि सुधीर या प्रस्तावाला विरोध करतात पण दुसरा काहीच पर्याय राहिला नसल्याने शेवटी तयार होतात. अशा प्रकारे धनंजय - पार्वती (परश्या) आणि शंतनू - सुधा (सुधीर) हे "जोडीने" लीलाबाईंच्या बंगल्यात राहायला जातात.

    त्यांचे नाटक अपेक्षेप्रमाणे यशस्वी होत असतानाच लीलाबाईंची भाची मनीषा आपली मैत्रीण सुषमा हिच्यासोबत सुटीसाठी पुण्याला येते. सुषमा ही कॉलेजमधली शंतनूची प्रेयसी. मनीषाला पाहून सुधीर तिच्या प्रेमात पडतो. या काळातच धनंजयने त्याच्या बॉस माधुरी आणि परश्याने आपली बालमैत्रीण कमळी यांच्याबरोबर सूत जमवलेले असते.

    अनेक समज-गैरसमजांनंतर शेवटी धनंजय-मित्रमंडळींचे भांडे फुटतेच. मात्र लीलाबाईंना त्यांनी केलेली मदत आणि बळीपासून लीलाबाईंचा केलेला बचाव पाहून लीलाबाई त्यांना क्षमा करतात.

    [संपादन] उल्लेखनीय

    चित्रपटात खालील गाणी आहेत

    [संपादन] बाह्यदुवे