बेळगांव

From Wikipedia

बेळगांव हे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर-पश्चिमी कर्नाटक या सीमाभागातील मार्कंडेय नदी किनाऱयावरील एक सुंदर शहर आहे. बेळगाव समुद्र सपाटी पासुन २५०० फुट(७६२ मिटर) उंचीवर वसले आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

कदाचित बेळगावचे जुने नाव वेणुग्राम (बांबुचे खेडे) असावे. १२ व्या शतकाच्या उत्तरर्धात राट्टां नी त्यांची राजधानी सौंदत्ती येथुन बेळगाव येथे हलविली. बेळगांव येथे १०० एकर परिसराचा एक किल्ला आहे. या किल्यात राट्टांचा अधिकारी बिचीराजा याने १२०४ मध्ये 'कमल बस्ती' या सुंदर वास्तुची निर्मिती केली. 'कमल बस्ती' वास्तुच्या आत छतास सुदंर कमळ आहे. 'नेमीनाथ तिर्थंकार' यांची प्रतिमा आहे. इतर ठिकाणी या किल्याचा बांधकामाचे वर्ष १५१९ असे आहे . (या वर्षा बद्दल तज्ञांनी योग्य दुरुस्ती करावी. या किल्यात काही जैन मंदीरे, मारुती मंदीर आहेत. चालुक्य बांधकामाचे वैशिष्ट्य सर्वत्र आढळते. शाहपुर हा शहराचा विभाग सांगली राज्याचा आणि वडगाव हे छोटे कुरुंदवाड या राज्यात होते .वडगाव जवळ सात्वाहन कालिन बुद्ध आवशेष मिळाले.

या भागात मराठी बोलली जाणारी प्रमुख भाषा असुन कन्नड हि शासकिय भाषा असली तरी महानगर पालिकेचे काम दोन्ही भाषात चालते.[1] बेळगाव हे क्षेत्र कर्नाटक राज्यात असले तरी स्थानिक जनता आणि महाराष्ट्रराज्य व समस्त मराठी मंडळींची इच्छा हे क्षेत्र महाराष्ट्र राज्यात असावे अशी आहे.बेळगांवाला इंग्रजीत Belgaum असे म्हणतात.

[संपादन] सीमाविवाद

अधिक माहितीसाठी पहा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न

बेळगाव जिल्हयात मराठी भाषिकांचे बाहुल्य असतानाही बेळगावास महाराष्ट्रा पासुन तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून तेथील जनता सनदशीर व शांततामय मार्गाने लढा देत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्ष बेळगांव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करीत आहे तर कर्नाटक शासन महाजन आयोगच्या शिफारसी लागू कराव्यात अशी मागणी करत आहे. महाराष्ट्राने हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात मांडला असून १७ जानेवारी २००७ पासून त्याची सुनावणी सुरु होणार आहे.

[संपादन] शैक्षणिक स्थान

महविद्यालये

[संपादन] काळरेषा (TimeLine)

  • ११९९ - किल्यात रट्ट राजा कार्तिविर्य ४था याचा कन्न्ड भाषा नागरी लिपी शिलालेख स्तंभ.
  • १२०० - राट्टांची राजधानी.
  • १२०४ - 'कमल्बस्ती'ची निर्मिती.
  • --- - सेवुनास(यादव) राज्य.
  • १२६१, किल्यात सेवुना(यादव)कृष्णा याचा कन्न्ड भाषा नागरी लिपी शिलालेख स्तंभ.
  • --- - विजयनगर चे आधिपत्य.
  • १४७४ - बहमनी सुलतान महमुद गावनने बेळगाव जिंकले
  • --- - फ़ारसी शिलालेखात बिजापुरच्या सरदार असदखानाने किल्यात 'साफ़ा मस्जीद' चे बांधकाम केल्याचा उल्लेख.'साफ़ा मस्जीद' ला ३ दरवाजे, प्रवेशद्वारास फुलाफुलांची आणि Calligraphy नक्षीकाम.
  • --- - आदीलशहा ने किल्याचे पुनरुज्जीवन केले.
  • १५८५-८६ शेरखानने किल्यात जामा मस्जीद बांधली. या मस्जीदी जवळ खंजर वली चा दर्गा आहे.
  • --- - मुघल राज्य. आझमनगर असे नाम:करण.
  • --- - मराठा राज्य
  • १८१८ - ब्रिटीश राज्य.
  • १९४७ - स्वतंत्र भारत गणराज्य १९४७-१९५६ बॉंबे प्रेसिडेंसीचा भाग.
  • १९५६ - कर्नाटक राज्याचा भाग

[संपादन] बेळगांव जिल्हा

बेळगांव हे जिल्हा केंद्र असून शहरासाठी महानगर पालिका आहे. जिल्ह्यात १० तालुके आहेत.

  • बेळगांव तालुका
  • हुक्केरी तालुका
  • चिक्कोडी तालुका
  • अथनी तालुका
  • रायबाग तालुका
  • गोकाक तालुका
  • रामदुर्ग तालुका
  • सौंदती तालुका
  • बैलहोंगल् तालुका
  • खानापुर तालुका


[संपादन] संदर्भ

[संपादन] जास्त माहीतीसाठी

इतर भाषांमध्ये