चाणक्य मंडल
From Wikipedia
अनुक्रमणिका |
[संपादन] 'चाणक्य मंडल परिवार'
[संपादन] संकल्पना
स्वतः चं व्यक्तिमत्त्व उत्तम आणि समृद्ध असं घडवून ते या देशाचे प्रश्न सोडवण्याच्या कामी लावण्याचं स्वप्न पाहणाऱ्या युवक- युवतींसाठी 'चाणक्य मंडल परिवार' ही संघटना आहे.
जे दारिद्र्याचं समर्थन करत नाहीत आणि दारिद्र्यानं खचूनही जात नाहीत, जे श्रीमंत होण्याची इच्छा बाळगण्यात काही गैर समजत नाहीत, पण ज्यांचा नीतिमंत मार्गानंच श्रीमंत होण्याचा निश्चय आहे आणि आपल्या बरोबर आपल्या देशाला श्रीमंत करण्याचं आणि श्रीमंतीचं समतापूर्ण वाटप करण्याचं स्वप्न ज्यांना पडतं अश्या कर्तृत्ववान, प्रतिभावान युवक- युवतींसाठी 'चाणक्य मंडल परिवार' ही संघटना आहे. ज्यांना साहसाची, पराक्रमाची, देशभक्तीची स्वप्न पाहण्याचा संकोच वाटत नाही आणि अशी स्वप्न सत्यात आणताना कधी अपयश आलं तर भीती वाटत नाही अश्या निर्भय, चैतन्यशाली युवक- युवतींसाठी 'चाणक्य मंडल परिवार' ही संघटना आहे.
कोणत्याही प्रकारे जातपात, पंथ, भाषा,लिंग, या भेदांची विषमता न मानणाऱ्या, समतेची साधना करणाऱ्या आधुनिक, चिकित्सक, बंडखोर, बिनधास्त आणि विशाल दृष्टीच्या युवक- युवतींसाठी 'चाणक्य मंडल परिवार' ही संघटना आहे.
अध्यात्म हा भारताचा आत्मा आहे. पण अंधश्रध्दाळू, शब्दबंबाळ आणि जीवनापासून पळ काढणारं निवृत्तिवादी अध्यात्म नाही, तर शास्त्रनिष्ठ, विवेकनिष्ठ, कृतीप्रवण, प्रवृत्तिवादी, आनंदी हसरं अध्यात्म अशी ज्यांची श्रद्धा आहे अश्या युवक- युवतींसाठी 'चाणक्य मंडल परिवार' ही संघटना आहे.
अत्याधुनिक शास्त्रांनीही सिद्ध होत चाललेल्या अद्वैताचा विचार म्हणजे अध्यात्माचा मुख्य आशय. अंती सत्य एक आहे म्हणून विश्वही एक आहे हे अद्वैताचं भान आहे. त्यातून सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता हा सहज स्वभाव बनतो. अश्या युवक- युवतींसाठी 'चाणक्य मंडल परिवार' ही संघटना आहे.
[संपादन] सूत्र
नवीन उगवणाऱ्या पिढीनं आता स्वतःचं स्वतःच आणि देशाचं भवितव्य घडवण्याची सूत्रं हातात घ्यायला हवीत. आमच्यासमोर आदर्शच नाहीत असं रडत बसण्यापेक्षा आम्हीच आदर्श घडवू अशी हिंमत धरायला हवी. भूतकाळात गुंतून न पडता, पण भूतकाळाचा अभ्यास करत, वर्तमानकाळानं निराश न होता एकविसावं शतक अंगावर घेण्याचं वेड लागलेली आणि संपूर्ण विश्वाचं भान असलेली एक अख्खीच्या अख्खी पिढी उभी राहायला हवीय, नव्या युवक-युवतींमधून. 'चाणक्य मंडल परिवार' ही संघटना त्यांच्यासाठी आहे.
आपण निवडलेल्या व्यवसायाचा देशप्रश्ननांशी कसा, कुठे संबंध ते जाणून घेऊन तिथे देशप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्य करा - हे 'चाणक्य मंडल परिवार' मांडत असलेलं चांगलं आयुष्य जगण्याचं पॅकेज आहे. हे समजणाऱ्या उत्साही युवक- युवतींसाठी 'चाणक्य मंडल परिवार' ही संघटना आहे.
कला, साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट,खेळ,व्यायाम ह्यापासून ते शास्त्र, तंत्रज्ञान, संगणक,ह्या पर्यंत आणि ग्रामीण विकास,आरोग्य, शेती, पिण्याचं पाणी, ह्यापासून ते राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ह्यापैकी कशाचीही ज्यांना 'ऍलर्जी' नाही उलट जीवन सर्व अंगांनी आनंदानं जगत जे आपापल्या निवडलेल्या क्षेत्रात 'देशकारण' करण्याचं ध्येय बाळगतात युवक- युवतींसाठी 'चाणक्य मंडल परिवार' ही संघटना आहे.
आपण निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा यांचा तेजस्वी आविष्कार करणं' म्हणजेच देशभक्ती. अशे देशभक्त होण्यासाठी ज्यांना आनंदपूर्वक कष्ट, व्यासंग, तपस्या, करायची आहे युवक- युवतींसाठी 'चाणक्य मंडल परिवार' ही संघटना आहे.
ही उद्दिट्यं, ही धेय्यं, ही स्वप्नं, साध्य करण्याचे अनेक मार्ग असू शकतात. जितक्या व्यक्ती तितके हे मार्ग असू शकतात. कोणत्याच मार्गाची शक्यता बंद न करता आणि कोणता तरी एकच मार्ग सर्वंकष न समजता 'चाणक्य मंडल परिवार' नं एक सुरुवात केली आहे.
[संपादन] कार्यक्रम
युवापिढी म्हणजे सर्वसाधारणपणे वयोगट १४ ते ३०. हा वयोगट डोळ्यांसमोर ठेवून युवक-युवतींना सर्वप्रकारच्या स्पर्धापरीक्षा, व्यवसाय मार्गदर्शन, उद्योजकता विकास आणि व्यक्तिमत्त्व विकसन यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन करतं असं केंद्र म्हणजे 'चाणक्य मंडल परिवार'
सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षा म्हणजे इयत्ता दहावीतल्या NTS पासून ते बँकिंग, संरक्षण, कारकून भरती, तसंच UPSC द्वारे IAS,IFS,IPS, केंद्रीय सेवा आणि MPSC द्वारे उपजिल्हाधीकारी , पो. उपअधिक्षक , तहसीलदार, गट विकास अधिकारी, अन्य राज्यसेवा अश्यांसारख्या वरिष्ठ पदांवर अधिकारी ज्या परीक्षांमधून निवडले जातात अश्या सर्व स्पर्धापरीक्षा. या परीक्षांची उत्तम तयारी करून उत्तम अधिकारी- कार्यकर्ता अधिकारी - व्हायचा निश्चय करून जर युवक- युवती शासकीय सेवांमध्ये भरती झाले तर चांगले बदल घडतील. स्वतः स्वच्छ, कार्यक्षम आणि लोकाभिमुख असतानाच सरकारी यंत्रणा सुद्धा तशीच करण्याचा निश्चय केलेले चारित्र्यसंपन्न आणि कर्तृत्वसंपन्न तरुण सर्व पातळ्यांवर सरकारी, सार्वजनिक सेवांमध्ये पाठवण्यासाठी तयार करणं हे 'चाणक्य मंडल परिवार' चं उद्दिष्ट आहे.
पण केवळ स्पर्धापरीक्षांची उत्तम तयारी करून घेण्यापाशी 'चाणक्य मंडल परिवार' ला थांबायचं नाही, तर तरूण पिढीला सर्व प्रकारचं करिअर मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध करून द्यायचं आहे. युवक-युवती ज्यावेळी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक करिअरचा विचार करतात तेव्हाच त्यांना योग्य निर्णय घ्यायला मदत होईल असं शास्त्रीय मार्गदर्शन उपलब्ध असण्याची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्याचा 'चाणक्य मंडल परिवार' चा प्रयत्न आहे.
युवकांच्या बुद्धीचा कल ओळखण्यासाठी त्यांच्या Aptitude Tests घेऊन त्या युवकाला योग्य करिअर निवडायला 'चाणक्य मंडल परिवार' मदत करते.
यातूनच पुढे युवकांना रोजगार विषयक मार्गदर्शन सुद्धा 'चाणक्य मंडल परिवार'च्या माध्यमातून केले जाते. यापुढच्या काळात तरुणांनी केवळ नोकऱ्या शोधणारे न राहता नोकऱ्या देणारे- नोकऱ्या निर्माण करणारे- संपत्ती निर्माण करणारे होण्याची उमेद बाळगली पाहिजे. श्रीमंत होण्याची आकांक्षा बाळगण्यात काही चूक नाही. उलट नीतीमंत श्रीमंती मिळवण्याची महत्त्वाकांक्षा तरुण पिढीनं बाळगलीच पाहिजे.त्यासाठी उद्योजकतेची वाढ घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 'चाणक्य मंडल परिवार' ची उद्योजकता विकास केंद्र त्यासाठी उत्तम मार्गदर्शन उपलब्ध करून देतात. नवीन पिढीनं अधिकाधिक लक्ष स्वयंरोजगाराकडे द्यावं असा 'चाणक्य मंडल परिवार' चा प्रयत्न असेल.
स्पर्धापरीक्षेतलं यश, यशस्वी शैक्षणिक आणि व्यावसायिक करिअर, तसंच स्वयंरोजगाराबरोबरच उद्योजकता विकास या उद्दिष्टांकडे व्यक्तिमत्त्व विकसनाच्या रस्त्यानं पोचायचा मार्ग आपण तयार करतो आहोत. आधुनिक काळात विकसित झालेल्या शास्त्रीय तत्त्वांच्या आधारे व्यक्तिमत्त्व विकसन करत असतानाच त्या तत्त्वांचा मेळ भारतीय मूलभूत तत्त्वांशी कसा घालायचा याचं शिस्तबद्ध प्रशिक्षण 'चाणक्य मंडल परिवार' द्वारे युवकांसाठी उपलब्ध करून दिलं जातं.
त्याहीपुढे जाऊन केवळ वैयक्तिक, आत्मकेंद्रित व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअरपाशीच न थांबता युवकांनी देशप्रश्नांशी आपल्या व्यक्तिमत्त्वाचं / करिअरचं नातं कसं जोडावं याचं प्रशिक्षण देतं. म्हणून 'चाणक्य मंडल परिवार' ची ध्येयवाक्ये आहेत :
१) वैश्विकतेचे भान आणि कर्तृत्व असलेल्या युवापिढीसाठी...... आणि
२) राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ तयार व्हावेत म्हणून ......
--~~~~ 'चाणक्य मंडल परिवार' १५५७, सदाशिव पेठ, नवी पेठ विठ्ठल मंदिराजवळ, पुणे ( महाराष्ट्र) ४११०३० फोन नं. (०२०) २४३३८५४२ फॅक्स (०२०) २४३३४२६४ ईमेल : chantank@pn2.vsnl.net.in संकेतस्थळ:- http://chanakyamandal.org
Neelkant 07:13, 7 फेब्रुवारी 2006 (UTC)