ययाति, कादंबरी
From Wikipedia
|
||||
---|---|---|---|---|
लेखक | वि. स. खांडेकर | |||
साहित्य प्रकार | कादंबरी | |||
प्रकाशन संस्था | ||||
प्रथमावृत्ती वर्ष | ||||
सध्याची आवृत्ती | ||||
पुरस्कार |
[संपादन] उपयोग
{{पुस्तक| |नाव = |लेखक = |प्रकार = |प्रकाशक = |प्रथमावृत्ती = |सध्या = |पुरस्कार = }}
ययाति ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्या वेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य नव्हे ह्याची जाणीव होते. इ.स. १९७२ साली वि.स. खांडेकरांना ययाति कादंबरीसाठी भारतातील साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
[संपादन] कथानक
सावधान: खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे. |
कादंबरीची सुरुवात देव दानव युद्धापासून होते. नहुषाच्या मदतीने देवगण युद्ध जिंकतात पण इंद्राला इंद्रपद मुकावे लागते. इंद्रपदाने गर्वित नहुष ताळतंत्र सोडुन वागायला लागतो. इंद्रपदासोबत इंद्राणीचा ह्व्यास त्याला सप्तर्षीच्या पालखीत प्रवास करायला लावतो. उतावीळ झालेला नहुष वृद्ध गौतम ऋषीचा अपमान करतो. अपमानीत गौतम ऋषी त्याला शाप देतात - "ह्या नहुषाची मुले कधिही सुखी होणार नाहीत" आणी त्याचे स्वर्गपतन होते. नहुषाचे दोन पुत्र, यति आणी ययाति. यति लहानपणी राजविलासापासून दूर संन्यासी जीवन व्यतित करतो.
ह्याला समांतर देव दानवाच्या युद्धात, शुक्राचार्याच्या संजीवनी विद्येच्या ज्ञानाने दानवाचे पलडे भारी पडते. संजीवनी विद्याप्राप्तीसाठी देवांचे कारस्थान सुरु होते. कारस्थानातील मुख्य पात्र बृहस्पतीपुत्र कच, संजीवनी विद्येच्या प्राप्तीसाठी शुक्राचार्याचा शिष्य बनतो. शुक्रचार्याची पुत्री देवयानी त्याच्यावर मोहित होते.